Sunday, 17 December 2023

मराठी साहित्य संमेलनात 'बालमेळावा'; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ

 मराठी साहित्य संमेलनात 'बालमेळावा'; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ


साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर जिल्हा जळगांव येथे २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ या तीन दिवसात होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला १ फेब्रुवारी २०२४ रोजी कलानंद बालमेळावा संपन्न होत आहे. या संमेलनातील बालमेळाव्यात बालनाट्य, काव्य वाचन, नाट्यछटा, नाट्य प्रवेश, समूहगीत, कथाकथन, सादरीकरण करण्यासाठी नोंदणी सुरु झाली आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 


बालमेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी आपले कला गुण सादर करु शकतात. काव्य वाचनासाठी स्वलिखीत कवितांचे सादरीकरण करण्यासाठी २० डिसेंबरला निवड चाचणी होईल. बालमेळावा उद्घाटन सत्रात व समारोप सत्रातील समूहगीतातील गायनाची निवड चाचणी २६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता होईल व त्यातूनच निवडक मुलांना बाल मिळाव्यात समूहगीतात खरा तो एकची धर्म व बालसागर भारत हो या गाण्यांवर समुहगीत सादर करण्यासाठी संधी मिळेल. नाट्यछटा सादरीकरण २७ डिसेंबरला सकाळी दहा वाजता होईल. सर्व निवड चाचण्या साने गुरुजी हायस्कूल एस.एम. गोरे सभागृह अमळनेर येथे होणार आहेत.


ज्यांना कलानंद बालमेळाव्यात मंच व्यवस्थापनात सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी आपापली नावे मंडळाकडे २० डिसेंबर २०२३ पर्यंत पाठवावीत त्यांची कार्यशाळा घेतली जाईल व त्या कार्यशाळातून निवड करून कलानंद बाल मेळाव्यात मंच व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपविण्यात येतील. कलानंद बालमेळावा साहित्य स्वीकारण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२३ आहे त्यासाठी मराठी वाङ्‌मय मंडळ नांदेडकर सभागृह न्यू प्लॉट अमळनेर जिल्हा जळगाव येथे पाठवावे, असे आवाहन, आयोजकांकडून करण्यात आले आहे. 


चिमुकल्यांच्या हस्तेच बालमेळाव्याचे उद्घाटन

कलानंद बालमेळाव्याला उद्घाटक म्हणून मुलगा, मुलगी यांची निवड करण्यात येणार आहे. कलानंद बाल मेळाव्याचे उद्घाटक मुलगा, मुलगी यांची निवड करण्यासाठी ज्या मुलामुलींचे कविता कथा आणि इतर साहित्य प्रकाशित झाले असेल त्या प्रकाशित झालेल्या साहित्याला नामवंतांनी गौरविण्यात असेल अथवा एखाद्या साहित्यिक पुरस्कार मिळाला असेल असे इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव सविस्तर माहितीसह पुराव्यासह मंडळाकडे २० डिसेंबर २०२३ पर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी बालमेळावा प्रमुख संदीप घोरपडे (मो.९४२२२७९७१०), भैय्यासाहेब मगर (मो.९४२३९०४४८३), वसुंधरा लांडगे (मो.९६८९०३७८४१), स्नेहा एकतारे (मो.९४२३९०२९६५) यांच्याशी संपर्क साधावा.



९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बातम्या/व्हिडीओ मिळवण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा : https://forms.gle/TCSFvFzRQNYhThNB7


गाडगे महाराज पुण्यतिथी विशेष

 गाडगे महाराज पुण्यतिथी विशेष


…………..

बिहारमध्ये रुग्णालयानंतर धर्म शाळेसाठी प्रयत्न
केंद्रीय गृहराज्यमंत्र्याकडे पाठपुरावा

प्रशांत देशमुख यांच्या पुढाकारातून प्रभावी प्रयत्न

मुंबई - बिहारमधील वाढती कर्क रुग्णांची संख्या ही चिंताजनक आहे. मुंबईच्या टाटा ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची गैरसोय लक्षात घेता प्रशांत देशमुख यांच्या अथक पाठपुराव्यामुळे टाटा मेमोरियलने बिहारच्या मुझफ्फरपूर येथे कर्क रुग्णालय सुरू केले. त्यानंतर आता या ठिकाणी गाडगे महाराज धर्मशाळा व्हावी यासाठी प्रशांत देशमुख यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. बिहारसह विविध ठिकाणी असलेल्या दानशूर नेत्यांची त्यांनी त्यासाठी भेट घेतली असून यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचा त्यामध्ये समावेश असून त्यांनी याकरिता सर्वकष प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे.

 देशभरातून कर्क रुग्ण हे मुंबईत येतात. टाटा ट्रस्टच्या कॅन्सर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातात. देशातील विविध राज्यांच्या तुलनेत  बिहारमधील कर्करुग्णांची संख्या अधिक आहे. दादरच्या धर्मशाळेत रुग्णालयात येणारे रुग्ण आश्रय घेतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता धर्मशाळेवरही काही मर्यादा येतात. त्यांची पुरेशा प्रमाणात सोय उपलब्ध होऊ शकत नाही. यातून व्याकुळ होत दादरच्या धर्म शाळेचे प्रमुख प्रशांत देशमुख यांनी बिहारमध्येच टाटा ट्रस्ट रुग्णालय व्हावे यासाठी 2016 पासून प्रभावीपणे प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी बिहार मधील विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. विषयाचे गांभीर्य त्यांना पटवून दिले. त्यानंतर आता बिहारच्या मुजफ्फरपुर येथे टाटा मेमोरियल सेंटर द्वारे कर्क रुग्णालय सुरू केले आहे. 250 ते 300 पर्यंत ची येथील ओपीडी असते. या रुग्णालयाचा आणखीन मोठ्या प्रमाणात विस्तार म्हणून 154 कोटी रुपयाचे निधीतून बांधकाम येथे केले जाणार आहे. रुग्णांच्या उपचाराचाच प्रश्न सुटत नाही तर प्रशांत देशमुख यांनी बिहारच्या मुजफ्फर पूर येथे श्री संत गाडगेबाबा धर्मशाळा व्हावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यासाठी अलीकडेच त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांना या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली. त्यांनीही सहकार्य दाखवले असून धर्मशाळे करिता जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तर दुसरीकडे गाडगे महाराज भक्त मंडळाचे अरविंद राय यांचे त्यासाठी विशेष सहकार्य मिळत असल्याची माहिती प्रशांत देशमुख यांनी दिली आहे.

------

कोट..

मुजफ्फरपुर येथे श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा व्हावी यासाठी संपूर्ण लोकप्रतिनिधी यांची भेट घेत आहे. यापूर्वी त्याठिकाणी रुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न आरंभले होते. ते यशस्वी झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपचारानंतर रुग्णांच्या निवासाचा प्रश्न सुटला तर त्यांना मुंबईत येण्याची आवश्यकता राहणार नाही. गाडगेबाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचे त्याकरिता मोलाचे सहकार्य मिळत आहे.

-प्रशांत देशमुख,

व्यवस्थापक, संत गाडगेबाबा धर्मशाळा ट्रस्ट, दादर, मुंबई

----

फोटो ओळ - केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद  राय यांच्याशी धर्मशाळा निर्माणाबद्दल चर्चा करताना प्रशांत देशमुख.

00000

बातमी हिंदी.

-----

दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल

 दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल

आपण नाटक पाहायला गेलो, तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पाहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच. असत  साबण बनवायला तेल हा घटकजरूरीचा असतो आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो! हा अटळ विरोधाभास आहे. जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात, वेडी माणसं आणि लहान मुलं! चांगल्या काम ासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या जगण्याचा आनंद घ्या.

जीवन खूप सुंदर आहे. फक्त तसं जगायला हवं, काचेला पारा लावला की, आरसा तयार होतो. पण, लोकांना आरसा दाखवला की, त्यांचा पारा चढतो. आरसा तोच असतो. फक्त त्यात हसत पाहिले की, आपण आनंदी दिसतो आणि रडत पाहिले की, आपण दुःखी दिसतो. तसेच, जीवनही तेच असतं, फक्त त्याच्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन त्याला आनंदी किंवा दुःखी बनवतो. म्हणून दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल.

स्वच्छता अभियान में मुंबईकर बड़ी संख्या में हुए शामिल संकल्प : स्वच्छ, सुंदर व हरित मुंबई का

 स्वच्छता अभियान में मुंबईकर बड़ी संख्या में हुए शामिल

संकल्प : स्वच्छसुंदर व हरित मुंबई का

                                                          - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई दि 17 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देशभर में स्वच्छता अभियान चलाकर सभी के लिए स्वच्छता का आदर्श स्थापित किया है. यहीं प्रेरणा लेकर मुंबई  प्रदूषणमुक्तस्वच्छ और हरित करने का संकल्प लेकर अब मुंबई गड्ढेमुक्त हो रही हैयह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बताया. 

संपूर्ण स्वच्छता अभियान (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) के अंतर्गतमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपस्थिति में बृहन्मुंबई महानगरपालिका के ‍चार परिमंडल के चार प्रशासकीय विभागों में (वॉर्ड) स्वच्छता अभियान का आयोजन किया गया.   

इस अवसर पर कौश विकास उद्यमिता एवं नवाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिले के पालकमंत्री मंगल प्रभात लोढासांसद मनोज कोटकसांसद राहुल शेवाळेविधायक राम कदमविधायक कालिदास कोळंबकरबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त

अश्विनी भिडेअतिरिक्ति आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे आदि मान्यवर उपस्थित थे.

आज सुबह से ही एन विभाग के अमृतनगर सर्कल से इस स्वच्छता अभियान का प्रारंभ किया गया. स्वच्छता करने के लिए आवश्यक ग्लोव्हज हाथ में पहनकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वच्छता अभियान में शामिल हुए. अमृतनगर सर्कल में मुख्यमंत्री श्री. शिंदे के हाथों स्वच्छता कर्मियों को सम्मानित किया गया. 

उसके पश्चात्  एन विभाग के कामराज नगर व घाटकोपर पूर्व स्थित राजावाडी अस्पताल परिसर में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वच्छता अभियान में शामिल हुए. एम पश्चिम विभाग के डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानतिलक नगरभैरवनाथ मंदि मार्गएफ उत्‍तर विभाग के भैरवनाथ मंदिर मार्गयहाँ पर भी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपस्थिति में 'संपूर्ण स्वच्छता अभियानचलाया गया. 

लोगों की सहभागिता

अतिरिक्त मानव संसाधन के साथ विविध संयंत्रों की सहायता से वॉर्ड के कोने-कोने की स्व‍च्छता की गई. शालेय विद्यार्थियों समेत मुंबई के लोगों ने भी इस अभियान में बड़ी संख्या में भाग लिया. 

अत्याधुनिक तकनीक का उपयोग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि मुंबई शहर के प्रदूषण पर नियंत्रण के लिए प्रमुखता से यह स्वच्छता अभियान चलाया जा रहा है. स्वच्छता अभियान के लिए आवश्यक मानव संसाधन उपलब्ध कर यह अभियान चलाया जा रहा है. इसके लिए अत्याधुनिक तकनीक का उपयोग भी किया जा रहा है. मुंबई के लोगों का स्वास्थ सुधारने के लिए यह अभियान निश्चित ही उपयुक्त साबित होगा और इसके सकारात्मक परिणाम निश्चित ही दिखाई देंगे. श्री. शिंदे ने बताया कि यह अभियान निरंतर जारी रहेगा और इस अभियान में लोगों की सहभागिता बढ़ रही है, इस पर उन्होंने ख़ुशी जाहीर की. मुंबई अंतरराष्ट्रीय स्तर का शहर है. उस दृष्टि से मुंबई हमें स्वच्छसुंदर और हरित रखनी ही चाहिए. 

सफाई कर्मियों को सभी अत्यावश्यक सुविधाएं उपलब्ध की जाएगी 

मुख्यमंत्री शिंदे ने कहा कि आपला दवाखाना की संख्या बढ़ाई जा रही है. सफाई कर्मियों को सभी अत्यावश्यक सुविधाएं उपलब्ध की जा रही है और उनकी समस्याओं का निराकरण किया जाएगा. अधिकारियों ने जगह-जगह भेट देकर स्वच्छता अभियान के कामों का समय-समय पर जायज़ा लेने के निर्देश भी मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस दौरान दिए.   

 

अस्पतालों की क्षमता बढ़ाने पर विचार 

राजावाडी यह अस्पताल मुंबई के लोगों के लिए महत्त्वपूर्ण अस्पताल है. इस अस्पताल की क्षमता 1000 बेड तक बढ़ाने का विचार है और यहाँ पर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध कराने पर भी जोर दिया जाएगा.  हॉस्पिटल की स्वच्छता पर विशेष जोर दिया जा रहा है और बृहन्मुंबई महानगरपालिका के सभी अस्पतालों को सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करने पर भी जोर दिया जा रहा है. अस्पताल में रहते नागरिकों को दवाइयां बाहर से न लानी पड़े, इसके लिए 'जीरो प्रिस्क्रिप्शनअवधारणा को भी लागू करने के निर्देश मुख्यमंत्री शिंदे ने संबंधितों को इस दौरान दिए. 

स्वच्छता अभियान बने जनअभियान

मुंबई के लोगों के स्वास्थ्य के लिएमुंबई स्वच्छ और सुंदर करने के लिए जारी स्वच्छता का यह अभियान सिर्फ महापालिका कर्मचारी,  अधिकारी तक ही सीमित न रहते हुए यह जनअभियान होने के लिए  मुंबई के प्रत्येक व्यक्ति का सहभाग इसमें आवश्यक होने की बात मुख्यमंत्री श्री. शिंदे ने  कही.

स्वच्छता कर्मचारी ही असली हीरो

मुंबई को स्वच्छसुंदर और स्वस्थ्य रखने के लिएमुंबई महापालिका के सफाई कर्मी काम करते है. उनकी वजह से ही मुंबईस्वच्छ और सुंदर है और स्वच्छता कर्मचारी ही ‘असली हीरो’ है, यह सराहनास्पद शब्द कहते हुए उनका सहयोग करने का आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस अवसर पर किया. 

चरणबद्ध तरीके से होगा डीप क्लीनिंग अभियान

मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि स्वच्छता अभियान के लिए बड़े पैमाने पर मानव संसाधन और विभिन्न प्रकार के अत्याधुनिक तकनीक पर आधारित संयंत्रे और वाहनों का उपयोग किया जा रहा है, जिससे परिसर कम समय में अधिक उत्तम रूप से स्वच्छ हो रहा है. लोकप्रतिनिधियों का भी सक्रिय सहभाग इस अभियान में है और यह निश्चित ही प्रेरणादायी है.  समूचे मुंबई शहर में चरणबद्ध तरीके से डीप क्लीनिंग अभियान चलाया जा रहा है और स्वच्छता अभियान के द्वारा बढ़ते प्रदुषण पर भी रोक लग सकेगी. इसमें सड़क नालेफूटपाथसार्वजनिक स्वच्छतागृह की स्वच्छता प्राथमिकता से की जा रही है.  निर्माणकार्य क्षेत्र के (राडारोडा) की सफाई भी की जा रही है. डीप क्लीनिंग अभियान के द्वारा स्वच्छसुंदर और स्वस्थ्य मुंबई की ओर आगे बढ़ रहे है श्री. शिंदे ने बताया.   

मुंबई की सभी सडकोंमुख्य सड़कोंअंतर्गत सड़केंअंतर्गत वसाहत के डीप क्लीनिंग इस अभियान के माध्यम से की जा रही है. इसमें पीने के पानी का उपयोग नहीं कर रहें है, बल्कि इसके लिए रिसायकलिंग किए हुए पानी का उपयोग कर रहे है. इस अभियान में चार-पाच वार्ड से मिलकर कम से कम दो हजार लोग एक समय में एक परिसर में काम करने से परिसर पूरी तरह से स्वच्छ होता है. सड़कें टासार्वजनिक शौचालये स्वच्छ हो रहें है. झोपडपट्टी सुधार योजना भी इसमें समावेश किया है और इसमें भीतरी टूटी-फूटी सड़कोंफुटपाथ खराब शौचालयों की दुरुस्







*जिसका मन मस्त है* **उसके पास समस्त है

 *जिसका मन मस्त है*

**उसके पास समस्त है!** मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका हार्ट स्पेशालिस्ट सर्जनची ही कथा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. आजच्या काळात तर ती फारच गरजेची.... म्हणून सांगतोय. 

हे डॉक्टर अतिशय निष्णात. सगळीकडे त्यांच्या कौशल्याचा बोलबाला. मृत्यूच्या दाढेतून अनेकांना त्यांनी बाहेर काढून जणू नवीन जीवन दिलेलं. 

मात्र ऑपरेशन करण्यापूर्वी जसा एक कन्सर्न फॉर्म (ऑपरेशनच्या परवानगीचा अर्ज) भरून घेतला जातो त्याच फॉर्मसोबत हे डॉक्टर अजून एक फॉर्म भरून घ्यायचे. 

त्यात त्यांनी विचारलेलं असायच की, जर तुम्ही या ऑपरेशनमुळे वाचलात, तर बाकीचे आयुष्य तुम्ही कशा प्रकारे जगणार आहात ते इथं लिहून द्यायच आणि त्याचबरोबर आजवरच्या जीवनात "करायचे राहून गेलेलं" असं काही असेल तर तेही लिहायच. की मला जीवदान मिळाले तर मी अमुक तमुक करेल !

*

ऑपरेशनला आलेले रुग्ण तो फॉर्म भरून डॉक्टरकडे देत. 

- त्यात कुणी लिहिलेलं असायच की, आजवर कुटुंबाला वेळ देऊ शकलो. तर आता यापुढे देईन 

- तर कुणी लिहायच.... माझ्या लहान मुलासोबत मी भरपूर खेळेन. ते राहूनच गेलं आहे. 

- कामधंद्याच्या नादात निसर्गात भटकायचं, टूरवर जायच राहून गेलं आहे. ते नक्की आता करणार 

- एकाने तर हेही लिहिलं की, माझ्याकडून आजवर कुणाला दुखावलं गेलं असेल तर त्यांना शोधून त्यांच्याकडे स्वतः जाऊन माफी मागेन. 

- एकीने लिहिलं.... संसार, पै पाहुण्याच्या नादात स्वतःसाठी जगायच, हसायचंच विसरून गेलेय... यापुढं मनसोक्त हसत हसत जगणार 

- निवृत्त वडिलांनी लिहिलेलं.... माझ्या शिस्तीच्या वागण्यामुळे अनेकांना माझ्याबद्दल तक्रारी होत्या. उर्वरित आयुष्यात अशी तक्रार कुणाचीच येऊ देणार नाही. 

- एका सासूने लिहिलं होत.... लेक आणि सुनेत मी थोडं डाव उजवं करत आले. आता लेकीसारखंच सुनेशी वागेन !

अशी अनेकांनी त्यांची त्यांची उर्वरित जीवनाची संकल्पचित्रे त्या फॉर्ममध्ये शब्दात मांडली. 

*

आणि मग डॉक्टर त्या रुग्णाला ऑपरेशन थियेटर मध्ये नेत आणि यशस्वीरित्या ऑपरेशन करून जीवनदान मिळवून देत. नंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर डिस्चार्ज देताना त्या त्या रुग्णाने भरून दिलेला तो "उर्वरित आयुष्याबद्दलचा फॉर्म" त्याला परत देत. आणि त्याला सांगत की, तुम्ही घरी जाल, नव्याने जीवन जगाल तेव्हा तुम्ही राहून गेलेल्या ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या प्रत्यक्षात आणल्यावर त्याच्या समोर "टिकमार्क" करत जा. आणि मग सहा महिन्यांनी तो फॉर्म घेऊन मला भेटायला या आणि सांगा की त्यातल्या कशासारखं जीवन तुम्ही जगला ?

*

आणि मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की, सगळ्यांनी सगळं लिहिलं पण कुणाशीच भांडण / वैर झालं नाही असा एकही नसणार ! पण तरीही कुणीही असं लिहिलं नव्हतं की, "जर मी वाचलो तर मला अमुक व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे. माझ्या त्या शत्रूला धडा शिकवायचा आहे. आणि जमलं तर त्याला पूर्ण बरबाद करायच आहे"

किंवा असेही कुणी लिहिले नव्हते की, मला अजून खूप पैसे कमवायचे आहेत. खूप श्रीमंत व्हायच आहे. स्वतःला खूप बिझी ठेवायच आहे. 

*

आणि मग सहा महिन्यांनी भेटायला आलेल्या रुग्णांना डॉक्टर विचारत, "ऑपरेशनपूर्वी जेव्हा कधी तुम्ही स्वस्थ होता. तेव्हा असं आयुष्य का जगला नाहीत जे गेल्या सहा महिन्यात जगलात. तुम्हाला तसे जगण्यासाठी कुणी अडवलं होत ?

यावर रुग्ण निरुत्तर होत मात्र निघताना डॉक्टरचे पाय धरून समाधानाने घरी जात. 

डॉ. डीडी क्लास : मृत्यूची घंटा वाजल्यावरच आपण जागे होतो. हार्ट अटॅक आल्यावरच त्यातून वाचल्यावर निष्कारण होणारी धावपळ थांबवतो. जेवणाखाण्याची हेळसांड थांबवतो. शिस्तबद्ध आयुष्य जगतो. आज जरा हे सगळं वाचून झाल्यावर खुर्चीत स्वस्थ डोळे मिटून थोडं चिंतन करा. की हातात किती आयुष्य आहे.... माहित नाही. पण निदान जितके आहे ते कशा प्रकारे जगायचे ते मनाशी नियोजन करा. आणि जमलंच तर ते सगळं एकाखाली एक असं वहीत लिहून काढा. 

आणि मस्तपैकी हातपाय तोंड धुवून नव्याने आयुष्याकडे पाहायला सुरु करा. आणि स्वतःला आधी हेच सांगा की, "अजून कुठं उशीर झालाय? जब जागो तब सवेरा" यामुळे तुम्हाला अजून उत्साह येईल. आणि हे मी स्वानुभातून सांगतोय. 

*

पंधरा वर्षांपूर्वी मीही अशीच चूक केलेली आणि मी ती जाहीरपणे मान्य देखील करतोय.  जेवणाकडे हेळसांड करून धाव धाव धावत होतो. सगळं मनासारख प्रत्यक्षात आणलं खरं पण अचानक अटॅकपायी पूना हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल व्हावं लागलं. त्यातून बाहेर आलो खरा पण आत जातानाचा मी अन बाहेर आल्यावरचा मी यात जमीन अस्मानचा फरक होता. जिथं चार पायऱ्या चढायला डॉक्टरांनी बंदी घातली होती आणि चौथ्या मजल्यावरचे (विना लिफ्ट)चे घर ताबडतोब सोडून ग्राउंड फ्लोअर ला दुसरं घ्या असं सांगितलं होत तिथं मी ते काहीही न करता मस्त ठणठणीत जगतोय. गडकिल्ले चढून जातोय.  योग्य आणि वेळेवर आहार, रोज स्वतःसाठी एक तास (morning walk)  आणि योगासने, रात्री झोपताना गार दूध, नो जागरण.... बास याच उपायावर त्या आजारातून बाहेर आलो. एकही गोळी न खाता. म्हणून म्हणतो, मला जी अक्कल "घंटा" वाजवून आल्यावर आली ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून हा लेखप्रपंच ! 

*

आणि अजून एक म्हणजे.... फार वखवख करत जगणे सोडून द्यावे. 

कारण... असं म्हणतात की 

*जो प्राप्त है-पर्याप्त है*

*जिसका मन मस्त है*

*उसके पास समस्त है!*

दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल

 दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल

आपण नाटक पाहायला गेलो, तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पाहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच. असत  साबण बनवायला तेल हा घटकजरूरीचा असतो आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो! हा अटळ विरोधाभास आहे. जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात, वेडी माणसं आणि लहान मुलं! चांगल्या काम ासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या जगण्याचा आनंद घ्या.

जीवन खूप सुंदर आहे. फक्त तसं जगायला हवं, काचेला पारा लावला की, आरसा तयार होतो. पण, लोकांना आरसा दाखवला की, त्यांचा पारा चढतो. आरसा तोच असतो. फक्त त्यात हसत पाहिले की, आपण आनंदी दिसतो आणि रडत पाहिले की, आपण दुःखी दिसतो. तसेच, जीवनही तेच असतं, फक्त त्याच्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन त्याला आनंदी किंवा दुःखी बनवतो. म्हणून दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल.

हक्क, कर्तव्यांप्रती सदैव जागरुक राहण्याची गरज

 हक्क, कर्तव्यांप्रती सदैव जागरुक राहण्याची गरज

                                                                                    - विधिमंडळ सचिव विलास आठवले

            नागपूरदि. 17 :- संसदीय लोकशाहीत नागरिक हा सर्वोच्चस्थानी असून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी संसद तसेच विधिमंडळाच्या सभागृहात  कायदेनियमध्येयधोरणे निश्चित केली जातात. नागरिकांनीही आपल्या हक्क व कर्तव्यांप्रती सदैव जागरुक असणे तितकेच महत्वाचे असल्याचे प्रतिपादन विधिमंडळाचे सचिव (2) विलास आठवले यांनी केले.

            राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (2) विलास आठवले यांनी 'भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचनाकार्यपद्धती व कायदा तयार करण्यासाठी प्रक्रियाया विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विधिमंडळाचे सचिव (1) जितेंद्र भोळे उपस्थित होते.

            सचिव श्री.आठवले म्हणालेलोकसभाविधानसभा ही महत्वाची सभागृहे असून लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमुळे संसदविधिमंडळ तयार होते. संसदेत राष्ट्रपतीप्रधानमंत्रीमंत्रिमंडळ तर विधानमंडळात राज्यपालमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या माध्यमातून लोकांच्या भावनाआकांक्षाचा विचार करुन जनहिताचे निर्णय घेतले जातात.

            देशहिताच्या दृष्टीने कायदे करण्याचा संसदेला तर राज्यहिताच्या दृष्टीने महत्वाचे कायदे करण्याचा अधिकार विधिमंडळाला घटनेने दिलेला आहेअसे सांगून श्री. आठवले म्हणालेघटनेतील तरतुदीशी सुसंगत कायदाविधेयक तयार करण्यापूर्वी या विषयातील तज्ज्ञसंबंधित विभाग  यांचे अभ्यासपूर्ण मत विचारात घेऊन ते प्रारूप तयार केले जाते. कायदाविधेयकाच्या प्रारुपाला मंत्रिमंडळात मान्यता देऊन ते संसद व विधिमंडळासमोर मांडले जाते. अशा कायद्याचीविधेयकाची ओळख  सभागृहाला संबंधित खात्याचे मंत्री करुन देतात. यावर प्रत्येक सदस्याचे मत विचारात घेतल्यानंतर राष्ट्रपतीराज्यपालांच्या मंजुरीनंतर त्याला राजपत्रात प्रसिद्धी दिली जाते. तद्नंतर हा कायदा अंमलात येतो. संविधानात अनेक तरतुदी असून राष्ट्रपतीप्रधानमंत्रीमुख्यमंत्री यांची वेगवेगळी कार्ये असल्याचे श्री.आठवले यांनी सांगितले.

            संसदविधिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम कार्यकारी मंडळाला पार पाडावे लागते. तर कायद्यानुसार सुरू असलेल्या कामकाजावर लक्ष ठेवणे व कायद्याचा अर्थ लावण्याचे काम न्यायमंडळ पार पाडतेअसे त्यांनी सांगितले.

            राष्ट्रपतीराज्यपाल यांच्या अभिभाषणाबद्दल श्री. आठवले यांनी सांगितले,  नवीन संसदनवीन विधानसभा व अर्थसंकल्पापूर्वी अभिभाषण होते. या भाषणात देशातराज्यात सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या ध्येयधोरणांचा उहापोह केलेला असतो. लोकांच्या हिताच्याजिव्हाळ्याच्या प्रश्नांची चर्चा संसद व विधिमंडळात केली जात असून संविधानिक बाबीने याकडे पाहिले जाते. सामाजिकऔद्योगिकआर्थिक विकासासाठी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्पात जनतेला अधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तरतूद केली जाते. यामध्ये वित्त विभागाची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

            श्री. आठवले यांनी आपल्या भाषणात तारांकित प्रश्नअतारांकित प्रश्नलक्षवेधी,  प्रश्नोत्तराचा तासस्थगन प्रस्तावअल्पसूचनाविशेष सूचनाऔचित्याचा मुद्दाअंतिम आठवडा प्रस्तावशासकीय विधयकेअशासकीय विधेयके याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तद्नंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.

            महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी विधिमंडळ सचिव श्री. आठवले यांचा विद्यार्थ्यांना परिचय करुन दिला. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठनाशिकची विद्यार्थिंनी पूजा इंगळे हिने आभार मानले.

000000

 

 

Featured post

Lakshvedhi