राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, एकल महिला हा राज्यातील दुर्लक्षित प्रश्न आहे. या सर्वेक्षणातून त्यांची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दुरवस्था समोर आली आहे. आगामी कृती आराखड्यामुळे या महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण होईल आणि महिला सन्मान व सामाजिक समावेश साध्य करता येईल.
परभणी जिल्ह्यातील ग्राम स्तरावरील सर्वेक्षणात निरक्षर व शेतमजुर महिला असून
जमिनीचा मालकीहक्क, राहते घर व उत्पन्नाचे साधन यांचा अभाव यामुळे या महिलांना आरोग्य, निवारा, उपजीविका आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधांची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३४ हजार ७३३ एकल महिला असल्याचे अंगणवाडी सेविकांच्या मदतीने झालेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आली आहे आहे. या महिलांपैकी विधवा आणि ज्येष्ठ नागरिक आहेत.
No comments:
Post a Comment