ब्रिटीश पंतप्रधानांचे घर, 10 Downing St...
🪔🪔
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
ब्रिटीश पंतप्रधानांचे घर, 10 Downing St...
🪔🪔
*कित्येक वर्षापासून फटाके न वाजवणारी दोन गावे*
वाचून आश्चर्य वाटलं नां?
तमिळनाडूतील तिरुपत्तूर जवळील *वेतांगुडीपट्टी आणि पेरिया कोल्लुकुडीपट्टी* या दोन गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून फटाके न फोडता दिवाळी साजरी करतात.
कारण..
*त्यांना पशू-पक्ष्यांना दुखवायचे नसते.*
या गावातील रहिवाशी म्हणतात,
*“आम्ही या गावात पक्ष्यांसाठीच फटाके फोडत नाही. पक्षी हे आपल्या पाळीव प्राण्यासारखे आहेत म्हणून आम्ही फटाके फोडणे पूर्णपणे टाळतो. आमच्या मुलांनाही पक्ष्यासाठी फटाके फोडण्यापासून दूर ठेवले आहे. कित्येक वर्षे झाली आहेत, आम्ही कधीही फटाके वाजवून दिवाळी साजरी केलेली नाही,”*
त्यामूळे आज...
*वेतांगुडी हे पक्ष्यांचे अभयारण्य झाले आहे.*
हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास झाले आहे.
हे पक्षी *स्वित्झर्लंड, रशिया, इंडोनेशिया आणि श्रीलंका* येथून उड्डाण करतात.
या *अभयारण्यात वर्षाला 15,000 पक्षी आकर्षित होतात.*
जवळपास अर्ध्या शतकापासून स्थलांतरित पक्ष्यांच्या 200 हून अधिक प्रजातींसाठी सुरक्षित आणि संरक्षित प्रजनन स्थळांपैकी ही गावे व तेथील अभयारण्य मानले गेले आहे.
हे पक्षी अनेक वर्षापासून वेतांगुडी, पेरिया कोल्लुकुडी पट्टी आणि चिन्ना कोल्लुकुडी पट्टी येथील सिंचन तलावांवर येत असत. *फटाक्यांमुळे त्यांच्या मनात भीती निर्माण होऊन त्यांच्या येण्यावर परिणाम होऊ लागला.*
*तेव्हापासून स्थानिक ग्रामस्थ फटाकेविरहित उत्सव साजरा करू लागले.*
आता पशू-पक्षी येथे *शांततेत* राहतात.
ग्रामस्थ म्हणतात, "आम्ही दिवाळीतच नव्हे, तर *सण, उत्सव, लग्न यामध्येही फटाके फोडत नाही.. आम्ही फटाके फोडणे टाळतो, कारण ते पशू-पक्ष्यांना त्रास देतात. इथे येणार्या पक्ष्यांना आम्ही आपली घरची मुलं म्हणून पाहतो.”*
ग्रामस्थांच्या या निर्णयाचे कौतुक म्हणून *वनविभागाच्या वतीने प्रत्येक दिवाळीला गावांतील रहिवाशांना अर्धा किलो मिठाईचे वाटप केले जात असते.*
हे अभयारण्य मदुराईपासून ५१ किलोमीटर अंतरावर आहे
मागील रविवारी कोलकत्ता-इडनगार्डन्स येथे सामन्यानंतर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पोलीस ड्युटीवरील घोड्याचा मृत्यु अनेक संवेदनशील मनांना हेलावून गेला. हवाप्रदूषण- ध्वनिप्रदूषण याचे चटके मानवाला आता बसू लागले आहेत. तरीही काहीजण अजूनही डोळ्यावर घोड्यासारखी झापडे लावून वागत आहेत.
*अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. आपली संस्कृती-परंपरा यांचे जतन करणे हे महत्त्वपूर्ण आहेच.*
पण आनंदाचा हा सण साजरा करताना---
निसर्गाचा वरदहस्त असलेल्या आपल्या देशात ध्वनिप्रदूषण, हवाप्रदूषण वाढवून,
आपण *आपल्याच भावी पिढीला अंधारात ढकलत आहोत* याचे भानही येणे गरजेचे आहे आणि....
सोबत फटाक्यांना ठामपणे नाही म्हणण्याची *ठोस कृती.*
*वेतांगुडीपट्टी आणि पेरिया कोल्लुकुडीपट्टी या गावातील सुजाण ग्रामस्थांप्रमाणे.*
बघा पटतंय कां?
🙏
शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
ठाणे,दि.15:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी नायब तहसिलदार श्री.दिनेश पैठणकर, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक श्री.प्रभाकर काळे उपस्थित होते.
0000
फोटो ओळ -
शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
*💖बहीण 💖*
*💖एक अनोखं नातं💖*
*आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.*
*असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं*...!
*🌹🌹🌹भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐*
*बहीण भाऊ*
बहीण भाऊ हे नमुने जन्मालाच यावे लागतात. पोतंभर पैसे घेऊन बाजारात गेलात तरी दुकानात हे नग... नगाने मिळायचे नाहीत.
प्रेम, जिव्हाळा, हेवा, स्पर्धा, आस्था, काळजी असे सगळे भाव ह्या एका नात्यात सामावलेले असतात.
थोडक्यात हे नातं अगदी पाणीपुरी सारखं असतं. भांडणाचा तिखटपणा, चेष्टेचा अंबटपणा, प्रेमाचा गोडवा, काळजीचं मीठ, कुरकुरीत खिलाडुपणा असं सगळं ह्यात असतं, पण ह्यात नं कडवटपणाला मात्र जागा नाही.
एकाने पूर्व म्हटलं की दुस-याने पश्चिम म्हटलेच म्हणून समजा. पण दुस-या कोणाशी भांडण्याची वेळ आली की, मात्र ह्यांची एकी मजबूत. दोघांपैकी एकाला झाप पडत असली की दुस-याच्या वर्तनात अचानक सदाचार आणि सन्मती दिसु लागते. ते कसे काय, हा दीर्घ संशोधनाचाच विषय आहे. चाॅकलेट वाटून घेताना सुतभर कमी जास्त होऊ नये म्हणून स्केलपट्टीने मोजणारे हे, कधी अचानक स्वतःच्या वाटणीचा आवडीचा उकडीचा मोदक भावंडाला आवडतो म्हणून त्याला किंवा तिला देतील हे सांगता येत नाही.
एकमेकांवर सतत नजर ठेवून असणारे बहीण-भाऊ एकमेकांचं गुपित मात्र कुणालाही कळू देत नाहीत.
शिक्षकांनी दिलेला मार, लपून छपून पाहीलेले सिनेमे, शिकवणीला मारलेली चाट, ही असली गुपित स्वतःच्या वयाची चाळीशी उलटली की, हे बहीण भाऊ आई समोर अलगद उलगडत जातात, अर्थात तेव्हा देखील आईच्या मूडचा अंदाज घेऊन मगच.
अगदी तारीख वार किंमती सहीत आई बाबांनी पहिल्यासाठी काय घेतलं होतं हे दुस-याच्या आणि दुस-यासाठी काय घेतलं होतं हे पहिल्याच्या इत्यंभूत लक्षात असतं.
भावंडाच्या मारामा-या सोडवताना अरे काय, वैरी आहात का एकमेकांचे?' म्हणणारी आई जेव्हा भावाला बहिणीच्या काळजीने कासावीस होताना बघते किंवा बहिणीला निजलेल्या भावाच्या डोक्यावरून हात फिरवताना पाहते तेव्हा तिचे डोळे भरून येतात.
विनाकारण तासन् तास हसणारी काही भावंड मोठी झाल्यावर विनाकारण एकमेकांना साधा फोन देखील करत नाहीत.
न भांडता मोठे झालेले बहीण भाऊ मी तरी कधी पाहीले नाहीत. पोहणं कसं एकदा शिकलं की विसरत नाही, तसं बहीण भावांच्या स्वतःच भांडण सोडवण्याच्या कलेचं देखील आहे. जसं पाण्यात पडल्यावर जिवाचा आटापिटा करत आपण हातपाय मारतो नं तशी तळमळ हवी भांडण सोडवायला.
जसं पोतं भर पैशात भाऊ बहीण विकत मिळत नसतात तसे ते तीळभर अभिमानानं मात्र कायमचे दूर होऊ शकतात.
लहानपणी आईने कान पिळला की, आपोआप शहाणपण यायचं आणि भांडण मिटायच. पण *आई बाप* काही जन्मभर पुरत नाहीत आणि *भाऊ बहीण* विकत काही मिळत नाहीत.
*भाऊबीज निमित्ताने सर्व भाऊ बहिणींना हार्दिक शुभेच्छा.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
पदवीदार मतदार संघासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म भरण्याची मुदत (दुसरा टप्पा ) *22 nov to 30 nov* आहे.
तरी अजून नोंदवायचे शिल्लक असल्यास नाव नोंदवून घ्यावे
शेतकरी हिताच्या बांधिलकीचा प्रत्यय
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्र अग्रेसर
मुंबई, दि. १३ : - पीएम कुसुम योजनेत देशात पहिले स्थान पटकावून महाराष्ट्राने शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीतील आपली बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे. हे राज्य बळीराजाचे असून त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करून राज्याच्या ऊर्जा विभागाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राने सुमारे ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित केले आहे.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या योजनेला यापुर्वीच गती देण्यात आली होती. त्यांच्या पुढाकाराने ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना प्रभावीपणे राबविली आहे. या अव्वल स्थानासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पुढाकारासाठी आणि महाऊर्जाशी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचेही अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, राज्यात नवीन व नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्राचाही आपण आपल्या शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या कृषी पंपांसाठीही प्रभावीपणे वापर करून घेत आहोत. यामुळे बळीराजाला सिंचनासाठी खात्रीलायक असा ‘ऊर्जा’ पर्याय उपलब्ध होईल. हा पर्याय कमी खर्चाचा आणि विश्वासाचा देखील आहे. ऊर्जा विभागाने केंद्राच्या यंत्रणांशी समन्वय साधून साध्य केलेले उद्दीष्ट हे केवळ एक टप्पा आहे. या योजनेतून अधिकाधिक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळावेत असे शासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी महाऊर्जाने आपल्या या कार्यप्रणालीत सातत्य राखावे, तसेच शेतकऱ्यांमध्ये या ऊर्जा स्त्रोताविषयी आणखी जागरुकता निर्माण करावी. महाराष्ट्राचे स्थान कायमच अव्वल राहावे यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ‘किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियान’ ‘कुसुम’ योजनेत राज्यांना ९ लक्ष ४६ हजार ४७१ सौरपंप बसविण्यासाठी मान्यता दिली आहे. देशात यापैकी एकूण २ लक्ष ७२ हजार ९१६ सौर पंप स्थापित झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त सौर कृषिपंप राज्यात महाऊर्जामार्फत बसविण्यात आले आहेत.
पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाऊर्जामार्फत स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले आहे. महावितरणकडे कृषिपंप जोडणीसाठी अर्ज केलेल्या मात्र अनामत रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना आता सौर कृषिपंप देण्याच्या योजनेवरही भर देण्यात येत आहे. महाराष्ट्राने अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण २०२० तयार करून या क्षेत्रात महत्वाचे पाऊल यापुर्वीच टाकले आहे. राज्याने पुढील पाच वर्षांसाठी पाच लाख कृषिपंपाना मान्यता दिली आहे.