Monday, 17 February 2025

अंगणवाडीत साजरी होणार शिवजयंती -

 अंगणवाडीत साजरी होणार शिवजयंती

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि. 17 : राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी अंगणवाडीतील बालकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती समजावी व त्यांच्या बालमनावर महाराजांच्या कार्याचे संस्कार व्हावेयाकरिता अंगणवाड्यांमध्येही मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे. यावेळी बालकांना शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या गोष्टी सांगण्यात येतील तसेच राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान असे अनुषांगिक उपक्रमही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी महिला विद्यापीठाने शाळांशी संपर्क वाढवावा

 अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी

 महिला विद्यापीठाने शाळांशी संपर्क वाढवावा

- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

 

मुंबई, दि. १७ : स्थापनेचे १०९ वे वर्ष साजरे करीत असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यातीलविशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातीलशाळांशी संपर्क वाढवावाअसे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला विद्यापीठाचा ७४ वा दीक्षांत समारोह विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात सोमवारी (दि. १७) संपन्न झालात्यावेळी ते बोलत होते.

महिला विद्यापीठाने नुकतेच चंद्रपूर येथे उपकेंद्र सुरू केले असल्याचे नमूद करून विद्यापीठाने आदिवासी भागातील मुलींची उच्च शिक्षणातून होणारी गळती कमी करण्याच्या दृष्टिने या संपूर्ण समस्येचे अध्ययन करावेअशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमांशिवाय विद्यार्थिनींना कृत्रिम बुद्धिमत्तासायबर सुरक्षाआरोग्य सेवा व्यवस्थापन आदी क्षेत्रातील आधुनिक पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करुन द्यावेअसेही यावेळी राज्यपाल यांनी सांगितले.

पदवीधर विद्यार्थिनींनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले उद्दिष्ट निश्चित करावे त्या दृष्टीने कठोर परिश्रम करावेप्रत्येकाला निसर्गाने वेगवेगळी कौशल्येक्षमता दिल्या असल्यामुळे कोणीही इतरांशी तुलना करीत बसू नये व आपल्या गतीने आपले निर्धारित उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे. स्वतःसाठी जगणे चुकीचे नाहीपरंतु केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे आहे असे सांगून विद्यार्थ्यांनी आयएएसआयपीएस किंवा इतर परीक्षा उत्तीर्ण कराव्या. मात्र समाजातील अशिक्षित तसेच गोरगरीब महिलांची काळजी घ्यावी.विद्यापीठांनी आपले शैक्षणिक वेळापत्रक पुरेसे अगोदर तयार करुन जाहीर करावेतसेच सर्व परीक्षांच्या व दीक्षांत समारोहाच्या तारखा अगोदरच जाहीर कराव्याअसे राज्यपालांनी सांगितले*

समाज एका महिलेला सुशिक्षित करतो त्यावेळी तिच्या सर्व भावी पिढ्यांना सुशिक्षित करीत असतोअसे सांगताना यशस्वी महिलांनी आपला काही वेळ समाजातील उपेक्षित महिलांच्या कल्याणासाठी द्यावा तसेच आत्मसन्मानाशी कधीही तडजोड करू नये असे उद्गार एकात्मिक संशोधन आणि विकास कृतीच्या कार्यकारी संचालिका डॉ. ज्योती पारिख यांनी यावेळी काढले.

कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी आपल्या अहवालात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीविदेशी विद्यापीठांशी सहकार्यहवामान बदल या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिसंवादविद्यापीठाने क्रीडा तसेच इतर क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती दिली.

दीक्षांत समारोहाला डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामतमाजी कुलगुरू डॉ. चंद्रा कृष्णमूर्तीविद्यापीठाच्या प्रकुलगुरु डॉ. रूबी ओझाकुलसचिव डॉ. विलास नांदवडेकरपरीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालकअधिष्ठाता आणि विभाग प्रमुखशैक्षणिक आणि अशैक्षणिक कर्मचारीतसेच स्नातक उपस्थित होते.

दीक्षांत समारोहात १५,३९२ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. एकूण ४६ संशोधकांना पीएचडी तर ७७ स्नातकांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

००००


अहिराणी काल, आज आणि उद्या- अहिराणी ही ऐके

 अहिराणी कालआज आणि उद्या- अहिराणी ही ऐके काळी खानदेश परिसरातील मुख्य बोली होती. ती व्यवहाराची भाषा होती. अहिरराजे यांची ती प्रमुख बोली. धुळेनंदूरबारजळगांवनासिकचा कळवणसटाणामालेगांव अन औरंगाबाद चा कन्नड व सोयगांव या तालुक्यांचा भाग या परिसरात ती आजही बोलली जाते. या परिसराची लोकसख्या ही दिड कोटीच्या आसपास आहेच. या शिवाय उर्वरित महाराष्ट्रात आणि गुजरात व मध्यप्रदेशात नोकरी वा व्यापारा निमित्ताने गेलेले सारे खानदेशवासी हे आपल्या घरात अहिराणीच बोलतात. जगाच्या पाठिवर अनेक देशातही खानदेशातील माणूस स्थाईक झालेला आहे. तेथेही तो आपल्या कुटूंबात अहिराणी जपून आहे. पूर्वी अहिराणी बोलणे गावंढळग्राम्यतेचे लक्षण मानले जाई. अलिकडे भाषिक अन प्रादेशिक अस्मिता जोपासली जाऊ लागली आहे. या शिवाय जागतिक स्तरावर विविध विद्यापिठातून बोली भाषेच्या अभ्यासाचे महत्व पटू लागल्याने त्या जतन करण्याकडेत्यांचे संवर्धन करण्याकडे जगाचा कल वाढू लागला आहे. आजवर प्रमाण भाषांनी बोलींनाबोलीतील शब्दांना दूर ठेवले होते. आता अलिकडे अभ्यासकांना याच बोलीतून प्रमाण भाषा जन्माला येते व बोलींच्या आधारानेच ती वाढतेटिकते हे कळू लागले आहे. त्यामुळे आपली बोली जतन करण्याचा तीचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सामान्य स्तरावरही होऊ लागला आहे.

अलिकडे अहिराणीतून दिनदर्शिकालग्नपत्रिकामाहिती पत्रके छापली जात आहेत. जे जे प्राण्मा मराठीतून असते ते ते आता अहिराणी बोलीतून प्रकाशित होत आहे. सकस वांङमयाचे अहिराणीतून भाषांतरेही होवू लागली आहेत. अहिराणी बोलीचा शब्दकोशभाषावैज्ञानिक अभ्याससुलभव्याकरणसचित्र कोशम्हणी कोशवाकप्रचार कोशओवी कोश अहिराणी बोलीतील लोकसाहित्य आदी ग्रंथ डॉ. रमेश सूर्यवंशी यांची प्रकाशित आहेतच. कालऔघात बोली नष्ट होत आहेत असे म्हटले जात असेल तरी जगभर या बोली वाचविण्यासाठीचे प्रयत्न सुरुच आहेत. या बोली वाचवून ठेवण्यात शेतकरी व शेतमजूर यांच मोठा वाटा आहे. हा वर्ग आपली बोली आजी सांभाळून आहे. जगभर बोली वाचविण्याची चळवळ सुरुच आहे. त्या मुळे बोलीच भवितव्य हे उज्वचल असेच आहे.


अहिराणी किंवा खानदेशी बोलीचा भूगोल

 अहिराणी किंवा खानदेशी बोलीचा भूगोल


अहिराणी किंवा खानदेशी बोलीचा उपरोक्त भाषा भूगोल (आधीचा खानदेश जिल्हा, त्यानंतर नासिकचे कळवण, सटाणा, मालेगांव तालुके व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचा सोयगांव व कन्नड हे तालुक्यातील डोगराखालील खानदेश लगतची गावे) आजवर संशोधकांनी स्विकारला आहे. आता नुकत्याच माझ्या क्षेत्रिय पाहणीतून असे लक्षात आले की ही खानदेशात बोलली जाणारी बोली जशीच्या तशी विदर्भातील अमरावती जिल्हयाच्या धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि चांदूर बाजार या चार तालुक्यातील सुमारे साठ ते सत्तर गांवातून केवळ गवळी जातीच्या लोकांकडून बोलली जाते. मात्र या लोकांना अहिर वा अहिराणी वा खानदेशी या संकल्पना अद्यापही ज्ञात नाहीत. ते आपल्या या बोलीला गवळी बोली म्हणून संबोधतात. त्यामुळे आता खानदेशी बोलीच्या सामाजिक प्रभेदात गवळी बोली तर प्रादेशिक प्रभेदात वऱ्हाडची अहिराणी म्हणून समावेश करुन सध्याचा भाषा भूगोलाचा विस्तार करावा लागत आहे.


(असं असली तरी सोरटी सोमनाथावरील गझनीच्या स्वारी नंतर पलायन केलेल्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी देवगीरीला आश्रय घेतला व तेथून त्यानां तामीळनाडूतील मंदिराचे पौराहित्यासाठी नेले गेले पुढे ते मासांहारीही बनले व सुताला रंग देण्याच्या व्यवसायातही उतरलेत. (हा इतिहास के.सी कृष्णमुर्ती यांनी 'द मायग्रन्ट सिल्क व्हेव्हर्स ऑफ तामिलनाडू' या ग्रंथात केला आहे. प्रकाशन फेब्रु. २०१४) त्यांची बोली तेथे सौराष्ट्री म्हणून प्रचलित असून तिच्यात आणि अहिराणीतही बरेच साम्य आढळते. या शिवाय नेपाळच्या नेपाळी बोलीत आणि अहिराणी बोलीतही बरेच साम्य आहे. अधिकचा अभ्यास करुन त्यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे)


अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि चांदूर बाजार या चार तालुक्यातील मेळघाट अभयारण्याचा मध्य प्रदेशाच्या, अशिरगड किल्ल्यापर्यतचा भागातील वस्तीला असलेले गवळी या जातीच्या लोकांची बोली ही गवळी बोली आहे. ह्या गवळी बोली बोलणारांची संख्या ही जवळजवळ पन्नास हजाराहून अधिकची आहे. देवगांव, कुकरु, खामगांव सारखी काही गावे ही संपूर्ण गवळी या जातीच्या लोकसंख्येची गावे आहेत. चिखलदरा, सांगोळा, कोहा ढाकण, मोथा, लवादा, देवगांव, धामनगांव गढी, हरीसाल, अंबापाटी, टेंभरु सोजाई, जामली, वस्तापूर, कुलंगणा खुर्द, उपासखेडा, नवाखडा अशाही काही गावांची नावे ही गवळ्यांची वस्ती असलेली गावे सांगता येतील. अभ्यासाअंती असे लक्षत येते की, या सगळ्या गवळ्यांची ही गवळी बोली आणि खानदेशात प्रचलित असलेली अहिराणी बोली ह्या दोन बोली भिन्न वा स्वतंत्र वेगवेगळ्या बोली नसून त्या एकच बोली आहेत. मात्र खानदेशात ती अहिराणी बोली म्हणून ओळखली जाते तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मेळघाटात ती गवळी बोली म्हणून ओळखली जाते आहे. विशेष बाब ही की आजपर्यंत अहिराणीच्या अभ्यासकांना ज्या प्रमाणे गवळी बोली हे अहिराणीचे वेगळ्या भूप्रदेशात आढळणारे रुप आहे ही बाब ज्ञात नाही. तशीच गवळी बोलीच्या अभ्यासकांनाही गवळी बोली ही अहिराणी बोलीचेच रुप आहे हे ज्ञात नाही. मात्र शब्दावली, वाक्याची रुपे, विभक्ती प्रत्यय, ही भाषा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासाची सगळी वैशिष्टे ही दोनही बोलीत सारखी आणि एकच आहेत. धारणी, चिखलदरा या भागात या गवळ्यांना अहिराणी हा शब्द ज्ञात नाही. ते आपल्या बोलीला गवळी बोली असेच म्हणतात. हे सारे गवळी लोक कोरकू, कुणबी, गोंड वा कोलामांसोबत राहात असले तरी गवळी बोली ही केवळ गवळी लोकांचीच बोली असून तेच बोलतात. गवळी बोली वर आजवर भाषावैज्ञानिक अभ्यास कुणी मांडल्याचे ज्ञात नाही. भाषा सर्वेक्षणातही मेळघाटातील या गवळ्ळ्यांच्या बोलीला ग्रिअर्सन पासून आताच्या भारतीय भाषा सर्वेक्षणापर्यंत कुणीही दखल घेतलेली नाही. म्हणजे या मेळघाटात बोलीच्या सर्वेक्षणाचेही कूपोषण झालेले आढळते.


या गवळ्यांच्या या भागातील आगमना बाबतच्या काही कथाही मिळतात. कौंडीण्यपूरहूर रुक्मीनी आणण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या गवळ्यांच्या लवाजम्यासह विदर्भात कूच केली. त्यांच्या सरंक्षणाच्या दृष्टीने बलदेवानेही गवळ्ळ्यासह त्यांच्या गुराढोरांसह कूच केली. परतीच्या मार्गावर चांदूर बाजार, अचलपूर सारख्या काळ्या जमिनीवर आपल्या गुरांचे पाय फसतात व गुरांना त्रास होतो हे जाणून त्यांनी तो काळ्या जमिनीचा भाग सोडून टणक जमिनीकडे वाटचाल केली. ते मेळघाट आले. रुक्मीनीला घेवून श्रीकृष्ण व गवळी रातोरात परतलेत. मात्र काही गवळींना आपल्या गुराढोरांसह, लवाजम्यासह परतणे शक्य झाले नाही. शिवाय आपल्या गुरांसाठी चारा असलेले घनदाट जंगल त्यांना आवडले. हे गवळी परत मथुरेला न जात तेथेच राहिलेत. वन्यजिवांकडून आपल्या गुरांचे सरंक्षण करण्याच्या दृष्टिने त्यांनी मातीच्या भिंतीची तटबंदी बांधून गाविलगड किल्ला बांधला. गाविलगड हा गवळ्यांचा किल्ला. पुढेही चिखलदराहून इंग्रजांनी या गवळ्यांना हुसकावून जंगलात पिटाळले. अशिरगड, नरनाळा आणि गाविलगड ही किल्ले गवळी आपले किल्ले समजतात. अशिरगडची आशा देवी ही त्यांचे कुलदैवत मानतात. ते कृष्णाला आपले पूर्वज मानतात. केवळ बोलीच नव्हे तर त्यांच्या रुढी परंपरा, विवाह विधी, सणउत्सव, हे खानदेशातील अहिराणी भार्षिक लोकांप्रमाणेच आहेत. या विदर्भातील गवळ्यामध्ये खेडके, हेकडे, शेडके, शनवारे, सावडे, गायन, तोटे अशी आडनावे आढळतात. मात्र असली आडनावे खानदेशातील अहिराणी भाषकांत आढळत नाहीत. खानेदशातील अहिराणी भाषिक हे विविध जातीचे असून कुणबी, मराठा, सोनार, शिंपी अशा विविध जातीत विभागले गेले आहेत. या गवळ्यांनी आपल्या दुग्धव्यवसायाशी संबंधित जी धार्मिक विधी आजही जपून ठेवलेली आहेत ती खानेदशात नावालाच आढळतात. विदर्भातील हे गवळी गुलाबाई, गौराई, भालदेव, विवाहाची गाणी, जात्यावरची गाणी हे सगळ आजही जपून आहेत. मात्र खानदेशात महत्वाचा समजला जाणरा कानबाईचा उत्सव या विदर्भातील गवळी जमातीत आढळत नाही. खानदेशातील या अहिराणी भाषकां प्रमाणे त्यांचा संपर्क बाहेरच्या जगाशी कमी आलेला असल्याने खानदेशीच्या मानाने त्यांच्यात सांस्कृतिक वा भाषिक बदल कमीच आढळतो. आजही हे गवळी मुलाच्या जन्मा नंतर कास्य या धातूची थाळी वाजवितात तर मुलीच्या जन्मा नंतर सूप वाजवितात. या गवळ्याचे महत्वाचे सण वा उत्सव म्हणजे गोकुळाष्टमी आणि दिपावलीची गायगोंदन. आपल्या दुग्ध व्यवसायाशी व कृष्णाशी संबंधित हे विधी ते आजही पाळतांना दिसतात. आपल्या जनावरांची हेटी करुन राहणे हे या गवळ्यात आजही आढळते. मात्र खानदेशात हे प्रमाण कमी झाले आहे. खानदेशा प्रमाणे आखाजीला पित्तर जेवू घालणे, विवाह प्रसंगी पूर्वजाना निवतं देणे हे विदर्भातील गवळ्यात आढळते. खानदेशाच्या भाषिक आणि सांस्कृतिक जिवनाशी साध्यर्म्य राखणारे हे गवळी स्वतःला गवळी, गोपालक, श्रीकृष्णाचे वंशज म्हणत असले तरी ते खानदेशातील अहिराहून वेगळे नाहीत हे अहिराविषयी जाणून घेतल्यावर लक्षात येते. विदर्भतील या गवळी जातीवर इतिहासकारांनी विषेश प्रकाश टाकलेला आढळत नाही.


खानदेशातील ब-याच परंपरा या मोडीत निघाल्या मात्र दुग्धव्यवसाया संबंधीत ब-याच परंपरा आजही बोली सोबत या गवळी समाजाने जपून ठेवलेल्या आढळतात. तेही स्वतःला गोपालक समजतात. दोहोचे नाते श्रीकृष्णाशी अन अशिरगड, गावीलगड यांचेशी आहे. अर्थात यादव, अहिर, गवळी हे एकाच कुलातील.

माय माउली साहित्यप्रवाहांनी समृद्ध

 साहित्यप्रवाहांनी समृद्ध

मराठी साहित्याला दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्रीवादी साहित्य, जनवादी साहित्य, आदिवासी साहित्य, विज्ञान साहित्य, प्रादेशिक साहित्य, बालसाहित्यमुस्लीम साहित्य, ख्रिस्ती साहित्य, बालसाहित्य अशा साहित्यप्रवाहांनी अतिशय समृद्ध केलेले दिसते. मराठीच्या विविध बोलींतून ही साहित्यनिर्मिती केलेली दिसते.

    १९९० च्या नंतर जागतिकीकरणाचा परिणाम मराठी साहित्यावरही झालेला दिसतो भोगवादचंगळवादउपभोगवादविलासवादग्राहकवादबाजारवादवस्तुवादलैंगिकतावाद या प्रकारच्या बाबींची वेगाने प्रतिष्ठापना करीत जागतिकीकरण वाढत चालले आहे. रंगनाथ पठारेमकरंद साठेश्रीधर नांदेडकरजयंत पवारविश्राम गुप्तेसदानंद देशमुखराजन गवसआसाराम लोमटे आदी साहित्यिकांच्या लेखनात ही संवेदना प्रकटलेली दिसते.

    संगणकादी नवे तंत्रज्ञान आल्यावरही मराठीचा वापर प्रचंड वाढला आहे. मराठी ब्लॉग्स,संकेतस्थळे वाढली आहेत. मराठीतील कोशवाङ्मय जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. प्रसारमाध्यमांनी मराठी भाषा साचेबद्ध न ठेवता तिच्यात कालानुरूप बदल केले आहेत. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच विद्यापीठांनी मराठी भाषाभ्यासाला व्यावहारिक जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे अनेक क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.भारतातील सर्वच विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकविली जाईल. बोलीभ्यास संशोधनअनुवाद प्रक्रिया यांना गती मिळेल. ग्रंथालये सशक्त होतील. पुरातन साहित्याचे डिजिटायझेशन होईल. त्यामुळे डिजिटल माध्यमांतून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

            अनेक जाती-धर्मांचे लोक मराठी भाषा बोलतात. अनेक पंथधर्मप्रांतसंस्कृती यांना मराठीने आपल्या पोटात सामावून घेतले आहे.खांद्यावर माय मराठीची पताका घेतलेल्या साडे बारा कोटींची ही भाषांमाजी भाषा साजिरी आहे.

-----

विविध भागातील बोलभाषा आणि वैशिष्ट्ये pl share

 ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

विविध भागातील बोलभाषा आणि वैशिष्ट्ये

 

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे दिल्लीत होणारे  साहित्य संमेलन पहिलेच 'अभिजात मराठी साहित्य संमेलनअसेल.दिल्लीत होणाऱ्या या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.जेष्ठ नेते शरद पवार या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असणार आहेत.

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहेयाचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषासंस्कृतीराष्ट्रभावनामानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हेअवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत

यापूर्वी १९५४ मध्ये  दिल्लीला ३७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळसंमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि १ मे १९६० मध्ये  महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नव्हते.

दिल्ली येथे नियोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व लोक संस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. २१२२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ ला दिल्लीत हे संमेलन होणार आहे. तब्बल ७० वर्षांनंतर राजधानी दिल्लीत मराठी भाषेचा आवाज घुमणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये अनेक बोलीभाषा प्रचलित आहेत. या बोलीभाषा त्या- त्या प्रदेशाच्या सांस्कृतिकभौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीवरून विकसित झाल्या आहेत. काही प्रमुख बोलीभाषा आणि त्यांचे वैशिष्ट्य....

कोकणी भाषा

 कोकण किनारपट्टीवरील जिल्हे म्हणजे रत्नागिरीसिंधुदुर्ग आणि गोव्यातील कोकणी भाषा प्रचलित आहे. कोकणी भाषा ही भारतातील सर्वांत जुन्या भाषांपैकी एक आहे.  कोकणीमध्ये अनेक बोलीभाषा आहेतजसे की गोव्याकडील कोकणीमंगलोरी कोकणीकेरळ कोकणीमालवणी इत्यादी. कोकणी भाषेत देवनागरीरोमनकन्नडमल्याळम आणि अरबी या विविध लिपींचा वापर केला जातो. कोकणी ही इंडो-आर्यन भाषाकुळातील असूनसंस्कृतशी तिचे जवळचे नाते आहे. कोकणी शब्दसंग्रहात संस्कृत शब्द मोठ्या प्रमाणावर आहेत. कोकण किनारपट्टीवर असल्यामुळे कोकणी भाषेत मराठीपोर्तुगीजतुळूकन्नड आणि मल्याळम भाषांचे प्रभाव दिसून येतात. कोकणी भाषक हिंदूख्रिस्ती आणि मुस्लीम समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. कोकणी भाषेत कविताकथालोकसंगीत आणि लोककथांची समृद्ध परंपरा आहे. कोकणी भाषा ही तिच्या वैशिष्ट्यांमुळे आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे एक अनमोल ठेवा आहे!

देशी बोली

पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसाताराकोल्हापूर भागात बोलली जाणारी भाषा आहे. या भागातील बोलीत एक प्रकारचा रांगडेपणा व सडेतोडपणा आहेजो त्या भागातील लोकांच्या स्वभावाला साजेसा वाटतो. या बोलीत मराठा साम्राज्याचावतनदार व शेतकरी संस्कृतीचा ठसा उमटलेला आहे. शब्दांमध्ये ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब दिसते.

प्रसिद्ध म्हणी आणि शिव्या:

या भागातील बोली म्हणींसाठीउपरोधिक वाक्यांसाठी आणि कधीकधी सुसंस्कृत वाटणार नाही अशा शिव्यांसाठीही प्रसिद्ध आहेज्या तिथल्या संवादाचा एक भाग आहेत.

'नाय' (नाही), 'काय बी' (काहीही), 'भारी' (छान), 'हुश्शार' (शहाणा), 'गड्या' (मित्रा) असे शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणावर आढळतात.लय भारी’, ‘काय म्हणतोस’, ‘चल गड्या’ यासारखे वाक्प्रचार प्रचलित आहेत. लोकसंवादात आढळणारी बोली साधीसरळ आणि स्पष्ट असतेकोणताही आडपडदा किंवा बडेजाव नसतो. 'जमिन', 'रान', 'बैलगाडी', 'तुरी', 'चाऱ्याचं गंजीअशा अनेक शब्दांतून कृषी जीवनाचे दर्शन घडते. या बोलीत बोलताना एक प्रकारची लय असते. वाक्यांचा शेवट कधीकधी चढत्या सूरात केला जातोज्यामुळे संभाषण अधिक ठसकेबाज वाटते. लावणीतमाशापोवाडे या लोककला प्रकारांचा प्रभाव या बोलीवर आहे. त्यामुळे तिच्या उच्चारात आणि शब्दरचनेत एक विशिष्ट गंमत आहे. सांगलीसाताराकोल्हापूरच्या बोलीत ऐकताना एक वेगळाच जोशउत्साह आणि आपलेपणा जाणवतोजो त्या भागातील मातीशीइतिहासाशी आणि लोकांशी जोडलेला आहे.

वऱ्हाडी

 विदर्भातील अमरावतीअकोलाबुलढाणायवतमाळ भागातील बोली भाषा आहे. वऱ्हाडी बोलीत एक वेगळा रांगडेपणा आहे. बोलण्यात ठासून आत्मविश्वास व ठसकेबाजी जाणवते. ‘लाचा उच्चार बा’: वऱ्हाडी भाषेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ला’ चा उच्चार बा’ असा होतो. उदाहरणार्थ 

मला  मबा

तुला  तुंबा

चला  चंबा

 वऱ्हाडी माणूस स्वतःला आपण’ म्हणतो. उदा. "आपण काल गेला होतो." (मी काल गेलो होतो.)

 भाषेत शहरी बडेजाव किंवा जडपणा नाही. तिच्यात गावरान सोज्वळपणा आणि सहजता आहे. बोलण्यात लयबद्धता असते आणि वाक्याच्या शेवटी एक विशिष्ट चढता सूर येतोजो वऱ्हाडी भाषेला अधिक प्रभावी बनवतो.


सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात गद्यलेखनाला बहर

 सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात गद्यलेखनाला बहर

शाहिरी वाङ्मयात होनाजी बाळासगनभाऊप्रभाकरपरशरामरामजोशीअनंतफंदी यांच्या लावण्या आणि पोवाड्यांनी अस्सल मराठमोळ्या जीवनाचे दर्शन घडविले. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठीत गद्यलेखनाला बहर आला. बखर वाङ्मय हे महाराष्ट्र सारस्वताचे एक विलोभनीय लेणे आहे. बखर वाङ्मयातून धर्मनिष्ठाराष्ट्रनिष्ठाउच्च जीवनमूल्ये यांची प्रचितीस्वामीनिष्ठा अशा प्रेरणांनी लेखन केले. मल्हार रामराव चिटणीस यांनी छत्रपती शिवाजीसंभाजी महाराजथोरले राजारामथोरले शाहू महाराजछत्रपती धाकटे रामराजेधाकटे शाहू यावर बखरलेखन केले. रामचंद्रपंत अमात्य यांनी रचलेले आज्ञापत्र’ आणि शिवाजी महाराजांनी आवर्जून तयार करवून घेतलेला राज्यव्यवहार कोश’ मराठी साहित्यात महत्वाचे ठरतात.

   ख्रिस्तीधर्मीय साहित्यिकांनी मराठी वाङ्मयनिर्मिती केलेली दिसते. फादर स्टीफन्स यांनी 'ख्रिस्तपुराणलिहिले. त्याचबरोबर फादर क्रुवापेद्रोजजोसेफमिगेलरिबैरू यांनीही मराठीत साहित्यनिर्मिती केली. मराठी जैन साहित्याचा विचार करता पुष्पदंत- 'णायकुमारचरिउ', ब्रह्मगुणदास-'श्रेणिकचरित्र', गुणकीर्ती-'धर्मामृत', जिनदास- 'हरिवंशपुराणहे ग्रंथ लिहिले.

    १८७४ ते १९२० या कालखंडात विष्णुशास्त्री चिपळूणकर,टिळक,आगरकरलोकहितवादी,महात्मा फुले,न्यायमूर्ती रानडे हे सामाजिक,राजकीय,धार्मिक आणि  आर्थिक विचार प्रसृत करीत होते,त्याच काळात केशवसुतांनी आपल्या काव्यरचनेला प्रारंभ केला.नव्या कवितेचे सर्व विशेष त्यांच्या काव्यात आलेले दिसतात. ना.वा.टिळकगोविंदाग्रजरेंदाळकरबालकवीचंद्रशेखरभा.रा.तांबेवि.दा. सावरकरसाने गुरुजीमाधव ज्युलियनबा.भ.बोरकरबा.सी.मर्ढेकरपु.शि.रेगेविंदा करंदीकरमंगेश पाडगावकरवसंत बापटग.दि.माडगूळकरना.धों.महानोरबहिणाबाई चौधरीइंदिरा संतकुसुमाग्रजवसंत बापटशांता शेळकेप्र.के.अत्रेमुक्तिबोधखानोलकरदिलीप चित्रे, नारायण सुर्वेना.सी.फडके, वि.स.खांडेकर, भालचंद्र नेमाडेविजय तेंडुलकर या साहित्यिकांनी मराठी सारस्वतात मोलाचे योगदान दिले.

              १८७४  ते १९२०  या कालखंडात मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद देवल, श्रीपाद कोल्हटकर, कृष्णाजी खाडीलकरराम गडकरी आदी नाटककारांनी संगीत नाटके लिहिलीरंगभूमीवर आणली. हा कालखंड मराठी रंगभूमीच्यादृष्टीने सुवर्णयुग मानला  जातो.

Featured post

Lakshvedhi