Wednesday, 29 November 2023

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४

 साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला 1 फेब्रुवारी 2024 रोजी बाल मेळावा होणार आहे. बाल मेळावा आयोजनासंदर्भात बैठक पार पडली. हा बाल मेळावा संपूर्ण विद्यार्थी केंद्रित असेल तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमूल्य ठरेल असे मत बाल मेळावा प्रमुख संयोजक एकनाथ आव्हाड यांनी व्यक्त केले.


या बाल मेळावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी होते. बाल मेळावा प्रमुख संयोजक एकनाथ आव्हाड (मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती होती. बाळमेळावा समिती प्रमुख संदीप घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. भैय्यासाहेब मगर यांनी सूत्रसंचलन केले. वसुंधरा लांडगे व स्नेहा एकतारे यांनी आयोजनातील प्रमुख मुद्दे मांडले. त्यानंतर बैठकीत बालमेळावा आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व विविध समित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.


या बैठकीस म.वा.मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, मंडळाचे सदस्य बन्सीलाल भागवत, बजरंग अग्रवाल, दिनेश नाईक, सतीष देशमुख, मुकेश पाटील, रमेश सोनवणे, डॉ.कुणाल पाटील, के.पी. बागुल, राहुल ब्रह्मे, वैभव आढाव, तृप्ती खैरनार, विद्या पाटील, मनोहर नेरकर, जी.एस. चौधरी, आदिंची उपस्थिती होती.


अशी आहे बाल मेळाव्यासाठी नियमावली


बाल मेळाव्याचे उद्घाटक एक मुलगा एक मुलगी यांची निवड करण्यासाठी ज्यांचे साहित्य क्षेत्रात कविता कथा किंवा इतर साहित्य प्रकाशित झाले असेल त्या प्रकाशित झालेल्या साहित्याला कोणी नामवंतांनी गौरविले असेल अथवा एखादा साहित्यिक पुरस्कार मिळालेला असेल अशा इयत्ता दहावी पर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव सविस्तर माहितीसह पुराव्यासह मंडळाकडे पाठवावेत., ज्या विद्यार्थ्यांना नाटिका नाट्य प्रवेश सादर करावयाचे असतील त्यांनी मंडळ सांगेल त्यावेळेस तेथे उपस्थित राहून आपले प्रवेश सादर करावेत त्यातून निवड चाचणी होऊन बाल मेळाव्यास सादरीकरणासाठी संधी मिळेल.,


ज्यांना बाल मेळाव्यात मंच व्यवस्थापनात सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी आपापली नावे मंडळाकडे ठराविक तारखेपर्यंत पाठवावेत त्यांची कार्यशाळा घेतली जाईल व त्या कार्यशाळेतून निवड करून बालमेळाव्याच्या मंच व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या बालकांवर टाकण्यात येतील., बाल मेळाव्यातील विविध सत्रांचे अध्यक्ष देखील आलेल्या साहित्यिक प्रस्तावातूनच निवडण्यात येतील त्यासाठी मंडळाकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे.,


बाल मेळाव्यातील उद्घाटन सत्रात व समारोप सत्रातील समूहगीतांसाठी गायनाची निवड चाचणी मंडळ सांगेल त्या दिवशी त्या ठिकाणी घेण्यात येईल व त्यातूनच निवडक मुलांना बाल मिळाव्यात समूहगीतात खरा तो एकची धर्म व बलसागर भारत होवो या गाण्यांवर समूहगीत सादर करण्यासाठी संधी मिळेल. इतर अधिकार बाल मेळावा आयोजन समितीकडे राखून ठेवण्यात आले असून अधिक माहितीसाठी बाल मेळावा समिती प्रमुख तसेच मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


राज्य में हुई बेमौसम बारिश के कारण हुए नुकसान का अनुमान 99 हजार 381 हेक्टेयर क्षेत्र प्रभावित

 राज्य में हुई बेमौसम बारिश के कारण हुए नुकसान का अनुमान

99 हजार 381 हेक्टेयर क्षेत्र प्रभावित

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंचनामे किए गए प्रस्ताव तत्काल प्रस्तुत करें

            मुंबईदि. 28 : पिछले दो दिनों में राज्य के कुछ जिलों में बेमौसम बारिशओले गिरने के कारण खेती और फल बाग को बड़े पैमाने पर नुकसान पहुंचा है। इस नुकसान का पंचनामा तत्काल करने की मांग सरकार को प्राप्त हुई है। राज्य में बेमौसम बारिश के कारण जिन तहसीलों में बेमौसम बारिश हुई हैवहां अब तक प्राप्त प्रारंभिक अनुमान के अनुसार 99 हजार 381 हेक्टेयर प्रभावित क्षेत्र में तत्काल प्रचलित कार्य पद्धति के अनुसार पंचनामा करने के आदेश सभी जिलाधिकारी सभी जोनल सिस्टम को दें। कृषि फसलों की 33 प्रतिशत से अधिक हानि होने के मामले में तत्काल निधि की मांग का प्रस्ताव सरकार को भेजने की व्यवस्था की जाएऐसा निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिया।

            राज्य के कुछ जिलों में 26 नवंबर को बेमौसम बारिश और ओलावृष्टि के कारण खेती व फल बागों के बाधित क्षेत्रों के बारे में आज 28 नवंबर 2023 को कृषि विभाग से प्राप्त प्रारंभिक अनुमान की जानकारी के अनुसारठाणे जिले के शहापुरमुरबाड तहसील प्रभावित हुए हैं और इसमें से 53 हेक्टेयर क्षेत्र में सब्जी की फसलों को नुकसान हुआ है।  पालघर जिले की पालघरवसई और दहाणू  तहसील में 41 हेक्टेयर क्षेत्र की सब्जियों को नुकसान हुआ है।

            नासिक जिले की कलवननांदगांवनासिकनिफाडत्र्यंबकेश्वरसटानादिंडोरीपेठसुरगानाइगतपुरीसिन्नरचांदवडयेवला तहसील में 32 हजार 833 हेक्टेयर क्षेत्र के प्याजअंगूरसोयाबीनमक्कागेहूंगन्ना और फलधुले जिले की साक्रीशिरपूरशिंदखेडा तहसील के 46 हेक्टेयर क्षेत्र में केलापपीताकपासचनानंदुरबार जिले की नवापुरअक्कलकुवानंदुरबारशहादातलोदाअक्रानी तहसील के 2 हजार 239 हेक्टेयर क्षेत्र में चावलकपासतूरमिर्चीमक्काप्याज फसल काजलगांव जिले की जलगांवभुसावलयावलरावेरमुक्ताईनगरअमलनेरचोपडाएरंडलपारोलाचालीसगांवजामनेरपाचोराधरणगांवबोदवडभडगांव तहसील के 552 हेक्टेयर क्षेत्र में प्याजचनागेहूंमक्काज्वारी व फलों को नुकसान हुआ है।

            अहमदनगर जिले के संगमनेरअकोलेकोपरगांवपारनेरराहाता में 15 हजार 307 हेक्टेयर क्षेत्र में केलापपीतामक्का की फसल को नुकसान हुआ है। पुणे जिले के खेड़आंबेगांवशिरूर तहसील में 3 हजार 500 हेक्टेयर क्षेत्र में अंगूर और प्याज की फसल को नुकसान हुआ हैसातारा जिले के जावली तहसील में 15 हेक्टेयर क्षेत्र में चावल फसल का नुकसान हुआ हैछत्रपति संभाजी नगर जिले की संभाजी नगरपैठणगंगापुरवैजापुरकन्नड़खुलताबादसिल्लोडसोयगांव और फुलंब्री तहसील में  4 हजार 200 हेक्टेयर क्षेत्र में केलेपपीता और मक्के की फसल को नुकसान हुआ है।

            जालना जिले के बदनापुरजालनाजाफराबाद तहसील में 5 हजार 279 हेक्टेयर क्षेत्र में अंगूरकेलाप्याजखरीफ ज्वारगेहूं और चना की फसल को नुकसान हुआ है। बीड जिले के परलीबीड तहसील में 215 हेक्टेयर क्षेत्र के प्याजज्वारसब्जियों को नुकसान पहुंचा हैहिंगोली जिले की वसमत तहसील में 100 हेक्टेयर क्षेत्र में सब्जियों को नुकसान हुआ है।

            परभणी जिले की परभणीगंगाखेड़जिंतुरपाथरीपूर्णापालम मानवत सोनपेठसेलू तहसील में 1 हजार हेक्टेयर क्षेत्र में रबी ज्वारकपाससीता फलअमरूदसब्जियों का नुकसान हुआ हैनांदेड़ जिले के नांदेडमुदखेड तहसील में 50 हेक्टेयर क्षेत्र में केले की फसल खराब हो गई है। बुलढाणा जिले की बुलढाणानांदुरालोनारसिंदखेड़राजादेउलगांव राजासंग्रामपुरमेहकरजलगांव जामोदमलकापुरखामगांवशेगांवमोतालानांदुरा तहसील में 33 हजार 951 हेक्टेयर क्षेत्र में सब्जियों को नुकसान हुआ है।

            क्षतिग्रस्त क्षेत्र का यह प्रारंभिक अनुमान है।  नुकसान हुए क्षेत्र का प्रस्ताव जिलाधिकारी समय पर प्रस्तुत करें। ऐसा निर्देश भी मुख्यमंत्री श्री शिंदे ने दिया है।

*****

Unseasonal rains damage approximately 99,381 ha area in the state

- CM Eknath Shinde

Directs to submit proposals after conducting panchnamas

 

            Mumbai, Nov. 28 The unseasonal rainfall and hailstorm in the last two days have caused massive damage to agriculture and horticulture in some districts of the state. The government has received the demand to conduct the panchnamas of these damages at the earliest. As per the information received from the talukas, the unseasonal rains have damaged the crops in 99,381 hectares of land. Chief Minister Eknath Shinde has directed the administration to conduct the panchnamas of these areas as per the existing system and asked the district collectors to issue orders to all the regional systems and in cases where the damages exceeded 33 percent, proposals for seeking compensation should be submitted to the government at the earliest.

            Some districts in the state experienced heavy unseasonal rainfall and hailstorms on November 26 causing massive damage to crops and fruit-bearing trees. According to the reports received from the Agriculture Department on November 282023, the preliminary reports say that vegetables in 53 ha area in Shahapur and Murbad talukas in Thane district, and 41 ha area in Palghar Vasai and Dahanu in Palghar district, are most affected. Onions, Grapes, Soyabean, Maze, Wheat, Sugarcane, and fruits in 32,833 ha area in Kalwan, Nandgaon, Nashik, Nifad, Tryambakeshwar, Satana, Dindori, Peth, Surgana, Igatpuri, Sinnar, Chandwad and Yewala talukas of Nashik district have been damaged. Banana, Papaya, Cotton, and Gram, crops in 46 ha area of Sakri, Shirpur, Shindkheda talukas of Dhule district; paddy, cotton, tur, chili, maze, onion crops in 2,239 ha area of Nawapur, Akkalkuwa, Nandurbar, Shahada, Taloda, and Akrani talukas of Nandurbar district; onion, gram, wheat, maze, jowar, and fruits in 552 ha land of Bhusaval, Yaval, Raver, Muktainagar, Amalner, Chopda, Erandol, Parola, Chalisgaon, Jamner, Pachora, Dharangaon, Bodwad and Bhadgaon talukas of Jalgaon district have been damaged.

            The untimely rains have caused widespread damage to crops like banana, papaya, maze, etc. on 15,307 ha land in Sangamner, Akole, Kopargaon, Parner, and Rahata talukas of Ahmadnagar district; grapes and onion crops in 3,500 ha land in Khed, Ambegaon, and Shirur talukas of Pune district are also damaged. Paddy crop in the 15 ha area of Jawali taluka in Satara district has been damaged by the rains. Banana, Papaya, and Maze crops standing on 4,200 ha of land got damaged by the rains in Sambhajinagar, Paithan, Gangapur, Vaijapur, Kannad, Khultabad, Sillod, Soygaon, and Fulambri talukas of Chhatrapati Sambhaji Nagar district.

            In the Jalna district, grapes, bananas, onion, kharif jowar, wheat, and gram crops in 5,279 ha land were damaged in Badnapur, Jalna, and Jafrabad talukas of Jalna district; onion, jowar and vegetables in 215 ha land of Parli and Beed talukas in Beed district; vegetables in 100 ha land in Vasmat taluka of Hingoli district have also been damaged. Rabbi Jowar, cotton, custard apple, guava, and vegetables in 1000 ha of land in Parbhani, Gangakhed, Jintur, Pathri, Purna, Palam, Manwat, Sonpeth and Selu talukas of Parbhani district have been affected by the rainfall; banana crop in 500 ha land in Mudkhed and Nanded talukas in Nanded district have also been affected. Vegetable crops in 33,951 ha of land in Buldana, Lonar, Sindkhedraja, Deupgaonraja, Sangrampur, Mehkar, Jalgaon Jamod, Malkapur, Khamgaon, Shegaon, Motala and Nandura talukas of Buldana district have been damaged due to untimely rains.

            The area under damage is as per the preliminary estimates. Chief Minister Shinde has directed the district collectors of the affected districts to submit the reports in time.

0000

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पत्रक व पोस्टरचे अनावरण

 राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

माहिती पत्रक व पोस्टरचे अनावरण

            मुंबई, दि. २८ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी माहिती पत्रक व पोस्टरचे अनावरण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी आयोजकांकडून माहिती घेतली व महापरिनिर्वाण दिन गांभीर्यपूर्वक व्हावा यासाठी सूचना केल्या.

            दिनांक १ व ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत देशभरातून तसेच राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून अनुयायी चैत्यभूमी येथे महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. या सर्व अनुयायांना प्रवासनिवासवैद्यकीय सुविधापोलीस सहायता या व इतर गोष्टींची अधिक माहिती असावी या दृष्टीने माहिती पत्रक काढण्यात आले असल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी यावेळी राज्यपालांना दिली.

            महापरिनिर्वाण दिन अभिवादन कुठल्याही अनुचित घटनेशिवाय व्हावा या दृष्टीने माहिती पुस्तके लोकांना पाठवली जातील. तसेच पोस्टर राज्यातील विविध वस्त्यांमधील बुद्ध विहारांमध्ये लावली जातील, असे त्यांनी सांगितले. 

            सुरुवातीला भदंत भन्ते डॉ. राहुल बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक त्रिशरण बुद्धपूजा पाठ घेण्यात आली. 

            यावेळी समितीचे महेंद्र साळवेसिद्धार्थ कासारेमयूर कांबळेआदी उपस्थित होते.

**

 

Maharashtra Governor releases Information Brochure and Poster for Mahaparinirvan Din Commemoration

            Mumbai, 28th Nov : Governor Ramesh Bais released a brochure and a poster ahead of the 67th death anniversary (Mahaparinirvan Din) of Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar at Raj Bhavan Mumbai on Tue (28 Nov).

            According to the General Secretary of the Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Samanvay Samiti Nagsen Kamble, the brochure containing information about the travels, medical facilities, police help, accommodation will be distributed to the followers of Dr Ambedkar ahead of the Mahaparinirvan Din.

            Bhadant Bhante, Dr Rahul Bodhi Mahathero, Mahendra Salwe, Siddharth Kasare, Mayur Kamble and others were present.

0000


विकसित भारत संकल्प यात्रे’अंतर्गत बृहन्मुंबईतील वाहनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ

 विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत

बृहन्मुंबईतील वाहनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ

 

            मुंबईदि. 28 : केंद्र शासन पुरस्कृत योजनांची परिपूर्णता साध्य करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे राज्यात आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा महानगरपालिकांची निवड करण्यात आली असून, बृहन्मुंबईसाठीच्या यात्रेतील चार वाहनांचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मंत्रालय परिसरात आज करण्यात आला. 

            बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबालसिंह चहलनगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराजमहानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशीअतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेमहानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            मुंबईतील विविध 227 ठिकाणांवर ही चार वाहने फिरणार असून विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविणे व त्याबाबत जागृती करणेशासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणेनिश्चित केलेल्या पात्रतेनुसार संभाव्य लाभार्थी यांची यात्रेमध्ये नोंदणी करणे आदी या यात्रेची उद्दिष्टे आहेत. या यात्रेदरम्यान विविध योजनांचे लाभार्थी या वाहनांना भेट देऊन थेट लाभ घेऊ शकतात.

            आयुष्मान हेल्थ कार्डउज्ज्वला योजनापीएम स्वनिधी योजनाआधार कार्ड आदी विविध योजनांचा या यात्रेअंतर्गत समावेश करण्यात येत आहे. या महत्वाकांक्षी योजना समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठीयोजनांबाबतची जनजागृती करून योजनेची परिपूर्णता साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा’ उपयुक्त ठरणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ही यात्रा राज्यातील एकूण 418 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थातील 2084 परिसरातून फिरणार आहे.

            विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिकाछत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाठाणे महानगरपालिकाकल्याण-डोंबिवली महानगरपालिकानागपूर महानगरपालिकासोलापूर महानगरपालिकानाशिक महानगरपालिकावसई-विरार महानगरपालिकापुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या दहा महानगरपालिकांची निवड करण्यात आली आहे.

00000

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्वपूर्ण निर्णय

 अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्वपूर्ण निर्णय

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

            मुंबई, दि. 28 : अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्वपूर्ण निर्णय शासन घेत असून उर्वरीत मागण्यांबाबत शासन सकारात्मक  असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

                   मंत्रालयात अंगणवाडी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत कृती समितीच्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार कपिल पाटीलमहिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, यासह अंगणवाडी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

                मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीअंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन घेण्यासाठी ११ हजार ८०० रूपये, अंगणवाडी सेविकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा प्रीमिअर शासन भरणार असून३००० अंगणवाडी सेविकांना लवकरच पदोन्नतीही मिळणार आहे. मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करणे याबाबतीत निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीविषयक ही बाब धोरणात्मक असून त्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर हा विषय सादर करण्यात येईल. अंगणवाडी सेविकांना दरमहा पाच तारखेच्या आत मानधन मिळावे आणि इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. अंगणवाडी कर्मचा-यांची मानधन वाढ ही ३ एप्रिल २०२३ रोजी करण्यात आली असून, अंगणवाडी कर्मचा-यांना सन २०२३-२४ ची भाऊबीज भेटही अदा करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री कु. तटकरे यांनी  बैठकीत दिली.

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारावे

 तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर

रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारावे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

            मुंबईदि. 28 : राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. या बैठकीस आमदार दिलीप मोहिते-पाटीलवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरानगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ताडॉ. के. एच. गोविंदराजनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेगृह (परिवहन) विभागाचे प्रधान सचिव पराग जैनसार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखेमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मामहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह पाणीपुरवठा विभागमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीतीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुरेशा वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. एसटी बसस्थानकांच्या इमारतीवर रॅम्पच्या सुविधेसह पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. शिवाय या आराखड्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेचाही समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच बसस्थानक परिसरातील रस्त्यांसाठी एसटी महामंडळाची ६५२ चौरस मीटर जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी एसटीला जागेच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा नियोजन समितीमधून देऊन जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावीअसेही त्यांनी सांगितले.

चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करा

            चाकण शहरातील विकासकामांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीपुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिकांना सोयीसुविधा देण्यात नगरपरिषदांना मर्यादा येत आहेत. चाकण शहर व परिसराची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

            हुतात्मा राजगुरू स्मारकाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीराजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी २४८ कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना पोलीस वसाहतीसाठी आरक्षित जागेच्या ठिकाणी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत करण्याचा सुधारित आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा. त्याचप्रमाणे पंचायत समितीची जुनी जागा आहेती जागाही नगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

            महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या चाकणराजगुरूनगरआळंदी येथील एमआयडीसीमधून १० रस्ते जातातयापैकी तीन रस्ते मंजूर आहेततर चार रस्ते एमआयडीसी क्षेत्राबाहेरील असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमावळ-खेड भागातील नागरिकांनी औद्योगिक क्षेत्रासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील गावांमधील नागरिकांना चांगल्या सोयी देण्यासाठी एमआयडीसी क्षेत्राला जोडणारे रस्तेपोहोच रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मुख्य रस्ते बनवितानाच पर्यायी रस्त्यांची दुरूस्ती करावीत्यांची रूंदी वाढवावी. शेतकऱ्यांची मान्यता असल्यास पुणे चक्राकार रोड (रिंग रोड) तयार करताना मरकळ ते गोलेगावदरम्यान सर्विस रोड ९० मीटरऐवजी ११० मीटर करावा. त्यापुढे तो लोणीकंदपर्यंत वाढविण्याबाबत विचार करावा. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनास मान्यता देण्यात येईल.

            चाकण एमआयडीसीकडे ४२ एमएलडी पाण्याची मागणी येत आहे. परिसरातील सहा ग्रामपंचायतीला एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा होत असून ३० एमएलडी पाणी शिल्लक आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीप्रस्तावित नवीन उद्योगांसाठी पाणी राखीव ठेवून उर्वरित पाण्यामधून गावांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे चाकणराजगुरुनगर आणि आळंदी या तिन्ही नगरपरिषदेचे घनकचरा संकलन प्रकल्प पूर्णतेच्या मार्गावर आहेत. यापुढे केवळ घनकचऱ्यावर प्रक्रिया न करता या प्रकल्पांमधून वीजगॅसबांधकामासाठीचे साहित्य यासारखे उत्पादन घेणारे प्रकल्प राबविण्यात यावेत. देशात नावीण्यपूर्ण कल्पना वापरून घनकचरा प्रकल्प उभारले जात आहेतअशा प्रकल्पांची माहिती घेऊन यापुढील नवीन प्रकल्प राबविण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

            यावेळी राजगुरूनगर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या निवासस्थानाला जलसंपदा विभागाची ८० गुंठे जागा देण्यास मान्यता देण्यात आली. ही जागा कृष्णा खोरे महामंडळाची असून २० लाख रूपये महामंडळाकडे भरून शासनाला जागा ताब्यात घेण्यासही मान्यता देण्यात आली.

-----०००-----

बालधोरणाची माहिती लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी

 बालधोरणाची माहिती लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

            मुंबई, दि. 28 : राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वसमावेशक असे बालधोरण महिला व बालविकास विभाग तयार करीत आहे. जनतेच्या हरकती आणि सूचना मागविण्यासाठी विभागाने बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केल्या.

           मंत्रालयातील दालनात बालधोरणाच्या मसुदाच्या सादरीकरणावेळी सूचना करताना मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरेसह आयुक्त राहुल मोरे यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, बालधोरणात बालकांच्या अनुषंगाने काम करणाऱ्या सर्व विभागांना याबाबतची माहिती पाठविण्यात यावी. संकेस्थळावरील प्रसिद्ध केल्यानंतर विभागाने यामध्ये जनतेकडून आलेल्या सूचनांचा व हरकतींवरही तातडीने कार्यवाही करावी. बालकांचा आहारसुरक्षितता, शिक्षण व आरोग्यहक्क, ग्रामीण व शहरी भागातील बालके यांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक समाज घटकातील बालके आणि सर्व संस्था यांची देखील मते विचारात घ्यावी. या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.

****

Featured post

Lakshvedhi