Sunday, 12 January 2025

मकर संक्रांत काळ विशेष दिन

 ***********   *श्री*  ***********

    *****   *मकर संक्रांत*  *****

        *मकर संक्रांत काळ विशेष दिन माहिती* !

*दिनांक  - १३/०१/२०२५ वार- सोमवार रोजी भोगी आहे*

*दिनांक  -  १४/०१ /२०२५*

*वार  -  मंगळवार*

     *यावर्षी  संक्रांत  मिती पौष कृष्ण प्रतिपदा शके १९४६ दिनांक १४/०१/२५  मंगळवार रोजी आहे*.

*मकरसंक्रातीचा पुण्यकाल  मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०८:५५ ते दुपारी ०४:५५ पर्यंत आहे* .

 *मंगळवार दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०८:५५ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे *बालव करणार* संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादि प्रकार खालील प्रमाणे 

वाहन - *वाघ* व उपवाहन - *घोडा* आहे.

*पिवळे वस्र* परिधान केलेले आहे

*हातात गदा* घेतलेली आहे.

*कपाळी केशराचा टिळा* लावलेला आहे.

*वयाने कुमारी* असून बसलेली आहे.

*वासाकरिता जाईचे फूल* घेतलेले आहे.

*पायस* भक्षण करीत आहे.

*सर्प जाती असुन भूषणार्थ मोती* धारण केलेले आहे.

वारनाव व नाक्षत्रनाव- *महोदरी* आहे

*सामुदाय मुहूर्त ४५ आहेत*.

*पूर्वेकडुन पश्चिमेकडे  जात आहे*.व

*वायव्य* दिशेस पहात आहे

   *संक्रांतीच्या पर्वकाळात खालील गोष्टी करू नयेत* 

*दात घासणे*, *कठोर बोलणे*, *वृक्ष - गवत तोडणे*, *गाई - म्हशींची धार काढणे* व *कामविषय   सेवन* ही कामे करु नयेत .

*या दिवसाचे कर्तव्य* 

*तिलमिस्रीत उदकाने स्नान करणे*

*तिळाचे उटणे अंगास लावणे*.

*तिलहोम करणे*

*तिलतर्पण करणे*

*तिलभक्षण करणे*

*तिलदान करणे*.

*असा  सहा प्रकारे तिळाचा उपयोग करावा* 

         *संक्रांतीपर्वकालात स्त्रियांनी  करावयाची दाने*

*नवेभांडे,गाईला घास* , *अन्नदान,तिळपात्र,गूळ,तीळ,सोने*,*भूमी,गाय,वस्र,घोडा ईत्यादी  यथाशक्ति दाने करावी* .

*दिनांक १५/०१/२०२५ रोजी करिदिन म्हणजेच संक्रांतीची कर आहे यालाच *किंक्रांत* असेही म्हणतात. 

   *तिळ गुळ घ्या गोड गोड बोला*

               🙏🙏🙏

युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद* *जन्मदिनाची* ⚜️⚜️⚜️

 🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

                       *२/२*

                

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

     *युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद*    

                  *जन्मदिनाची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


         *आज 'राष्ट्रीय युवा दिन'*

                                                                                                                              

🌸🥀🔆🌺🚩🌺🔆🥀🌸


        *"अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो".. शिकागोतील जागतिक सर्वधर्म परिषदेच्या व्याख्यानातील भगवाधारीच्या पहिल्याच वाक्याने जग जिंकले. आज भाषणात हे वाक्य म्हणजे प्रथा झालीय. पण तेव्हा या वाक्यातील हिंदू संस्कृतीचा उदात्त भाव लक्षात येताच बराच वेळ टाळ्यांचा कडकडाट होत राहीला.. कारणही तसेच होते. जगात प्रथमच कुणीतरी जगाशी भावाबहिणीचे पवित्र नाते जोडले होते.*  

        *आज १२ जानेवारी. याच दिवशी जगाला प्रत्येक 'जीव हा शिव आहे' हे हिंदू धर्म सहिष्णूतेचे अव्दैत वैदिक तत्त्वज्ञान.. भारतीय योगदर्शन जगाला सांगणाऱ्या एका तेजस्वी संन्यासाचा जन्म झाला.. नरेंद्रनाथ दत्त. १८६३ साली जन्म कलकत्ता. ओळख स्वामी विवेकानंद.*

        *जनतेच्या उद्धारासाठी त्यांना गुरुमंत्र देणारे दैवी पुरुष जगविख्यात गुरू लाभले रामकृष्ण परमहंस. त्यांचे कार्य पूढे नेण्यासाठी विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. सर्वप्रथम भारतभ्रमण करुन जनतेची दुःख बघितली. माणसातील सुप्त मनुष्यत्व जागविण्यासाठी.. वेदान्त विचार जगाला पटविण्यासाठी सर्वधर्म परिषदेत मातृभूमीचा सेवक म्हणून भाग घेतला.*

        *अमेरिका.. इंग्लंड.. युरोप दौऱ्यात त्यांच्या मानवतावादी तेजस्वी व्यक्तीमत्वाचा.. वाणीचा.. मानवतावादी विचारांचा एवढा प्रभाव पडला की जगाला उर्जा देणारे युगपुरुष ख्याती झाली. स्वामी विवेकानंदामुळे जगाची भारताकडे बघण्याची दृष्टीच बदलली. जगात भारतीय तत्त्वज्ञानाचे महत्त्व पटले. स्वामी विवेकानंद म्हणजे जीवनात उर्जा देणारे.. गीता सांगणारे आधुनिक श्रीकृष्णच.* 

        *विवेकानंदांची अचाट बुद्धिमत्ता.. स्मरणशक्ती.. ज्ञानार्जनाची क्षमता सारेच विस्मयकारी.. अविश्वसनीय पण सत्य आहे. प्रत्येक विचार जीवनात प्रेरणादायी.. विवेकानंद म्हणतात.. उठा, जागे व्हा, आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. धैर्य हेच जीवन आहे आणि भ्याडपणा हे मृत्यूचं लक्षण आहे. प्रेम म्हणजे जीवन, द्वेष म्हणजे मृत्यू. मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंर्तमनात प्रचंड शक्ति आहे. या शक्तिच्या मदतीनं तुम्ही अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवू शकता. तुम्ही जसा विचार कराल तसे व्हाल. दुर्बल समजलात तर दुर्बल, उठा जागृत व्हा. तुमच्या ध्येय प्राप्ती पर्यंत थांबू नका. तुम्ही जसा विचार करता तसे बनता. स्वतःला घडविण्याकडे एवढे व्यस्त रहा की इतरांचे दोष काढण्यासाठी वेळच  मिळणार नाही.* 

        *स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन १२ जानेवारी हा भारतात 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून संपन्न होतो. या प्रेरणादायी दिनाच्या शुभेच्छा !!*

        *स्वामी विवेकानंदांनी आम्हांला धीरता.. शूरता.. वीरता आणि विद्येसह नम्रता.. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शासन हा गुरु मंत्र दिलाय. हा गुरुंचा वारसा आपण चालवू या. विवेकानंद म्हणजे भारताचे आध्यात्मिक पिता असे सुभाषचंद्र बोस गौरवितात. अशा या युगपुरुषाला जन्मदिनी विनम्र अभिवादन.*


🌹⚜️🌸🥀🚩🥀🌸⚜️🌹


  *गुरूने दिला ज्ञानरूपी वसा*

  *आम्ही चालवू हा पुढे वारसा*


  *पिता-बंधु-स्‍नेही तुम्ही माउली*

  *तुम्ही कल्पवृक्षातळी सावली*

  *तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा !*


  *जिथे काल अंकुर बीजातले*

  *तिथे आज वेलीवरी ही फुले*

  *फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा !*


  *शिकू धीरता, शूरता, वीरता*

  *धरू थोर विद्येसवे नम्रता*

  *मनी ध्यास हा एक लागो असा !*


  *जरी दुष्ट कोणी करू शासन*

  *गुणी सज्जनांचे करू पालन*

  *मनी-मानसी हाच आहे ठसा !*


  *तुझी त्याग-सेवा फळा ये अशी*

  *तुझी कीर्ती राहील दाही दिशी*

  *अगा पुण्यवंता भल्या माणसा !*


🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹 

  

  *गीत : जगदीश खेबूडकर*  ✍  

  *संगीत : प्रभाकर जोग*

  *स्वर : अनुराधा पौडवाल*

  *आणि सुरेश वाडकर*

  *चित्रपट : कैवारी (१९८१)*

  

  🎼🎶🎼🎶🎼    🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-१२.०१.२०२५-*


🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻

आपल्या स्वतंत्र भारतात या गावातील लोकांसाठी शाळा पोहोचण्याची गरज आहे...!

 बघून मन सुन्न झाले... आपल्या कल्याण पासून काही तासावर असलेले शहापूर आणि तानसा धरण तलावतील खोल पाण्यातून तरफ्याने नदी ओलांडून रोज फक्त शिक्षणासाठी शाळेत जातात... अशा परिस्थितीत राहणारे आदिवासी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत गावातच २०० पेक्षा जास्त कुटुंबाला शाळेची गरज आहे.

आपल्या स्वतंत्र भारतात या गावातील लोकांसाठी शाळा पोहोचण्याची गरज आहे...!


११/०१/२०२५- लालबहादूर शास्त्री पूण्यदिन..

 🍃🌾😊


🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

            *🔸श्री. लाल बहादूर शास्त्री.🔸*


*🟣११/०१/२०२५- लालबहादूर शास्त्री पूण्यदिन...🙏* *--------------------------------------*

*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*

*--------------------------------------*

*श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला... लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्या तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली.....*


*लहान गावात लालबहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले... मात्र तरीही गरीबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले. उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्वजण त्यांना “नन्हे” नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळयातही तापलेल्या रस्त्यावरुन ते शाळेत जायचे.....*


*वयात आल्यावर, लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली... भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते, आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली.....*


*गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते... गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून‍ शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता.....*


*त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहित होते की एकदा निर्णय घेतला की ते तो कधीही बदलणार नाहीत, कारण बाहेरुन मृदू वाटणारे शास्त्री आतून एखादया खडकासारखे कणखर होते.....*


*ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले... येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव “शास्त्री” होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले.....*


*१९२७ मध्ये त्यांचा विवाह झाला... त्यांची पत्नी ललिता देवी हया त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथील होत्या. त्यांचा विवाह पारंपारिक पध्दतीने पार पडला. हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड होते. यापेक्षा अधिक त्यांना आणखी काही नको होते. १९३० मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिक परिपक्व झाले.....*


*स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनित लाल बहादूर शास्त्री यांचे महत्त्व लक्षात आले होते... १९४६ मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा या “छोटया डायनॅमो”ला देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यात आले. त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरुढ झाले. त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तर प्रदेशात एक लोकोक्ती बनली. १९५१ मध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.....*


*त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती... एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लालबहादूर शास्त्री यांची इमानदार वृत्ती आणि उच्च आदर्शमूल्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की शास्त्री यांचा राजीनाम मी स्वीकारत आहे कारण यामुळे घटनात्मक मर्यादेमध्ये एक उदाहरण कायम राहील. जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत.....*


*रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना लाल बहादूर शास्त्री म्हणाले “कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर होऊ शकत नाही... जरी मी शारीरिकदृष्टया धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवतही नाही.....”*


*आपल्या मंत्रालयीन कामकाजादरम्यान, काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यवहाराकडेही त्यांनी लक्ष दिले आणि त्यात भरीव योगदानही दिले... १९५२, १९५७ आणि १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एखाद्या गोष्टीची जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते.....*


*तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले... नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधीच्या शैलीत ते एकदा म्हणाले. “कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.” महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले.....*

*स्रोत: आंतरजाल, PM INDIA...*

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹


     *🌺🦚 राधे राधे 🦚🌺*

*भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?*

 . 


*भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?*


यावर आपण एक उदाहरण बघू.


तीन महिन्यांसाठी एक प्रयोग करून बघा. सात्त्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो. कारण जसे अन्न, तसे मन होते. सात्त्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही, तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अन्न असते.


जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला असेल, तर त्यास सात्त्विक अन्न म्हणत नाहीत. म्हणून स्वयंपाक  करणाऱ्याने कधीही रागाच्या भरात, उदास, नाराज होऊन स्वयंपाक करू नये. (जेवण बनवू नये. अन्न शिजवू नये.)


तसेच स्वयंपाक करत असताना कधीही आईला, बहिणीला, पत्नीला (जे कोणी स्वयंपाक करत असतील, त्यांना) ओरडू नये, रागवू नये, त्यांच्याशी भांडू नये. कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना, त्या पदार्थांत त्याच प्रकारची (सर्व रागाची) स्पंदने जातात आणि तेच आपण खाणार असतो. ही लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

आणि म्हणूनच पूर्वी *सोवळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती.*


# भोजन तीन प्रकारचे असते.

(१) जे आपण हॉटेलमध्ये खातो,

(२) जे घरात आई, पत्नी बनवते आणि

(३) जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो, ते भोजन.

तिन्ही भोजनांत वेगवेगळी स्पंदने असतात.


(१) हॉटेलमध्ये पदार्थ बनवतात, ते विकत घेऊन खावे लागते. ते आपण नेहमी खाल्ल्यास त्यातील स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाहीत. त्यामुळे कधी कधी त्या अन्नाने आपणास त्रासही होतो. ते पदार्थ कोण शिजवतं, त्यावेळी त्याच्या मनात काय चालले आहे, त्याचा भाव कोणता आहे, ते सगळं त्या अन्नात उतरतं, तेच संस्कार त्या अन्नावर होतात. तोच भाव आपल्यात उतरतो.


(२) घरात आई, पत्नी जे पदार्थ करते, ती फार प्रेमाने करत असते. म्हणून त्या पदार्थांत सात्त्विक स्पंदने असतात, ती आपणास समाधानी बनवतात. 


परंतु हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात. त्यांच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत.


घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल, की मला अजून एक पोळी वाढ. तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो. ती अजून प्रेमाने एक पोळी त्याला वाढते. त्यात तिचे प्रेम असतं, आनंद असतो. पण हेच आपण स्वयंपाक्याकडे मागितले, तर तो वाढेल; पण त्यात प्रेम असेलच, असे नाही. असे जेवण अंगी लागत नाही.


(३) मंदिरात अन्नकोटात आपण जे खातो, तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो. ती भावना प्रसादाची असते. ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेले असते म्हणून ते अन्न प्रसाद होते.


आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत, असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे म्हणजे तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करावा म्हणजे रोज प्रसादच भक्षण होईल.


स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात. घरात काही त्रास असेल, तर त्यावर हा एक उपाय आहे. ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा.


परमेश्वरास प्रार्थना करावी, की हे अन्न खाणाऱ्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम , वात्सल्य, आपुलकी, विश्वास निर्माण होऊ दे. त्यांच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता, तुझ्याविषयी श्रद्धा निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा.


अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्कारांचाही परिणाम होतो. स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे भाजी असो, कुकर असो, काही असो, त्या पात्राला हात लावून *कृष्णार्पणमस्तु* किंवा *शिवार्पणमस्तु* म्हणून नमस्कार करा. मग बघा, काय जादू होते. सगळी आसपासची सूक्ष्म स्पंदनं संपून जातील आणि उरेल किंवा तयार होईल प्रसाद.!



*श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ*

🙏🏼🌹🙏🏼🌻🙏🏼🌻🙏🏼🌹🙏🏼


.

Ka,? कशा साठी

 *1) अंत्यसंस्कार किंवा केशकर्तनावरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची ?*

*Infections spread टाळण्यासाठी.*


*2) चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?*

*Infections spread टाळण्यासाठी.*


*3) घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची?*

*(यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?)*

*कारण मृत्यू समयी माणसाला काही ना काही आजार असतोच.*

*त्याची Immunity lowest level ला असते ,त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते.*

*या infective आजारांपासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस अंतर ठेवावे.*


*काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे.*

*त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.*

*इथे कारण उलटे असते*

*कारण नवजात बालकाची* *immunity खूप कमी असते.* *बाहेरच्या जगातील आजार त्याला होऊ नयेत म्हणून घरातच राहणे,जसे आपण आता करत आहोत.*


*4) मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२व्या नंतर घरात साफसफाई का करतात?*

*आलं का logic लक्षात.*


*5) शौचास बसून करण्याची भारतीय पद्धत का प्रचलित आहे? (आतड्यांना लॉक करणारे मसल्स अनलॉक झाल्याने मलाचा पूर्ण निचरा होतो, टॉयलेट पेपरची गरज नाही त्यामुळे इको-फ्रेंडली आहे,*

*पाश्चात्य कमोडच्या सीटवरच्या लाखो विषाणूंचा डायरेक्ट शरीराला संपर्क होतो तसा भारतीय पद्धतीत होत नाही.*


*6) हळद आणि मसाले युक्त अन्न शरीराच्या प्रतिकार शक्तीला आपसूकच बळ देतात. लग्नाआधी हळदी समारंभ का असतो?*

*आता western लोकही हळददूध प्यायला लागलेत, फरक एवढाच की ते त्याला turmeric latte म्हणतात. तुमच्या शहरातील कोणत्याही cafe shop वर जाऊन turmeric latte मागवून तर बघा.*


*7) घरात उद, कापूर जाळणे धूप फिरवणे यामागे काय कारण असावे?*

*Logic लक्षात घ्या.*


*8. ऋतुमानानुसार सणवार आणि अन्न नियोजन यामागे किती मोठा विचार असेल....?*

*उन्हाळा सुरू व्हायच्या आधीचा काळ हा वायरल इन्फेक्शनचा असतो.*

*या काळातच दारोदारी होळी का पेटवली जाते...?*


*9)*

*आपल्याकडे जनरली मृतदेह दफन करण्याऐवजी दहन करायची पद्धत का रूढ आहे? गुगल करा "cremate or bury". अनेक संशोधने मिळतील. तिकडे चीनने मृतदेहांना पुरण्या ऐवजी जाळण्याचे आदेश दिलेत.*


*10*

*जगातला सगळ्यात जास्त शाकाहारी असलेला देश भारतच आहे.*

*असे का...?*

*इथे भारतात आपण प्राण्यांत पण देव पाहतो. झाडांमध्ये, दगडांमध्ये, नद्यांमध्ये, पर्वतांमध्ये ही...!*

*आम्हाला जगाने इको-फ्रेंडली व्हा हे शिकवणे म्हणजे मोठा विनोद आहे.*

*आम्ही कुत्र्यात पण देव पाहतो, खंडोबा म्हणतो. तिकडे चीनच्या युलीन फेस्टिवल मध्ये कुत्र्यांना भाजून खातात.*


*11*

*एकाही व्हायरसचा जन्म भारतातून झाला आहे असे ऐकिवात का नाही?*

*कारण आम्ही इकडे वटवाघूळ, उंदीर, मांजर कुत्री, ऑक्टोपस, साप,रातकिडे, अळ्या असे बेछूट खात नाही. Nonveg खाण्यातही नियम आहेत ते पाळतो.*


*12*

*उठसुठ हात मिळवणे, मुके घेऊन अभिवादन करणे असे प्रकार आपल्याकडे नसून हात जोडून नमस्कार करायची पद्धत का आहे..?*

 भारतीय पद्धतींचा logical विचार करा.*

*त्या बरोबर आहेत .👍*


*_आपली संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्व टिकवून आहे. अनेक महामाऱ्या आणि संकटे झेलून अनुभव संपन्न झाली आहे. आमचीच संस्कृति किती वैज्ञानिक आहे याचा ढोल बडवायचा यात उद्देश अजिबात नाही. हे केवळ अनुभवातून शिकणे आणि कॉमन सेन्सचा भाग आहे. स्वतःच्या संस्कृतीला कमी समजणे आणि वेस्टर्न तेच योग्य ही विचारसरणी कोरोना पेक्षा घातक आहे._*


🙏 *आपली आणि आपल्यांचीं काळजी घ्या*🙏

Featured post

Lakshvedhi