Sunday, 31 May 2026

सायप्रस हे युरोप, पूर्व भूमध्य समुद्र आणि मध्यपूर्वेसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार असल्याचे सांगत

 सायप्रस हे युरोप, पूर्व भूमध्य समुद्र आणि मध्यपूर्वेसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सागरी वाहतूक, लॉजिस्टिक्स, वित्तीय सेवा आणि नवोपक्रम क्षेत्रात सायप्रसची ताकद असून महाराष्ट्र  आणि भारताच्या आर्थिक भविष्यासाठी प्रवेशद्वार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी अत्यंत महत्वाची ठरेल. फिनटेक आणि डिजिटल व्यवहार क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर आदर्श निर्माण केला असून भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे अब्जावधी व्यवहार सुरक्षितपणे होत आहेत. सायप्रसच्या युरोपीय वित्तीय नेटवर्क आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील सहकार्यामुळे सीमापार वित्तीय व्यवहार आणि डिजिटल नवोपक्रमासाठी नवे मार्ग खुले होतील, असेही मुख्यमंत्री  यांनी नमुद केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, संरक्षण उत्पादन, स्वच्छ ऊर्जा, संशोधन, शिक्षण आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात येणारे जागतिक गुंतवणूकदार जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या भविष्यात गुंतवणूक करत आहे. भारत आणि सायप्रस यांच्यातील संबंध आशादायी असून भूमध्य समुद्र आणि हिंदी महासागर हे व्यापार, तंत्रज्ञान आणि सामरिक सहकार्याद्वारे अधिक जवळ येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भारत-सायप्रस आर्थिक भागीदारीसाठी पुढील दशक निर्णायक ठरणार

 भारत-सायप्रस आर्थिक भागीदारीसाठी पुढील दशक निर्णायक ठरणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईत सायप्रस ट्रेड सेंटरउभारून भारत-युरोप व्यापार संबंधांना नवी चालना देणार

सायप्रस प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस

 

मुंबई, दि. 21 : सायप्रसच्या उद्योगसमूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी. उत्पादन, नवोपक्रम आणि व्यापार क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारी निर्माण करावी. महाराष्ट्र शासन स्थिर, निर्णयक्षम आणि उद्योगपूरक असून जागतिक भागीदारीसाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये सांगितले.

सायप्रस प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्या उपस्थितीत मुंबईतील हॉटेल ताज महल पॅलेस, आयोजित या फोरममध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सह सचिव जय प्रकाश शिवहरे, फिक्कीचे (Federation of Indian Chambers of Commerce and Industry) उपाध्यक्ष विजय संकर, सीआयआयचे (Confederation of Indian Industry)  अध्यक्ष बी.थियागर्जन, सायप्रसच्या चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष स्टाव्रोस स्टाव्रू तसेच इन्व्हेस्ट सायप्रसचे अध्यक्ष इव्हजेनिअस इव्हजेनिऊ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत आणि सायप्रस यांचे संबंध केवळ भौगोलिक मर्यादांवर आधारित नसून लोकशाही, सार्वभौमत्व आणि शांततामय अस्तित्व या समान मूल्यांवर उभे आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये केलेल्या सायप्रस दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवे बळ मिळाले असून आर्थिक सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

महाराष्ट्र हे आज 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचे राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30 टक्के आणि परकीय गुंतवणुकीत 40 टक्के वाटा राज्याचा आहे. मुंबई हे जगातील वेगाने विकसित होणारे आर्थिक केंद्र बनत असून राज्यात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो नेटवर्क, लॉजिस्टिक पार्क आणि स्मार्ट शहरांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52 टक्के ऊर्जा नवीकरणीय स्रोतांतून निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच आंतरराष्ट्रीय एज्यु सिटी, मेडी सिटी आणि जीसीसी सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती श्री. फडणवीस  यांनी दिली.

१० जून तक राज्य के अधिकांश हिस्सों में मानसून के आगमन की संभावना नहीं १ जून से तूफ़ानी बारिश का अनुमान, लेकिन किसान बुआई की जल्दबाजी न करें

 १० जून तक राज्य के अधिकांश हिस्सों में मानसून के आगमन की संभावना नहीं

१ जून से तूफ़ानी बारिश का अनुमान, लेकिन किसान बुआई की जल्दबाजी न करें

 

            मुंबई, ३१ मई:- वर्तमान में राज्य के मौसम में बदलाव शुरू हो गया है, और १ जून से शुरू होने वाले सप्ताह में मौसम में और अधिक बदलाव देखने को मिलेगा। मुख्य रूप से विदर्भ, मराठवाड़ा, मध्य महाराष्ट्र और खानदेश में दोपहर के बाद बादल छाने और कुछ हद तक तूफ़ानी बारिश का अनुमान जताया गया है। कोंकण में भी आंशिक रूप से बारिश की संभावना है। इसके साथ ही, मई महीने की तुलना में राज्य के अधिकतम तापमान में गिरावट आएगी, लेकिन विदर्भ के कुछ हिस्सों, विशेष रूप से पूर्वी विदर्भ में, अधिकतम तापमान ४० डिग्री सेल्सियस से ऊपर बना रहेगा। आगामी तूफ़ानी बारिश का मानसून से कोई संबंध नहीं है, क्योंकि मानसून अभी तक केरल नहीं पहुंचा है। वर्तमान स्थिति के अनुसार, राज्य के अधिकांश हिस्सों में कम से कम १० जून तक मानसून के आगमन की कोई संभावना नहीं है।

कृषि और आपदा प्रबंधन विभागों द्वारा किसानों और आम जनता से अपील की जा रही है कि वे संभावित मौसम बदलाव को ध्यान में रखते हुए उचित एहतियाती उपाय करें:

·         किसान तूफ़ानी बारिश के भरोसे रहकर और मानसून के आगमन से पहले बुआई करने की जल्दबाजी न करें।

·         बिजली कड़कने के दौरान नागरिक और किसान अपनी तथा अपने पालतू जानवरों की सुरक्षा सुनिश्चित करें। ऐसे समय में पेड़ों के नीचे, टिन शेड के नीचे और बिजली के ट्रांसफार्मर, बिजली के खंभों या बिजली की तारों के पास खड़े होने से बचें।

000

 


--

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही १ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

 किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही

१ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

 

मुंबई, दि ३१ मे: सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.

कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी:

शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये.

विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे.


अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीक्षेत्र चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 301 वा जयंती महोत्सव

 अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्रीक्षेत्र चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 301 वा जयंती महोत्सव

 

            अहिल्यानगर, दि. 31 मे :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही आणि समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती महोत्सवात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार रामराव वडकुते, आमदार सर्वश्री काशिराम दाते, मोनिका राजळे, सुनील कर्जतकर, गोपीचंद पडळकर, विठ्ठलराव लंघे, किरण लहामटे, हेमंत ओगले, अमोल खताळ, अक्षय कर्डिले, उत्तमराव जानकर, नारायण पाटील, बाबासाहेब देशमुख, सचिन कांबळे, तसेच माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. महाराष्ट्राचा अभिमान, शौर्य, त्याग व समर्पण यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे अहिल्यादेवी होळकर होत. चौंडीची माती त्यांच्या जन्माने पावन झाली आहे. त्या न्यायप्रियता आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या युगप्रवर्तक होत्या. त्यांचा राज्यकारभार आदर्शवत होता. जनतेवर त्यांनी आईप्रमाणे माया केली. तीनशे वर्षांनंतरही देश त्यांचे स्मरण करत आहे. त्यांनी मानवधर्म जपला. अहिल्यादेवींनी अनेक वैयक्तिक आघात सहन केले; मात्र त्यातून खचून न जाता आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे. गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा शासनाने आयोजित केली. अहिल्यादेवी या दूरदृष्टी असलेल्या राज्यकर्त्या होत्या. त्यांनी समाजाच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.

अहिल्यादेवी या हिंदुत्वाचा हुंकार व शौर्याचे प्रतीक होत्या. त्यांची न्यायप्रियता, लोककल्याणकारी राज्यकारभार व जनसेवेचा वारसा आपल्यासाठी आदर्श आहे. त्यांनी सत्तेपेक्षा सेवेला आणि वैभवापेक्षा जनकल्याणाला प्राधान्य दिले. आपल्या कार्यकाळात देशभरात मंदिरे, घाट, धर्मशाळा व जलसंवर्धनाची अनेक कामे उभी केली. जलसंवर्धन क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही मार्गदर्शक ठरते. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून जलसंवर्धनाचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या निधनाचे मोठे आघात सहन करूनही त्यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवत कर्मयोगी वृत्तीने जनसेवा केली, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी 28 वर्षे आदर्श राज्यकारभार केला. त्यांनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली. देशभरातील धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार स्वतःच्या निधीतून केला. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्य करताना त्यांनी लोकसेवा आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांचे कार्य आजही आदर्शवत मानले जाते. माहेश्वरी वस्त्रउद्योगाला चालना देऊन रोजगारनिर्मिती केली. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला.

त्या पुढे म्हणाल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःसाठी धनखर्च न करता समाजकल्याणासाठी संपत्तीचा उपयोग केला. त्यामुळेच त्यांना 'लोकमाता' म्हणून ओळखले जाते. गोदा ते नर्मदा या अहिल्यादेवी जलयात्रेचा शुभारंभ यावर्षी चौंडी येथून करण्यात आला.

प्रास्ताविकात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीचे विशेष महत्त्व आहे. जयंती महोत्सवानिमित्त तीन दिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्यभर लोककल्याण, न्यायनिष्ठ प्रशासन आणि समाजहितासाठी कार्य केले. त्यांच्या कार्यातून समाजाला आजही प्रेरणा मिळते. प्रत्येकाने त्यांच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा आदर्श घेऊन समाजहितासाठी योगदान देण्याची गरज आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्यामुळे आजही संपूर्ण समाजाला प्रेरणा मिळत आहे. चौंडी ही केवळ त्यांची जन्मभूमी नसून प्रेरणास्थळ आहे. त्यांनी समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी केलेले कार्य आजही मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजाच्या विकासासाठी व सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे.

यावेळी खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनीही मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रीय शेअर बाजारातील भांडवली गुंतवणुकीविषयी आणि सायप्रस - भारतातील गुंतवणूक

 भारत ही जगातील सर्वात गतिमान अर्थव्यवस्थेपैकी एक आहे, तर युरोप ही जगातील सर्वात मोठी आणि स्थिर बाजारपेठ आहे. जगातील या दोन मोठ्या लोकशाही व्यवस्था एकत्र आल्यास सुमारे २ अब्ज लोकांची एक विशाल बाजारपेठ तयार होते. या भागीदारीमुळे दोन्ही देशांसाठी भविष्यात अनंत संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक राष्ट्रीय शेअर बाजाराचे अध्यक्ष श्रीनिवास इंजेटी यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय शेअर बाजारातील भांडवली गुंतवणुकीविषयी आणि सायप्रस - भारतातील गुंतवणूक संधीबद्दल भाष्य केले. कार्यक्रमाला सायप्रस व भारताचे राष्ट्रगीताने सुरुवात झाली. यावेळी सायप्रस देशातील प्रतिनिधी मंडळातील मंत्री, सदस्य, राष्ट्रीय शेअर बाजाराचे अधिकारी उपस्थित होते.

जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताची वाढती भूमिका प्रशंसनीय - सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स · राष्ट्रपतींच्या हस्ते 'एनएसई ' मध्ये घंटानाद

 जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताची वाढती भूमिका प्रशंसनीय

-         सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स

·         राष्ट्रपतींच्या हस्ते 'एनएसई ' मध्ये घंटानाद

 

मुंबई, दि. २१ :  सायप्रस आणि भारतामधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आता एका नवीन टप्प्यावर आले आहे.  भारताचे आर्थिक सामर्थ्य, नाविन्यता आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या भूमिका प्रशासनीय आहे, असे गौरवोद्गार सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी काढले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्थित नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती क्रिस्टोडोलाइड्स बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय शेअर बाजाराचे अध्यक्ष श्रीनिवास इंजेटी, व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान उपस्थित होते.

कार्यक्रम दरम्यान राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे घंटानाद करण्यात आला.

राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स म्हणाले, सायप्रस हा युरोपीय महासंघ आणि युरोझोनचा एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. सायप्रसकडे सध्या यूरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद आहे. या अध्यक्षपदाच्या काळात सायप्रसने भारत आणि यूरोपीय महासंघ यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सायप्रसच्या अध्यक्षपदाच्या पहिल्याच महिन्यात भारत आणि यूरोपीय महासंघादरम्यान मुक्त व्यापार करारावर सहमती झाली होती. सायप्रस हा भारत, यूरोप, पूर्व भूमध्य समुद्र आणि मध्य पूर्व या क्षेत्रांना जोडणारा एक नैसर्गिक दुवा म्हणून काम करतो.

Featured post

Lakshvedhi