Monday, 17 February 2025

तुका झालासे कळस'

 तुका झालासे कळस'

एकनाथ हे सांस्कृतिक पुनरुत्थानाचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी होत. ची वाङ्मयसेवा बहुविध आहे. त्यांचे 'एकनाथी भागवतआणि 'भावार्थ रामायणहे महत्त्वपूर्ण ग्रंथ. देशकालपरिस्थितीनुसार अगदी योग्य वेळी,एका विशिष्ट हेतूने ही रामकथा त्या वेळच्या लोकांपुढे त्यांनी ठेवली. हा हेतू राष्ट्रीय स्वरूपाचा आहे. ज्ञानेशादिकांनी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणून ठेवलेले तत्त्वज्ञान अभ्यासूनपचवून, जीवनाच्या झगड्यात प्रत्यक्ष अनुभवूनलोकांना उपदेश करण्याची पात्रता संत तुकारामांनी सिद्ध केली. यामुळेच 'तुका झालासे कळसहे त्यांच्या संबंधीचे उद्गार सार्थ ठरले आहेत. एकनाथ-तुकारामांच्या काळात आणि त्यानंतरही मुसलमान संतांनी जी मराठीची सेवा केली ती उपेक्षणीय नाही. शहा मुंतोजी ब्रह्मणी यांचा 'सिद्धसंकेतप्रबंधहा  दोन हजार ओव्यांचा  सर्वात मोठा ग्रंथ. यानंतर अंबर हुसेनशेख सुलतानशेख महंमदशहामुनी इत्यादी संतांनी यात महत्त्वाचे योगदान दिले.

               कलात्मकदृष्टीने कथा निवेदन करणे हा  विशेष मुक्तेश्वर यांच्या काव्यात दिसतो. त्यांची एकूण कविता १७००० इतकी भरेल.शिवकालीन प्रवृत्तीची आणि आकांक्षांशी पूर्णतः समरस झालेले संत कवी रामदास त्यांचा 'दासबोध',' मनाचे श्लोक','रामायणही रचना. वामन पंडित-'यथार्थदीपिका', मोरोपंत-'केकावली', रघुनाथ पंडित-'दमयंती स्वयंवर', सामराज-'रुक्मिणी स्वयंवर', कृष्णदयार्णव-'हरिवरदा', श्रीधर- 'हरिविजय', 'पांडवप्रताप','वेदांतसूर्यया पंत साहित्यातील महत्वाच्या रचना.

लीळाचरित्र’ : पहिला चरित्रग्रंथ

 लीळाचरित्र : पहिला चरित्रग्रंथ

तेरावे शतक हे मराठी वाङ्मयनिर्मितीचा प्रारंभिक काळ. परिपक्वताप्रौढतापारमार्थिकता या गुणांनी युक्त. मराठीतील पहिला चरित्रग्रंथ म्हणून लीळाचरित्राला अनन्यसाधारण महत्व आहे. महानुभाव संप्रदायातील साहित्यिकांनी निर्माण केलेल्या साहित्याची विपुलता आणि वैविध्यता ही वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी आख्यानक काव्येभाष्ये-महाभाष्येसूत्रबद्ध व्याकरणभावगीतात्मक स्वयंवरकथागीताटीकास्थळवर्णनेआरत्यापदेभारुडेस्तोत्रेप्रवासवर्णनचरित्रटीकाविदग्ध कथाकाव्येटीपा अशा विविध साहित्यप्रकांरातून लेखन केलेले दिसते.

मराठीत आज अस्तित्वात असलेल्या अनेक वाङ्मयप्रकारांचा उगम महानुभाव साहित्यात शोधता येतो. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि मराठी भाषेत गीतार्थाचे सुंदर व प्रत्ययकारी निरुपण  केले. सर्व समाजाला प्रेमाचासमतेचा आणि भक्तिभावाचा उपदेश गीताटिकेच्या द्वारा करण्याचा उपक्रम ज्ञानेश्वरांनी केला.मराठी जन आणि मराठी मन घडवणारा पहिला क्रांतिकारी नेता ज्ञानदेव होय. मौलिक स्वरूपाचे तत्त्वज्ञान आणि अव्वल दर्जाचे काव्य या दोहोंचा मनोहर संगम तत्कालीन दुसऱ्या कोणत्याही भाषेत आढळणार नाही. महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार मुख्यतः इस.१५५८ मध्ये लिहिलेल्या सरस्वती गंगाधर यांच्या गुरुचरित्राने केला. दासोपंतांचा 'गीतार्णवयासारखा सव्वा लाख ओवीसंख्या असलेला प्रचंड ग्रंथ मराठीत दुसरा 

मराठीला आकार देणारे महानुभाव साहित्य

 मराठीला आकार देणारे महानुभाव साहित्य

 

आज आपण बोलत असलेली मराठी ही अनेक स्थित्यांतरे आणि उत्क्रांतीनंतर तयार झालेली समृद्ध भाषा आहे. अशा या समृद्ध साहित्य परंपरा लाभलेल्या मराठी भाषेस केंद्र शासनाने ऑगस्ट 2024 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आसा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच नवी दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्ताने मराठी साहित्याचा पाया असणाऱ्या महानुभाव पंथाच्या साहित्याचा घेतलेला हा धांडोळा. आजच्या आपल्या मराठीच्या विकासामध्ये किंबहुना  आज वापरात असलेल्या मराठीला आकार देण्याचे महत्वाचे काम केले ते महानुभाव पंथानेया पंथाच्या साहित्यातील लीळाचरित्र हा चक्रधर स्वामींच्या लीळांवर आधारित ग्रंथ मराठीतील आद्य ग्रंथ म्हणावा लागेल. मराठीच्या विकासात महानुभव पंथाच्या योगदानावर टाकलेला हा प्रकाश.*

महाराष्ट्र आणि मराठी विषयी -  मराठी भाषेची उत्पत्ती प्राकृतात असल्याचे सर्वश्रृत आहे. प्राकृत भाषेत लिहला गेलेला गाथा सप्तशती’ हा आद्य: ग्रंथ आणि यातील भाषा ही अस्सल महाराष्ट्राचीगोदावरी खोऱ्यातील आहे.  महाराष्ट्र प्रदेशावर साडेचारशे वर्ष राज्य करणाऱ्या सातवाहन कुलातील राजा हाल यांने हा ग्रंथ लिहला. मराठीतील पहिला शिलालेख हा कर्नाटकातील श्रवणबेळगोळा येथील श्री चावुण्ड राये करवियले श्री गंगराये सुत्ताले करवियले हा आहे. तर रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील आक्षी येथे सापडलेला  शिलालेख मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे डॉ शं.गो.तुळपुळे म्हणतात. त्याही आधी 'धर्मोपदेशमाला' (इ.स. 859) या ग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख आहे. सललयि-पय-संचारा पयडियमाणा सुवण्णरयणेल्ला ! मरहठ्य भासा कामिणी य अडवीय रेहंती !! असे मराठीचे वर्णन येते. सहाव्या शतकातील वराह मिहीरच्या बृहत्दसंहितेत महाराष्ट्र  देशाचा उल्लेख पहावयास मिळतो. तर महाराष्ट्राचा स्पष्ट उल्लेख महानुभव लेखक डिंबकृष्णमुनी यांनी केल आहे. विंध्याद्रीपासौनि दक्षिणदिशेसी।कृष्णनदीपासौनि उत्तरेसी।। झाडीमंडळापासौनि पश्चिमेसि । महाराष्ट्र बोलिजे ।।’ असा महाराष्ट्र प्रदेश असल्याचे ते सांगतात. याशिवाय मराठीच्या वापराची उदाहरणे आपल्याला दिवे आगरपंढरपूर येथील ताम्रपटातून पहावयास मिळतात.

                यादव काळात मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. या राजभाषेचा विकास करण्याचे कार्य महानुभाव पंथातील अनेकांनी केले. श्री गोविंदप्रभूभटोबासकेसोबाडिंबकुष्णमुनी यांनी मराठीला आकार दिला. पंथियांच्या अनेक साहित्यातून मराठी समृद्ध होत गेली. त्यामध्ये म्हाईंभटांचे लीळाचरित्रगोविंदप्रभूचरित्र किंवा ऋद्धिपूरचरित्रकेशिराजबास यांचे दृष्टांतपाठसिद्धांतसूत्रपाठबाईदेवबास यांचे पूजावासरनरेंद्रस्वामी यांचे रुक्मिणीस्वयंवरभास्करभट्ट यांचे शिशुपाळवधउद्धवगीतादामोरदपंडित यांचे वच्छाहरणरवळोबास यांचे सह्याद्री महात्म्यनारो बहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णनविश्वनाथ पंडित यांचे ज्ञानप्रबोधयासह स्थानपोथीवृद्धाचारमार्गरुढीचरित्र अबाबमहदबेचे धवळे अशा ग्रंथांचा समावेश आहे.

                सांकेतीक लिपीचा वापर - महानुभाव साहित्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सांकेतीक लिपीचा वापर. या वापरामुळेच अनेक वर्ष हे साहित्य सामान्यांपासून लांब राहिले. पणयाचमुळे हे सर्व साहित्य आहे त्या स्थितीत आज आपल्याला उपलब्ध झाले. यादव काळात 12 व्या शतकात महानुभाव पंथ उदयास आला. पंथियांना मार्गदर्शन करण्यासाठी साहित्याची निर्मिती केली. या साहित्यातूनच अधुनिक मराठीला आकार मिळत गेला. यानंतरच्या काळात वारकरी सांप्रदायांने मराठी अधिक समृद्ध केली.

                महानुभाव सांप्रदायाने महाराष्ट्राला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे समृद्ध साहित्य. पंथियांच्या या साहित्यामध्ये सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल असा ग्रंथ म्हणले स्थानपोथी. चक्रधरस्वामींनी महाराष्ट्रात ज्या ठिकाणी भ्रमण केले त्याची भौगोलिक माहिती देणारा ग्रंथ म्हणजे स्थानपोथी. चक्रधरस्वामींनी भेटी दिलेल्या ठिकाणी पंथियांनी ओटे बांधले आहेत. त्यामुळे आजही आपणास स्थानपोथीतील गावांचीनगरांची माहिती मिळते. यातील अनेक गावेनगरे आजही अस्तित्वात आहेत. त्यामुळे यादवकालीन महाराष्ट्र समजून घेताना स्थानपोथीचे महत्व अनन्यसाधारण आहे. एकूणच या ग्रंथाच्या माध्यमातून आपणास यादवकाळातील महाराष्ट्राचा भूगोल,  संस्कृतीजीवनपद्धतीग्रामरचनाखाद्य संस्कृतीव्यवहारप्रशासनघर बांधणीव्यापार व व्यवसाय याविषयी सविस्तर माहिती मिळते. त्याकाळच्या महाराष्ट्राचे समग्र दर्शन घडवणारा उत्कृष्ट असा दुसरा ग्रंथ नाही.

लीळाचरित्र मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ - महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधरस्वामी त्यांच्याविषयीच्या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. महींद्रबास ऊर्फ म्हाईंभट यांनी नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. याचा रचनाकाल सन 1178 च्या आसपासचा आहे. तत्कालीन राजकीयसामाजिक व धार्मिक जीवनाचे मार्मिक चित्रण लीळाचरित्रातून आले आहे.  लीळाचरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा उत्तम नमुनाच होय. छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्येअलंकृत साधेपणा हे तिचे विशेष होत. त्यावेळचे खाद्यपदार्थवस्त्रचालीरितीकरमणुकीचे प्रकारकायदेसामाजिक सुरक्षासणउत्सव इत्यादी सामाजिक जीवनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक उल्लेख या चरित्रग्रंथातून आले असल्यामुळे तत्कालीन समाजजीवनाच्या व धार्मिक जीवनाच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. चक्रधरांच्या काळातील वाक्प्रचारम्हणी यांचा उपयोग करून भाषेला सजविण्याचा प्रयत्न म्हाईंभटांनी केला आहे. साधीसरळसोपी पण आलंकारिक भाषा हे या चरित्रग्रंथाचे वैशिष्ट्य.

ऋद्धिपूरलीळा उर्फ गोविंदप्रभूचरित्र – ऋद्धिपूरचे चक्रधरांचे गुरू गोविंदप्रभू उर्फ गुंडमराउळ यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी म्हाइंभटाने गोळा केल्या व त्यातून ऋद्धिपूरलीळा उर्फ गोविंदप्रभूचरित्र हा ग्रंथ सिद्ध केला. याचा रचना काळ इ.स. 1288 आहे. प्राचीन वऱ्हाडी भाषेच्या अभ्यासासाठी हा एक उपयुक्त साधन ग्रंथ आहे. गडू = तांब्याहारा = टोपलीहेल = पाणी भरण्याचे मडकेपोपट / पावटे = उकडलेल्या तुरीच्या शेंगागीदरीउकड = नीट न बसलेलाकोनटा = कोपरा असे शब्द या ग्रंथात भेटतात.

मराठीतील पहिला कथासंग्रह दृष्टांतपाठ - दृष्टांत म्हणजे छोटीशी बोधकथा होय. प्रत्येक दृष्टांत स्वतंत्ररोचक आहे. विचारप्रतिपादनतत्त्वज्ञानमांडणीभाषाशैली आणि समाजजीवनाचे निरीक्षण या सर्वच गोष्टींनी हा ग्रंथ अपूर्व आहे.  चक्रधरांचे तत्त्वज्ञान विद्वानांना रुचेल अशा मराठीतून मांडणे व अध्यात्मासारखे शास्त्र पेलण्यास समर्थ अशी शब्दसंपत्ती मराठीत रूढ करणे हे केशिराजाचे मोठे कार्य. दृष्टांतपाठ हा फक्त तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही तर मराठीतील लोककथांचे पहिले संकलन आहे. खरे तर म्हातारियाना तो सोप्या भाषेतील अज्ञानमुंचन करणारा ज्ञानग्रंथ आहे.

रुक्मिणीस्वयंवर – नरेंद्रस्वामींनी लिहलेला हा ग्रंथ म्हणजे मराठीतील पहिले शृंगारिक आख्यानकाव्य. काव्यदृष्ट्या व कालदृष्ट्या साती ग्रंथांमधील पहिल्या क्रमांकाचा ग्रंथ. हे भक्तीतून उमललेले विदग्ध काव्य आहे. ज्या यादवकाळात रुक्मिणीस्वयंवर लिहिले गेले त्या काळात मराठी वाङ्मयाच्या भावसृष्टीवर श्रीकृष्णाच्या भक्तीचे अधिराज्य होते. या काव्याची रचना संस्कृतमधील महाकाव्यांच्या धर्तीवर आहे. वर्णनाची विपुलता व कथानकाची मंदगती यांचा प्रत्यय येतो. रुक्मिणीस्वयंवराच्या कथेवर अनेकांनी रचना केली पण नरेंद्राची सर कुणालाच आली नाही. खरीखुरी कलावंताची दृष्टी असणारा नरेंद्र हा मराठीतील पहिला कवी आहे.

शिशुपालवध - महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. याचा कर्ता भास्करभट्ट बोरीकर आहे. रुक्मिणी-श्रीकृष्ण यांच्या चित्रणासोबतच शिशुपाळवधाचे चित्रण या ग्रंथात आहे. विरक्ती व भक्तीपेक्षा शृंगाराचे चित्रण या ग्रंथात अधिक आढळते. या ग्रंथाविषयी बाईदेवबास म्हणतात भटो ग्रंथु निका जाला : परि निवृताजोगा नव्हेचि (ग्रंथ तर उत्तम झाला आहे पण निवृत्तीमार्गासाठी उपयुक्त नाही!) बाइदेवबासांचे हे उद्गार मराठी समीक्षेचे पहिले वाक्य ठरते.

उद्धवगीता - महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. याचा कर्ता भास्करभट्ट बोरीकर. भागवताच्या एकादशस्कंधावरील मराठीतील ही पहिली टीका ठरते.

वच्छाहरण - महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता दामोदर पंडित. दामोदरपंडिताचा कवित्वाचा विलास वृंदावनवर्णनयमुनावर्णनश्रीकृष्णमूर्तीवर्णन यांमधून प्रकर्षाने जाणवतो. श्रीकृष्णवर्णन आणि पंथाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार हे दुहेरी कार्य दामोदरांनी साधले आहे.

सैह्याद्री-माहात्म्य किंवा सैह्याद्रवर्णन - सैह्याद्री-माहात्म्य किंवा सैह्याद्रवर्णन हा महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. याचा कर्ता रवळोबास आहे. मूळ ग्रंथ शके 1254 ते 1275 यादरम्यान केव्हातरी लिहिला गेला असावा. सैह्याद्रवर्णन काव्यातील सह्याद्री म्हणजे माहूरचा डोंगर. पश्चिम घाटावरील सह्याद्री डोंगराशी या काव्यातील सह्याद्रीचा काही संबंध नाही. सैह्यादी-माहात्म्य हे काव्यकवीचे वर्णनचातुर्यत्याची प्रतिभासृष्टी आणि काव्यातला रसाविष्कार या दृष्टीने वाचले तररवळोबास हे एक एक प्रतिभावंत कवी होते असे प्रत्ययास येते.

ज्ञानप्रबोध - महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. याचा कर्ता विश्वनाथ. काव्य व तत्त्वज्ञान यांचा संगमवैराग्याची व भक्तीची शिकवण या ग्रंथात आहे.

                अशा वैविध्यपूर्ण ग्रंथाच्या लिखाणातून पंथियांनी मराठीचे साहित्यविश्व प्राचीनकाळी समृद्ध केले आहे. त्यांच्या या साहित्याचा वारसा पुढील काळात संत ज्ञानेश्वरांनी पुढे नेला. संत ज्ञानेश्वर माऊलींचा भावार्थदीपिकाअमृतानुभवचांगदेवपासष्टी अशा ग्रंथांनी मराठी भाषेतील साहित्याला वेगळ्या उंचीवर नेले. तर त्यानंतर संत नामदेवसंत तुकाराम महाराज यांनी केलेल्या रचनांनी भक्तीची परंपरा जनसामान्यांपर्यंत पाझरवण्याचे काम केले.

                अशा या समृद्ध मराठीभाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ही प्रत्येक मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.

हेमंतकुमार चव्हाण,

विभागीय संपर्क अधिकारी

0000


महाराष्ट्राबाहेर पुन्हा एकदा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा डंका

 महाराष्ट्राबाहेर पुन्हा एकदा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा डंका!


यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. या आधी तब्बल बावीस वेळा महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलने झाली आहेत. यंदाही हे संमेलन अनेक कारणांसाठी विशेष ठरणार आहे.


केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. यामुळे हे संमेलन ऐतिहासिक असेल. हा सोहळा मराठी भाषिक, साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. यामुळे संपूर्ण भारतभर आणि परदेशात विखुरलेल्या मराठी जनामनास एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. या संमेलनामुळे मराठीचा लौकिक अधिक वृद्धिंगत होईल. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटन हा मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण असेल.


अशी आहे मराठी साहित्य संमेलनाची गौरवशाली परंपरा


मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ १८७८ मध्ये पुण्यात रोवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक संमेलने महाराष्ट्राबाहेर पार पडली आहेत. विशेष म्हणजे १८७८ मध्ये सुरू झालेली साहित्य संमेलनाची परंपरा आजही सुरू आहे. पहिले संमेलन १८७८ मध्ये पुणे येथे पार पडले.


✒️ यानंतर १९०९ मध्ये म्हणजेच तब्बल २१ वर्षांनी सातवे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.


✒️ १९१७ मध्ये म्हणजेच तब्बल आठ वर्षांनी दहावे संमेलन मध्यप्रदेश मधील इंदूर येथे पार पडले.


✒️ १९२१ मध्ये तब्बल चार वर्षांनी अकरावे संमेलन बडोदा (गुजरात ) येथे पार पडले.


✒️ १९२८ मध्ये तब्बल सात वर्षांनी चौदावे संमेलन मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे पार पडले.


✒️ १९२९ मध्ये पंधरावे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.


✒️ १९३० मध्ये सोळावे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.


✒️ १९३१ मध्ये सतरावे संमेलन तेलंगणातील हैद्राबाद येथे पार पडले.


✒️ १९३४ मध्ये तब्बल चार वर्षांनी विसावे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.


✒️ १९३५ मध्ये एकविसावे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदूर येथे पार पडले.


✒️ १९४६ मध्ये तब्बल अकरा वर्षांनी ३० वे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.


✒️ १९४७ मध्ये ३१ वे संमेलन तेलंगणातील हैद्राबाद येथे पार पडले.


✒️ १९५१ मध्ये तब्बल चार वर्षांनी ३४ वे संमेलन कर्नाटक मधील कारवार येथे पार पडले.


✒️ १९५३ मध्ये ३६ वे संमेलन गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडले.


✒️ १९५४ मध्ये ३७ वे संमेलन दिल्ली येथे पार पडले.


✒️ १९६१ मध्ये ४३ वे संमेलन तब्बल सात वर्षांनी मध्यप्रदेशमधील ग्वालेहर येथे पार पडले.


✒️ १९६४ मध्ये ४५ वे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.


✒️ १९६७ मध्ये ४७ वे संमेलन मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे पार पडले.


✒️ १९८१ मध्ये तब्बल १४ वर्षांनी ५६ वे संमेलन छत्तीसगडमधील रायपूर येथे पार पडले.


✒️ २००० मध्ये ७३ वे संमेलन तब्बल १९ वर्षांनी कर्नाटक मधील बेळगाव येथे पार पडले.


✒️ २००१ मध्ये ७४ वे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदोर येथे पार पडले.


✒️ २०१५ मध्ये तब्बल १४ वर्षांनी ८८ वे संमेलन पंजाबमधील घुमान येथे पार पडले. त्यानंतर २०१८


✒️ २०१८ मध्ये ९१ वे संमेलन गुजरात मधील बडोदा येथे पार पडले.


यानंतर यंदा तब्बल ७ वर्षांनी पुन्हा २०२५ मध्ये ९८ वे संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्ली येथे पार पडणार आहे.


मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याचा जागर


मराठी ही केवळ एक भाषा नसून शब्द, साहित्य, संगीत, कला आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. संत साहित्यापासून ते आधुनिक काव्यापर्यंत, लोककथांपासून आधुनिक कादंबऱ्यांपर्यंत, नाटकांपासून चित्रपटांपर्यंत मराठी साहित्याचा वारसा अत्यंत समृद्ध आहे.


या संमेलनात मराठी साहित्यविश्वातील मान्यवर लेखक, कवी, समीक्षक आणि रसिक वाचक एकत्र येणार आहेत. विविध चर्चासत्रे, परिसंवाद, ग्रंथप्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून मराठी भाषेचे भवितव्य उजळवण्याचा संकल्प केला जाणार आहे.


या भव्य सोहळ्याचा भाग बना!


दिल्लीतील हे साहित्य संमेलन मराठी संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्यप्रेमी, लेखक, कवी, विद्यार्थी आणि मराठी भाषा जपणाऱ्या सर्वांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी आहे. आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी, तिचा जागर करण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आपण सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे. चला, तर मग मराठी साहित्याचा हा ऐतिहासिक उत्सव दिल्लीच्या ऐतिहासिक भूमीवर भव्य स्वरूपात साजरा करूया!




 

️ १९६७ मध्ये ४७ वे संमेलन मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे पार पडले.

️ १९८१ मध्ये तब्बल १४ वर्षांनी ५६ वे संमेलन छत्तीसगडमधील रायपूर येथे पार पडले.

️ २००० मध्ये ७३ वे संमेलन तब्बल १९ वर्षांनी कर्नाटक मधील बेळगाव येथे पार पडले.

️ २००१ मध्ये ७४ वे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदोर येथे पार पडले.

️ २०१५ मध्ये तब्बल १४ वर्षांनी ८८ वे संमेलन पंजाबमधील घुमान येथे पार पडले. त्यानंतर २०१८

️ २०१८ मध्ये ९१ वे संमेलन गुजरात मधील बडोदा येथे पार पडले.

यानंतर यंदा तब्बल ७ वर्षांनी पुन्हा २०२५ मध्ये ९८ वे संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्ली येथे पार पडणार आहे.

मराठी भाषासंस्कृती आणि साहित्याचा जागर

मराठी ही केवळ एक भाषा नसून शब्दसाहित्यसंगीतकला आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. संत साहित्यापासून ते आधुनिक काव्यापर्यंतलोककथांपासून आधुनिक कादंबऱ्यांपर्यंतनाटकांपासून चित्रपटांपर्यंत मराठी साहित्याचा वारसा अत्यंत समृद्ध आहे.

या संमेलनात मराठी साहित्यविश्वातील मान्यवर लेखककवीसमीक्षक आणि रसिक वाचक एकत्र येणार आहेत. विविध चर्चासत्रेपरिसंवादग्रंथप्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून मराठी भाषेचे भवितव्य उजळवण्याचा संकल्प केला जाणार आहे.

या भव्य सोहळ्याचा भाग बना!

दिल्लीतील हे साहित्य संमेलन मराठी संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्यप्रेमीलेखककवीविद्यार्थी आणि मराठी भाषा जपणाऱ्या सर्वांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी आहे. आपली मराठी संस्कृती जपण्यासाठीतिचा जागर करण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आपण सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे. चलातर मग मराठी साहित्याचा हा ऐतिहासिक उत्सव दिल्लीच्या ऐतिहासिक भूमीवर भव्य स्वरूपात साजरा करूया!

- वर्षा फडके- आंधळेवरिष्ठ सहायक संचालक 

Rनवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा वेतन प्रश्न लवकर मार्गी लागेल

 नवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा

वेतन प्रश्न लवकर मार्गी लागेल

कामगार मंत्री आकाश फुंडकर

 

मुंबईदि. 17 : नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल. यासंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी कार्यवाही करून कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

 

नवी मुंबई महानगर पालिकेतील ८ हजार कंत्राटी सफाई कामगार तसेच ठोक मानधन रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या १००८ कामगारांच्या वेतनाबाबत कामगार मंत्री यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस माजी खासदार तथा श्रमिक संघटनेचे अध्यक्ष संजीव नाईककामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदननवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलास शिंदेकामगार विभागाचे अधिकारीविविध कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

नवी मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत महापालिका आयुक्तांच्या स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल लवकर महानगर पालिकेकडे सादर केला जाणार आहे. या समितीच्या अहवालानंतर कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईलअसेही मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा विषय हा त्या त्या महानगरनगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित असल्याने आयुक्तांनी कामगारांच्या वेतन प्रश्नांवर सहानुभूतीने विचार करावाअसेही त्यांनी सांगितले.

खर्डा गावातील मदारी वसाहतींचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे

 खर्डा गावातील मदारी वसाहतींचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे

- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

 

मुंबईदि. 17 : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत  जामखेड तालुक्यातील खर्डा गावात २० मुस्लीम मदारी कुटुंबियांच्या वसाहतीसाठी निधीस मंजूरी देण्यात आली. ३१ मार्च पर्यंत या कामाला गती देऊन वसाहतीचे काम पूर्ण करावेअसे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

विधानपरिषद येथे मौजे खर्डा (ता. जामखेड) अहिल्यानगर जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत मदारी वसाहतीच्या कामासंदर्भात आढावा घेण्यात आला. त्यावेळी सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेइतर मागासवर्ग कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिल्लारीप्रादेशिक उपसंचालक भगवान वीरसहाय्यक संचालक विनोद लोंढेखर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी पाटीलकृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटीलमाजी सभापती रवींद्र सुरवसेग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदेमहालिंग कोरेमहेश दिंडोरे व खर्डा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

            सभापती प्रा. राम शिंदे  म्हणाले कीयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा गावात २० मुस्लीम मदारी कुटुंबियासाठी वसाहतीसाठी २०१८ ला निधीचे वितरण करण्यात आले. हे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा प्रकिया राबवूनस्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन पूर्ण करावे.

मदारी वसाहतीचे काम हा राज्यातील पहिला  प्रकल्प आहे. त्यामुळे या वसाहतीचे काम उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण करावे. तसेच वसाहतीच्या ठिकाणी तेथील नागरिकांना आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून द्याव्यातअशी सूचनाही सभापती प्रा. शिंदे यांनी केली.

Few exercises for All diseases

 


Featured post

Lakshvedhi