राज्यातील ५०० मंदिरे, ६० राज्य संरक्षित किल्ले आणि
१८०० बारवा यांच्या संवर्धनासाठी बृहृत आराखडा
तीन जिल्ह्यांचे डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनाझेशन निर्माण करणार
- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. १६ : राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राज्य शासनाकडून मोठा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील ५०० मंदिरे, ६० राज्य संरक्षित किल्ले आणि १८०० बारवा (जलस्रोत) यांच्या संवर्धनासाठी बृहृत आराखडा तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिल्या आहेत. या बृहृत आराखड्यामध्ये त्यांच जतन, संवर्धन आणि यापुढे पर्यटक, फुटफॉल वाढवणे याचा समावेश असेल मैत्रीच्या सोबतीने पुरातत्व विभाग यांमध्ये नोडल एजन्सी म्हणून काम करेल, अशा पद्धतीचा निर्णय आज घेण्यात आला. शिवाय पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील ऐतहासिक स्थळे, मंदिरे, गडकिल्ले यांचा स्वतंत्र एकात्मिक बृहत् आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
No comments:
Post a Comment