मिठी नदी पुनरुज्जीवनासाठी काम करणार – सिद्धेश कदम
महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम म्हणाले की, एकल वापर प्लास्टिक कमी करण्यासाठी जनतेची साथ आवश्यक आहे. त्याचबरोबर सध्या समुद्राचे पाणी काळे होत आहे. हा रंग बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मुंबईतील मिठी नदीच्या पुनरुज्जीवनासाठीही आम्ही काम करत आहोत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. ढाकणे यांनी प्रास्ताविकात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. मात्र, नागरिकांनीही सहभाग घेणे आवश्यक आहे. विभागाच्या वतीने राज्यात २२ मार्चपासून विविध उपक्रम सुरू असून आतापर्यंत सुमारे एक हजाराहून अधिक जनजागृतीपर कार्यक्रम झाले आहेत. पर्यावरण परिषदेतील तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वातावरणीय बदल कृती आराखडा व महापर्यावरण ॲपचे अनावरण
यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य वातावरणीय बदल कृती आराखडा, माझी वसुंधरा अभियान ६.० टूल किट चे तसेच सल्फरडाय ऑक्साईड इमिशन ट्रेडिंग स्किमच्या संकल्पनेचे अनावरण करण्यात आले. प्रदूषणासंदर्भातील तक्रारीसाठी तयार करण्यात आलेल्या 'महा पर्यावरण' ॲप्लिकेशनचे अनावरणही मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयोजित विविध परिसंवादामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांनी सहभाग घेऊन चर्चा केली.
0000
No comments:
Post a Comment