Wednesday, 25 February 2026

उत्तर महाराष्ट्र कनेक्टिव्हिटीसाठी खानदेश एक्सप्रेसवेचा डीपीआर प्रक्रियेत

 उत्तर महाराष्ट्र कनेक्टिव्हिटीसाठी खानदेश एक्सप्रेसवेचा डीपीआर प्रक्रियेत

-राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

मुंबईदि.२४ : राज्यातील जनतेचा प्रवास सुकर व विनासायास व्हावा. राज्यातील महत्वाच्या शहरांकडे सहा ते आठ तासात पोहचता यावे.  यासाठी राज्यात नियंत्रित द्रुतगती मार्गाचे जाळे निर्माण करण्यास शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्याच अनुषंगाने उत्तर महाराष्ट्राच्या जलद कनेक्टिव्हिटीसाठी जळगावधुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी १०५ किलोमीटर लांबीच्या खानदेश प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग प्रकल्पाचे प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात येत असल्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi