Monday, 17 February 2025

तुका झालासे कळस'

 तुका झालासे कळस'

एकनाथ हे सांस्कृतिक पुनरुत्थानाचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी होत. ची वाङ्मयसेवा बहुविध आहे. त्यांचे 'एकनाथी भागवतआणि 'भावार्थ रामायणहे महत्त्वपूर्ण ग्रंथ. देशकालपरिस्थितीनुसार अगदी योग्य वेळी,एका विशिष्ट हेतूने ही रामकथा त्या वेळच्या लोकांपुढे त्यांनी ठेवली. हा हेतू राष्ट्रीय स्वरूपाचा आहे. ज्ञानेशादिकांनी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणून ठेवलेले तत्त्वज्ञान अभ्यासूनपचवून, जीवनाच्या झगड्यात प्रत्यक्ष अनुभवूनलोकांना उपदेश करण्याची पात्रता संत तुकारामांनी सिद्ध केली. यामुळेच 'तुका झालासे कळसहे त्यांच्या संबंधीचे उद्गार सार्थ ठरले आहेत. एकनाथ-तुकारामांच्या काळात आणि त्यानंतरही मुसलमान संतांनी जी मराठीची सेवा केली ती उपेक्षणीय नाही. शहा मुंतोजी ब्रह्मणी यांचा 'सिद्धसंकेतप्रबंधहा  दोन हजार ओव्यांचा  सर्वात मोठा ग्रंथ. यानंतर अंबर हुसेनशेख सुलतानशेख महंमदशहामुनी इत्यादी संतांनी यात महत्त्वाचे योगदान दिले.

               कलात्मकदृष्टीने कथा निवेदन करणे हा  विशेष मुक्तेश्वर यांच्या काव्यात दिसतो. त्यांची एकूण कविता १७००० इतकी भरेल.शिवकालीन प्रवृत्तीची आणि आकांक्षांशी पूर्णतः समरस झालेले संत कवी रामदास त्यांचा 'दासबोध',' मनाचे श्लोक','रामायणही रचना. वामन पंडित-'यथार्थदीपिका', मोरोपंत-'केकावली', रघुनाथ पंडित-'दमयंती स्वयंवर', सामराज-'रुक्मिणी स्वयंवर', कृष्णदयार्णव-'हरिवरदा', श्रीधर- 'हरिविजय', 'पांडवप्रताप','वेदांतसूर्यया पंत साहित्यातील महत्वाच्या रचना.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi