अमित सिंघी म्हणाले की, जगातील विविध तज्ज्ञांच्या मते, 2030 च्या दशकाच्या सुरुवातीस क्वांटम संगणन इतके सक्षम होण्याची शक्यता आहे की ते पारंपरिक क्रिप्टोग्राफी मोडू शकतील. याच पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांनी ‘पोस्ट-क्वांटम क्रिप्टोग्राफी’कडे वाटचाल सुरू केली आहे. या संक्रमणासाठी सर्वप्रथम संस्थांनी आपल्या प्रणालीतील क्रिप्टोग्राफीचा सखोल आढावा घेणे आवश्यक आहे. त्यानंतर जोखीम मूल्यांकन, धोरण आखणी, अंमलबजावणी आणि सातत्याने निरीक्षण या टप्प्यांमधून ‘क्वांटम-सेफ’ प्रणाली विकसित करावी लागेल. यामध्ये शासकीय यंत्रणा, खाजगी उद्योग, शैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय मानक संस्था यांचे समन्वित प्रयत्न आवश्यक ठरणार आहेत.
क्वांटम सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर जनजागृती, सशक्त प्रशासकीय यंत्रणा, तांत्रिक क्षमता विकास, संशोधन आणि नवोन्मेष यांना प्राधान्य देणे गरजेचे असून भविष्यातील सायबर सुरक्षेचा पाया आजच मजबूत करणे ही काळाची गरज असून त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment