Saturday, 7 February 2026

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची विशेष मुलाखत

 ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी

 निलेश सागर यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची विशेष मुलाखत ९ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीवर प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत श्री. सागर यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली आहे.

‘उमेद’ अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना बचत व कर्ज सुविधाकौशल्य विकास प्रशिक्षण तसेच उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जात आहे. लखपती दीदी’ उपक्रमशेतकरी उत्पादन कंपनी (FPO), सेंद्रिय शेतीला प्रोत्साहनएकात्मिक शेती समूह (IFC) तसेच नमो ड्रोन दीदी’ यासारख्या अभिनव योजनांमुळे महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.

यासोबतच स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शन’ सारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) यांच्या माध्यमातून महिलांना विविध व्यवसायांसाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. उमेद अभियानामुळे ग्रामीण भागातील महिलांचे उत्पन्न वाढण्यासत्यांचा आत्मविश्वास बळकट होण्यास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मोठी मदत होत असल्याचे श्री. सागर यांनी या मुलाखतीत सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत महिलांनी आर्थिक स्वावलंबन साध्य करावेअसा संदेशही त्यांनी दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला आहे.

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच न्यूज ऑन एआयआर’ (News on AIR) या मोबाईल अॅपवरही ऐकता येणार आहे. या मुलाखत निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी घेतली.

०००

पर्यटन स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून 'स्वदेश दर्शन २.०' आणि 'प्रसाद' (PRASHAD) सारख्या योजनांतर्गत

 पर्यटन स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून 'स्वदेश दर्शन २.०आणि 'प्रसाद' (PRASHAD) सारख्या योजनांतर्गत आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा विकास आणि आध्यात्मिक वारसा स्थळांच्या संवर्धनावर भर दिला जातो. महाराष्ट्रातील पर्यटन विकासासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नियमितपणे चर्चा आणि समन्वय बैठका घेतल्या जातातज्यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळत आहे.


जागतिक स्तरावर भारताला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून

 जागतिक स्तरावर भारताला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनेपरदेशी टूर ऑपरेटर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सहलीरोड शो आणि भारतीय खाद्य महोत्सवांचा समावेश आहे. हे सर्व प्रयत्न राज्य सरकारे आणि भारतीय दूतावासांच्या मदतीने केले जात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील परदेशी पर्यटकांचा ओघ सातत्याने वाढत आहे. २०२२ मध्ये

 केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसारमहाराष्ट्रातील परदेशी पर्यटकांचा ओघ सातत्याने वाढत आहे. २०२२ मध्ये १.५१२ दशलक्ष असलेला हा आकडा २०२३ मध्ये थेट ३.३८८ दशलक्षवर गेला आणि २०२४ मध्ये तो ३.७०५ दशलक्ष इतका नोंदवला गेला. विशेष म्हणजे२०२४ मध्ये भारतात आलेल्या एकूण परदेशी पर्यटकांपैकी १७.६९ टक्के पर्यटकांनी महाराष्ट्राला पसंती दिली असूनपर्यटनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहिला आहे.

परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला पहिली पसंती § राज्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ

 परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला पहिली पसंती

§  राज्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ

 

 नवी दिल्ली, दि. ६ : भारतातील पर्यटन क्षेत्रासाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरत असूनगेल्या तीन वर्षांत राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. सन २०२२ मध्ये महाराष्ट्रात १.५१२ दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भेट दिली होतीहा आकडा २०२४ मध्ये वाढून ३.७०५ दशलक्षवर पोहोचला असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना  दिली.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्यांना घटनास्थळी पाचारण

 तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलराज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानंतर सर्व दलांच्या उपस्थित अधिकारी व रसायन तज्ज्ञांच्या माध्यमातून टँकरमधील गळती बंद करण्याचे व अपघातग्रस्त गॅस टँकरमधून दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये गॅस भरणे 4 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या दोन रिकाम्या टँकरमध्ये भरून 5 फेब्रुवारी रोजी रात्री 1.05 वाजा अपघातग्रस्त टँकर सुरक्षित स्थळी हलविण्यात आला. त्यानंतर रात्री 1.45 वाजता पुणे बाजूकडील तीनही मार्गिकांवरून वाहतूक सुरू करण्यात आली. टँकरमधील वायूगळती रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी रसायन तज्ज्ञ यांच्या मदतीने प्रयत्न करून वायूगळती थांबविली.

 

याप्रकरणी कोची (केरळ) येथून सुरत (गुजरात) येथे जाण्याकरिता निघालेल्या टँकर क्रमांक एन एल 01 ए. जी 4250 चा चालक रतन उदय नारायण सिंग (वय 43) रा. आझमगड (उत्तर प्रदेश) विरूद्ध खोपोली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीतेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू आहेअसे गृह अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी  कळविले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यात पोलिसांची तत्परता

 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यात पोलिसांची तत्परता

 

मुंबईदि.06 : यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर 3 फेब्रुवारी रोजी सायं 5 वा. च्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर प्रोपिलीन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीसांनी तत्परता दाखविली.

 

अपघातानंतर बोरघाट पोलीस केंद्र यांनी रायगड परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकारीखालापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक महसूल प्रशासनमहामार्ग पोलीस मुख्यालय व जिल्हा पोलीस अधिक्षक रायगड येथील नियंत्रण कक्षअपघातग्रस्तांना मदत करणारी सामाजिक संस्थामृत्यूंजय दूत पथक यांना  अपघाताची माहिती दिली. टँकरमधील प्रोपिलीन गॅस हा अत्यंत ज्वलनशील असल्याने सायं 5.10 वाजता मुंबई बाजूकडे जाणरी वाहतूक अपघाताचे सुमारे 100 मिटर अलीकडे थांबविण्यात आली. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने क्रेनच्या सहाय्याने सिमेंट क्राँक्रीट दुभाजक बाजूला करून तेथून पुणे मार्गिकेवर वाहतूक वळविण्यात आली.

 

त्यानंतर सायं 6. 15 वाजेच्या सुमारास अपघाताजवळील वाहने काढल्यानंतर 44.100 किलोमीटर क्रमांकाच्या दुभाजक कटमधून पुण्याकडे जाणाऱ्या दोन व मुंबईकडे जाण्याकरीता एक मार्गिका सुरू केली. तसेच पी. ए यंत्रणेद्वारे थांबलेल्या वाहनचालकांना व नागरिकांना या घटनेबाबत माहिती देण्यात येत होती. जड वाहनांना एका मार्गिकेला थांबवून वाहतूक दुसऱ्या बाजुने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. रसायन तज्ज्ञ धनंजय गिध यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. श्री. गिध रात्री 9.30 वाजता आल्यानंतर त्यांनी पाहणी करून याबाबतची माहिती अन्य रसायन तज्ज्ञांना दिली. टँकरमधील गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याची माहिती रसायन तज्ज्ञ यांनी दिल्यांनतर खोपोली अग्नीशमक दलपरिसरातील सर्व एमआयडीसी अग्नीशमन दल यांना घटनास्थळी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या

Featured post

Lakshvedhi