भारत पर्व अंतर्गत राज्यात विविध उपक्रम
महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांना लोहपुरुषांच्या विचारांची प्रेरणा मिळून सामाजिक बांधिलकी अधिक बळकट होईल, या विचारातून क्रीडा मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, माय भारत, एनएसएस, एनसीसी तसेच स्थानिक प्रशासन संयुक्तिकरित्या जिल्हास्तरीय पदयात्रा काढणार असून प्रत्येक जिल्ह्यात ८ ते १० कि.मी. अंतराच्या जिल्हास्तरीय पदयात्रा, निबंध आणि वादविवाद स्पर्धा, सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये, नशा मुक्ती भारत प्रतिज्ञा, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, संस्था स्वदेशी मेळावे, आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा, सांस्कृतिक सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक राज्याद्वारे अशा अभिनव स्पर्धा आणि कार्यक्रमांतून देशभर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment