टीबीमुक्त भारतासाठी १०० दिवसांची विशेष मोहीम
· राज्यात व्यापक अंमलबजावणी
मुंबई, दि.२३ : भारत सरकारतर्फे जागतिक क्षयरोग दिन २०२६ निमित्त “टीबी मुक्त भारत अभियान – १०० दिवसांची विशेष मोहीम” २४ मार्चपासून देशभरात राबविण्यात येणार असून, महाराष्ट्रातही या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने ही मोहीम राज्यातील सर्व जिल्हे व शहरी भागांमध्ये राबविण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment