Monday, 17 February 2025

लीळाचरित्र’ : पहिला चरित्रग्रंथ

 लीळाचरित्र : पहिला चरित्रग्रंथ

तेरावे शतक हे मराठी वाङ्मयनिर्मितीचा प्रारंभिक काळ. परिपक्वताप्रौढतापारमार्थिकता या गुणांनी युक्त. मराठीतील पहिला चरित्रग्रंथ म्हणून लीळाचरित्राला अनन्यसाधारण महत्व आहे. महानुभाव संप्रदायातील साहित्यिकांनी निर्माण केलेल्या साहित्याची विपुलता आणि वैविध्यता ही वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी आख्यानक काव्येभाष्ये-महाभाष्येसूत्रबद्ध व्याकरणभावगीतात्मक स्वयंवरकथागीताटीकास्थळवर्णनेआरत्यापदेभारुडेस्तोत्रेप्रवासवर्णनचरित्रटीकाविदग्ध कथाकाव्येटीपा अशा विविध साहित्यप्रकांरातून लेखन केलेले दिसते.

मराठीत आज अस्तित्वात असलेल्या अनेक वाङ्मयप्रकारांचा उगम महानुभाव साहित्यात शोधता येतो. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि मराठी भाषेत गीतार्थाचे सुंदर व प्रत्ययकारी निरुपण  केले. सर्व समाजाला प्रेमाचासमतेचा आणि भक्तिभावाचा उपदेश गीताटिकेच्या द्वारा करण्याचा उपक्रम ज्ञानेश्वरांनी केला.मराठी जन आणि मराठी मन घडवणारा पहिला क्रांतिकारी नेता ज्ञानदेव होय. मौलिक स्वरूपाचे तत्त्वज्ञान आणि अव्वल दर्जाचे काव्य या दोहोंचा मनोहर संगम तत्कालीन दुसऱ्या कोणत्याही भाषेत आढळणार नाही. महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार मुख्यतः इस.१५५८ मध्ये लिहिलेल्या सरस्वती गंगाधर यांच्या गुरुचरित्राने केला. दासोपंतांचा 'गीतार्णवयासारखा सव्वा लाख ओवीसंख्या असलेला प्रचंड ग्रंथ मराठीत दुसरा 

1 comment:

Featured post

Lakshvedhi