छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यातून जगण्याची प्रेरणा मिळते - सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार
छत्रपती संभाजी महाराज हे प्रेरणा असल्याने 'राज्य प्रेरणागीत पुरस्कार' जाहीर करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर अत्यंत बुद्धिमान आणि बहुभाषिक व्यक्तिमत्त्व होते. मराठीसोबत संस्कृत, हिंदी, इंग्रजी व अन्य भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी साहित्यनिर्मिती, ग्रंथलेखन, कविता आणि विविध प्रकारच्या लिखाणातून अनमोल कार्य केले. त्यामुळे राज्याच्या प्रेरणागीत पुरस्कारासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्यापेक्षा दुसरे नाव विचारात येणे शक्य नव्हते, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यातून आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते. स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित मराठी प्रेरणागीत 'अनादि मी, अनंत मी..' हे प्रचंड आत्मबळ असलेले गीत. त्यामुळेच राज्य शासनाने हा पुरस्कार दिला असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी म्हणाले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्र, स्वातंत्र्यवीरांच्या लेखनाचा, त्यांच्या उपलब्ध भाषणांचा व त्यांच्या राष्ट्रकार्याचा अकादमिक स्तरावर अभ्यास करेल तसेच त्यावर विद्वत्तापूर्ण चर्चा घडवेल आणि सावरकरांना समर्पित असलेले केंद्र सामाजिक सुधारणा, स्वातंत्र्य आदी विचारांचा विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांच्याद्वारे अभ्यास करेल व त्याद्वारे एक जागतिक विचारमंच प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल. या केंद्राच्या वतीने प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि विद्यावाचस्पती अशा विविध अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषाशुद्धीचा विचार, प्रेम आणि आग्रह लक्षात घेऊन पुढील दोन वर्षात विज्ञान व तंत्रज्ञानातील सर्व अभ्यासक्रमातील विविध अभ्यासक्रमातील आशय हे मराठी भाषेत आणले जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारांचा अभ्यास करणारे भारतातले पहिलेवहिले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्र हे प्रबळ असावे, सक्षम असावे, संशोधकांना योग्य असं साहाय्य मिळावे या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाकडे शंभर कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव सादर केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment