Friday, 17 April 2026

विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध भारत असे नसून 'सर्वे भवन्तु सुखिनः' हा विकसित भारत

 भारतातील प्रत्येक राज्याची वेशभूषाभाषानृत्य व खाद्य संस्कृती वेगळी आहे. ही विविधता हीच देशाची शक्ती आहे. संपूर्ण देश फुलांच्या हराप्रमाणे एका सांस्कृतिक धाग्याने बांधला आहे. 'एक भारत श्रेष्ठ भारतया उपक्रमामुळे प्रत्येक राज्याला इतर राज्यांची संस्कृती समजण्यास मदत होतेअसे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध भारत असे नसून 'सर्वे भवन्तु सुखिनःहा विकसित भारत या संकल्पनेमागील विचार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. शासन आणि समाजाने खांद्याला खांदा लावून काम केल्यास विकसित भारत निश्चितपणे साकार होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी दोन्ही राज्यांचे सौंदर्यइतिहासवारसास्वातंत्र्यलढासंस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शविणारे माहितीपट दाखवण्यात आले. यावेळी 'म्हारो राजस्थानहे राजस्थानचे व 'बंदे उत्कल जननीहे ओडिशाचे राज्यगीत ऐकविण्यात आले.    

कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरोडकरसमितीचे सदस्यपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) डॉ.अविनाश ढाकणेराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेराज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व पालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर उपस्थित होते. 

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (प्रशासन) करुणा वावडणकर यांनी आभार प्रदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi