मा. अमित शहा यांनी बंद दरवाजाआड वचन दिलं होतं”, हे खोटं कोण बोलतंय
हे आज महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे उमगले आहे
- आ. अतुल भातखळकर यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी खोटं बोलू शकतात, ते मा. अमित शहा यांच्याशीही बोलू शकतात. “त्यामुळे बंद दरवाजाआड वचन दिलं होतं” हे खोटं कोण बोलतंय हे आज महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे उमगले आहे अशी बोचरी टीका भाजपा मुंबई प्रभारी आ. अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी, ते सुद्धा त्यांच्या विषयाकरिता खोटं बोलू शकतात, असे मुख्यमंत्री मा. अमित शहा यांच्याशी तर सहजतेने खोटं बोलू शकतात हे आज पूर्णपणे सिद्ध झाले आहे अशी टीका आ. भातखळकर यांनी यावेळी केली. तसेच कुठल्याही मुख्यमंत्रीपदाचे वचन हे त्यांना दिले गेले नव्हते परंतु केवळ सत्तेच्या लालसेपायी स्वतः मुख्यमंत्री व्हायचे आणि स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मंत्री करायचे म्हणून हिंदुत्व, मराठी बाणा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे, हेच आजच्या छत्रपती संभाजीराजेंच्या विधानांवरून सिद्ध झालेले आहे असे म्हणत आ. भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
No comments:
Post a Comment