प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व साहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत पदविका संस्थांशी समन्वय साधून इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळणारे श्रेयांक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अतिरिक्त श्रेयांक म्हणून नोंदविण्यात येतील. या करारामुळे पदविका विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीस चालना मिळण्यासोबतच त्यांना परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांना यावेळी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment