अमित पुंडे यांनी सांगितले की, या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात देशभरातून राष्ट्रीय स्पर्धेतून निवड झालेले उत्कृष्ट युवा सहभागी एकत्र येणार आहेत. दोन दिवसीय विचारमंथन सत्रात शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विषयविशेषज्ञ सहभागी होऊन केंद्रीय अर्थसंकल्प 2026 शी निगडित विषयांवर चर्चा करतील. देशभरातील 17 ठिकाणांहून 15,000 हून अधिक युवक या संवादात सहभागी होणार आहेत.
देशभरातून 12 लाखांहून अधिक युवकांनी सहभाग नोंदवला असून 46,500 पेक्षा अधिक निबंध प्राप्त झाले आहेत. मुंबईतील अंतिम फेरीत सहभागी युवक विकसित कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी कल्याण बळकटीकरण तसेच मानवी संसाधन शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार या विषयांवर चर्चा पुढे नेतील. 12 एप्रिल रोजी सहभागींचे आगमन व नोंदणी होईल आणि दुपारी महिला युवा संसद आयोजित केली जाईल. 13 एप्रिल रोजी उद्घाटन समारंभ, माय भारत सत्र आणि दोन तज्ज्ञ पॅनल चर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment