Sunday, 25 January 2026

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार · गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज

 प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

·        गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीकचित्ररथ सज्ज

 

नवी दिल्ली, दि.२२: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला असूनयंदा राज्याच्या वतीने गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्'ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर यंदाचा सोहळा विशेष ठरणार आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असूनत्यांच्या उपस्थितीत संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा हा चित्ररथ राज्याची प्रदीर्घ परंपरा आणि वाढत्या आर्थिक सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला घडवेल.

 

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून ज्या सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवलीतिच चळवळ आज आधुनिक भारताला कशी 'आत्मनिर्भरबनवत आहेयाचे प्रभावी चित्रण या चित्ररथात करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारी कोट्यवधींची आर्थिक उलाढालमूर्तिकार आणि सजावट कलाकारांना मिळणारा शाश्वत रोजगार आणि त्यातून विणली गेलेली आर्थिक साखळी या चित्ररथाच्या केंद्रस्थानी आहे. महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२५ पासून सार्वजनिक गणेशोत्सव हा 'राज्य महोत्सवम्हणून साजरा करण्यास सुरुवात केली असूनया उत्सवामुळे केवळ सांस्कृतिकच नव्हेतर पर्यावरणीय आणि आर्थिक आत्मनिर्भरतेसही कशी चालना मिळतेहे या चित्ररथातून ठळकपणे मांडण्यात आले आहे.

Saturday, 24 January 2026

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी' अभिनव, खर्चमुक्त उपक्रम

 महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी

 ‘बीग्सीअभिनवखर्चमुक्त उपक्रम

- परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

 

मुंबईदि. २३ : महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने बीग्सी हा अभिनव आणि खर्चमुक्त उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले. एका सामाजिक जाणिवेतून सुरू झालेला हा प्रकल्प भविष्यात महिला सुरक्षेचा नवा अध्याय लिहीलअसा विश्वासही परिवहन आयुक्त भिमनवार यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र पोलीसमोटार परिवहन विभागवाहतूक पोलीस आणि इटीएस ३६० टेक्नोलॉजी सोल्युशन यांच्या सहकाऱ्याने मुंबई तसेच राज्यभरातील काळी पिवळी टॅक्सी आणि ऑटोरिक्षाकरिता बीग्सी (बीवायजीएसवायया सेवेचा आरंभ परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते झाला. यावेळी सह परिवहन आयुक्त शैलेश कामतवाहतूकचे उपआयुक्त अजित बोगार्डेमुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील तसेच बीग्सीचे संस्थापक प्रोफ.निरंजन भट आदी उपस्थित होते.

परिवहन आयुक्त भिमनवार म्हणाले कीशहरीकरणाच्या प्रक्रियेत महिलांचा कामासाठीचा प्रवास वाढला असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये कायम चिंता असते. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर गंभीरपणे घेतला गेला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवासी वाहनात व्हेईकल लोकेशन अँड ट्रॅकिंग डिव्हाइस’ (व्हीएलटीडीव पॅनिक बटन बसवणे बंधनकारक करण्यात आले.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे राष्ट्रीय मिलेट

        राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे राष्ट्रीय मिलेट क्षेत्रातील अनुभव आयआयएमआरहैदराबादच्या संचालक डॉ. तारा सत्यवतीबाजरी ब्रीडर डॉ. पी. संजना रेड्डी यांनी बाजरी संशोधनसुधारित वाण आणि धोरणात्मक हस्तक्षेपांवर प्रकाश टाकला. आयसीआरआयएसएटीहैदराबाद येथील जीन बँकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वेत्रिवेंद्रन मणी यांनी जैवविविधतेच्या संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले. ओडिशा मिलेट मिशनचे माजी अधिकारी दिनेश बालम यांनी ओडिशातील मिलेट चळवळीचा अनुभव उपस्थितांशी शेअर केला.या चर्चासत्रामुळे महाराष्ट्रात भरड धान्य पिकांवर आधारित उपाययोजना प्रणाली उभारण्यासाठी ठोस दिशा मिळेलअशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

                                                ००००

संध्या गरवारे/विसंअ

गरजा आणि भविष्यातील संधीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

  गरजा आणि भविष्यातील संधीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

     एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनचे जैवविविधता संचालक डॉ. ई. डी. इस्रायल ऑलिव्हर किंग यांनी भरड धान्य पिकांपुढील प्रमुख आव्हानेगरजा आणि भविष्यातील संधी यावर सादरीकरण केले. यानंतर महिला शेतकऱ्यांचे थेट अनुभव ऐकून घेण्यात आलेज्यामध्ये शेतीतील वास्तव अडचणीओळखबाजारपेठ आणि संसाधनांपर्यंत पोहोच याबाबत त्यांनी आपले मत मांडले.

         ओडिशा मिलेट मिशनकडून मिळालेल्या अनुभवांचे सादरीकरण करण्यात आलेज्यातून राज्यस्तरीय मिलेट उपक्रम यशस्वीपणे कसे राबवता येतातयाबाबत माहिती देण्यात आली. या सादरीकरणात राज्यातील विस्तार यंत्रणेची भूमिका आणि संधी स्पष्ट केल्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठराहुरी अंतर्गत एनएआरपीकोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराडतसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी येथील एनएआरपीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. जी. पवारमुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.आर. एस. इंगोले यांनी संशोधनबियाणे विकास आणि क्षेत्रीय अंमलबजावणीवरील अनुभव मांडले.

महिला शेतकऱ्यांची भूमिका बळकट करण्याच्या प्रयत्नांना

 महिला शेतकऱ्यांची भूमिका बळकट करण्याच्या प्रयत्नांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत सकारात्मक आणि पाठिंबा देणारे आहेत, असे डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले. हवामान बदलामुळे शेतीपुढील अडचणी संरचनात्मक अडथळ्यांचा सामना याबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.

         बीड येथील द्वारकाताई वाघमारे,धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील वैशाली घुगेपुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शांताबाई वारवे या महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या महिला शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. दैनंदिन शेतीमधील अडचणी शासनाने करावयाच्या उपाययोजना याबाबत मते मांडली.

         विदी लीगल सेंटर आणि एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकरी  यांची स्थानिक पातळीवरील आव्हाने आणि संभाव्य धोरणात्मक व कार्यक्रमात्मक उपाययोजनांवर चर्चा झाली. महिला शेतकऱ्यांचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्याबाबतही चर्चा झाली.

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे

 महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे

- अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी

·        कृषि विभाग- एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन

आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

मुंबई,दि.२३: महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहेमहिला शेतक-यांसाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवत असून शाश्वत शेतीसाठी कृषि विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन कृषि विभागासोबत शेतकरी महिलांच्या विकासासाठी काम करत आहे, असे कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले.

            महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे महिला शेतक-यांच्या विविध विषयाच्या अनुषंगाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी बोलत होते.

या कार्यक्रमात एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामिनाथनशेतकरी महिला प्रतिनिधीविविध भागातून महिलांविषयक काम करणा-या स्वयंसेवी संस्थापशुसंवर्धनदुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामीसहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेकृषी आयुक्त सुरज मांढरेनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंगमहाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदच्या महासंचालक वर्षा लड्डाएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त कैलास पगारेउमेद- राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर,मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खानविधी व न्याय विभागाचे संयुक्त सचिव मकरंद कुलकर्णी तसेच महिला किसान अधिकार मंच यांच्या सीमा कुलकर्णी यांनीही आपले विचार मांडले.

लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार 'भारत पर्व 2026' महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दालनासह 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथाचे असणार विशेष आकर्षण

  

लाल किल्ल्याच्या प्र






 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दालनासह 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक'

चित्ररथाचे असणार विशेष आकर्षण

 

नवी दिल्ली, दि. 24: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी  भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे 26 ते 31 जानेवारी या कालावधीत लाल किल्ल्यावर 'भारत पर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी  विनामूल्य प्रवेश असून, 26 जानेवारी रोजी सायंकाळी ते रात्री आणि 27 ते 31 जानेवारी या काळात दुपारी 12 ते रात्री या वेळेत सुरु राहील.  या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) भव्य दालन असूनयाद्वारे महाराष्ट्राच्या समृद्ध पर्यटनाचे आणि ऐतिहासिक वारशाची माहिती देण्यात येणार आहे.

 

या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलनात सहभागी झालेला महाराष्ट्राचा 'गणेशोत्सव: आत्मनिर्भर भारताचे प्रतीकहा देखणा चित्ररथ. हा चित्ररथ प्रदर्शनासाठी लाल किल्ला परिसरात विशेष स्थानी ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा लाडका उत्सव असलेला 'गणेशोत्सवहा केवळ धार्मिक सोहळा नसून तो स्थानिक कलाकारांनामूर्तिकारांना आणि लघुउद्योगांना कशाप्रकारे बळ देतोम्हणजेच 'आत्मनिर्भर भारताचेएक जिवंत प्रतीक कसे आहेयाची प्रभावी मांडणी या चित्ररथातून करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) या दालनामध्ये पर्यटकांना राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळेअथांग कोकण किनारपट्टीऐतिहासिक गड-किल्लेअध्यात्मिक वारसा आणि व्याघ्र प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. राज्यातील विविध पर्यटन केंद्रांवरील निवासाच्या सोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन पॅकेजेसची माहिती देण्यासाठी येथे स्वतंत्र कक्ष कार्यरत असेल.

 

या महोत्सवात पर्यटकांना 'पॅन इंडिया फूड कोर्ट'च्या माध्यमातून विविध राज्यातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येईल. यासोबतच हस्तशिल्प आणि हातमाग बाजारात विणकरांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू उपलब्ध असणार आहेत. सहा दिवसांच्या या उपक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमसशस्त्र दलांचे बँड वादन आणि 'डिजिटल इंडिया'चे प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांची  रेलचेल असेल.

 

Featured post

Lakshvedhi