Monday, 27 November 2023

जलयुक्त शिवार को जन अभियान बनाकर इसे मिशन मोड पर चलाएंगे

 जलयुक्त शिवार को जन अभियान बनाकर इसे मिशन मोड पर चलाएंगे  

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आर्ट ऑफ लिव्हिंग समेत जलयुक्त शिवार और प्राकृतिक कृषि का सामंजस्य करार

            मुंबई दि, 26: जलयुक्त शिवार को जन अभियान बनाकर इसे मिशन मोड पर चलाया जाएगा, यह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा. राज्य में जलयुक्त शिवार के दुसरे चरण को गति देने के लिए राज्य सरकार की ओर से आज व्यक्ति विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था के साथ सामंजस्य करार किया गया, इस अवसर पर मुख्यमंत्री बोल रहे थे. हॉटेल ताज में हुए इस कार्यक्रम में उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  श्री श्री रविशंकर उपस्थित थे. इस अवसर पर राज्य में प्राकृतिक खेती करने के संदर्भ में व्यक्ति विकास केंद्र के साथ कृषि विभाग ने भी सामंजस्य करार किया. 

24 जिलों में काम किया जाएगा 

            जलयुक्त शिवार- 2 में गामुक्त तालाब -गायुक्त शिवार के कामों के लिए मृद व जलसंधारण विभाग की ओर से सामंजस्य करार पर सचिव सुनील चव्हाण और व्यक्ति विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्र के अध्यक्ष प्रसन्न प्रभू ने हस्ताक्षर किये. इस करार के द्वारा राज्य के नागपुवर्धा,  चंद्रपु अमरावती अकोला बुलढाणायवतमाळवाशिम सांगलीसाताराकोल्हापुरसोलापुपुणेअहमदनगरलातूरबीडजालनाछत्रपति संभाजीनगरनंदुरबारधुलियांनाशिक

जलगांव ठाणेपालघर ऐसे 24 जिलों के 86 तहसीलों में जलयुक्त शिवार की गाद निकालने की और जल स्त्रोतों का गहराई बढ़ानेनदियों का चौड़ाईकरणसीमेंट के बांध का निर्माण और खेत तालाबों के कामों को किया जाएगा. इसके लिए तीन साल की अवधि होगी. कृषि विभाग से हुए इस करार के अनुसार राज्य में व्यक्ति विकास केंद्र यह सेंद्रिय और प्राकृतिक खेती करना, मानव संसाधन विकासकिसानों को प्रशिक्षण वर्तमान रसायने और खादों पर आधारित पारंपरिक खेती प्राकृतिक खेती में बदलना इन कामों को कृषि विभाग से समन्वय से किया जाएगा.  

अच्छी योजनाओं के लिए गुरूदेव का आशीर्वाद 

             इस दौरान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि हम हमेशा कहते है जल हे तो कल है. लेकिन इस जल को सुरक्षित करने के लिए भी प्रयास किये जाने चाहिए. ग्लोबल वॉर्मिग की वजह  से आज पर्यावरण की अनेक समस्याएं निर्माण हो रही है, उस पर हल निकलने की जरुरत है. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री रहते जलयुक्त शिवार के पहले चरण में अच्छी सफलता मिली है. आज यह सामंजस्य करार क जलयुक्त शिवा के कामों को प्राकृतिक और सेंद्रिय खेती का साथ दे सकें, जो की, बड़ी बात है.  मुख्यमंत्री ने कहा कि मिशन मोड  हम जलयुक्त शिवार- 2 चरण लागू की जाएगी. जलयुक्त शिवार यह जन अभियान बना इस बात का उदाहरण भी मुख्यमंत्री ने इस दौरान दिया. उन्होंने बताया कि जालना जिले में वाटुर में मैं गया थातब जलयुक्त शिवार से हुआ परिवर्तन देखा. श्री श्री रविशंकर यह अच्छे कामों के साथ हमेशा रहते है. यह हमारा सौभाग्य है कि उनका आशीर्वाद हमें मिल रहा है. 

तालाबों का अभी गाद निकाला जाएगा 

            मुख्यमंत्री ने आगे कहा कि इस साल बारिश भी कम हुई है, इसलिए बहुत ही सही समय पर यह जलयुक्त  शिवार का करार हो रहा है.  तालाबों में बड़े पैमाने पर गा जमा हुआ है,  ऐसे में वहां पर भण्डारण क्षमता बढ़ाने को लेकर भी सरकार काम कर रही है.  कैंसर जैसी बीमारियाँ भी बढ़ रही है, उसके लिए हमें सेंद्रिय और प्राकृतिक खेती की ओर रुझान करना जरुरी होने की बात मुख्यमंत्री ने कही.   

देश में जलयुक्त शिवार की सफलता - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            इस अवसर पर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि जलयुक्त शिवार के पहले चरण में महाराष्ट्र के 22 हजार गाँवो में बड़ा काम हुआ है. केंद्र 2020 में जो रिपोर्ट दी है, उसमें महाराष्ट्र का वॉटर टेबल अन्य राज्यों की तुलना में ऊपर आ गया है, ऐसे नमूद किया है. इसमें आर्ट ऑफ लिव्हिंग की बड़ी भागीदारी है. उपमुख्यमंत्री फडणवीस ने बताया कि जलयुक्त शिवार का दूसरा चरण और विषमुक्त खेती कार्यक्रम यह दोनों कार्यक्रम चलाकर किसानों के जीवन में हम परिवर्तन लायेंगे.   

महाराष्ट्र की भूमि अध्यात्मिक विचारों की भूमि है 

श्री श्री रवीशंकर

             इस कार्यक्रम में  श्री श्री रविशंकर ने कहा कि पिछले साल 1 हजार किसान महाराष्ट्र से बैंगलोर में आये थे. वें वहां स्वयं के खर्च से ये थे, उनकी आय बढ़ी थी,  वें धन्यवाद देने के लिए आये थे. योजना को राजाश्रय मिलकर लोगों का सहभाग मिला और उसी से जलयुक्त शिवार योजना सफल हुई.  प्रधानमंत्री मोदी ने स्वच्छ भारत का अभियान शुरू किया और एक इतिहास रचा यह उदाहरण है. इस भूमि में विषारी घटक मिलाकर उसे हम निष्प्रभ कर रहे है. इसलिए प्राकृतिक खेती की जरुरत है. महाराष्ट्र की भूमि यह अध्यात्म के विचारों की भूमि है. 

0000

Jalyukt Shivar will be made Public Movement and implemented on Mission mode- Chief Minister Mr Eknath Shinde

 

Memorandum of Understanding signed with Art of Living for Jalyukt Shivar and organic farming

 

      Mumbai, November 26:- The Jalyukt Shivar will be converted to People’s  Movement and will be implemented in the state on ‘Mission Mode’ asserted Chief Minister Mr Eknath Shinde. He was speaking after the state government had signed a Memorandum of Understanding (MoU) with Vyakti Vikas Kendra- Art of Living for accelerating the second phase of Jalyukt Shivar in the state. Deputy Chief Minister Mr Devendra Fadnavis, Sri Sri Ravi Shankar were also present during the program held at hotel Taj. The agriculture department of the state also entered in a MoU the Vyakti Vikas Kendra for encouraging organic farming in the state. 

 

Work will be carried on in 24 districts

      The Memorandum of Understanding related to Jalyukt Shivar Phase -2 for de-silting of dam and silt- free Shivar work, the agreement was signed by secretary of soil and water conservation department Sunil Chauhan and Prasanna Prabhu- president of Vyakti Vikas Kendra- Art of Living Institute.

Work will be carried on in 24 districts

      The Memorandum of Understanding related to Jalyukt Shivar Phase -2 for de-silting of dam and silt- free Shivar work, the agreement was signed by secretary of soil and water conservation department Sunil Chauhan and Prasanna Prabhu- president of Vyakti Vikas Kendra- Art of Living Institute.

      Under this agreement, the de-silting, deepening of water resources, broadening of rivers, construction of cement dams and water ponds will be carried on in 86 taluka's of 24 districts including Nagpur, Wardha, Chandrapur, Amravati, Akola, Buldhana, Yavatmal, Washim, Sangli, Satara, Kolhapur, Solapur, Pune, Ahmednagar, Latur, Beed, Jalna, Chhatrapati Sambhaji Nagar, Nandurbar, Dhule, Nashik, Jalgaon, Thane and Palghar.

 

      Under the MoU by the agriculture department, the Vyakti Vikas Kendra will take all out efforts for organic and natural farming, human resource development, training related to agriculture, conversion of present farming based on chemicals to natural farming and other like crusades in coordination with the Agriculture Department.

 

Blessings of Gurudev for good schemes

      Speaking further Chief Minister Mr Eknath Shinde said that we always say 'Jal hai to Kal hai' but we have to preserve the water for tomorrow. There are many environmental problems because of the global warming and it is extremely necessary to find a way out from this global problem. The chief minister further said that Mr Devendra Fadnavis was chief minister, the first phase of Jalyukt Shivar was successfully implemented in the state and today with the signing of memorandum of understanding, the work of Jalyukt Shivar will be accelerated and it will be connected with natural and organic farming and it is indeed a major decision taken by the government. He also said that the Jalyukt Shivar will be implemented on Mission mode in the state. He said that there are examples showing that the Jalyukt Shivar had become the movement of the people. He also said that when he visited the Vattur village in Jalna district, he has seen the important positive changes brought in the entire region because of the Jalyukt Shivar. He saidd that Sri Sri Ravi Shankar is always blessing us and we are lucky to be blessed by Gurudev.

 

De silting of dams will be emphasized

      Chief Minister Mr Eknath Shinde said that this year the rainfall was very scanty and this is the right time to start the Jalyukt Shivar on Mission mode. He said that the silt had deposited in the dam on large scale and in order to increase the storing capacity of the dams, the government is continuously taking efforts. He also said that the killer disease like cancer is increasing rapidly and in order to curb it, it is essential to shift towards organic and natural farming from the present chemical based agriculture.

 

Jalyukt Shivar was successful in the nation

Deputy Chief Minister Mr Devendra Fadnavis

      Speaking on the occasion Deputy Chief Minister Devendra Fadnavis said that the first phase of Jalyukt Shivar was successful and the work was carried on in 22 thousand villages across Maharashtra. He said that the union government in its report in the year 2020 had said that the water table of Maharashtra is better as compared to all the other states of the nation. He said that, in fact the Art of Living had a lions share in this success. He said that poison free farming program will be implemented with the intention of transforming the lives of the farmers of the state and it will definitely a successful mission.

 

Maharashtra is a land of spiritual thoughts -Sri Sri Ravi Shankar

      Addressing the gathering Sri Sri Ravi Shankar said that last year 1000 farmers from Maharashtra visited Bangalore on their own expenses because they have earned more and there income has increased a lot. He said that these farmers visited for giving thanks. He said that the scheme got all the required support from the government and participation of people had made the Jalyukt Shivar scheme successful. He also said that the 'Swachh Bharat' movement implemented by Prime Minister Narendra Modi had created a history and set an example. He further said that we are destroying our soil by putting hazardous content in it so it is extremely essential to move towards natural and organic farming. Gurudev also said that the land of Maharashtra teaches spirituality.

00000

दिव्याज फांऊडेश की ओर से शहीदों के परिवारों का


जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार

 जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


आर्ट ऑफ लिव्हिंगसमवेत जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेतीचा सामंजस्य करार


 


            मुंबई दि,26: जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे आज व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. हॉटेल ताज येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री श्री रवीशंकर उपस्थित होते. याप्रसंगी राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात व्यक्ती विकास केंद्रासमवेत कृषी विभागाने देखील सामंजस्य करार केला.


24 जिल्ह्यात कामे करणार


            जलयुक्त शिवार 2 मध्ये गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने सामंजस्य करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली. या कराराद्वारे राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर अशा 24 जिल्ह्यातील 86 तालुक्यात जलयुक्त शिवारची गाळ काढण्याची तसेच जल स्त्रोतांचे खोलीकरण, नद्यांचे रुंदीकरण, सिमेंट बंधारे बांधणे तसेच शेततळ्यांची कामे होणार आहेत. यासाठी तीन वर्षांचा कालावधी असेल. कृषी विभागाशी झालेल्या करारानुसार राज्यात व्यक्ती विकास केंद्र हे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पिकविणे, मनुष्यबळ विकास, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, सध्याची रसायने व खतांवर आधारित पारंपरिक शेती नैसर्गिक शेतीमध्ये बदलणे ही कामे कृषी विभागाशी समन्वयाने करेल.


 


चांगल्या योजनेसाठी गुरूदेवांचा आशीर्वाद


 


             यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण नेहमी म्हणतो की, जल हे तो कल है. पण हे पाणी जपून ठेवण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. ग्लोबल वॉर्मिगमुळे आज अनेक पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात चांगले यश मिळाले. आज हा सामंजस्य करार करून जलयुक्त शिवराच्या कामाला नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची जोड देऊ शकलो ही मोठी गोष्ट आहे. मिशन मोडवर आम्ही जलयुक्त शिवार 2 टप्पा राबविणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जलयुक्त शिवार ही लोकांची चळवळ बनली याचे उदाहरण मुख्यमंत्र्यांनी दिले. जालना जिल्ह्यात वाटुरमध्ये मी गेलो असताना जलयुक्त शिवारमुळे झालेली किमया पाहिली असेही ते म्हणाले. श्री श्री रवीशंकर हे चांगल्या कामांच्या पाठीशी नेहमी असतात, त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत हे भाग्य आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 


 


धरणांमधील गाळही काढणार


 


            यावर्षी पाऊस ही कमी झाला आहे त्यामुळे अगदी योग्य वेळी हा जलयुक्त शिवारचा करार होतोय असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झालेला आहे. तेथील साठवणूक क्षमता वाढविण्यावर शासन काम करीत आहे. कॅन्सर सारखे रोग वाढत चालले आहे, त्यासाठी आपण सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.


 


जलयुक्त शिवारचे देशात यश - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


            यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या 22 हजार गावांमध्ये मोठे काम झाले. केंद्राने 2020 मध्ये जो अहवाल दिला त्यात महाराष्ट्रातला वॉटर टेबल इतर सर्व राज्यांच्या तुलनेने वर आला असे नमूद केले आहे. यामध्ये अर्थातच सिंहाचा वाटा हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा आहे. जलयुक्त शिवार दुसरा टप्पा तसेच विषमुक्त शेतीचा कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम राबवून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आम्ही परिवर्तन करणार आहोत असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


 


महाराष्ट्राची भूमी अध्यात्मिक विचारांची


श्री श्री रवीशंकर


 


            यावेळी बोलताना श्री श्री रविशंकर म्हणाले की, गेल्या वर्षी 1 हजार शेतकरी महाराष्ट्रातून बंगलोरमध्ये आले होते. ते त्यांच्या खर्चाने आले होते, त्यांचे उत्पन्न वाढले होते. ते धन्यवाद देण्यासाठी आले होते. योजनेला राजाश्रय मिळून लोकांचा सहभाग मिळाला आणि त्यामुळे जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाली असे सांगून ते म्हणाले की, प्रधानमंत्री मोदी यांनी स्वच्छ भारताची चळवळ सुरू केली आणि एक इतिहास निर्माण झाला हे उदाहरण आहे. या जमिनीत विषारी घटक टाकून टाकून तिला आपण निष्प्रभ करतो आहोत. त्यामुळे नैसर्गिक शेतीची गरज आहे असेही ते म्हणाले. महाराष्ट्राची भूमी अध्यात्माची

 शिकवण देणारी आहे, असेही ते म्हणाले.


राज्यपालांच्या हस्ते सील आश्रम संस्थेचे संस्थापक के.एम. फिलिप यांना यावर्षीचा मदर टेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान

 राज्यपालांच्या हस्ते सील आश्रम संस्थेचे संस्थापक के.एम. फिलिप


यांना यावर्षीचा मदर टेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान


            मुंबई, दि.26 : सामाजिक न्यायासाठी मदर टेरेसा मेमोरियल अवार्डची स्थापना केल्याबद्दल आणि या पुरस्कारासाठी सर्वात योग्य व्यक्ती आणि संस्थांची निवड केल्याबद्दल मी हार्मनी फाउंडेशनचे अभिनंदन करतो.या वर्षीच्या मदर टेरेसा स्मृती पुरस्कारासाठी सील आश्रम संस्थेचे संस्थापक के.एम. फिलिप यांना मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. हार्मनी फाऊंडेशनला त्याच्या भविष्यातील प्रत्येक कार्यात यश मिळो अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी व्यक्त केली.


             राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सांताक्रुझ येथील हॉटेल ताज येथे मदर टेरेसा स्मृती पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल रमेश बैस बोलत होते.


राज्यपाल श्री. बैस म्हणाले, डॉ. अब्राहम मथाई हे समाजातील विविध घटकांमध्ये समंजसपणा, सद्भावना आणि बंधुता वाढवण्यासाठी हार्मनी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करीत आहेत. आज खऱ्या अर्थाने जगाला भगवान महावीरांची गरज आहे, आज आपल्याला भगवान बुद्ध, महात्मा गांधी आणि मदर टेरेसा यांच्यासारख्या महान राष्ट्र पुरुषांची गरज आहे, जे संपूर्ण मानवतेला पुन्हा शांती आणि सौहार्दाचा मार्ग दाखवू शकतील. सील आश्रम संस्था 1999 पासून मुंबईच्या रेल्वे फलाट आणि रस्त्यांवर आढळणाऱ्या निराधार, आजारी आणि बेघर लोकांसाठी काम करते. सील संस्थेने मुंबई आणि त्यालगतच्या उपनगरात सापडलेल्या बेघर आणि निराधार लोकांना केवळ वाचवलेच नाही तर त्यांचे पुनर्वसनही केले आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे.


            सील आश्रमाच्या कार्यामुळे आतापर्यंत 504 लोक त्यांच्या कुटुंबियांशी जोडले गेले आहेत, जे खरोखरच प्रशंसनीय आहे.राज्यपाल श्री. बैस पुढे म्हणाले की,'सील' आश्रमात तरुण आणि वृद्ध, स्त्री-पुरुष, आजारी, हरवलेल्या आणि सोडून दिलेल्या जीवांना नवीन जगण्याची संधी देतो. या आश्रमात मानसिक आधाराबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्यसेवा आणि उत्तम शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबांचा शोध घेण्याचा आणि हरवलेल्यांना पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न केला जातो.


            जमशेद जीजीभॉय, नाना शंकरशेठ आणि इतरांनी मुंबई शहर आणि येथील लोकांसाठी खूप सेवाभावी आणि परोपकारी कार्य केले. आजही अनेक उद्योजक आपल्या व्यवसायातील काही वाटा सामाजिक कार्यासाठी वापरतात. त्यांनी सील आश्रमासारख्या संस्थांना पाठिंबा द्यायला हवा, असे मत राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशा लोगो यांनी केले.


00000

प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांचा २२ नोव्हेंबर हा जन्मदिन. आज त्यांची १५९ वी जयंती

 प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांचा २२ नोव्हेंबर हा जन्मदिन. आज त्यांची १५९ वी जयंती. त्यानिमित्ताने आपल्या अस्तित्वासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची ही कथा…


रखमाबाई राऊत. डॉक्टरकीची पदवी मिळवून प्रत्यक्ष प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर. डॉ. आनंदीबाई जोशी डॉक्टर झाल्या, परंतु लगेचच आजारपणात त्यांचा मृत्यू झाल्याने त्या डॉक्टरकी करू शकल्या नाहीत. रखमाबाईंनी मात्र तहहयात डॉक्टरकी केली आणि निभावलीही. सोबत समाजकार्याचा वसाही जपला. एक बुद्धिमान, बाणेदार, धाडसी आणि सेवाव्रती असं रखमाबाईंचं व्यक्तिमत्त्व होतं. आज स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती असे शब्द खूप सहजपणे वापरले जातात आणि ते महत्त्वाचेही आहेत. परंतु सव्वाशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने आपल्या ज्ञानाच्या तुलनेत खूपच सामान्य असलेल्या नवऱ्याला नाकारणं ही त्या काळाच्या परिप्रेक्ष्यात क्रांतिकारी घटना होती. मात्र मोहिनी वर्दे यांनी १९८२ मध्ये ‘रखमाबाई : एक आर्त’ हे पुस्तक लिहीपर्यंत त्यांच्या कर्तृत्वावर काळाचा पडदा पडलेला होता. मात्र आता रखमाबाईंचं कर्तृत्व काळानेच उजळून देण्याचं ठरवलेलं असावं. त्यामुळेच प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी रखमाबाईंच्या आयुष्यावर आणि कर्तृत्वावर सिनेमा बनवला आहे.


रखमाबाई यांचे आजोबा हरिश्चंद्र यादवजी चौधरी इंग्रज सरकारच्या नोकरीत असल्याने त्यांना सरकारदरबारी मानमरातब होता. त्यांना जयंतीबाई नावाची मुलगी होती. तिचा विवाह वयाच्या १५व्या वर्षी १८६३ मध्ये मुंबईतील गोरेगाव येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक जनार्दन सावे ह्यांच्याशी झाला. २२ न‌ोव्हेंबर १८६४ साली जयंतीबाईंनी एका मुलीला जन्म दिला. ती मुलगी म्हणजे- रखमाबाई. दुर्दैवाने जयंतीबाई १७ वर्षांच्या असतानाच जनार्दन सावे यांचं निधन झालं आणि जयंतीबाई रखमाबाईला घेऊन वडिलांकडे आल्या.


आपल्या विधवा मुलीचा व नातीचा भविष्यकाळ सुखाने जावा म्हणून हरिश्चंद्र चौधरी यांनी आपल्या मुलीचा पुनर्विवाह डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी लावून दिला. राऊत हे ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई येथे प्राध्यापक होते. ते आधुनिक विचारसरणीचे होते. डॉ. राऊतांनी छोट्या रखमाबाईंचासुद्धा स्वीकार केला व रखमाबाई ‘सावे’ऐवजी ‘राऊत’ झाल्या.


आताच्या पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील दातीवऱ्याच्या दादाजी भिकाजी ठाकूर यांच्याशी वयाच्या ९व्या वर्षी रखमाबाईंचं लग्न झालं. मुलीने वयात येईपर्यंत आईवडिलांकडे राहण्याची प्रथा त्याकाळी होती. साहजिकच १८ वर्षांपर्यंत रखमाबाई माहेरीच राहिल्या. त्यानंतर १८३३ मध्ये दादाजीने त्यांना आपल्या घरी बोलावलं. मात्र दरम्यानच्या काळात शिक्षणामुळे रखमाबाईंच्या विचारांची पातळी उंचावली होती. दादाजी श्रीमंत होते, परंतु निरुद्योगी होते. कुठलाच उद्योग, व्यवसाय न करता, ते आपले मामा नारायण धर्माजी यांच्याकडे राहत होते. त्यामुळे अशा निरुद्योगी माणसाच्या घरी राहण्यास रखमाबाईंनी स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे डॉ. सखाराम राऊतांनीही दादाजींना कळवलं की, प्रतिष्ठेने राहता येईल असं वातावरण आपल्याकडे नसल्यामुळे मी माझ्या मुलीला आपल्याकडे पाठवू शकत नाही. आपली डाळ शिजत नाही हे कळल्यावर दादाजीने १८८४ मध्ये तिला वकिलांमार्फत नोटीस पाठविली. न्यायाधीश पिन्हे ह्यांच्यावर या खटल्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती पिन्हे ह्यांनी ‘लहानपणी लग्न झालेली मुलगी आता सज्ञान झाली आहे. निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आली आहे. चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या स्त्रीला नवऱ्याकडे पाठविण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल’, असं सांगून निर्णय रखमाबाईंच्या बाजूने दिला.


ह्या निर्णयामुळे बुजुर्ग मंडळी खडबडून जागी झाली. ‘नेटिव्ह ओपिनियन’ ह्या इंग्रजी दैनिकातून कोर्टाच्या निर्णयावर टीका करण्यात आली. लोकमान्य टिळकांनीही आपल्या ‘केसरी’ वर्तमानपत्रातून टीकेची झोड उठविली. मात्र रखमाबाईंचे वडील डॉ. सखाराम राऊत मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. परंतु ह्या प्रचंड धावपळीमुळे व मानसिक ताणामुळे वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी, १८ एप्रिल १८८५ रोजी त्यांचं निधन झालं.


त्यानंतर दादाजी ठाकूर यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील केलं. मुख्य न्यायाधीश फेरेन ह्यांच्यासमोर आलेल्या ह्या खटल्याच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ह्यावेळी मात्र हायकोर्टाचा निकाल रखमाबाईंच्या विरोधात लागला. न्यायमूर्ती फेरेन यांनी, निकालाच्या दिवसापासून एका महिन्याच्या आत रखमाबाईंनी नवऱ्याच्या घरी राहण्यास जायला हवं, असा निर्णय दिला. परंतु रखमाबाई आपल्या निर्णयापासून ढळल्या नाही. २३ वर्षांच्या रखमाबाई तोपर्यंत सामाजिक बहिष्काराला व टीकेला सरावल्या होत्या. खंबीरपणे सामोरे जात होत्या. अन्यायाला विरोध करणाऱ्या त्या रणरागिनी बनल्या होत्या. परिणामी हा वाद चिघळत गेला. देशभरातील प्रमुख वर्तमानपत्रांतून ह्या विषयासंबंधी बातम्या येऊ लागल्या आणि न्यायमूर्ती रानडे, गोपाळराव आगरकर, डॉ. भांडारकर, रावसाहेब मांडलिक, तसेच पंडिता रमाबाई अशी विद्वान मंडळी रखमाबाईंच्या पाठिशी उभी राहिली. विदेशातील ‘लंडन टाइम्स’, ‘सेंट जेम्स् गॅझेट’ अशा अनेक प्रमुख वर्तमानपत्रांतून हा विषय गाजू लागला. इंग्लंडमध्येसुद्धा सामाजिक धुरिणांचा चर्चेचा विषय बनला. तेथील विचारवंत महिलांनी रखमाबाईंना सहकार्य करण्याचं आश्वासन पत्राद्वारे दिलं. ‘लंडन टाइम्स’चे बिशप ऑफ चाल्टरी यांनी स्वतः पुढाकार घेऊन इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया व व्हॉइसरॉय ऑफ हिंदुस्थान ह्यांच्या कानावर ही बातमी घातली. परिणामी हा खटला प्रिव्ही कौन्सिलसमोर पुन्हा नव्याने चालविण्याचं ठरलं. या खटल्याच्या खर्चासाठी प्रिन्सिपल वर्डस्वर्थ यांनी ‘रखमाबाई ए हिंदू लेडी डिफेन्स कमिटी’ या संस्थेची स्थापनाही केली.


हे सगळं पाहून रखमाबाईंचे पती दादाजी आणि मामा नारायण धर्माजी यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचं ठरवलं. इंग्लंडमध्ये जाऊन लढण्याची त्यांची ताकद नव्हती. तसंच जनमत आपल्याविरुद्ध जात आहे याची जाणीव त्यांना झाली होती. शेवटी रखमाबाईंशी चर्चा करून असा निर्णय घेण्यात आला की लग्नाचा व कोर्टाचा खर्च म्हणून रुपये २०००/- दादाजींना देऊन कायदेशीर घटस्फोट घ्यायचा. त्याप्रमाणे ५ जुलै १८८८ मध्ये हा वाद मिटविण्यात आला.


रखमाबाईंच्या आयुष्यातील एक संघर्षमय वादळ शमलं. त्यांचं अर्धं आयुष्य जीवनाशी संघर्ष करण्यात गेलं. आता नव्या पर्वाला सुरुवात होणार होती. त्यानंतर रखमाबाईंनी आपल्या भूतकाळाचं गाठोडं बाजूला ठेवून आपलं लक्ष पुढील शिक्षणाकडे केंद्रीत केलं. त्यांच्या संघर्षमय जीवनामुळे त्यांचं नाव इंग्लंडमधील अनेक स्त्रियांना परिचित झालं होतं. तेथील एक महिला डॉ. एडिच पीची फिप्सन यांनी रखमाबाईंना इंग्लंडमधील वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं, तसंच लेडी मॅक्लेरन यांनी आपल्या घरी राहण्याची सोय करीन असं कळवलं. त्यामुळे इंग्लंडमध्ये गेल्यानंतर वैद्यकीय कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक विषयाचा अभ्यास फक्त चार महिन्यांत पूर्ण करून रखमाबाईंनी ऑक्टोबर १८९० मध्ये ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमन’ ह्या कॉलेजात प्रवेश घेतला. लांब हाताचा ब्लाऊज, पांढरी साडी, कपाळावर मोठं कुंकू, असा त्यांचा पोशाख. १८९१ व १८९२ मध्ये अनुक्रमे पहिली व दुसरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ‘रॉयल हॉस्पिटल’मध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांनी शवविच्छेदन व अॅनेस्थेशिया ह्या विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर डब्लिन येथील ‘रोटांडो’ हॉस्पिटलमध्ये मिडविफ्री व स्त्रीरोगतज्ञ हा शिक्षणक्रम पूर्ण केला. नॅशनल डेंटल हॉस्पिटलमध्ये दंतचिकित्सेचं शिक्षण घेतलं. तसंच ‘बाळंतपणातील शस्त्रक्रिया’ ह्या विषयात ‘लंडन कॉलेज ऑफ मेडिसिन’ येथे त्यांनी परीक्षेत ऑनर्स मिळविला. अशा विविध विषयांचा अभ्यास केल्यानंतर १८९४ मध्ये त्या शेवटची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या. परंतु लंडन विद्यापीठाला वैद्यकीय पदवी देण्याचा अधिकार नव्हता. रखमाबाई खचल्या नाहीत त्यांनी पुढील परीक्षेसाठी ‘जॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजस् ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ एडिंबरा’ येथे प्रवेश घेतला. येथे त्या उत्कृष्ट मार्कांनी परीक्षा उत्तीर्ण झाल्या नि त्यांच्या नावापुढे एम्.डी. आणि एल्.आर.सी.पी. अँड एस् (Licential of the Royal Collage of Physicians & Surgeons) ही उपाधी लागली. ‘डॉ. रखमाबाई सखाराम राऊत’ ह्या नावाने त्या डिसेंबर १८९४ मध्ये भारतात परतल्या.


मुंबईत परतल्यानंतर आपल्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात रखमाबाईंनी मुंबईतील ‘कामा’ हॉस्पिटलमधून केली. तिथे त्या हाऊस सर्जन होत्या. नंतर त्या गुजरातमध्ये गेल्या. सुरतमध्ये ‘शेठ मोरारजीभाई व्रजभूषणदास मालवी’ ह्या हॉस्पिटलच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. ह्याच काळात मुंबई, दिल्ली, राजकोट, सुरत इत्यादी ठिकाणी त्यांनी लंडनमधील ‘डफरीन’ या संस्थेच्या सहकार्याने हॉस्पिटलची उभारणी केली. १८९६ मध्ये सुरतमध्ये प्लेगची साथ आली तेव्हा त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने त्यांना ‘इंग्रज ए हिंद’ हा बहुमान दिला.


डॉ. रखमाबाईंनी वैद्यकीय क्षेत्रात योगदान दिलं, तसंच सामाजिक कार्यातही. १९१७ मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्त्रियांमधील अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हाती घेतलं. विधवा स्त्रियांसाठी ‘वनिता’ या नावाने आश्रमाची स्थापना केली. १९३२ मध्ये त्यांनी गावदेवी मंदिर अस्पृश्यांना खुलं केलं. त्यांनी कामाठीपुरातील शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने आयोजित केली. वैद्यकीय व सामाजिक कार्यासाठी योगदान देणाऱ्या, आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत धडपडणाऱ्या रखमाबाईंनी २५ डिसेंबर १९५५ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.


ऊर्जेची अखंड ज्योत निमावली! स्त्रीशक्ती विचारांचं घोंघावणारं वादळ रुढार्थाने शमलं. पण त्यांनी दिलेला लढा सर्वकालिन महिलांसाठी आदर्श आहेत.


(संकलित)

 *तिरुमला तिरुपती बालाजी मंदीरात आषाढी&कार्तिक एकादशी च्या निमित्ताने भजन नक्की पहा*


हंगेरी इस्कॉन चे जय srikrishna Nagar


 

निवडणुकी मध्ये असा game केला जातो


 

Featured post

Lakshvedhi