Tuesday, 24 February 2026

कृषी क्षेत्र, शेतकरी सक्षमीकरणावर भर

 कृषी क्षेत्रशेतकरी सक्षमीकरणावर भर

            ‘महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण’ लागू करून शेती अधिक उत्पादक करण्यावर भर देण्यात आला आहेनैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत 3.22 लाख हेक्टर क्षेत्रावर 7,000 शेतकरी गट कार्यरत आहेतकापूस व सोयाबीन खरेदीपीकविमा व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ₹15,576 कोटींची थेट मदत देण्यात आली.

            ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनाअंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्यात येत असून 44 लाख शेतकऱ्यांना ₹25,087 कोटींचा दिलासा देण्यात आला आहेसौर पंप बसविण्यात राज्याने विक्रम प्रस्थापित केला असून त्याची दखल गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतलीतसेच राज्याच्या जल संधारण आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम राज्याचे प्रथम पारितोषिक महाराष्ट्राला प्राप्त झाले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi