Tuesday, 23 July 2024

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना ३१ जुलैपर्यंत लाभार्थ्यांनी आधार पडताळणीचे

 राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना

३१ जुलैपर्यंत लाभार्थ्यांनी आधार पडताळणीचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन

 

        मुंबईदि. 23 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षावरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. या योजने अंतर्गत 34 हजार 600 कलाकार व साहित्यिक यांचा समावेश असून त्यांना एप्रिल 2024 पासून सरसकट 5 हजार रुपये एवढे मानधन देण्यात येत आहे. ही प्रत्यक्ष लाभाची योजना असल्यामुळेप्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली द्वारेच मानधन अदा करण्याबाबत राज्य शासनाचे धोरण  आहे. त्यानुसारराज्यातील या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थ्यांची आधार पडताळणी राहिली असेलत्या सर्व लाभार्थ्यांनी 31 जुलै 2024 पर्यंत त्यांची आधार पडताळणी करून घ्यावीअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

            आतापर्यंत या योजनेतील 17 हजार 350 लाभार्थ्यांनी आधार पडताळणी पूर्ण केलेली आहे. ज्या लाभार्थ्यांनी आधार पडताळणी केलेली आहे. त्यांना माहे मे महिन्याचे मानधन डीबीटीमार्फत देण्यात आलेले आहे. ज्यांची आधार पडताळणी झालेली नाही त्या कलाकारांना विशेष बाब म्हणून मे महिन्याचे मानधन अदा करण्यात आले होते. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली द्वारे मानधन दिल्यामुळे कलाकारांना मानधन मिळण्यात कालापव्यय होणार नाहीलाभार्थ्यांना मानधनाबाबतची माहितीमानधन मिळण्याच्या अगोदर व मानधन मिळाल्यानंतर मोबाईलवर संदेशाच्या रूपाने वेळोवेळी देता येईलमानधन रक्कम खात्यात जमा होताना कोणतीही तांत्रिक चूक होणार नाही. मानधन मिळाले नाही किंवा परत गेले अशा प्रकारच्या बाबी घडणार नाहीत.

            प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकाची पडताळणी करणे ही वैयक्तिक लाभार्थ्यांचीच जबाबदारी आहेकारण अन्य कोणतीही व्यक्ती अशा प्रकारची पडताळणी करू शकत नाही. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी मोबाईल वरून किंवा सेतू सुविधा केंद्रातून आधार पडताळणी करणे आवश्यक आहे. आधार पडताळणी करण्याआधी लाभार्थ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाला जोडणे आवश्यक आहे. आधार पडताळणी करण्यासाठी https://mahakalasanman.org/AadharVerification.aspx ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हास्तरावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद हे या समितीचे सदस्य सचिव असल्यानेग्रामपंचायत किवा पंचायत समिती स्तरावरूनही याबाबत आपणास माहिती मिळू शकेल. यापुढेज्या कलाकारांची आधार पडताळणी झालेली आहे. अशा कलाकारांच्या खात्यात विहित वेळेत मानधन जमा करण्यात येईल. ज्या कलाकारांची आधार पडताळणी प्रलंबित आहे त्यांना मानधन जमा होण्यास विलंब लागू शकतो. आधार पडताळणी करण्याबाबत काही अडचणी आल्याससांस्कृतिक कार्य संचालनालयमुंबई तसेच पुणे/ नागपूर/ छत्रपती संभाजीनगर या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

            आधार पडताळणीसंदर्भात अडचणींसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            मुंबई कार्यालयातील संपर्क क्रमांक – दूरध्वनी क्र. 022- 228426370022- 22043550.

            श्रीराम पांडेसहसंचालक मो. ९४२१६४२६५१संदीप बलखंडेसहायक संचालक मो. ९७६३०६८०८३. श्रीमती जयश्री घुगेकार्यक्रम अधिकारी मो. ९००४११५०८६श्रीमती अक्षता बिर्जे अधीक्षक मो. ९८६९८३४९४६श्रीमती पल्लवी कदमउच्चश्रेणी लघुलेखक मो. ७५०७८७४९३०

            पुणे विभागीय कार्यालय - श्रीमती श्वेता पवारसहायक संचालकमो. ९०२८९१२८३८. श्रीमती जान्हवी जानकरअधीक्षकमो. ९५४५४१४३४३नरेंद्र तायडेसहायक लेखा अधिकारी मो.९४२३११४४९९

            नागपूर विभागीय कार्यालय - संदीप शेंडेसहायक संचालक-मो.९४२१७८२८४८श्रीमती प्रज्ञा पाटीलसहा. लेखा अधिकारी - ८९२८१३०६२२

            छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय - संदीप शेंडेसहायक संचालक- मो.९४२१७८२८४८. सुर्यकांत ढगेसहा. लेखा अधिकारी-९८२२३३४३२१.

000

विकासाला अधिक गती देणारा अर्थसंकल्प

 विकासाला अधिक गती देणारा अर्थसंकल्प

                                         - मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबईदि. २३: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या विकासाला अधिक गती देत सामान्यांना दिलासा देणारा आणि काळाभिमुख सुधारणा करतांनाच वित्तीय तूट कमी करणारा असा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना न्याय देणारारोजगार निर्मिती बरोबरच शेतीलाही चालना देणारा आणि लोककल्याणकारी आहेअशी प्रतिक्रिया वनेसांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

 

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला विश्वगुरू बनविण्याचे आपल्या सर्वांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणाऱ्या या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो. आजच्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४.९ टक्के इतकी कमी राखली गेली आहे. देशात विकासात्मक कामांवरील आणि कल्याणकारी योजनांवरील खर्च वाढत असतांना तूट कमी करण्याचे आव्हान केंद्र शासनाने पेलून दाखवले आहे. आयकराची केलेली पुनर्रचना सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. जीएसटी मध्ये विविध वस्तूंना दिलेली सवलतआयात व सीमा शुल्कातून विविध अत्यावश्यक औषधांना दिलेली सूट समाधान देणारी आहे. तर मोबाईल फोनत्याचे सुटे भाग यांच्यावरील घटवलेले कर हे अर्थव्यवस्थेच्या डिजिटायजेशनला अधिक वेग देणारे आहेतश्री.मुनगंटीवार म्हणाले.

            या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला. या अर्थसंकल्पामुळे खते व बी-बियाणे स्वस्त होतील. हा अर्थसंकल्प शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याच्या दिशेने अधिक दमदार पाऊल टाकणारा आहे. तेलबियांच्या उत्पादनाला दिलेल्या सवलती व चालना दिल्यामुळे देश खाद्यतेल क्षेत्रात स्वयंपूर्ण बनेल असा विश्वास वाटतो.  नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याकरता ग्रामपंचायत पातळीवर दिलेल्या योजना व सवलती हे आपली जमीनजल व धान्य निर्वीष करणाऱ्या आहेतअसे ते म्हणाले.

 

            आजच्या अर्थसंकल्पात हवाई वाहतूक व जल वाहतुकीला तसेच जहाज व विमान दुरूस्ती व देखभाल या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरता जाहीर केलेल्या योजना देशाला या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवत पुढे नेणाऱ्या आहेत. ग्रामीण आणि नागरी भागातील भूमी अभिलेखांचे डिजिटायजेशन तसेच नवीन सर्वेक्षणत्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यातून जमिनीचा वापर अधिक कार्यक्षमतेने करता येईलतसेच विकासाचे नियोजन नियंत्रण करणाऱ्या संस्थांना व प्राधिकरणांना अधिक चांगले काम करता येईल, असेही ते म्हणाले. भूमी अभिलेख क्षेत्रात बरेच दिवस प्रलंबित असलेले प्रश्न या अर्थसंकल्पामुळे सुटतील. असेही श्री.मुनगंटीवार म्हणाले.

            सर्वसामान्यांना आयकरात सवलत देतांनाच कॉर्पोरेट क्षेत्रालाही सवलती दिल्या आहेतत्या सवलती रोजगार निर्मितीशी जोडल्याने (एम्प्लॉयमेंट बेस्ड इंसेंटीव्हज) कंपन्यांना तंत्रज्ञान व नफा यासोबतच आता रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागणार आहेत्याचे स्वागत केले पाहिजेअसे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

सर्वसामान्यांना दिलासा; विकसित भारत संकल्पनेला बळ प्रधानमंत्र्यांनी कोट्यवधी देशवासीयांचा विश्वास ठरविला सार्थ 'नवरत्न' अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब

 सर्वसामान्यांना दिलासा; विकसित भारत संकल्पनेला बळ

प्रधानमंत्र्यांनी कोट्यवधी देशवासीयांचा विश्वास ठरविला सार्थ

'नवरत्नअर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

          मुंबईदि. २३ : कर रचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासीयांचा विश्वास सार्थ ठरविला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला  अर्थसंकल्प शेतकरीमहिलायुवाकौशल्य विकासरोजगारपायाभूत सुविधांची उभारणीशहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूदरोजगाराला चालना देणारा आणि 'विकसित भारतसंकल्पनेला बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

शेतकऱ्यांना बळ

            केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीगरीबमहिलायुवाशेतकरी या घटकांवर भर देतानाच कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद तसेच शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरविण्याचा निर्णय हा कृषी क्षेत्राबरोबरच शेतकऱ्यांना बळ देणारा आहे. एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य शासनाने देखील महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी पावले उचलल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            नवीन कर रचना ही सामान्यांनानोकरदारांना दिलासा देणारी असून त्याचे मी स्वागतच करतो. या नव्या कररचनेमुळे करदात्यांची संख्याही वाढेल. यातून विकासाला आवश्यक असणारे कर संकलनातही महाराष्ट्रात अग्रेसर राहीलअसा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागाचा कायापालट

            या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रातील उत्पादकतारोजगार व कौशल्य विकासमनुष्यबळ विकास व सामाजिक न्यायउत्पादन व सेवाशहरी विकासउर्जा संरक्षणपायाभूत संरचनासंशोधन व विकासनव्या पिढीतील सुधारणा या नऊ घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आल्याने सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याचे सांगत ग्रामीण भारताच्या विकासासाठी केलेली २.६६ लाख कोटी रुपयांची तरतूद खेड्यांचा कायापालट करणारी ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

५० लाख अतिरिक्त रोजगार

            आपला देश युवांचा आहे, असे नेहमी म्हटले जाते. त्याचे प्रतिबिंब आजच्या अर्थसंकल्पात पहायला मिळाले असून युवा वर्गासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच रोजगारासाठी तयार झालेल्या युवकांना एक महिन्याचा भत्ता पहिल्या महिन्यात देण्याचा निर्णय हा युवांसाठी दिलासा देणारा आहे. ५० लाख अतिरिक्त रोजगार निर्माण करण्याचा देखील निर्धार अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील युवकांनाही रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे.

            देशातील ५०० अग्रणी कंपन्यांमध्ये युवकांना इंटर्नशिप संधी  मिळणार असून पाच वर्षांत सुमारे एक कोटी तरुणांना याचा फायदा होणार आहे. कौशल्य विकासासाठी जाहिर केलेल्या नवीन योजनेद्वारे राज्य सरकार व उद्योगविश्व यांच्या संयुक्त विद्यमातून ५ वर्षांच्या काळात २० लाख युवकांना कौशल्यविकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुद्रा योजनेतून दुप्पट कर्ज देण्याचा निर्णयही युवांना सक्षम करणारा आहे.

पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटी

            अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली आहे. देशात पायाभूत सुविधा उभारणी कामात महाराष्ट्र अग्रेसर आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ११ लाख कोटींची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या खासगी गुंतवणुकीला सरकारी धोरणांमधून प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक पाठबळ मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.  देशभरात रस्ते बांधणीसाठी २६ हजार कोटींचा खर्च केला जाणार असल्याने दळणवळणाचे जाळे मजूबत होणार आहे. देशभरात १२ इंडस्ट्रियल पार्कला नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत मंजुरी देण्याचा निर्णय हा उद्योग क्षेत्राला भरारी देणारा आहे.

            देशभरातील २५ हजार गावांसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते बनवण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना टप्पा ४ सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेद्वारे सौर ऊर्जेला चालना मिळणार असून अर्थसंकल्पातील तरतुदी आणि योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासात मोठी भर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

०००००


 

शाळा

 शाळा...



गेले चार दिवस बेशुद्ध असलेल्या शिंत्रे बाईंनी आज डोळे उघडले. वृद्धाश्रमातून म्युनिसिपल हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यावर शुद्ध गेलेल्या त्यांना, स्वतःला एका अद्यावत इस्पितळात पाहून आश्चर्य वाटलं. समोर उभा असलेला डॉक्टर म्हणाला-


डॉक्टर- बाई मी अमोल भुस्कुटे. तुमचा विद्यार्थी. ओळखलं का? 


बाईंना ओळख पटली. अमोल ने त्यांचा चष्मा त्यांच्या डोळ्यावर लावला. बाईंनी डोळे बारीक करून त्याला पाहिला.


बाई- भुस्कुटे म्हणजे ८९ ची बॅच ना रे?


अमोल- हो बाई बरोबर.


बाई- पण मी इथे कशी रे? मला तर आश्रमवाल्यानी सरकारी हॉस्पिटल मध्ये ठेवलं होतं.


अमोल- बाई आपला पाटील आठवतो का? आमच्या वर्गातला?


बाई- गणिताला घाबरणारा पाटील. बरोबर ना? 


अमोल- हो बाई. तुम्ही त्याची स्पेशल तयारी करून घेतली होती दहावीच्या परिक्षेआधी. म्हणून पास झाला. आता तो पोलिसात आहे. तो त्या दिवशी एका केस साठी सरकारी हॉस्पिटल मध्ये आला होता आणि तुम्हाला त्याने ओळखलं. आणि मला फोन केला. मी म्हणालो लगेच इथे घेऊन ये. बाई मी एच ओ डी आहे इथे. मीच उपचार करतोय तुमच्यावर. उद्या आयसीयू मधून शिफ्ट करतो तुम्हाला. दोन दिवसात डिस्चार्ज देऊन घरी नेतो.


बाई- घर विकलं रे मी मिलिंदला अमेरिकेला शिकायला पाठवताना पैसे हवे म्हणून! भाड्यावर रहात होते. मिलिंदने तिथेच लग्न केलं आणि तिथेच राहतो. मी रिटायर झाल्यावर एकदा आला आणि  मला आश्रमात ठेवलं तब्बेतीची काळजी म्हणून. तिथले पैसे जेमतेम भरते मी. पण  इथलं बिल कस देऊ बाळा? मिलिंद तर माझे फोनही घेत नाही. विसरला आहे मला. 


अमोल- बाई, बिलाची चिंता करू नका. आणि तुम्ही इथून माझ्या घरीच यायचं आहे. आश्रम विसरा आता. बाई तुम्ही इतकं छान शिकवलं म्हणून आम्ही आज आयुष्यात उभे आहोत. तुम्हाला इथे ऍडमिट केल्यावर मी आणि पाटील ने आमच्या शाळेच्या ग्रुप मध्ये ते सांगितलं. आम्ही सगळे भेटलो. आम्ही ठरवलं आहे की आता तुम्ही आमच्या घरी राहायचं. कोण तुम्हाला नेणार ह्यावर वाद झाले. सगळेच न्यायला उत्सुक आहेत. शेवटी असं ठरलंय की तुम्ही प्रत्येकाच्या घरी तीन तीन महिने राहायचं. आम्ही पंचवीस जण आहोत अजून कॉन्टॅक्ट मध्ये. म्हणजे तुमची सहा वर्षांची सोय झाली आहे आत्ताच.


बाई- पंचवीस त्रिक पंचाहत्तर. पंचाहत्तर महिने म्हणजे फक्त सहा वर्ष नाही रे भुस्कुटे. वरचे तीन महिने कसे विसरलास? 


अमोल- (हसून) बाई माझं गणित अजूनही तसंच थोडं कच्चं आहे.


बाई- पण शास्त्रात तुला पैकीच्या पैकी होते दहावीला. बरोबर ना?


अमोल- हो बाई..


बाई- पण कशाला रे बाळा तुम्हाला त्रास. तुमचे संसार असतील. मी जाईन माझ्या आश्रमात परत.  राहिलेत किती दिवस माझे?


अमोल- ते मला नका सांगू. आयसीयू बाहेर जे पंचवीस जण उभे आहेत ना त्यांना सांगा. 


अस म्हणून अमोल ने आयसीयूच दार उघडलं. पंचवीस शाळकरी मित्र मैत्रिणी आवाज न करता सावकाश आत येऊन बाईंच्या सभोवार उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेलं प्रेम, आदर आणि आस्था बाईंना सगळं सांगून गेल्या. बाईंच्या डोळ्यात अश्रू तराळले. पोरांनीही हळूच डोळे पुसले. आज गुरू पौर्णिमा होती. बाईंना आज मुलांनी गुरू दक्षिणा दिली होती. आयसीयू मध्ये शांतता आणि मशिन्सची टिकटिक सुरू होती. पण बाई आणि मुलांच्या मनात परत एकदा मुलांच्या चिचिवाटाने गजबजलेली शाळा भरली होती!-

बारिश के मौसम में अलग अलग प्रजाति के मेढक के आवाज सुनिए 🫢😳🤔


 बारिश के मौसम में अलग अलग प्रजाति के मेढक के आवाज सुनिए 🫢😳🤔

हा नंबर सेव करुन घ्या....इथे हृदय विकार व हार्ट ब्लॉकेज १५ दिवसात कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता मनी बॅक ग्यारंटी सहित, ब्लॉकेज पूर्ण पणे क्लियर केले जातील

 हा नंबर सेव करुन घ्या....

9004204269

vidya sanjay Gavali

मुंबई महामार्गाजवळ,

कामोठे बस स्थानकासमोर 

के एल इ कॉलेजच्या बाजूला, एल आय जी फस्ट, सेक्टर नं-३  रूम नं के-२ कळंबोली, नवी मुंबई.

या ठिकाणी.

इथे हृदय विकार व  हार्ट ब्लॉकेज १५ दिवसात कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता मनी बॅक ग्यारंटी सहित, ब्लॉकेज पूर्ण पणे क्लियर केले जातील....हा मेसेज तुमच्या प्रत्येक ग्रुप मधे फारवर्ड करा...

तुमच्या एक मैसेज ने कुण्या गरीब माणसाच्या उपचाराला मदत होऊ शकते, या कामासाठी योगदान करा.. हवे तेवड़ा हा मेसेज फारवर्ड करा.

या नंबर वर रिपोर्ट पाठवा व खात्री करून Result घ्या.

 *आणि विशेष सूचना: शस्त्रक्रियेने मनुष्य पहिल्यासारखे काम करू शकत नाही.* 


*विना शस्त्रक्रिया हृदय चांगले व निरोगी ठेवा, जेवणात लसूण कडीपत्ता नेहमी ठेवा, योग प्राणायाम, तसेच भरपूर चालणे ठेवा आणि दिनचर्या ऋतूचर्या पाळा.*....


*मेसेज पुढे अवश्य पाठवा*


🙏 *धन्यवाद!* 🙏


(जसा मेसेज मिळाला तसा पूढे पाठवला)

विभिन्न पाठ्यक्रमों में प्रवेश ले चुके एसईबीसी प्रवर्ग के विद्यार्थियों को जाति वैधता प्रमाण पत्र जमा करने के लिए अब छह माह की समय सीमा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का मराठा विद्यार्थियों के हित में फैसला

 विभिन्न पाठ्यक्रमों में प्रवेश ले चुके एसईबीसी प्रवर्ग के विद्यार्थियों को

जाति वैधता प्रमाण पत्र जमा करने के लिए अब छह माह की समय सीमा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का मराठा विद्यार्थियों के हित में फैसला 

 

              मुंबई, 22 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने वर्ष 2024-25 में इंजीनियरिंगमेडिकल एवं अन्य व्यावसायिक पाठ्यक्रमों के लिए विभिन्न शैक्षणिक संस्थानों में प्रवेश पाने वाले विद्यार्थियों के लिए जाति वैधता प्रमाण पत्र जमा करने के लिए आवेदन करने की तारीख से लेकर छह महीने की अवधि तक समय सीमा बढ़ाने का निर्णय लिया है। ऐसा होने से अब विशेषकर मराठा समाज के विद्यार्थियों को प्रमाणपत्र प्राप्त करने में आने वाली कठिनाइयां दूर हो सकेंगी।

              महाराष्ट्र राज्य में सामाजिक और शैक्षिक रूप से पिछड़े वर्गों के लिए आरक्षण अधिनियम (एसईबीसी) 2024 को 20 फरवरी 2024 को एक विशेष अधिवेशन में सर्वसम्मति से पारित किया गया था। इस अधिनियम के अनुसार राज्य के शैक्षणिक संस्थानों में प्रवेश तथा सरकारी एवं अर्ध-सरकारी नौकरियों में सीधी सेवा भर्ती के पदों पर 10 प्रतिशत आरक्षण दिया गया। इसका लाभ मुख्य रूप से मराठा समुदाय को  हुआ है।

              एसईबीसी अधिनियम का लाभ लेते हुए शिक्षण संस्थानों में प्रवेश लेने वाले विद्यार्थियों को जाति वैधता प्रमाणपत्र प्राप्त करने में कठिनाइयों का सामना करना पड़ता था। इसके चलते एसईबीसी विद्यार्थियों के लिए जाति वैधता प्रमाण पत्र जमा करने की समय सीमा बढ़ाने की मांग की जा रही थी। इस मांग पर सकारात्मक विचार करते हुए मुख्यमंत्री श्री.शिंदे ने प्रमाण पत्र जमा करने के लिए प्रमाण पत्र हेतु आवेदन करने से लेकर छः महीने की अवधि तक समय सीमा बढ़ाने का फैसला लिया है।‌

0000


 

SEBC students admitted to various courses are given six months

to submit caste validity certificates

Chief Minister Eknath Shinde's decision for the benefit of Maratha students

 

      Mumbai, July 22: Students admitted to engineering, medical, and other professional courses for the academic session 2024-25 in various institutions are given six months to submit their caste validity certificates. The six-month time limit will be applicable from the date of applying for admission. This decision taken by Chief Minister Eknath Shinde will especially help Maratha community students acquire caste certificates without any hassles. 

 

      The Reservation Act for Socially and Educationally Backward Classes (SEBC) in Maharashtra was unanimously passed in the state legislature's special session on February 202024. According to this act, 10 percent reservation was given in admission in the state's educational institutions besides in the direct recruitments in government and semi-government jobs. This provision has benefitted mainly the Maratha community.

 

      Students taking advantage of the SEBC Act encountered difficulties in obtaining caste validity certificates. Hence, a demand was made to give more time to SEBC students to submit their caste validity certificates. Considering this demand positively, Chief Minister Shinde has taken this decision to give six months from the date of applying to obtain the caste validity certificate.

००००

Featured post

Lakshvedhi