Friday, 6 March 2026

सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरण समतोल आणि जनहिताला प्राधान्य

 सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरण समतोल आणि जनहिताला प्राधान्य

-         मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. ५ : सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरण समतोल राखत स्थानिक जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे,' असे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्गच्या विविध पर्यावरणविषयक विविध मुद्द्यांवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीस माजी मंत्री व आमदार दीपक केसरकरआमदार निलेश राणेपर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोजसिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेउपवन संरक्षक मिलनकुमार शर्मामहाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव भारत सिंगतसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi