सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरण समतोल आणि जनहिताला प्राधान्य
- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. ५ : सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरण समतोल राखत स्थानिक जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे,' असे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्गच्या विविध पर्यावरणविषयक विविध मुद्द्यांवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीस माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपवन संरक्षक मिलनकुमार शर्मा, महाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव भारत सिंग, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment