केंद्रीय मंत्र्यांकडून महाराष्ट्राचे अभिनंदनदेशाची प्रतिमा ही स्वच्छ आणि सुंदर शहरांमधून
२०२३ मध्ये केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून २०२४ ला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात १० शहरांना बक्षीसे मिळाली आहेत. त्यातील ७ शहरे सुपर स्वच्छ लीगमध्ये आल्याबद्दल केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मोहन लाल खट्टर यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले.
देशाची प्रतिमा ही स्वच्छ आणि सुंदर शहरांमधून निर्माण होत असते, त्यासाठी प्रत्येक शहरे स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री मोहन लाल यांनी केले. उघड्यावरच्या हागणदारी मुक्त योजनेपासून स्वच्छतेची सुरुवात झाली आता प्रत्येक घरांमध्ये शौचालयांचा वापर होऊ लागला आहे, हे एक मोठे यश असून शहरांमधील कचऱ्याचे ढीग, राडारोडा, दूर करुन अपेक्षित यश साध्य करण्यासाठी गतीने प्रयत्न करण्याची आवश्यकताही केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवली. ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमात बक्षीसप्राप्त नागरी स्वराज्य संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि क्रमवारीत खाली असलेल्या शहरांना सोबत घेऊन त्यांनाही स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत वर आणण्याचे आवाहनही त्यांनी केले
No comments:
Post a Comment