Friday, 21 March 2025

उन्हाळ्यात रक्तदात्यांनी रक्तदानाच्या सर्वश्रेष्ठ कार्यात सहभागी व्हावे -

 उन्हाळ्यात रक्तदात्यांनी रक्तदानाच्या सर्वश्रेष्ठ कार्यात सहभागी व्हावे

 सार्वजनिक आरोग्यमंत्री मंत्री प्रकाश आबिटकर

 मुंबईदि. 20 : रक्तदानाच्या चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा कमी प्रमाणात असतो.त्यामुळे गरजू रुग्णांना उन्हाळ्याच्या कालावधीत देखील रक्त पुरवठा सुरळीतपणे उपलब्ध होण्यासाठी रक्तदात्यांनी उन्हाळ्यात देखील रक्तदानाच्या सर्वश्रेष्ठ कार्यात सहभागी व्हावेअसे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

             मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्य रक्त संक्रमण परिषद संचलित जे. जे. महानगर रक्तकेंद्र यांच्यावतीने स्वैच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला दिलेल्या भेटी दरम्यान सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.आबिटकर यांनी आवाहन केले. यावेळी आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकरराज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक महेंद्र केंद्रेभायखळासर जे.जे. महानगर रक्तकेंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. हितेश पगारे यांच्यासह संबंधित डॉक्टर्स व रक्तदाते उपस्थित होते.

            आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महाविद्यालयांना सुट्ट्या असतात. त्यामुळे स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे प्रमाण काहीसे कमी असल्याने रक्त संकलन कमी होतेपरंतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कॅन्सर पेशंटहिमोफिलियाथॅलेसेमियासिकलसेल तसेच गर्भवती महिला या सगळ्यांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. उन्हाळ्याच्या कालावधीत गरजू रुग्णांची रक्ताची निकड लक्षात घेताजास्तीत जास्त रक्तदात्यांनी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदानासाठी पुढाकार घ्यावाअसे आवाहन मंत्री श्री. आबिटकर यांनी केले.

00000

नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा/ टॅक्सी चालकांच्या तक्रारीसाठी लवकर व्हाट्सअप क्रमांक

 नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा/ टॅक्सी चालकांच्या

तक्रारीसाठी लवकर व्हाट्सअप क्रमांक

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. २० : प्रवाशांना नियमबाह्य भाडे आकारणेभाडे नाकारणे तसेच गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा - टॅक्सी तसेच ओला -उबर चालकांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाट्सअप क्रमांक प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रवाशांनी आपल्या गैरसोय बाबत या क्रमांकावर प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते वांद्रे पूर्व मतदारसंघातील बांद्रा, खार व इतर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा व टॅक्सी चालकांच्या अरेरावी संदर्भात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार वरुण सरदेसाई व मोटार परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी बांद्रा, खार अंधेरी या रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना रिक्षा व टॅक्सी चालकांची अरेरावी सहन करावी लागते. हे चालक नियमबाह्य पद्धतीने भाडे आकारतात, गैरवर्तन करताततसेच अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास नकार देतात. या संदर्भात परिवहन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. या वेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले कीमोटार परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांनी मिळून एक संयुक्त पथक नेमावे ज्या भागात अशाप्रकारे प्रवाशांना रिक्षा चालकाकडून त्रास होतो तेथे वारंवार ग्रस्त घालावी. तसेच  प्रादेशिक विभाग निहाय हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित न करता पूर्ण मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाट्सअप क्रमांक प्रदर्शित करावा व त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी. जेणेकरून प्रवासी आपल्या तक्रारी संबंधित व्हाट्सअप क्रमांकावर करतील.

तक्रार असलेल्या रिक्षा अथवा टॅक्सी चालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवणे आवश्यक असून तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन गरज पडल्यास त्याचा परवाना देखील रद्द करण्याची कारवाई करावी, असे निर्देश परिवहन विभागाला मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले.

***

संध्या गरवारे/विसंअ/

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सेन यांची नेव्हल डॉकयार्ड येथे भेट

 न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सेन यांची नेव्हल डॉकयार्ड येथे भेट

 

मुंबई, दि. २० न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सेन आणि रॉयल न्यूझीलंड नेव्हीचे नौसेना प्रमुख रिअल ॲडमिरल गारिन गोल्डिंग यांनी भारतीय नौदलाच्या नवीनतम स्वदेशी विनाशिका आयएनएस सुरत ला नेव्हल डॉकयार्डमुंबई येथे भेट दिली. पश्चिमी नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल संजय जे. सिंग यांनी पंतप्रधान लक्सेन यांचे जहाजावर स्वागत केले.

          या भेटीदरम्यान आयएनएस सुरत च्या अत्याधुनिक डिझाइनप्रगत तंत्रज्ञान आणि सामरिक क्षमतांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेचराष्ट्रीय सागरी सुरक्षेतील या युद्धनौकेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा आढावा घेण्यात आला. आयएनएस सुरत ही भारतीय नौदलाची नवीनतम क्षेपणास्त्र विनाशिका असून १५ जानेवारी २०२५ रोजी नौदलात समाविष्ट झाली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्समुंबई यांनी या युद्धनौकेची निर्मिती केली असून भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने तिची रचना विकसित केली आहे. या जहाजात ७५ टक्के पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा समावेश असूनही आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेचा उत्तम नमुना असल्याची माहिती यावेळी पंतप्रधान लक्सेन आणि त्यांच्या शिष्टमंडळाला देण्यात आली.

यानंतर रिअल ॲडमिरल गारिन गोल्डिंग यांनी व्हाईस ॲडमिरल संजय जे. सिंग यांची सदिच्छा भेट घेऊन द्विपक्षीय नौदल सहकार्य आणि धोरणात्मक संबंधांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी नेव्हल डॉकयार्डच्या हेरिटेज हॉलला भेट देऊन ‘एचएमएनझेडएस ते काहा’ (HMNZS Te Kaha) च्या एप्रिल २०२५ मधील नियोजित भेटीकरिता तांत्रिक सहाय्याबाबत चर्चा केली. याशिवायअॅडमिरल गोल्डिंग यांनी नेव्हल डॉकयार्डमुंबई येथील गौरव स्तंभ’ येथे पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्रसेवेसाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या विरांना श्रद्धांजली वाहिली.

या दौऱ्याच्या अनुषंगाने नौदल सहकार्य वाढवण्यासाठी तसेच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये क्रॉस-डेक भेटीक्रीडा स्पर्धा आणि सामाजिक कार्यक्रम यांचा समावेश आहे. ‘एचएमएनझेडएस ते काहा’ HMNZS Te Kaha जहाज निघण्यापूर्वी भारतीय नौदलासोबत मेरीटाइम पार्टनरशिप एक्सरसाईज (MPX) पार पडणार आहे. या सागरी युद्धाभ्यासामुळे नौदल संचालनामधील समन्वय अधिक वृद्धिंगत होईल आणि सागरी सहकार्याची सामूहिक बांधिलकी अधोरेखित केली जाईल.

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी गतिमान कार्यवाही,शेतीसाठी १०० टक्के हरित ऊर्जा आणणारे महाराष्ट्र पहिले राज्य

 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी गतिमान कार्यवाही

-ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

•       शेतीसाठी १०० टक्के हरित ऊर्जा आणणारे महाराष्ट्र पहिले राज्य

 

मुंबईदि. २०: शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनामागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्यासाठी शासनाची गतिमान कार्यवाही सुरू आहे. शेतीला १०० टक्के हरित ऊर्जेवर आणणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत ऊर्जा विभागाच्या चर्चेवरील उत्तरादरम्यान सांगितले.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्याराज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून ७.५ अश्वशक्ति असलेल्या ४५ लाख कृषी वीज पंपांना मोफत वीज देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने १४ हजार ६१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पहिल्या तीन महिन्यांसाठी ७ हजार ९३८ कोटी रुपयांच्या निधीचाही समावेश आहे. महाराष्ट्र हे कृषीसाठी सर्वात मोठा सौर ऊर्जेचा पुरवठादार राज्य बनले आहे.

राज्यात १६ हजार मेगावॉट सौर ऊर्जा शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यात २७ जिल्ह्यात २ हजार ७७९ विद्युत पंप सौर उर्जेवर आणण्याची कामे सुरू करण्यात आली आहे. ऑक्टोंबर २०२६ पर्यंत हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. मागील ९ महिन्यात ३०० मेगावॉट प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात आली आहे. सौर ऊर्जीकरणामुळे राज्याची ५ हजार ५०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. शेतीसाठी सौर ऊर्जी करण करण्याकरिता राज्यात ४२ कंपन्यांना कामे देण्यात आलेली आहेअसेही राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या.

 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्यामागणीनुसार राज्यात ३३३२ केव्ही उपकेंद्र मंजूर करण्यात येत आहे. आरडीएसएस योजनेतून आशियाई बँकेच्या सहकार्याने ७ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या माध्यमातून नवीन उपकेंद्रांना मंजुरी देण्यात येईल. तसेच पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सौर उर्जेवर आधारित बूस्टर पंप देण्यात येणार आहे. जुन्या ऊर्जा निर्मिती केंद्रांबाबत केंद्र शासनाच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे ६६० मेगावॅट वीज निर्मिती केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच चंद्रपूर येथे ८०० मेगावॉट वीज निर्मिती केंद्र उभारण्यासाठी शासन कार्यवाही करेल.

सन २०२५- २६ आर्थिक वर्षासाठी ऊर्जा विभागाच्या अनिवार्य खर्चासाठी ९८ कोटी ९० लाख ४९ हजार आणि कार्यक्रम खर्चाकरिता २२ हजार ५३४ कोटी १ हजार रुपये रकमेच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या.

००००

पोषण आहारातून विद्यार्थ्यांना त्रास झाल्याप्रकरणी पुन्हा चौकशी करणार

 पोषण आहारातून विद्यार्थ्यांना त्रास झाल्याप्रकरणी पुन्हा चौकशी करणार

-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. 20 : अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील मौजे आडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पोषण आहारातून 31 विद्यार्थ्यांना त्रास झाल्याप्रकरणी पुन्हा चौकशी करण्यात येईल. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईलअसे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले.

याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. त्यावर मंत्री श्री.दादाजी भुसे यांनी पुन्हा चौकशी करण्यात येईलअसे सांगितले. सदस्य परिणय फुके यांनी यासंदर्भातील मूळ प्रश्न उपस्थित केला होता.

याबाबत माहिती देताना शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणालेआडगाव येथे विद्यार्थ्यांना पोषण आहारातून झालेल्या त्रासाची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. कांदा-लसूणच्या पेस्टची मुदत संपलेली होतीनवीन साहित्य आलेले असतानाही मुदत संपलेली पेस्ट वापरण्यात आली. यामुळे संबंधित शाळेतील स्वयंपाकी तथा मदतनीस यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. संबंधित मुख्याध्यापक यांना निलंबित करुन विभागीय चौकशीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच पुरवठादाराला एक लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

यासंदर्भात राज्यातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसंदर्भात आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येत असल्याचेही श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार

 पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार

गृह राज्यमंत्री डॉ पंकज भोयर

 

मुंबईदि. २० : पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील अनधिकृत बांधकामाबाबत तातडीने चौकशी करण्यात येईल. हे अनधिकृत बांधकाम असल्यास तातडीने निर्देश देऊन काढण्यात येईल,असे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

थेरगाव येथील अनधिकृत बांधकामाबाबत सदस्य अमोल खताळ यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

गृह राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणालेथेरगाव येथील हा भाग पुणे महापालिकेत येतो. पुणे महापालिकेला कारवाईबाबतचे निर्देश देण्यात येतील. या अनधिकृत बांधकामामुळे या भागात होत असलेल्या बेकायदेशीर वर्तन आणि गैरव्यवहारांवरही कारवाई करण्यात येईलसंगमनेर येथील घटनेची माहिती घेऊन याबाबतही आवश्यक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

औषधांच्या किमतीमध्ये तफावत आढळल्यास चौकशी करुन कारवाई -

 औषधांच्या किमतीमध्ये तफावत आढळल्यास चौकशी करुन कारवाई

-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

 

मुंबईदि. 20 – पुणे शहरात प्रत्येक मेडिकलदुकानामध्ये एकच औषध वेगवेगळ्या कंपनीची उपलब्ध असून विविध मेडिकल दुकानात वेगवेगळ्या दराने मिळत असल्याबाबत तक्रार प्राप्त नाही. मात्र अशी तफावत आढळून आल्यास त्याची चौकशी करुन कारवाई केली जाईलअसे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. सदस्य श्री.प्रवीण दरेकर यांनी याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ म्हणालेकेंद्र शासनाच्या औषध किंमत नियंत्रण आदेश, 2013 अन्वये औषधांच्या किंमती नियंत्रित केल्या जातात. एमआरपी पेक्षा अधिक किंमतीत कुणीही औषध विक्री करू शकत नाही. त्यांना मिळणाऱ्या कमिशनमधून ते दर कमी जास्त करू शकतात. खाजगी रुग्णालयात जेनेरिक औषध दुकान सुरू करण्याबाबत निश्चित विचार केला जाईलअसे सांगून डॉक्टरांना जेनेरिक किंवा इतर ब्रँडचे औषध याबाबत स्पष्ट उल्लेख करण्याच्या सूचना दिल्या जातीलअसेही मंत्री श्री.झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi