Thursday, 5 February 2026

‘सीआयएसएफ’कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–2026’चे आयोजन

 सीआयएसएफकडून रत्नागिरीत

वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–2026’चे आयोजन

 

मुंबईदि. 4 : देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफआपल्या 57 वर्षांच्या गौरवशाली सेवेचे औचित्य साधत 14 फेब्रुवारी 2026 रोजी रत्नागिरी येथील पोलस मैदानावर वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–2026’ या उपक्रमाचे आयोजन केले आहेया उपक्रमाचा रंभ उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता

२१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. ४ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारनटराज पुरस्कारविश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक या पुरस्कारासाठी सन २०२५-२६ वर्षाकरिता इच्छुक व्यक्ती व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी व्यक्ती व संस्थांनी २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करावे असे आवाहन सहसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय यांनी केले आहे.

 

पुरस्कारासाठी अटी व शर्ती :- अर्जदार व्यक्तीसंस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिकसामाजिकसांस्कृतिकआर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रेकार्याचा सविस्तर अहवालशिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्णचुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

 

पुरस्कारासाठीचे अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालकइतर मागास बहुजन कल्याण विभाग येथे २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुनाशासन निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती तसेच अधिक माहिती सहायक संचालकइतर मागास बहुजन कल्याण विभागजिल्हा कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.

पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेतअसे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.

फ्लोटिंग सोलर पॉवर जनरेशन पॉलिसीचा आढावा

 फ्लोटिंग सोलर पॉवर जनरेशन पॉलिसीचा आढावा

जलसंपदा विभागाने तयार केलेल्या फ्लोटिंग सोलर पॉवर जनरेशन पॉलिसीच्या आराखड्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर करण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री विखे- पाटील यांनी दिले.

तसेच महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत पाटबंधारे नियम१९७६ मध्ये प्रस्तावित बदल करण्याबाबतच्या तरतुदी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असूनत्यासंदर्भातही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध सिंचन प्रकल्पविकासकामे तसेच नदीजोड प्रकल्पांसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती सादर करण्यात आली.

नाबार्ड'च्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या सिंचन

 नाबार्ड'च्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या सिंचन प्रकल्पांसाठी 24 हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित असून त्यापैकी साडेआठ हजार कोटी रुपये जलसंपदा विभागास प्राप्त झाले आहेत. या निधीतून विविध सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचे वितरण करण्याबाबत वित्त व नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे तसेच कृष्णा खोऱ्यातून भीमा खोऱ्यात पाणी आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

नदीजोड प्रकल्पांतील कामांचा

 नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

 

मुंबईदि 4 :- राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला.

 दमणगंगावैतरणागोदावरी नदीजोड प्रकल्पदमणगंगाएकदरे– गोदावरी नदीजोड प्रकल्प तसेच कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा नदी खोऱ्यात वळविण्यासाठी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृह येथे नदीजोड प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरमहाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयजलसंपदा सचिव संजय बेलसरेगोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या गोष्टी आताच समजून घ्या:*

 *म्हातारपणी एकटे पडू नये आणि कोणावरही ओझे होऊ नये म्हणून, या गोष्टी आताच समजून घ्या:*


*०१. जमिनीच्या वादात पडू नका:*

फक्त 'शेजाऱ्याला धडा शिकवण्यासाठी' आपले आयुष्य न्यायालयाच्या पायऱ्यांवर घालवू नका. 


खटला संपण्यापूर्वीच तुम्ही कदाचित जगातून गेलेले असाल. आणि जरी तुम्ही लढून जमीन जिंकलीत, तरी तिथे तुम्ही नाही, तर वकीलच स्थायिक होतील.


*०२. जुनी वाहने ओझे बनू शकतात:*

पाच लाखांचा फायदा होत आहे असे समजून जुनी वाहने घरी आणू नका. जर गाडी रस्त्यापेक्षा गॅरेजमध्येच जास्त वेळ घालवत असेल, तर हृदयविकाराचा झटका गाडीला नाही, तर तुम्हाला येईल.


 *०३. आपली मालमत्ता हस्तांतरित करण्याची घाई करू नका:*

आज जरी मुले 'देवासारखी' वाटत असली, तरी एकदा तुम्ही तुमच्या मालमत्तेचा प्रत्येक पैसा त्यांच्या नावावर केलात, की त्याच घरात तुम्ही एक 'नको असलेली वस्तू' बनू शकता. मुले वाईट नसतात, पण जग क्रूर आहे. शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी स्वतःच्या नावावर ठेवा.


*०४. तुमची शेवटची बचत सुरक्षित ठेवा:*

३० वर्षे कमावलेले पेन्शनचे पैसे मुलांच्या व्यवसायासाठी देऊ नका. शेवटी, औषधे खरेदी करण्यासाठी तुम्हाला त्याच मुलांसमोर हात पसरावे लागतील.


 *०५. मुलांच्या घराला चिकटून राहू नका:*

फक्त 'ती आपली मुले आहेत' म्हणून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नका. जास्त जवळीक तुमचे प्रेम त्यांच्यासाठी त्रासदायक बनवू शकते. स्वतःसाठी एक छोटी जागा शोधा आणि स्वतंत्रपणे जगा.


 *०६. तीर्थयात्रेसाठी मुलांची वाट पाहू नका:*

'त्यांना सुट्टी मिळाल्यावर ते मला घेऊन जातील' असे म्हणून वाट पाहत बसू नका. जेव्हा त्यांना वेळ मिळेल, तेव्हा कदाचित तुम्ही चालायलाही सक्षम राहणार नाही. जोपर्यंत तुमच्यात शक्ती आहे, तोपर्यंत तुम्हाला आवडणाऱ्या ठिकाणी जा—अगदी एकटे का असेना.


*०७. आज जे खावेसे वाटते ते खा:*

तुमच्या जोडीदाराला (पत्नी/पतीला) आजच त्यांच्या आवडीची वस्तू घेऊन द्या.  एखाद्या अन्नाच्या ताटासोबत शवपेटीजवळ रडत, "त्यांना हे खूप आवडायचे," असे म्हणणे म्हणजे निव्वळ ढोंग आहे.


*०८. स्वतःसाठी विश्रांतीची सोय करा:*

मरणाच्या दिवसापर्यंत कामाचा डोंगर रचू नका. जर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत धावतच राहिलात, तर शेवटी तुम्ही काहीही जिंकलेले नसाल. तुमच्या शरीराला आवश्यक असलेली विश्रांती द्या.


*०९. झोपेसारखे दुसरे औषध नाही:*

अनावश्यक निद्रानाश कमी करा आणि शांतपणे झोपा. जेव्हा तुम्ही आजारी पडाल, तेव्हा कोणीही तुमचे दुःख वाटून घेणार नाही - ते तुम्हाला एकट्यालाच अनुभवावे लागेल.


*१०. तुम्ही एकटेच आला आहात हे कधीही विसरू नका:*

तुमच्यासाठी कोणीतरी काहीतरी करेल या अपेक्षा कमी करायला शिका. एक दिवस तुमची सावलीसुद्धा तुम्हाला सोडून जाईल. मृत्यूसुद्धा एकाकी असतो - म्हणून आनंदाने एकटे राहायला शिका.

आनंद ही अशी गोष्ट नाही जी कोणीतरी तुम्हाला देतो; ती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतःच निर्माण करावी लागते.


११. तुमचा पती/पत्नी निरोगी असताना, प्रत्येक लहान-मोठे काम स्वतःहून करायला शिकण्यास अजिबात संकोच करू नका.


१२. जरी तुम्ही मृत्युपत्र लिहिले असले तरी, ते बदलण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे हे लक्षात ठेवा.


१३. जर वारसदार तुमचा छळ करत असतील किंवा त्रास देत असतील, तर हे विसरू नका की आज कायदा आणि जिल्हा प्रशासन तुमच्या बाजूने आहे.


१४. दररोज फिरायला जाण्याची सवय लावा आणि तुमचे जुने मित्र किंवा नातेवाईक असल्यास, त्यांच्यासोबत तुमच्या तरुणपणीच्या आठवणी न चुकता शेअर करा.


१५. नेहमी लक्षात ठेवा की एक दिवस जीवनाचा हिशोब संपणार आहे; त्या अंतिम दिवसासाठी मानसिक तयारीने जगा.


१६. शेवटी तुम्ही काहीही सोबत घेऊन जाणार नाही हे लक्षात ठेवून, प्रत्येकाशी प्रेम आणि मैत्रीने वागा, गरजूंना मदत करा आणि स्वतःला एक चांगला माणूस म्हणून घडवा.

आज जगभरातल्या अनेक संस्कृती नष्ट झाल्या आहेत. पण भारतीय सनातन संस्कृती

 आज जगभरातल्या अनेक संस्कृती नष्ट झाल्या आहेत. पण भारतीय सनातन संस्कृती आजही टिकून राहीली आहे असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सनातन विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगणारे आणि सर्वात प्राचीन असे आहेत. आता सरस्वती संस्कृतीच्या उत्खननातूनही या विचारांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे विज्ञान आणि इतिहास या दोन्ही कसोट्यांवर भारतीय जीवन पद्धती, सनातन संस्कृती समृद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. या भारतीय संस्कृतीने विविधता आत्मसात करून, तिच्या वैभवात भर घातली आहे. ही संस्कृती टिकवण्यात स्वामी सत्यमित्रानंदजी यांच्यासारख्या वाहकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. स्वामीजीनी आपल्या आचरण, कार्यातून या संस्कृतीचे पोषण केले. ती भावी पिढ्यांकडे सुपूर्द केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला मोठी गती मिळाली आहे. त्यामुळे आता भावी पिढ्याही या सनातन संस्कृतीशी स्वतःला जोडून घेऊ लागली आहे. त्यांनाही या संस्कृतीचा अभिमान वाटू लागला आहे. यामागेही या संत, महंताच्या कार्याचा बहुमुल्य आधार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

०००००

Featured post

Lakshvedhi