Wednesday, 5 February 2025

वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ

 वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ


 


शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस वर्षभराची मुदत वाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 


कृषिक, निवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय जमिनींचे किंवा भाडेपट्टयाने दिलेल्या वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्यासाठीची मुदत संपली आहे. मात्र, राज्यात अशी रुपांतरणाची खूप प्रकरणे प्रलंबित असल्याने या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यामुळे या सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्याच्या योजनेस आणखी एक वर्षांची मुदत वाढ देण्यास मान्यता देण्यात आली. यानुसार यापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रकरणांना तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल होणाऱ्या अर्जांसाठी ही योजना लागू राहणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

की चैन बाबत सावधानता pl share

 😱 *सावधान !!!.... सतर्क राहा.!!!*👽


बुडीत बंधारा बांधकामामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल

 महाबळेश्वरजावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी

मंत्रिमंडळाची विशेष बाब म्हणून मान्यता

बुडीत बंधारा बांधकामामुळे  पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल

-         मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

 

मुंबई दि. 4 : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या कामास  विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे  या भागात पाण्याचे  दुर्भिक्ष असणाऱ्या गावांना व शेतकऱ्यांना याचा लाभ होऊन पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेलअसा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील म्हणालेकोयना जलाशय परिसरातील हे २५ बंधारे बुडीत क्षेत्रात येत आहेत.   जलाशयाची पाणी पातळी फेब्रुवारी ते मे या महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाश्यांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची समस्या भेडसावते. ही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना म्हणून या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

            मृद व जलसंधारण विभागामार्फत  कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्यात येणार आहेत.  या बंधाऱ्यांमुळे आवश्यक पाणी साठा होऊन  या भागात पिण्यास  व शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. या कामास  मंत्रिमंडळाने विशेष बाब म्हणून मान्यता दिल्याने या भागातील नागरिकांचे जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल,असेही मंत्री श्री. जाधव पाटील म्हणाले.

२५ बंधारा बांधकामाच्या कामास १७० कोटीची तरतूद

महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये २५ बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये  बुडीत बंधारा आकल्पेआहिरेफुरुसहरचंदीकळम गावलामजकोट्रोशीम्हावशी,  मुनावळेनिवळी क्र. १निवळी क्र. २पाली तर्फ आटेगाव,  पिंपरी तर्फ तांबरेनोशीउचाटवाळणेआवळण,  दरे तर्फ तांब क्र १दरे तर्फ तांब क्र. २आणि जावळी तालुक्यातील  आमशीगावढोशीकेळघर तर्फ सोळशी,  तेटलीशेंबडी आणि  वेंगळे या बुडीत बंधाऱ्याच्या समावेश आहे.

०००००

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातील कामे पारदर्शकपणे करावी

 नानाजी  देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातील

कामे पारदर्शकपणे करावी

- कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि. 4 :  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राज्यात राबवतानाराज्यात 21  जिल्ह्यातील 7201 गावातील कामांममध्ये पारदर्शकता असावीशेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे,पाण्याचा कार्यक्षम वापर करणेजमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी संवर्धित शेती पध्दतीद्वारे कृषी पूरक उद्योगांना चालना देण्यावर भर द्यावा असे निर्देश कृषीमंत्री  ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

            मंत्रालयात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासंदर्भात आयोजित बैठकीत कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे बोलत होते यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीनानाजी  देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंगउपसंचालक संतोष अमदापुरेकृषि विद्यावेत्ता विनय कोळेकर यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले कीनानाजी  देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा एक मधील कामे पूर्ण झाली आहेत तर दुस-या टप्प्यातील होणारी कामेही शेतकऱ्यांना विश्वासात घेवून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करावीत. कृषी उत्पादन पध्दतींची कार्यक्षमता वाढविणे,नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये विविध संशोधन संस्थाशी समन्वय व सामंजस्य करार करणेशेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापरक्षमता बांधणीमनुष्यबळ व्यवस्थापनसनियंत्रण व मूल्यमापन यावर भर देण्यात यावा. प्रकल्पातील गाव निवडीचे निकष,शेतीशाळा हा उपक्रम राज्यभरात वाढवून शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्यात यावी.

          नानाजी  देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या कामांच्या माहितीचे यावेळी सादरीकरण केले.

लिंग समभावासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारताना येणाऱ्या आव्हानांवर 6 फेब्रुवारी रोजी चर्चासत्र

 लिंग समभावासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारताना

 येणाऱ्या आव्हानांवर 6 फेब्रुवारी रोजी चर्चासत्र

 

मुंबई, दि. ४ लिंगसमभावासाठी संस्थात्मक यंत्रण उभारताना येणारी आव्हानेअडथळे व कार्यपद्धती बाबत ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत.

बिजिंग परिषदेला ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जगातील सर्व देशांनी व राज्यांनी स्वीकृत केलेल्या कृती कार्यक्रमाला अनुसरून कृती कार्यक्रमांचा आढावा कमिशन ऑन स्टेटस ऑफ वूमन कडून संयुक्त राष्ट्रसंघ, न्यूयॉर्क येथे मार्च २०२५ मध्ये घेतला जाणार आहे. या पार्श्वभुमीवर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्रात महिला व मुलींचे आरोग्य व प्रजननविषयक हक्कहिलाविरोधी हिंसाचार प्रतिबंध करण्यासाठी स्थायी कार्यपद्धतीलिंग समभाव वाढविण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने तसेच लोकसहभागातून संस्थात्मक कार्यप्रणाली उभारणी, नागरी भागातील रोजगारग्रामीण भागात रोजगार हमी योजना आणि कौशल्य विकास कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण यावर यावेळी चर्चा होणार आहे.

०००

इकिगाई Ikigai*

 *इकिगाई Ikigai*


बऱ्याच वेळा माणसाला निवृत्त झाल्यावर काय करावे असा प्रश्न पडतो. काहीजण म्हणतात, आता बरीच वर्षे नोकरी, कामधंदा केला, आता जरा आराम करायचा ठरवलं आहे. .तर काहींना चैन पडत नाही नुसतं घरी बसून. मग काहीतरी उद्योग शोधून काढतात, TV बघत वेळ घालवतात,पत्ते, रमी खेळतात, भिशी join करतात….असे बरेच निरनिराळे विचार प्रवाह आपण ऐकतो. जपानी माणसाला मात्र निवृत्ती/रिटायरमेंट हा शब्दच माहिती नसतो. जपानी कल्चरमधे रिटायरमेंट ही संकल्पनाच नाही. या विषयी बरंच ऐकलं होतं आणि मध्यंतरी याच विषयासंबंधात" Ikigai "नावच पुस्तक वाचनात आलं. Hector Garcia व Francese Mirallesया दोघांनी हे पुस्तक लिहिले आहे.


इकिगाई ही एक जपानी concept आहे, ज्याचा अर्थ आहे "a reason for being" जगण्याचे कारण. तुम्ही सकाळी उठल्यावर कोणत्या कारणाने/विचाराने जागे होता, काहीतरी करण्याचे मनात घेऊन जागे होता, तेंव्हा ते तुमच्या हातून पुढे घडते. तुमची इकिगाई सापडवण्याचे मिशन हे प्रत्येक ओकिनावा(जपान मधील एक बेट) मधील जपानी माणसाचं जगण्याचं इंधन असते. एकदा का ती तुम्हाला मिळाली की धैर्याने, प्रयत्न पुर्वक तुम्हाला योग्य मार्गावर राहता येते. अर्थात हे जगण्याचे तत्व प्राचीन आहे.ते हाईयन( Heian  ) काळातील आहे. अशी ही Ikigai आहे तरी काय हे बघू.


हे एका Venn diagram ने सांगता येईल. ४ निरनिराळी वर्तुळे एकमेकांना छेदतात. ह्या चारही वर्तुळांचा सहभाग असलेली जागा म्हणजे तुमची इकिगाई. ही चार वर्तुळे म्हणजे


1.   जी गोष्ट मनापासून करायला तुम्हाला आवडते (what you love) passion

2.   ज्या गोष्टीत तुम्हाला गती आहे (what are you good at) profession

3.   ज्याची जगाला आवश्यकता/उपयोग आहे (what the world needs ) mission

4.   ज्या पासून तुम्हाला अर्थार्जन होऊ शकते (what you can be paid for) vocation


iki म्हणजे life किंवा जगणे. gai म्हणजे value किंवा कारण. काहीही करा पण निवृत्त होऊ नका, हे या मागचे मुख्य तत्व.


या चार गोष्टी ज्यात common असतील ती तुमची इकिगाई. ओकिनावा मधील प्रत्येक जपानी माणसाला त्याची इकिगाई माहिती असते, त्याने ती चिंतन, मनन करून शोधून काढलेली असते. त्यानुसार तो आयुष्यभर जगत असतो अर्थात काही नियम पाळून.


तुमची स्वतः ची इकिगाई शोधून काढण्यासाठी, मला कोणत्या चार गोष्टी करायला आवडतात ते तुम्ही लिहून काढा. मग कोणत्या चार गोष्टीत मला गती आहे किंवा करता येतात, किंवा माझ्याकडे कोणती स्किल्स आहेत हे लिहून काढा. मग जगाला कोणत्या गोष्टीची जरुरी आहे व या पैकी कोणत्या गोष्टींना जग पैसे देण्यास तयार आहे, हे लिहून काढले की या चारीमध्ये जे काही समान असेल ती तुमची इकिगाई. एकदा का ती तुम्हाला गवसली की तुमचा मार्ग सुकर होतो.


Dan Buettner नावाचे नॅशनल जॉग्रफिकचे फेलो व न्यूयॉर्क टाइम्सचे लोकप्रिय लेखक, Educator, Explorer आहेत. त्या लेखकाने जगातील असे पाच भाग शोधून काढले की तेथील लोकं दीर्घायुषी पण आनंदी जीवन जगतात. वयाची शंभरी गाठणे याचे कोणालाच आश्चर्य वाटत नाही. ते पाच भाग खालील प्रमाणे आहेत.

1.   Okinawa - जपान

2.   Sardinia - इटली

3.   Nicoya - कोस्टा रीका

4.   Icaria - ग्रीस

5.   Loma Linda -कॅलिफोर्नीया


या पाच भागांवर त्यांनी ‘Blue Zones' असे एक पुस्तक लिहिले आहे. दीर्घायुष्यावर अभ्यास करून त्यांनी काही आश्चर्यकारक गोष्टी शोधून काढल्या. 2012 मध्ये त्यांनी जगभर प्रवास केला. जगातील काही भागातील लोकं इतर जगभरातील लोकांपेक्षा दीर्घायुषी का असतात या भेडसावणाऱ्या प्रश्नाचे सर्वच डॉक्टर व तत्वज्ञाते विचार करत होते. त्यावेळी काही प्रवाशांनी त्यांना ग्रीस, निकरागुवा, जपान अशा ठिकाणी नेले. त्या अभ्यासातून त्यांनी अमेरिकेत परत येऊन “The Blue Zones Solution” असे पुस्तक लिहिले.

अशा या जगभरातील 'ब्लू झोन्स' मधील लोकं निरनिराळ्या भूप्रदेशातील असून त्यांच्यात 8 ते 9 समान घटक आढळले, जे त्या लोकांच्या दीर्घायुषी, आनंदी राहणीमानाशी निगडित आहेत. मानववंशशास्त्राचे अभ्यासक, लोकसंख्या शास्त्रज्ञ, साथीच्या रोगांचे वैद्यकीय विशेषज्ञ अशा टीमने सर्व पुरावे गोळा केले व त्यातून समान संप्रदायातील पुरावे घेऊन खालील 8-9 घटक त्यांच्यात समान असल्याचे सांगितले. या पाचही भागातील लोकांना स्वतःची इकिगाई सापडवण्याची सवय असते.


बऱ्याचदा असे होते, की जीवनात तुम्हाला एखादी गोष्ट करायला खूप आवडत असते, त्यात गती देखील असते व ती गोष्ट तुम्ही बऱ्याच वेळा लहानपणी केलेलेही असते. पण कुटुंबातील काही प्राधान्यामुळे म्हणा किंवा त्या त्या वेळेची निकड वेगळी असल्याने, बरेच वर्ष ती तुम्ही केलेली नसते व त्यामुळे ती गोष्ट आपल्याला करायला येते, हेच मागे पडलेले असते. इतके, की ती गोष्ट मनातूनही निघून जाते पण हुरहूर मात्र उरते आणि कशाची हुरहूर आहे ते मात्र कळत नाही.

हे शोधून काढण्यासाठी तुम्ही चार तास घ्या, एक दिवस घ्या, हवं तर महिना घ्या पण शोधून काढा. थोडा वेळ वाया गेला तरी चालेल. .....आत्तापर्यंत तुम्ही जर नुसते बसलेले असाल तर तुमचा असाही वेळ वायाच जात होता तेंव्हा तुम्हाला काय करायला येतं, तुम्हाला कशाची आवड आहे, अशी कुठली गोष्ट आहे, की जी जगाला उपयोगी पडणार आहे आणि त्यासाठी जगात तुम्हाला मान मिळेल किंवा अर्थार्जन होऊ शकेल, अशी ही इकिगाई शोधून काढणे हा फार महत्वाचा मुद्दा आहे. केवळ असा आहार करा, तसा व्यायाम करा वगैरे सांगण्यात अर्थ नाही, तर पहिल्यांदा तुमची इकिगाई काय आहे, तुमचे goal काय हे तुम्हाला माहित असायला हवे.


जसे एखाद्या बाईला खूप छान स्वयंपाक येत असेल, तिच्या हाताला छान चव आहे, परंतु मधल्या काही वर्षात तिला असा छान छान स्वयंपाक करायला वेळच मिळाला नसेल, ती पूर्णतः विसरून गेलेली असेल, की तिला हे, हे पदार्थ छान जमतात. तर आता छान चविष्ट पदार्थ करणे तिची इकिगाई असू शकते. ती जेथे राहत असेल तेथे ती हे पदार्थ करून देऊ शकते, मुलं छोटी आहेत, नोकरीवर जायचे आहे अशा गृहिणीला याचा उपयोगही होऊ शकतो.


ओकिनावा बेटावरील एका 65 वर्षाच्या आनाआजीला आत्तापर्यंत मुलं, नोकरी, यात गुरफटल्यामुळे विणकाम करायला वेळच झालेला नसतो. लहानपणापासून तिला खूप वेगवेगळ्या डिझाईनचे स्वेटर, जॅकेट विणायची खूप हौस होती, आवडही होती व गतीही होती. नोकरीतून रिटायर झाल्यावर ती छोटे स्वेटर, मफलर यांच्या ऑर्डर्स घेऊ लागली. नवनवीन रंगसंगतीची डिझाइन्स करू लागली. moai ग्रुपमधे तिला खूप ऑर्डर्स मिळू लागल्या. वेळ कसा घालवायचा असा प्रश्नच तिला पडला नाही. तिची इकिगाई तिला सापडली.


प्रत्येक माणसाकडे असे काहींनाकाही कौशल्य असतेच. पण ते माणूस विसरून गेलेला असतो. आणि त्याला उगीचंच वाटत असते, की आपण खितपत पडलो आहोत. पण तुमची इकिगाई तुम्ही एकदा का शोधून काढली, की तुमचा पुढचा मार्ग सुकर होतो.


रिटायर झाल्यावर कोणाची भजनाचा क्लास घेण्याची, तर कोणाची योगासने शिकवण्याची इकिगाई होऊ शकते. त्यातून थोडे अर्थार्जन पण होते आणि आदरपूर्वक म्हातारपण जगता येते.


ही तुमची इकिगाई बदलूही शकते. वयाच्या पन्नाशीमध्ये असलेली इकिगाई, साठीमध्ये वेगळी असू शकते. तसेच भौगोलिक परिस्थितीप्रमाणेही इकिगाई बदलू शकते. वरील चारही घटकांपैकी पहिले दोन घटक शक्यतो कायम राहतात. म्हणजेच मला काय करायला आवडते व मला कशात गती आहे हे घटक स्थिर राहिले, तरी शेवटचे दोन, म्हणजे, जगात कशाची आवश्यकता आहे आणि लोकं कशासाठी पैसे अथवा आदर देण्यास तयार आहेत हे जागेप्रमाणे, काळाप्रमाणे बदलू शकते.


कोणाची गणित किंवा फिजिक्स शिकवण्याची आवड तिची इकिगाई बनू शकते. त्यातून जगाला असलेली गरज भागवणे आणि अर्थार्जन किंवा त्यातून मिळणारा आनंद, आदर या गोष्टी तिला आयुष्यभर उपयोगी पडतात. एखाद्या विद्यार्थ्याने मार्क मिळाल्यावर व्यक्त केलेला आनंद, स्मितहास्य यामूळे तिची जगण्याची उमेद वाढते.


अर्थार्जन हे नेहमी पैशांच्या स्वरूपातच असणे अभिप्रेत असते असे नाही, तर तुम्हाला lecture देण्यासाठी एखाद्या ग्रुपमध्ये बोलावणे, आदर देणे, तुमच्यातील कलेला प्रोत्साहन मिळणे, या स्वरूपातही pay/अर्थार्जन असा अर्थ अभिप्रेत आहे.


इकिगाईत आहार-विहारासंबंधी ही काही तत्वे पाळली जातात. तसेच व्यायाम, सामाजिकदृष्ट्या कसे एकत्र राहता येते याबद्दलही विस्ताराने विचार केलेला आहे.

🙏🙏🙏🙏

भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर 🚑


 🩺 भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर 🚑 


वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभाग क्रमांक ७, शिवसेना विभागप्रमुख श्री. कुणालजी सरमळकर आणि महिला विभागप्रमुख श्रीमती भक्ती भोसले यांच्या पुढाकाराने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 


📅 दिनांक – बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५

⏰ वेळ – सकाळी १०:०० ते दुपारी ३:००

📍 स्थळ – कलावती आई मंदिर**, इमारत क्र. ७ समोर, शासकीय वसाहत, ज्ञानेश्वर नगर जवळ, वांद्रे (पूर्व)  


🏥 शिबिरामध्ये मिळणाऱ्या सुविधा:

✔️ ECG तपासणी  

✔️ बीपी व सुगर तपासणी

✔️ हृदयरोग तपासणी 

 ✔️ जनरल तपासणी


🔹 आपले आरोग्य, आपली जबाबदारी!

🔹 शिवसेना जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर!


#ShivSena #ArogyaShibir #HealthcareForAll #BandraEast #PublicWelfare

🩺 भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर 🚑 

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभाग क्रमांक ७, शिवसेना विभागप्रमुख श्री. कुणालजी सरमळकर आणि महिला विभागप्रमुख श्रीमती भक्ती भोसले यांच्या पुढाकाराने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 

📅 दिनांक – बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५
⏰ वेळ – सकाळी १०:०० ते दुपारी ३:००
📍 स्थळ – कलावती आई मंदिर**, इमारत क्र. ७ समोर, शासकीय वसाहत, ज्ञानेश्वर नगर जवळ, वांद्रे (पूर्व)  

🏥 शिबिरामध्ये मिळणाऱ्या सुविधा:
✔️ ECG तपासणी  
✔️ बीपी व सुगर तपासणी
✔️ हृदयरोग तपासणी 
 ✔️ जनरल तपासणी

🔹 आपले आरोग्य, आपली जबाबदारी!
🔹 शिवसेना जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर!

#ShivSena #ArogyaShibir #HealthcareForAll #BandraEast #PublicWelfare


Featured post

Lakshvedhi