Sunday, 7 June 2026

नागपुरात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांवर भर

 नागपुरात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांवर भर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

· खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता

नागपूर, दि. 7 : नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या सोयी-सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार संजय भेंडे, अरुण लखानी, महापौर नीता ठाकरे, क्रीडा महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष संदीप जोशी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित होत असलेल्या क्रीडा महोत्सवाचा प्रतिसाद सातत्याने वाढत असून अनेक खेळाडूंना यानिमित्ताने संधी आणि प्रशिक्षण उपलब्ध होत आहेत. या माध्यमातून नागपुरात एक क्रीडा संस्कृती आकारास येत आहे. क्रीडा क्षेत्र हे सातत्याने बदलत असून अभ्यासासोबतच आता क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविण्यावरही मोठा भर दिला जात आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यावसायिकता आली आहे. त्यामुळे खेळाडूंना वेगवेगळ्या क्षेत्रातील दालने उपलब्ध झाली आहेत. खेळ ही अशी संस्कृती आहे ज्यामुळे युवा पिढी योग्य दिशेने वाटचाल करू शकते. त्यातून स्पर्धात्मक वृत्ती देखील तयार होत असल्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

नापुरात क्रीडा संस्कृतीला आणखी चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. देशातील अत्यंत आधुनिक असे क्रीडा संकुल मानकापुरात तयार होत आहे. यानिमित्ताने येथे जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील करता येईल. क्रीडा विद्यापीठ देखील तयार होत आहे. एकूणच या सोयीसुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


 

कम से कम 15 जून तक महाराष्ट्र में व्यापक मानसूनी वर्षा की संभावना कम · मानसून कोंकण में पहुंचा,

 कम से कम 15 जून तक महाराष्ट्र में व्यापक मानसूनी

वर्षा की संभावना कम

·         मानसून कोंकण में पहुंचा, लेकिन अभी पूरे क्षेत्र में सक्रिय नहीं; किसानों से बुवाई में जल्दबाजी न करने की अपील

मुंबई, 7 जून: दक्षिण-पश्चिम मानसून दक्षिण कोंकण में प्रवेश कर चुका है तथा सिंधुदुर्ग और रत्नागिरी जिलों के कुछ भागों में 9 जून तक मध्यम से भारी वर्षा होने का अनुमान है। हालांकि, वर्तमान मौसम पूर्वानुमान के अनुसार कम से कम 15 जून तक राज्य में वर्षा की तीव्रता तथा मानसून की प्रगति की गति धीमी रहने की संभावना है। इसलिए इस अवधि में राज्यभर में संतोषजनक और व्यापक वर्षा की संभावना कम दिखाई दे रही है।

वर्तमान मौसम पूर्वानुमान के अनुसार, कम से कम 15 जून तक विदर्भ, मराठवाड़ा, खानदेश और मध्य महाराष्ट्र के कुछ हिस्सों में दोपहर के बाद बादल छाने तथा गरज-चमक के साथ छिटपुट वर्षा होने की संभावना है। हालांकि, यह वर्षा व्यापक स्तर पर बुवाई के लिए अनुकूल परिस्थितियां बनाती हुई फिलहाल नहीं दिखाई दे रही है।

इस बीच, कम से कम 12 जून तक राज्य के कई हिस्सों में अधिकतम तापमान ऊंचा बने रहने की संभावना है। विदर्भ और खानदेश में अधिकतम तापमान 40 डिग्री सेल्सियस से अधिक रह सकता है, जबकि मराठवाड़ा में यह 35 से 40 डिग्री सेल्सियस के बीच रहने का अनुमान है।

According to the latest weather forecasts, parts of Vidarbha, Marathwada, Khandesh

 According to the latest weather forecasts, parts of Vidarbha, Marathwada, Khandesh, and Madhya Maharashtra may experience cloudy conditions and scattered thunderstorms accompanied by rain during the afternoon hours until at least June 15. However, the prevailing conditions do not yet suggest rainfall sufficient for widespread sowing operations.

Meanwhile, maximum temperatures are likely to remain high across many parts of the state until at least June 12. Temperatures in Vidarbha and Khandesh may exceed 40°C, while those in Marathwada are expected to range between 35°C and 40°C.

Low probability of widespread monsoon rainfall across Maharashtra until at least June 15

 Low probability of widespread monsoon rainfall across Maharashtra until at least June 15

 

·         Monsoon has entered Konkan, but is not yet active across the entire region; farmers are advised not to rush with sowing

 

Mumbai, June 7: The southwest monsoon has entered South Konkan, and moderate to heavy rainfall is forecast in parts of Sindhudurg and Ratnagiri districts until June 9. However, current weather forecasts indicate that both the overall intensity of rainfall and the pace of monsoon advancement across Maharashtra may remain subdued until at least June 15. Consequently, the likelihood of satisfactory and widespread rainfall across the state during this period appears low.

According to the latest weather forecasts, parts of Vidarbha, Marathwada, Khandesh, and Madhya Maharashtra may experience cloudy conditions and scattered thunderstorms accompanied by rain during the afternoon hours until at least June 15. However, the prevailing conditions do not yet suggest rainfall sufficient for widespread sowing operations.

राज्यात आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देत मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याचे धोरण

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देत मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे. ग्रामीण भागात मानसिक आरोग्य सेवा अधिक परिणामकारकपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी उडानप्रकल्पाचा विस्तार करण्यात येत आहे.

या प्रकल्पांतर्गत गावपातळीवर मानसिक आरोग्य जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून ग्रामपंचायत, बचत गट, युवक गट यांचा सहभाग वाढविला जाणार आहे; तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, मनुष्यबळ प्रशिक्षण, मातृ मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविणे, तसेच सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना मानसोपचार व समुपदेशन सेवा देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :

 कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :

·         आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.

·         विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.


किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

 किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

·         मान्सून कोकणात दाखल झाला, पण सर्वदूर सक्रिय नाही;

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

मुंबई, दि. 7 : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :

·         आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.

·         विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे

Featured post

Lakshvedhi