कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना
जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न
-रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले
मुंबई, दि. २४ : कोकणातील हवामान बदलामुळे आंबा मोहोराचे नुकसान व फळधारणा कमी झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार क्षेत्रीय पाहणी सुरू असून याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी विधान परिषदेत सांगितले.
कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्याबाबत विधानपरिषदेत सदस्य सुनील शिंदे व प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य भाई जगताप, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment