Monday, 9 March 2026

अर्थसंकल्पात शेतकऱ्याना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीचा घोषणा

 अर्थसंकल्पात शेतकऱ्याना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून

कर्जमाफीचा घोषणा

 

·         7.69 लाख कोटींचा विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर

·         शेतकरी कर्जमाफीनदीजोड प्रकल्पतिसरी मुंबई आणि स्टार्टअपला चालना

·         राज्याची विकसित महाराष्ट्रच्या दिशेने यशस्वी घौडदौड

·         एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना  क्रॉक्रिट रस्त्याने जोडणार

 

मुंबई, दि. 6 : राज्याच्या सर्वांगीणसर्वसमावेशक आणि दीर्घकालीन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेला 2026-27 वर्षाचा 7.69 लाख कोटींचा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र’ या ध्येयावर आधारित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रगतीशील विकासशाश्वततासर्वसमावेशकता आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प राज्याच्या आर्थिकसामाजिक आणि पायाभूत विकासाला नवी दिशा देणारा ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी करीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला.

 

       विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सादर केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळ सदस्यविधानसभा सदस्य उपस्थित होते.

आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

 आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

 

जागतिक महिला दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला डॉक्टर्सस्त्रीरोग तज्ज्ञस्त्री शल्यचिकित्सकपरिचारिकाआरोग्य सेविकाआरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार यांचा सन्मान करण्यात येणार येईल. ग्रामीण व दुर्गम भागात मातृत्वबाल आरोग्यकर्करोग प्रतिबंध आणि जनजागृती मोहिमांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा विशेष गौरव करण्यात आला. महिला सक्षमीकरणस्त्री-पुरुष समानता आणि आरोग्य हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी हे उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून महिलांच्या स्वप्नांना बळ देऊयाउद्याचे उज्ज्वल भविष्य घडवूया! या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे ठरतीलअसा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाण नियमित प्रमाणे सुरू आखाती देशातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण सूचना

 व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाण नियमित प्रमाणे सुरू

आखाती देशातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण सूचना

मुंबईदि. 7 : आखाती देशातील युद्ध सदृश्य परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रलंबित झालेली विमान सेवा व विमान उड्डाण सुरू झाली आहेत.व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाणे नियमित सुरू झाल्याने  भारतीय नागरिकपर्यटक व प्रवासी भारतात येण्यासाठी आवश्यकतेनुसार थेट तिकीट आरक्षित करू शकतातअसे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने कळविण्यात आले  आहे.

           आखाती विविध देशात अडकलेल्या प्रवाशांना सहाय्य व अधिक माहितीसाठी संबंधित देशातील भारतीय दूतावास अथवा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयास संपर्क साधावाअशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या  राज्य आपत्तकालीन कार्य केंद्राच्या( SEOC )वतीने देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अश्विनी भिडे यांची विशेष मुलाखत

 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

अश्विनी भिडे यांची विशेष मुलाखत

मुंबईदि. 7 : "आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या" निमित्ताने पायाभूत सुविधा क्षेत्रात महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

मुंबईत नुकताच पूर्ण झालेला भारतातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो प्रकल्प मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ)’ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रकल्प ठरला आहे. अभियांत्रिकी कौशल्यसातत्य आणि अचूक नियोजनाच्या जोरावर या प्रकल्पाने अनेक अडथळ्यांवर मात करत यशस्वी वाटचाल केली. या प्रकल्पाच्या पूर्ततेदरम्यान आलेले अनुभवतांत्रिक अडचणी आणि त्यावर केलेल्या प्रभावी उपाययोजनांबाबत अश्विनी भिडे यांनी या मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे.

आपल्या 25 वर्षांच्या सेवाकाळातील कार्याचा आढावा घेताना त्यांनी मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाच्या उभारणीपासून ते अरबी समुद्रालगतच्या कोस्टल रोड प्रकल्पापर्यंत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आलेले अनुभव सांगितले. पायाभूत सुविधा क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना मुंबई मेट्रो वूमन अशी ओळख मिळाली असली तरीही माझी नव्हे तर संपूर्ण टीमची ओळख आहे, असे त्या नम्रपणे नमूद करतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकीसारख्या क्षेत्रात मोठ्या आत्मविश्वासाने पुढे यावेअसा संदेशही त्यांनी दिला आहे.

0000

पश्चिम खेतवाडी येथे आयोजित शिबिरात विविध दाखल्यांचे वितरण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

 पश्चिम खेतवाडी येथे आयोजित शिबिरात विविध दाखल्यांचे वितरण

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

 

मुंबईदि. : 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात कामाठीपुरापश्चिम खेतवाडी परिसरात समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये कामाठीपुरा तसेच गिरगाव परिसरातील 150 हून अधिक निराधार महिलादिव्यांग आणि इतर नागरिक यांना विविध दाखलेज्येष्ठ नागरिक यांना ओळखपत्र व संजय गांधी निराधार योजनेसंबंधीचे सर्व लाभ एकाच ठिकाणी देण्यात आले. 

या शिबिरात रिलायन्स फाउंडेशनलोढा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. हे शिबीर मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरातउपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी-वॉर्डचे नगरसेवक गौरांग झवेरी व श्रीमती स्नेहल तेंडुलकर, संजय गांधी योजना विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या शिबिरात विधवा महिलादिव्यांग लाभार्थी आणि वृध्द लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आलेसंजय गांधी, श्रावणबाळ योजना अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक सहकार्य व कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. लाभार्थ्यांचे रहिवास प्रमाणपत्रउत्पन्न प्रमाणपत्राबाबत अर्ज भरुन घेण्यात आले. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना समिती बैठकीमध्ये त्रुटी दर्शविण्यात आलेल्या प्रकरणामध्ये त्रुटींची पुर्तता करुन घेण्यात आली. लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्रबाबत मार्गदर्शनज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रकरीता अर्ज भरुन घेण्यात आले. निवृत्तीवेतनाच्या अनुषंगाने आधार संबधी त्रुटींची पुर्तता करून घेण्यात आली. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतन संबधीच्या अडचणी सोडवण्यात आल्या.


“हर एक पल का शायर साहिर” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 हर एक पल का शायर साहिर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबईदि. 7 कवी गीतकार साहिर लुधियानवी यांच्या विविधांगी प्रतिभेचा समग्र धांडोळा घेणारा हर एक पल का शायर साहिर या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम शनिवार 7 मार्च, 2026 रोजी रात्री 8.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिरबोरीवली येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात गायक म्हणून श्रीकांत नारायणसरिता राजेशसौम्या वर्मा आणि मुख्यार शाह यांचा सहभाग आहे. संगीत संयोजन प्रवीण फाटक यांनी केलेले असून या कार्यक्रमाचे निवेदन आरती शेट्टी व ध्वनीव्यवस्था नितीश फणसे करीत आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून रसिक प्रेक्षकांनी या सांस्कृतिक लोकप्रिय गीतांचा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

 आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

जागतिक महिला दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला डॉक्टर्सस्त्रीरोग तज्ज्ञस्त्री शल्यचिकित्सकपरिचारिकाआरोग्य सेविकाआरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार यांचा सन्मान करण्यात येणार येईल. ग्रामीण व दुर्गम भागात मातृत्वबाल आरोग्यकर्करोग प्रतिबंध आणि जनजागृती मोहिमांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा विशेष गौरव करण्यात आला. महिला सक्षमीकरणस्त्री-पुरुष समानता आणि आरोग्य हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी हे उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून महिलांच्या स्वप्नांना बळ देऊयाउद्याचे उज्ज्वल भविष्य घडवूया! या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे ठरतीलअसा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

Featured post

Lakshvedhi