Saturday, 3 May 2025

प्राईम फोकस' सोबतच्या तीन हजार कोटींच्या करारामुळे मुंबईत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार होणार

  

प्राईम फोकससोबतच्या तीन हजार कोटींच्या करारामुळे

मुंबईत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. २ : जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. चित्रपट सृष्टीत नविन्यपूर्ण संकल्पनाक्रिएटिव्हिटीचा गुणवत्तापूर्ण वापर होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्राईम फोकस’ सोबत ३००० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी तर प्राईम फोकस च्या वतीने संचालक नमित मल्होत्रा यांनी करारावर सह्या केल्या. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकसिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासूउद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

            मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेल्या कराराद्वारे ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून सुमारे २५०० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होईल. हा प्रकल्प २०२५-२६ मध्ये सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मुंबतील खार येथे कार्यालय असणाऱ्यातसेच जगभरात आपल्या शाखा असणाऱ्या प्राईम फोकस कंपनीचे जगभरात काम चालते. या कंपनीसह तिच्या सहयोगी कंपन्यांना आवश्यक त्या परवानग्या / नोंदणी प्रक्रिया / मान्यता / क्लिअरन्स / आर्थिक प्रोत्साहने इत्यादी मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांकडून सहकार्य करण्यात येणार आहे. त्यांना विद्यमान धोरणेनियम व नियमावलींनुसार आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’सोबत सामंजस्य करार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत

युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कसोबत सामंजस्य करार

----

एज्यूकेशन सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकत्रित येतील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

 

मुंबईदि. २ : नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. यामुळे सिडकोमार्फत नवी मुंबईत सुरू होत असलेल्या एज्यूकेशन सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकत्रित येतीलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आज झालेल्या करारांमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न पूर्ण होईलअसे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज २०२५ परिषदेमध्ये आज आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी सिडको आणि इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकउद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगनसिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासूउद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

परदेशी विद्यापीठांना भारतात आणून जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र उभारण्याच्या उद्देशाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२५ मध्ये सिडकोच्या इंटरनॅशनल एज्युसिटी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वेव्हज परिषदेत सिडको आणि इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (University of York) यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. हे विद्यापीठ नवी मुंबई येथे सिडकोमार्फत उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटी’ प्रकल्पामध्ये आपले कॅंपस उभारून जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र निर्माण करणार आहे. यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कच्या वतीने १५०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कच्या वतीने कुलगुरू व अध्यक्ष चार्ली जेफ्री यांनी स्वाक्षरी केली.

युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कला राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईलअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.

ठिबक व तुषार सिंचन प्रणालीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक

 ठिबक व तुषार सिंचन प्रणालीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक

- कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

            

मुंबई, दि. 2 : ठिबक व तुषार सिंचन संचाचे वितरण करताना त्याची पूर्ण माहिती शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना ही प्रणाली कशी वापरावी याचे प्रशिक्षण या संचाचे वितरण करणाऱ्या साहित्य विक्रेत्यांनी द्यावे, असे निर्देश कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

             सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना : प्रति थेंब अधिक पीक (ठिबक व तुषार) अंमलबजावणी संदर्भात झाली. या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीईरीगेशन असोसिएशनचे अध्यक्ष  झुंबरलाल भंडारी यांच्यासह संघटनेचे सदस्य, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, ठिबक आणि तुषार सिंचन संचाचे वितरण कंपन्यांद्वारे केले जाते. या योजनांमध्येशेतकऱ्यांना अनुदान आणि सवलती मिळतात. पाणी वाचवण्यासाठी आणि पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ठिबक सिंचन उपयुक्त आहेतर तुषार सिंचन मोठ्या क्षेत्रांसाठी योग्य आहे. ठिबक व तुषार सिंचन संच शेतात बसविल्यानंतर त्याचा योग्यप्रकारे वापर होणे गरजेचे आहे. तसेच जास्त कालावधीपर्यंत ही यंत्रणा शेतकऱ्यांना वापरता यावी यासाठी हे संच वापरण्याचे कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे. ज्या कंपन्या शेतकऱ्यांना याबाबत योग्य ते प्रशिक्षण देणार असतील त्या कंपन्यानाच शासन अनुदान देण्यासंदर्भात प्राधान्यक्रम निश्च‍ित करेल असेही कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.                                                    

******

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ : प्रवेशपत्र उपलब्ध

 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ : प्रवेशपत्र उपलब्ध

 

 मुंबईदि. २ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी पात्र उमेदवारांची प्रवेशपत्रे आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीवर उपलब्ध झाली आहेत. संबंधित उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरून आपल्या खात्यात लॉगइन करून डाउनलोड करावीत.

 

ही परीक्षा १०१११३१४ आणि १५ मे २०२५ या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी मूळ स्वरूपात छापील प्रवेशपत्र अनिवार्य असून त्याविना परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाहीअशी स्पष्ट सूचना आयोगाने केली आहे.

परीक्षेच्या दिवशी उद्भवू शकणाऱ्या वाहतूक कोंडीआंदोलनेहवामानातील बदल इत्यादी कारणांमुळे उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान दीड तास अगोदर केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे. परीक्षा सुरू होण्याच्या एका तास आधी स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. नियोजित वेळेनंतर परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

अधिक माहितीसामान्य सूचना आणि मार्गदर्शक नियम आयोगाच्या संकेतस्थळावर ‘Guidelines for Examination’ या विभागात उपलब्ध आहेत. या सूचनांचे पालन न केल्यास उमेदवारांवर कारवाई होऊ शकते.

प्रवेशपत्र मिळवताना अडचण आल्यास उमेदवारांनी आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in किंवा support-online@mpsc.gov.in या ईमेलवर किंवा ०२२-६९१२३९१४ / ७३०३८२१८२२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

 

नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 4 मे रोजी मेगा ब्लॉक नाही

 नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर

4 मे रोजी मेगा ब्लॉक नाही

 

मुंबई, दि. 2 : राष्ट्रीय परिक्षा एजेंसीनवी दिल्ली यांचेमार्फत रविवारी दि. 4 मे 2025 रोजी National Eligibility cum Entrance Test (UG) - 2025 ही परिक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने उमेदवार मुंबईच्या बाहेरील भागातील आहेत आणि त्यांना त्यांच्या परिक्षा केंद्रावर विना अडथळा पोहचण्यासाठी जिल्हा प्रशासनमुंबई शहर यांनी रेल्वे प्रशासनास रविवार दि. 4 मे 2025 रोजी कोणताही Mega Block ठेऊ नये असे कळविले होते. त्यानुषंगानेरेल्वे प्रशासनाने दि. 4 मे 2025 रोजी सेंट्रलहार्बर व वेस्टर्न रेल्वे या तीन मार्गांवर कोणताही Mega Block नसल्याचे कळविलेले आहे. तरी यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी कळविले आहे.

0000


Padma Awardees from the State Honored by Maharashtra Governor Posthumous Honours for Manohar Joshi and Pankaj Udhas; Achyut Palav, Ashok Saraf felicitated for Padma Shri

 Padma Awardees from the State Honored by Maharashtra Governor

Posthumous Honours for Manohar Joshi and Pankaj Udhas;

Achyut Palav, Ashok Saraf felicitated for Padma Shri

 

Mumbai, 2nd May : Padma awardees and other national awardees from Maharashtra were felicitated at the hands of Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at a programme held at Raj Bhavan Mumbai on Fri (2 May).

 

The felicitation ceremony was organized by the Vasantrao Naik Rural Development and Agricultural Research Foundation.

 

Unmesh Joshi, the son of Padma Bhushan awardee former Chief Minister Manohar Joshi accepted the honour meant for his late father. The honour for Pankaj Udhas was accepted by the wife of the late playback singer.

 

Calligrapher Achyut Palav and actor Ashok Saraf accepted the honour in person. The recipient of the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar Kareena Thapa from Amravati was also honored by the Governor.

 

The felicitation for the social worker Chaitram Pawar, flautist Ronu Majumdar, and renowned doctor Vilas Dangre – all Padma Shri awardees - were accepted by members of their family.

 

Minister of State for Industries Indranil Naik, President of the Vasantrao Naik Foundation Rajendra Barwale, Working President Avinash Naik, former trustees Mushtaq Antulay, Anand Patwardhan and Anjali Naik Piramal were among those present.

0000

राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सन्मान अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

 राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सन्मान

अशोक सराफसुलेखनकार अच्युत पालव राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

मनोहर जोशी व पंकज उधास मरणोपरांत सन्मानित

प्रगल्भ नेतृत्वामुळे महाराष्ट्राची प्रगतीविकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र आवश्यक : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

 

मुंबई, दि. 2 : समर्पित नेतृत्व लाभल्याशिवाय कोणतेही राज्य प्रगती करु शकत नही. सुदैवाने महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणवसंतराव नाईक यांच्यासारखे द्रष्टे व प्रगल्भ नेते लाभले. प्रगल्भ नेतृत्वामुळे महाराष्ट्राची प्रगती झाली. विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी तसेच देशाला ५ ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे आहेअसे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले. 

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या राज्यातील पद्म पुरस्कार व पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचा अभिनंदन सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २ ) राजभवन मुंबई येथे झालात्यावेळी ते बोलत होते.

वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

आपण संसद सदस्य असताना मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. त्यावेळची लोकसभा तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशी यांनी अतिशय कुशलतेने चालवली तसेच सभागृहातील चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात होतील हे सुनिश्चित केले असे राज्यपालांनी सांगितले.

            छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्व गुणांचा उल्लेख करताना राज्यपालांनी महाराज सच्चे धर्मनिरपेक्ष होते असे सांगितले. आपल्या धर्माचा अभिमान असावा परंतु इतर धर्मांचा तिरस्कार नको असे राज्यपालांनी नमूद केले.

यावेळी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत पार्श्वगायक पंकज उधास यांना मरणोपरांत पद्मभूषण जाहीर झाल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. उन्मेष जोशी यांनी सन्मान स्वीकारला.

सुलेखनकार अच्युत पालव व अभिनेते अशोक सराफ यांना देखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती - अमरावतीची करिना थापा हिला देखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.     

पद्मश्री प्राप्त सामाजिक कार्यकर्ते  चैत्राम पवारबासरी वादक रोणू मजुमदार व प्रसिद्ध डॉक्टर विलास डांगरे यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांनी सत्कार स्वीकारला.

कार्यक्रमाला उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईकवसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले,  प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अविनाश नाईक,  विश्वस्त मुश्ताक अंतुलेआनंद पटवर्धन व अंजली नाईक पिरामल उपस्थित होते.

*****

Featured post

Lakshvedhi