Monday, 26 February 2024

राज्यातील १५ आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण आरोग्य सुविधांमुळे जनतेला दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 राज्यातील १५ आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या

हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण

आरोग्य सुविधांमुळे जनतेला दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार

                                      -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि.२५:--सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासना तर्फे राज्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात आले असूनया २२३ रुपये खर्चाच्या आरोग्य सुविधांमुळे जनतेला दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  राजकोट येथून दुरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते.

            सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,  उपमुख्यमंत्री  देवेन्द्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटीलआरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंतग्रामविकास मंत्री गिरीश महाजनमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,राज्य उत्पादन शुल्क मंत्री  दादा भुसेवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडेगृहनिर्माण मंत्री अतुल सावेआदिवासी विकास मंत्री डॉ.राजेंद्र गावित शिक्षण मंत्री दीपक केसरकरजल व मृदुसंधारण मंत्री संजय राठोडक्रीडा मंत्री संजय बनसोडमुख्यमंत्री कार्यालय प्रधान सचीवविकास खारगे, प्रधान सचिव भूषण गगराणीप्रधान सचिव ब्रिजेश सिंहअपर मुख्य सचिव  आरोग्य सेवा मिलिंद म्हैसकरआरोग्य सेवा सचिव नवीन सोनासंचालक आरोग्य सेवा आरोग्य अभियान नवी दिल्ली डॉ. सरोज कुमार डॉ. अतिरिक्त संचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहसंचालक डॉ.सुनिता गोलाईत अधीक्षक अभियंता देवेंद्र पवारउपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच  राज्यातील सर्व आरोग्य संस्था या कार्यक्रमासाठी दूर दूरदृश प्रणाली द्वारे उपस्थित होत्या .

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  "प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्प इन्फ्रास्ट्रक्चर मिशन"  (पीएम-अभिम ) अंतर्गत  खालील आरोग्य संस्थांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण

  

पीएम-अभिम अंतर्गत १३५.०५ कोटी रुपये खर्चाच्या  क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक कामाचे भूमिपूजन झाले .

 यामध्ये जिल्हा रुग्णालयजि. पुणे - १०० खाटा,

जिल्हा रुग्णालयजि. अहमदनगर ५० खाटा,

जिल्हा रुग्णालयजि. बुलढाणा - ५० खाटा,

जिल्हा रुग्णालयजि. बीड - ५० खाटा,

 आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयजि. नंदुरबार - ५० खाटा समावेश आहे.

तसेच पीएम-अभिम अंतर्गत. १.२५ कोटी रुपये खर्चाच्या इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅब जिल्हा रुग्णालयजि. अमरावती भूमिपूजन झाले.

*राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकूण  ७७.९४ कोटी रुपये खर्चाच्या खालील आरोग्य सुविधांचे लोकार्पण झाले.

मुख्य इमारत आणि १४ स्टाफ क्वार्टर - प्रा. आ. केंद्रकरजगाव ता. चांदूरबाजार जि. अमरावती

मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालयजैताने ता. साक्री जि. धुळे

मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर प्रा. आ. केंद्रशिराळा ता. अमरावती जि. अमरावती

जिल्हा वेअरहाऊसमिटींगडीपीएमए ऑफिसजि. चंद्रपूर

स्टाफ क्वार्टर - प्रा.आ.केंद्रताडली ता. चंद्रपूर जि. चंद्रपूर

मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर प्रा.आ. केंद्रगव्हाळीता. अक्कलकुवा जि. नंदुरबार

मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालयसावदा ता. रावेर जि. जळगाव

मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालयकिनगाव ता. यावल जि. जळगाव

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत एकूण  8.99 कोटी रुपये खर्चाच्या पुणे येथील नवीन आयुष रुग्णालय इमारतीचे लोकार्पण झाले.

आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

 आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबईदि. 26 : मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेल्या आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

            विरोधी पक्षनेते विजय वड्डेटिवार यांनी विधानसभेमध्ये याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होते. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीशासन आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावीअसे आवाहनही त्यांनी केले. चर्चा करून आशा सेविकांचे प्रश्न सोडवले जातील, असेही उपमुख्यमंत्री श्री. 

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2024 विधानसभेमध्ये 8 हजार 609 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर मुंबई, दि. 26 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी एकूण आठ हजार 609.17 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. पहिल्या दिवशी तीन विधेयके सादर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2024 मांडले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक 2024 आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024 मांडले.

 अर्थसंकल्पीय अधिवेशन 2024

विधानसभेमध्ये 8 हजार 609 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

 

            मुंबईदि. 26 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी एकूण आठ हजार 609.17 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.

पहिल्या दिवशी तीन विधेयके सादर

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2024 मांडले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक 2024 आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024 मांडले.

सरकार लोकांचे जीवन सुकर होईल असे काम करत आहे

 सरकार लोकांचे जीवन सुकर होईल असे काम करत आहे                                                            -देवेंद्र फडणवीस


            यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात विकासाची कामे वेगात सुरू आहेत दुष्काळ, आरोग्य, रोजगार, शिक्षण आदी बाबींवर सरकारचे लक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देण्यासाठी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो बोनस घोषित झाला आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार व्यक्त करतो आहे.हे सरकार लोकांचे जीवन सुकर होईल असे काम करते आहे असे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.


राज्याचा अंतिम अर्थसंकल्प जुलैमध्ये


                                                            -अजित पवार


            याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले,

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर राज्याचा अंतिम अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर केला जाईल परंतु येत्या चार महिन्यांसाठी चा खर्चास मान्यता घेण्यासाठी अधिवेशनात सादर केले जातील. महानंद प्रकल्प राज्याचा असून गोरेगाव येथे मुख्यालय आहे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ हे देशपातळीवर कार्य करणारी संस्था असून यापूर्वी देखील जळगाव जिल्हा दूध संघाचे त्यांच्याकडे हस्तांतर केले होते परंतु त्या दूध संघाची आर्थिक सुधारणा झाल्याने सुस्थिती आलेला दूध संघ जळगाव जिल्हा कडे हस्तांतरित करण्यात आला. दूध उत्पादकांसाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जात असून त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही.


            ते पुढे म्हणाले, ड्रग्जच्या गुन्ह्याचे तपास करताना पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत पंजाब व परदेशापर्यंत धागेदोरे शोधले आहेत या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना 25 लाखाचे रोख पारितोषिक देखील जाहीर केले आहे. मराठा आरक्षण बाबत शासनाने मार्ग काढण्याचे धोरण स्वीकारून ते पूर्ण केले आहे यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण देण्यासाठी कार्यवाही झाली होती . बिहारचे 50% पेक्षा अधिक आरक्षण मध्ये मर्यादा असून राज्यांमध्ये त्याच धर्तीवर 50% पेक्षा अधिक आरक्षण झाले आहे. ते टिकणारे असून या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था चांगली रहावी हे गरजेचे आहे सर्वसामान्यांसाठी सरकार काम करीत आहे असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यावेळी म्हणाले.


            सन 2024 चे राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची दिनांक 23 फेब्रुवारी 2024 पर्यंतची यादी


1. सयुक्त समितीकडे पाठविलेले विधेयक-06


2. प्रस्तावित विधेयके-05


00000000



 

Sunday, 25 February 2024

सातारा जिल्हा परिषदेच्या जलरथांचा मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते शुभारंभ

 सातारा जिल्हा परिषदेच्या जलरथांचा मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते शुभारंभ

 

        सातारा दि.24 : ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सर्व गावात हा रथ मार्गक्रमण करणार आहे.

            या जलरथांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाईकृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनपोलीस अधीक्षक समीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

            ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने व लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा करणेप्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे 55 लिटर प्रति व्यक्ती प्रति दिवस शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणेगावातील पाण्याचे स्त्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयघनकचरा सांडपाणी व प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनतसेच गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजनांविषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या या जलरथाचा शुभारंभ मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या  हस्ते  हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

            ग्रामस्थांचा पाणीपुरवठा योजना चालवणेपाण्याचे स्त्रोत बळकट करणे या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून राज्यातील 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यातील गावांमध्ये जलरथांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात जलरथांद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल. यासाठी सर्व गटविकास अधिकारी यांची तालुका नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

            गावात जलरथांच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्सगावात पोस्टर्स लावण्यात येणार आहे, ग्रामस्थांना माहितीपत्रक दिले जाणार आहेत. तसेच नियुक्त केलेल्या समन्वयक मार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. गावातील जलस्त्रोततलावातील गाळ काढण्याची मागणी सरपंचग्रामसेवकग्रामस्थांनी केली तर शासनाच्या पोर्टलवर मागणी तात्काळ ऑनलाईन करण्यात येईल. या शुभारंभ कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटेकार्यकारी अभियंता पाणीपुरवठा गौरव चक्केकार्यकारी अभियंता (म.जी.प्रा.) पल्लवी चौगुलेजिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.


सुट्ट्यांमध्ये चलो हिमालय !

 सुट्ट्यांमध्ये चलो हिमालय !

- मुलांसाठी ट्रेकिंग, अॅडव्हेंचर आणि बर्फाच्छादित शिखरे

मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे वेध लागलेत. परीक्षा संपल्या की काय करायचं, असे प्लॅन तयार होऊ लागलेत. इतर काही ठरवण्याआधी हे पहा आणि "भवताल - निसर्ग जागर"  सोबत हिमालयात यायचा प्लॅन करा. ट्रेकिंग, अॅडव्हेंचर आणि बर्फांनी झाकलेली हिमशिखरं. मजा, मस्ती आणि निसर्गाची अनेक रहस्य उलगडणं...  तारखा राखून ठेवा आणि लगेचच आपलं नाव नोंदवा.

12 वर्षांपुढील मुला-मुलींसाठी स्पेशल समर कॅम्प,
चलो हिमालय

विशेष आकर्षण:
• बर्फातील ट्रेकिंग आणि हिमनद्या @हामता खिंड

• बर्फाच्या कुशीतील पर्वतरांगा  @रोहतांग खिंड

• उंचीवरील सर्वांधिक लांबीचा बोगदा @अटल टनेल

• हिमालयातील सर्वांगसुंदर ठिकाण @जिस्पा गाव

• गरम पाण्याची कुंडं / प्राचीन मंदिरे @मनाली

• राफ्टिंग / पॅराग्लायडिंग/ अॅडव्हेंचर @कुलू

कालावधी:
17 - 25 एप्रिल 2024

मार्गदर्शक:
• नॅचरॅलिस्ट श्री. अभिजित घोरपडे
• पर्यावरणतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी लिंक:

संपर्क:
9545350862 / 9922414822

--
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com



Saturday, 24 February 2024

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात कुसुमाग्रज साहित्य जागर...

 मराठी भाषा गौरव दिनानिमित्त

विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात

कुसुमाग्रज साहित्य जागर...

 

            मुंबईदि. २४ : महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे २७ फेब्रुवारी२०२४ रोजी "कुसुमाग्रज साहित्य जागर" मांडला जाईल.

            कविश्रेष्‍ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे दिनांक २७ फेब्रुवारी२०२४ रोजी दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत "कुसुमाग्रज साहित्य जागर" या कार्यक्रमाचे संयोजन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेनुसार करण्यात आले आहे.

            या कार्यक्रमाचे उद्घाटन सत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने आणि मराठी भाषा मंत्री दिपक केसरकरसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटीलविरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार विधिमंडळ मराठी भाषा समितीचे प्रमुख चेतन तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.

            "कुसुमाग्रज साहित्य जागर" कार्यक्रमात दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्यविधानमंडळाचे अधिकारीकर्मचारी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वार्तांकन करण्यासाठी आलेले पत्रकार हे कुसुमाग्रजांची एक आवडती कविता किंवा त्यांच्या साहित्यांतील लेखाचा सारांशनाट्यसंवाद यापैकी एक आणि एक स्वरचित कविता सादर करणार आहेत. "कुसुमाग्रज साहित्य जागर" कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

***

 

 


 


 

Featured post

Lakshvedhi