Tuesday, 3 February 2026

Under the guidance of the Union Ministry of Petroleum and Natural Gas

 Under the guidance of the Union Ministry of Petroleum and Natural Gas and with the cooperation of the State Government, various public awareness activities are being organized by state-level coordinators of the oil industry at Ravindra Natya Mandir, Prabhadevi. As part of this, the ‘Saksham 202526 (Fuel Conservation Capacity Festival)’ was inaugurated under the chairmanship of Minister Mangal Prabhat Lodha, who was speaking on the occasion.

Conservation of Natural Oil and Gas is Service to the Nation

 Conservation of Natural Oil and Gas is Service to the Nation

Minister Mangal Prabhat Lodha

 

‘SAKSHAM 202526’ campaign launched from today to promote energy conservation

 

Mumbai, Feb 2: Conserving natural oil and gas is a service to the nation. Fuel conservation is a key objective envisioned by Prime Minister Narendra Modi under the goal of Viksit Bharat 2047, and with the participation of every citizen, the country will achieve this goal. Conserving oil and gas means adopting green energy, and participation in this initiative is a social responsibility of every individual, appealed Minister for Skill Development, Employment, Entrepreneurship and Innovation, Mangal Prabhat Lodha.

 

Under the guidance of the Union Ministry of Petroleum and Natural Gas and with the cooperation of the State Government, various public awareness activities are being organized by state-level coordinators of the oil industry at Ravindra Natya Mandir, Prabhadevi. As part of this, the ‘Saksham 202526 (Fuel Conservation Capacity Festival)’ was inaugurated under the chairmanship of Minister Mangal Prabhat Lodha, who was speaking on the occasion.

राज्यात संरक्षण क्षमता महोत्सव राबविणार - उमेश कुलकर्णी

 राज्यात संरक्षण क्षमता महोत्सव राबविणार - उमेश कुलकर्णी

        राज्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी म्हणाले कीभारत सरकारच्या ऊर्जा सुरक्षितताशाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या सक्षम २०२५-२६ (संरक्षण क्षमता महोत्सव)’ या राष्ट्रीय अभियानाची आजपासून देशभरात सुरुवात होत आहे. १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत Conserve Oil & Gas, Go Green (तेल आणि गॅस वाचवाहरित ऊर्जा स्वीकारा) या घोषवाक्यासह हे अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि संबंधित राज्य शासनाच्या सहकार्याने तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांकडून विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

सक्षम अभियानाच्या पंधरवड्यात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गटचर्चा व वादविवादमहाविद्यालयांमध्ये भित्तीचित्र व ग्राफिटी स्पर्धाइंधन-कार्यक्षम वाहनचालक स्पर्धालेखन स्पर्धादूरदर्शन व रेडिओवरील चर्चासत्रांचे आयोजन. या अभियाना दरम्यान शालेय विद्यार्थीयुवकएलपीजी वापरकर्तेवाहनचालकउद्योग क्षेत्रातील कर्मचारीशेतकरीगृहनिर्माण संस्थाग्रामपंचायती व स्वयंसेवी संस्था यांच्यापर्यंत पोहोचून इंधन संवर्धनाचे महत्त्वफायदे आणि उपाय योजनांबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. इंधन-कार्यक्षम तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी  दिली.

         

 

 राज्य समन्वयक विभाग मुख्य प्रबंधक दीपक वाघ यांनी इंधन बचतीची शपथ दिली. यावेळी मायरा फाउंडेशनतर्फे इंधन बचतीचे पथनाट्य सादर करण्यात आले.

परळी वैजनाथमध्ये 13 फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन · राज्यातील पशुपक्षी पालकांना सहभागी होण्याचे आवाहन

 परळी वैजनाथमध्ये 13 फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

·         राज्यातील पशुपक्षी पालकांना सहभागी होण्याचे आवाहन

 

मुंबईदि. 2 : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचेआयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील विविध प्रजातींचे एक हजाराहून अधिक पशू सहभागी होणार असून प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू आहे. या पशुपक्षी प्रदर्शनात सहभागी व्हावेअसे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

या प्रदर्शनात पशुपालकांना गायीम्हशीघोडेशेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जेदार प्रजाती पाहायला मिळतील. केवळ महाराष्ट्रच नव्हेतर संपूर्ण देशातील प्रगतशील पशुपालक व शेतकरी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. पशुपालकांना आधुनिक पशुपालनआहार व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती या माध्यमातून मिळणार आहेअशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

 

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन.  यांच्या मार्गदर्शनाखाली  या प्रदर्शनाचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे करण्यात येत आहे. परळी वैजनाथ येथे प्रदर्शनासाठी भव्य मैदान व पशुधनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. "या प्रदर्शनाच्या माध्यमातून पशुपालकांना पशुसंवर्धनाविषयीची संकीर्ण व अद्ययावत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल. याचा मोठा फायदा पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी होईल," असा विश्वास पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी व्यक्त केला आहे.

 

नवीन तंत्रज्ञान व दर्जेदार पशुधनाची माहिती घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी · सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

 मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी

·         सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

 

मुंबई, दि. 2 : तोतया व्यक्तींना पुढे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करण्याचे प्रकार घडत असून, या पार्श्वभूमीवर जनसामान्यांनी मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक यांनी केले आहे.

 

एका तोतया व्यक्तीने स्वतःला मूळ मालक म्हणून दर्शवत बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्तनोंदणी केल्याचा गंभीर प्रकार अंधेरी येथील सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात 29 जानेवारी रोजी उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वतःला सलाउद्दीन आदम नाईक या मूळ मालकाच्या जागेवर भासवणारे मोहम्मद रफीक मोहम्मद इलियास यांच्याविरुद्ध जूहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सह जिल्हा निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री, गहाणखत, बक्षीसपत्र हक्कसोडपत्र, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी, करारनामे, विकसन करारनामे आदी सामान्य नागरिकांची कामे नियमित स्वरूपात मोठ्या प्रमाणात केली जातात. भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीद्वारे मूळ मालकांची फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणतेही व्यवहार करतांना जागरुकता बाळगण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक रमेश पगार यांनी केले आहे.

 

नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा

 नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा  

-मंत्री मंगलप्रभात लोढा

·         ऊर्जा संवर्धनासाठी सक्षम २०२५-२६’ अभियानाची आजपासून सुरुवात

          मुंबई, दि. २ : नैसर्गिक तेल व वायूची बचत करणे ही देशाची सेवा आहे. विकसित भारत २०४७  च्या उद्दीष्टामधील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे इंधन बचत हे ध्येय असून प्रत्येकाच्या सहभागाने देश हे ध्येय साध्य करेल. तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे हरित ऊर्जेचा अंगीकार करणे हा आपल्या प्रत्येकाच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

         प्रभादेवी रवींद्र नाट्य मंदिर येथे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य शासनाच्या सहकार्याने तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांकडून विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत 'संरक्षण क्षमता महोत्सव २०२५-२६चा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान ;

उद्योगआस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

 

मुंबईदि. 2 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांमध्ये शनिवार दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक  होत आहे. या निवडणुकीमध्ये  राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावायासाठी उद्योगआस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योगउर्जाकामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे.

यानुसारनिवडणूक  होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगारअधिकारीकर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबरही सुट्टी उद्योगऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनाकारखानेदुकाने इत्यादींना लागू असेल. यात खासगी कंपन्या यामधील आस्थापनासर्व दुकाने व इतर आस्थापनानिवासी हॉटेलखाद्यगृहेअन्य गृहेनाट्यगृहेव्यापारऔद्योगिक उपक्रम किवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्याशॉपिंग सेंटरमाल्सरिटेलर्स आदींना हे आदेश लागू राहणार आहेत.

अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारीकर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेलयाची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये रायगड (पंचायत समित्या - पनवेलकर्जतखालापूरसुधागडपेणउरणअलिबागमुरुड. रोहातळामाणगावम्हसळाश्रीवर्धनमहाडपोलादपूर)रत्नागिरी (मंडणगडदापोलीखेडचिपळूणगुहागररत्नागिरीसंगमेश्वरलांजाराजापूर)सिंधुदुर्ग (वैभववाडीकणकवलीदेवगडमालवणकुडाळवेंगुर्लासावंतवाडी दोडामार्ग)पुणे (जुन्नरआंबेगावशिरुरखेडमावळमुळशीहवेलीदौंडपुरंदरवेल्हेभोरबारामतीइंदापूर)सातारा (खंडाळाफलटणमाणखटावकोरेगाववाईमहाबळेश्वरजावळीसातारापाटणकराड)सांगली (आटपाडीजतखानापूर (विटा)कडेगावतासगावकवठेमहांकाळपलूसवाळवा-ईश्वरपूरशिराळामिरज)सोलापूर (करमाळामाढाबार्शीउत्तर सोलापूरमोहोळपंढरपूरमाळशिरसमंगळवेढासांगोलादक्षिण सोलापूरअक्कलकोट)कोल्हापूर (शाहुवाडीपन्हाळाहातकणंगलेशिरोळकागलकरवीरगगनबावडाराधानगरीभुदरगडआजरागडहिंग्लजचंदगड)छत्रपती संभाजीनगर (सोयगावसिल्लोडकन्नडफुलंब्रीखुलताबादवैजापूरगंगापूरछत्रपती संभाजीनगरपैठण)परभणी (जिंतूरपरभणीमानवतसेलूपाथरीसोनपेठपूर्णापालमगंगाखेड)धाराशीव (परांडाभूमवाशीकळंबधाराशीवतुळजापूरलोहाराउमरगा) आणि लातूर (पंचायत समित्या - अहमदपूरजळकोटउदगीरचाकूररेणापूरलातूरशिरूर (अनंतपाळ)देवणीऔसानिलंगा) यांचा समावेश आहे.

000

Featured post

Lakshvedhi