Monday, 13 October 2025

कृषी सखी काम करत असून

 अनेक ठिकाणी नदीकडेला शेतीत माती राहिली नाहीवीजरोहित्र (ट्रान्सफॉर्म)वीजपंप राहिले नाहीत. त्यामुळे या नुकसानीसाठी साधारणत: ३१ हजार ६२७ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. अजूनही त्यात काही बाबींचा समावेश करण्यात येईल. यात कोरडवाहू शेतीला १८ हजार ५०० रूपयेहंगामी बागायत शेतीला २७ हजार आणि बागायती शेतीला ३२ हजार ५०० रुपये हेक्टरी असे आणि रब्बीसाठी पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी १० हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

 

राज्यात ३ हजार ५०० कृषी सखी काम करत असून त्या स्वत: प्रशिक्षण घेऊन तेथील महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्याचा अभिमान असून कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सुरू केलेल्या मोठ्या योजनेची माहिती घेऊन सेंद्रीय शेतीमधील तंत्रज्ञानकृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीशेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी कृषी सखींनी मार्गदर्शन करावेअसे आवाहनही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi