या उपक्रमाचा प्रत्यक्ष परिणाम स्पष्ट करताना रावल यांनी ‘मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’चा उल्लेख केला. या संस्थेने वंचित आणि दुर्लक्षित घटकांतील मुलांसोबत काम करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे, जीवनकौशल्ये विकसित करणे आणि शाश्वत रोजगाराच्या संधी मिळवून देणे यासाठी मोठे योगदान दिले आहे. गेल्या १५ वर्षांत एका पिढीला अनिश्चिततेतून संधींकडे आणि असुरक्षिततेतून आकांक्षेकडे नेण्याचा हा प्रवास आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ‘अक्षय पात्र फाउंडेशन’च्या माध्यमातून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळत असून, त्यामुळे त्यांच्या शिक्षणात सातत्य राखले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे महाराष्ट्राला जागतिक स्तरावर ओळख मिळाली असून, ६० हून अधिक देशांतील सहभागामुळे राज्याची मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्याची क्षमता अधोरेखित झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. हा उपक्रम विश्वासाचा क्षण, परिवर्तनाची शक्ती आणि भारत काय साध्य करू शकतो याचे द्योतक आहे, असे सांगत रावल यांनी आपण केवळ अंतरासाठी नव्हे, तर बदलासाठी धावूया, असे आवाहन केले.
No comments:
Post a Comment