लीळाचरित्र’ : पहिला चरित्रग्रंथ
तेरावे शतक हे मराठी वाङ्मयनिर्मितीचा प्रारंभिक काळ. परिपक्वता, प्रौढता, पारमार्थिकता या गुणांनी युक्त. मराठीतील पहिला चरित्रग्रंथ म्हणून ‘लीळाचरित्रा’ला अनन्यसाधारण महत्व आहे. महानुभाव संप्रदायातील साहित्यिकांनी निर्माण केलेल्या साहित्याची विपुलता आणि वैविध्यता ही वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी आख्यानक काव्ये, भाष्ये-महाभाष्ये, सूत्रबद्ध व्याकरण, भावगीतात्मक स्वयंवरकथा, गीताटीका, स्थळवर्णने, आरत्या, पदे, भारुडे, स्तोत्रे, प्रवासवर्णन, चरित्र, टीका, विदग्ध कथाकाव्ये, टीपा अशा विविध साहित्यप्रकांरातून लेखन केलेले दिसते.
मराठीत आज अस्तित्वात असलेल्या अनेक वाङ्मयप्रकारांचा उगम महानुभाव साहित्यात शोधता येतो. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि मराठी भाषेत गीतार्थाचे सुंदर व प्रत्ययकारी निरुपण केले. सर्व समाजाला प्रेमाचा, समतेचा आणि भक्तिभावाचा उपदेश गीताटिकेच्या द्वारा करण्याचा उपक्रम ज्ञानेश्वरांनी केला.मराठी जन आणि मराठी मन घडवणारा पहिला क्रांतिकारी नेता ज्ञानदेव होय. मौलिक स्वरूपाचे तत्त्वज्ञान आणि अव्वल दर्जाचे काव्य या दोहोंचा मनोहर संगम तत्कालीन दुसऱ्या कोणत्याही भाषेत आढळणार नाही. महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार मुख्यतः इस.१५५८ मध्ये लिहिलेल्या सरस्वती गंगाधर यांच्या ‘गुरुचरित्रा’ने केला. दासोपंतांचा 'गीतार्णव' यासारखा सव्वा लाख ओवीसंख्या असलेला प्रचंड ग्रंथ मराठीत दुसरा
खूप छान
ReplyDelete