Thursday, 2 April 2026

केंद्र सरकारच्या निर्देशानुसारएलपीजी पुरवठा करण्यात येत

 केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात हॉस्पिटल्सशैक्षणिक व सामाजिक संस्थादुसऱ्या टप्प्यात रेस्टॉरंट्स व अन्न उद्योगतर तिसऱ्या टप्प्यात कामगारप्रधान उद्योगांना एलपीजी पुरवठा करण्यात येत आहे. या अनुषंगाने उर्वरित उद्योगांची यादी अंतिम करून पुढील एक-दोन दिवसांत पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती श्री.डांगे यांनी यावेळी दिली. बैठकीत पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) सुविधेच्या विस्ताराला गती देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली. शहर गॅस वितरण प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या जलदगतीने देण्यात येत असून रस्ते खोदकामपाईपलाईन टाकणे आदी कामांना 24 तास परवानगी देण्यात आली आहे. बहुतांश कामे या महिन्यात पूर्ण होतील असे यावेळी सांगण्यात आले.

सध्यस्थितीत कोणत्याही विदेशी उद्योगांना एलपीजीचा पुरवठा झाला नसल्याबाबत तक्रार नाही

 सध्यस्थितीत कोणत्याही विदेशी उद्योगांना एलपीजीचा पुरवठा झाला नसल्याबाबत तक्रार नाही. त्यामुळे उद्योजकांनी काळजी न करता सहकार्य करावेअसे आवाहन सचिव डॉ.गवांदे यांनी यावेळी केले.

एलपीजीच्या काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात

 एलपीजीच्या काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. हे क्रमांक सर्व नागरिक आणि उद्योजकांपर्यंत पोहोचविण्याची सूचना करुन मंत्री जयकुमार रावल यांनी नागरिक आणि उद्योगांकडून येणाऱ्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्याचे तसेच दरवाढ किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एलपीजी पुरवठ्याचे टप्प्याटप्प्याने वितरण सुरू

 राज्यातील एलपीजीच्या पुरवठ्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणालेजागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने आणि शिपिंग कंपन्यांकडून दरवाढ झाल्याने अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या निर्देशानुसार राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एलपीजी पुरवठ्याचे टप्प्याटप्प्याने वितरण सुरू असून प्राधान्य क्षेत्रांना दिलासा देण्यात येत आहे.

सध्यस्थितीत पुण्यात सुरू असलेल्या विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना एलपीजी पुरवठा सुरळीत व्हावा

 सध्यस्थितीत पुण्यात सुरू असलेल्या विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना एलपीजी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी स्वीडनजपान आणि दक्षिण कोरियाचे महावाणिज्य दूत यांच्य विनंतीवरून सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री श्री रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत स्वीडनचे महावाणिज्य दूत आणि डीन ऑफ द कॉन्सुलर कॉर्प्स स्वेन ऑस्टबर्गजपानचे महावाणिज्य दूत कोजी यागी आणि दक्षिण कोरियाचे महावाणिज्य दूत डोंगवान यूराजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ.राजेश गवांदेअन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगेराज्यातील तेल कंपन्यांचे समन्वयक उमेश कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील

 उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील

-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 1 :  महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहेया भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसेच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावायासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून या संकटात कोणत्याही उद्योगाला राज्य शासन अडचण येऊ देणार नाहीअशी ठाम भूमिका राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली.

जगाच्या इतिहासात अनेक महान व्यक्तिमत्त्वांनी तारुण्यावस्थेत लक्षणीय

 साहित्याला मिळणारा पुरस्कार हा लोकमान्यतेचे प्रतीक असतो असे सांगून हिंदी साहित्यिक सूर्यप्रसाद दीक्षित म्हणालेकी  युवा अवस्था ही केवळ विशिष्ट कालावधीदर्शक संकल्पना नाहीतर ती एक चेतनेची जाणीव आहे. जगाच्या इतिहासात अनेक महान व्यक्तिमत्त्वांनी तारुण्यावस्थेत लक्षणीय दिशादर्शक काम केले आहे. आज देशात युवकांची मोठी संख्या आहे. ही ऊर्जा प्रेरित करण्यासाठी युवा लेखकांनी सकारात्मक जाणिवेचे लेखन करताना वाचकांना ज्ञानविज्ञानाशी जोडण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावेत.

अकादमीच्या सचिव श्रीमती होळकर यांनी प्रास्ताविक केले तर श्रीमती कुमुद शर्मा यांनी आभार मानले.

इतर भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते याप्रमाणे  - ( भाषा व लेखक)

आसामी- सुप्रकाश भुयान

बांगला - सुदेष्णा मोईत्रा

बोडो - अमर खुंगुर बर

इंग्रजी - अव्दैत कोट्टारी

गुजराती  मयुर खावडू

हिंदी - पार्वती तिर्की

कन्नड -  दिलीपकुमार आर

कश्मीरी - साईका सहर

कोकणी - ग्लिनिस डायस

मैथिली - नेहा झा मणि

मलयाळम् - अखिल धर्मजन

मणिपुरी - अकोइजन जितेन सिंह

नेपाली - सुवास ठकुरी

ओडिया - सुब्रतकुमार  सेनापती

पंजाबी  मनदीप औलख

राजस्थानी - पुनमचंद गोदारा

संस्कृत - धीरजकुमार पाण्डेय

संथाली  फागू बास्के

सिंधी -  मंथन बछाणी

तमिळ  लक्ष्मीहर टी

तेलुगु - प्रसाद सुरी

उर्दू -  नेहा रुबाब

Featured post

Lakshvedhi