Saturday, 30 September 2023

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून ओबीसी समाजाची बैठक

 मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांकडून ओबीसी समाजाची बैठक

 

इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता

मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका

 

                                                                      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

 

            मुंबईदि. २९: इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळसारथीबार्टीमहाज्योतीटीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईलकेंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बारा बलुतेदारांना लाभ मिळवून दिला जाईलअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

            सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास वर्ग तसेच भटके-विमुक्त समाजातील विविध संघटनांसमवेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळइतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेवन मंत्री सुधीर मुनगंटीवारखासदार रामदास तडसआमदार सर्वश्री डॉ. संजय कुटेपरिणय फुकेगोपीचंद पडळकरमाजी आमदार प्रकाश शेंडगेमुख्य सचिव मनोज सौनिकमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेराष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत इतर मागासवर्गभटके-विमुक्तबारा बलुतेदार आदी समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे मांडले.

            कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी करण्याची शासनाची भूमिका नाहीअसे स्पष्ट करीत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  सांगितले कीमराठा समाजाचे रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळवून देताना इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भात निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे. राज्य शासन इतर मागासभटक्या विमुक्त समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. 

            राज्यातील सारथीबार्टीमहाज्योतीटीआरटीआय या महामंडळाना निधी देताना कुठलाही भेदभाव होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही देतानाच भटक्या विमुक्तांच्या विविध प्रश्नांबाबत स्वतंत्रपणे बैठक घेण्यात येईलअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इतर मागास समाजातील विद्यार्थ्य़ांसाठी ७२ वसतीगृहे तातडीने सुरू करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ देताना नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र असल्यास आठ लाखाच्या मर्यादेचं प्रमाणपत्राची अट मागे घेण्यासंदर्भात तपासणी करण्याची सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

 

इतर मागास समाजासाठी ४००० कोटी रुपयांच्या योजना- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            राज्य शासनाच्या माध्यमातून इतर मागास समाजासाठी सुमारे ४००० कोटी रुपयांच्या योजनांची अमंलबजावणी करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. केंद्र शासनाने ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतला असून वैद्यकीय प्रवेशामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याचा निर्णयही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकार इतर मागास समाजावर अन्याय होऊ देणार नाहीअशी ग्वाहीही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

 

भटक्या विमुक्त समाजाला भरघोस निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            राज्यातील भटक्या विमुक्त समाजाला आणि त्यातील दुर्लक्षीत घटकांना भरघोस निधी देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. कोणत्याही घटकाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे सांगतानाच हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे सारथीबार्टीमहाज्योतीटीआरटीआय या महामंडळांना निधी उपलब्ध करून दिला जाईलअसेही श्री. पवार यांनी सांगितले.

            यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांच्यासह श्री. शेंडगेश्री. तडसडॉ. तायवाडेश्री. बावकरश्री. पडळकरलक्ष्मणराव गायकवाडपल्लवी रेणकेमंगेश ससाणेविश्वनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

      बैठकीस राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जिवतोडेसचिन राजुरकरपुरुषोत्तम प. शहाणे (पाटील)शरद वानखेडेसुभाष घाटेनरेश बरडेशकील पटेलदिनेश चोखारेप्रकाश भगरथभालचंद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

००००

 


एक तारीख एक तास” स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया

 एक तारीख एक तास स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन,

 

रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यभर मोहिम

 

            मुंबईदि. २९ : - स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊयाअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

            “स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात एक तारीख एक तास या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छतासाफ-सफाई करून या अभियानात सहभाग नोंदवू शकणार आहेत. गावा-गावांमध्येशहरातप्रत्येक वार्डात  सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्र ही सहभागी होतील. काही ठिकाणी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी विशेष शिबिरे-प्रदर्शने आयोजित केली जातील. ज्यातून स्वच्छतेची गरजत्यांचे फायदेमहत्व पटवून दिले जाईल.

            याबाबतच्या आवाहनात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे कीस्वच्छता  आपल्या सर्वाच्या दैनंदिनीतील महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते. आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा दृढ संबंध आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते अनेक थोर राष्ट्र पुरूष साधू-संतानीही स्वच्छतेबाबत आपल्याला धडे घालून दिले आहेत. याच अनुषंगाने आपल्या सर्वांना स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा हे अभियान यशस्वी करायचं आहे. एक तारीख एक तास या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपणआपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असालतिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहेअसे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी आपल्या राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-२ चा शुभारंभ केला. त्यातून महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा असे ध्येय घेऊन आता वाटचाल करत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे कीमहाराष्ट्राला अनेक थोरा-मोठ्यांनी परिसर स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयीचा मंत्र दिला आहे. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. आता या धड्यांची आपल्याला उजळणी करायची आहे. आपआपल्या परिसरात महापालिकानगरपालिकानगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची आहे. साचलेला कचराराडा-रोडा-डेब्रीज हटवायचे आहेत. यात आपल्या सर्वांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थामहसूल आणि जिल्हा प्रशासन सज्ज राहीलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे

            “स्वच्छता ही सवय आहे. आपल्याला स्वच्छतेची शिस्त अंगिकारायची आहे. त्याला संस्काराचे रूप द्यायचे आहे. या अभियानानंतर आपल्याला १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही देखील यशस्वी करायची आहे. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात आपल्या महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून द्याल. चला महाराष्ट्र कचरा मुक्त करूया. स्वच्छसुंदर करूया. आरोग्य आणि समृद्धीला गवसणी घालूया. स्वच्छतेचा जागर करूया, असेही मुख्यमंत्र्यानी आवाहन केले आहे.

00000

ती कोणी कोरली, कधी आणि कशासाठी? - चला, कातळशिल्पांच्या गूढ विश्वात

 ती कोणी कोरली, कधी आणि कशासाठी?

- चला, कातळशिल्पांच्या गूढ विश्वात


कातळशिल्पं... कोकणातील एक गूढ आणि रहस्यमय वारसा. तिथल्या पठारांवर असलेल्या कातळावर कोरलेली ही लहान-मोठी शिल्पं. त्यांची संख्या शेकडो. कितीतरी गावांमध्ये सापडली आहेत, अजूनही सापडत आहेत. पण त्यांच्यासोबत काही रहस्यं आणि गूढ वास्तव कायम आहे.

ती कोणी कोरली? त्यांचा काळ काय? त्यामागचा उद्देश काय? त्यांचा नेमका अर्थ काय? ती कोरण्यासाठीची साधनं काय?...

असे कितीतरी प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं अजूनही नेमकेपणाने देता येत नाहीत. ही कातळशिल्पं पाहणं - समजून घेणं म्हणजे अनोख्या दुनियेत सफर करण्यासारखंच.

अशी सफर करण्याची संधी "भवताल" उपलब्ध करून देणार आहे... अर्थातच तज्ञांसोबत !

तुम्ही येणार ना?


शुक्रवार-शनिवार-रविवार

१३ ते १५ ऑक्टोबर २०२३ 

(पुणे ते पुणे; सर्वसमावेशक)


संपर्क:

9545350862 / 9922063621


नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/Ecotour/Katalshilp

- भवताल टीम  



--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9



545350862 / bhavatal@gmail.com

Friday, 29 September 2023

गगनाला गवसणी घालणारा; शून्यातुन विश्व निर्माण करणारा अवलीया पत्रकार म्हणजे आत्मलिंग शेटे ---------

 गगनाला गवसणी घालणारा; शून्यातुन विश्व निर्माण करणारा अवलीया पत्रकार म्हणजे आत्मलिंग शेटे

--------------------------

जिसका कोई नही उसका तो खुदा है यारो..!! त्याप्रमाणे घरातुन कोणताही सामाजिक, धार्मिक, राजकीय, पत्रकारिता असा कोणताच वारसा नाही. ना-वडील-ना-भाऊ ना चुलता. वडील लहानपणीच न कळत्या वयातच म्हणजे वयाच्या चौथ्या वर्षीच वडील वारले. मग आई-बहिणी सोबत मामाकडेच प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. नंतर काही कारणास्तव मॅट्रीक-आय.टी.आय.शिक्षण घेवून घर सोडले व स्वतःचा इतिहास स्वतःच लिहणारे आमचे अवलीया पत्रकार परम मित्र व नातेवाईक आत्मलिंग शेटे हे आहेत.

पुणे येथे काही दिवस या आमच्या या मित्राने फक्त 150 रुपये पगाराने गॅरेजला व कंपनीत काम केले. नंतर परळी येथे स्थायिक झाल्यावरही आत्मलिंग शेटे यांचे हालअपेष्टा संपल्या नाहीत. परळी येथेही थर्मल पॉवर स्टेशला शटडाउन ला रोजंदारीवर काम केले. असे करत करत मालवाहु टेम्पोचा ही व्यवसाय केला.पण शेवटी कुठेच यश मिळत नव्हते. नंतर त्याने काही दिवस वैद्यनाथ बँक मध्ये पिग्मी एजंटचे काम केले, परंतु त्याला त्याचे आवडते पत्रकारिता क्षेत्र बोलावत होते. नंतर पत्रकारितेकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला व पुन्हा मागे वळुन पाहिले नाही.

-0 पत्रकारितेला सुरूवात 0-

इ.स.1985 मध्ये पत्रकरितेची सुरूवात केली व सुरवातीला अंबाजोगाई मधील जेष्ठ व निर्भिड पत्रकार अमर हबीब यांचे सा.अंबाजोगाई परिसर नावाचे वृत्तपत्र होते. त्यांचे पत्रकार म्हणून काम सुरू केले व नंतर स्वतःचे 23 मे 1993 रोजी स्व.ना.गोपीनाथराव मुंडे, स्व.ना.विमलताई मुंदडा, स्व.राजेश्वरराव देशमुख, स्व.भगवानराव लोमटे यांच्या हस्ते “सा.परळी समाचार”चे प्रथम अंकाचे प्रकाशन केले व या छोट्याशा वृत्तपत्र क्षेत्रातील रोपट्याचे संगोपन करुन ते आता 31 व्या वर्षात पर्दापन करीत असून जनमाणसात सर्व परिचीत असून अन्याय अत्याचाराच्या विरोधात परखडपणे प्रकाशित होत असते. त्यांच्या या वृत्तपत्राच्या यशस्वी वाटचालीमध्ये स्व.मोहनलालजी बियाणी, स्व. काशीनाथ वरपे, स्व.एम.पी.कनके, शंकरअप्पा मोगरकर, शिवशंकर झाडे, लक्ष्मण वाकडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी सुरूवातीला दै.मराठवाडा साथी परळी, दैनिक मराठवाडा औरंगाबाद, दै.तरुण भारत सोलापूर, दै.यशवंत लातूर, दै.लोकाशा बीड इत्यादी वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कार्य केलेले आहे.

-0 मान्यवरांकडुन पुरस्कार 0-

24 जुलै 2022 ला अ.भा.मराठी साहित्य परिषदेचा “पत्रकार भुषण” हा पुरस्कार, राष्ट्रीय अध्यक्ष शरदजी गोरे, संमेलनाध्यक्ष कवीयत्री जयश्रीताई बोहरा, उद्योगपती बाबाजी पाटील पनवेल यांच्या हस्ते देण्यात आला.

10 मार्च 2022 ला पुणे येथे “राज्यस्तरीय गुणीजन दर्पणरत्न” हा पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने मुख्य संयोजक अ‍ॅड.कृष्णाजी जगदाळे, ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर, समाजसेविका सौ.सुवर्णाताई खेडकर यांच्या हस्ते देण्यात आला.

6 जानेवारी 2022 रोजी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा “जीवन गौरव” हा पुरस्कार मा.ना.पंकजाताई मुंडे, विकासराव डुबे, जुगलकिशोर लोहिया इत्यादी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. 6/1/2018 रोजी दर्पण दिनानिमित्त समाजसेविका डॉ.शालीनीताई कराड, डॉ.बालासाहेब कराड यांनी ‘रिपोर्टर ऑफ द इअर’ हा मानाचा पुरस्कार आत्मलिंग शेटे यांना संपत्नीक देण्यात आला होता.

कोवीड-19 कोरोना काळात जाहीर पत्रक, वृत्तपत्रात लेख,फोटो इत्यादीचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लॉकडाउन मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आत्मलिंग शेटे यांचा “कोरोना योद्धा” हा पुरस्कार 15 ऑगस्ट 2020 ला ग्राहक संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजयजी पाठक अकोला यांनी दिला तर दुसरा पुरस्कार “कोरोना योद्धा” पुरस्कार नाशिक येथील जयहिंद क्रांती सेना मिशनचे या सामाजिक संस्थेच्या वतीने वृत्तपत्र माध्यमातून चांगले लिखान केल्याबद्दल, पोलिस प्रशासनाला मदत केल्याबद्दल 20/7/2020 रोजी प्रदेशाध्यक्ष डॉ.आनंदसिंग मोहिते यांनी “कोरोना योद्धा” म्हणून प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.

-0 सामाजिक कार्य 0-

आत्मलिंग शेटे यांनी पत्रकारितेसोबतच विरशैव समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेत असतात. त्यांनी सुरूवातीला1985 मध्ये गणपती उत्सवापासून सुरवात केली व नंतर सुरवातीला डॉ.सुरेशअप्पा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वधु-वर सुचक मेळावा, सामुहिक विवाह सोहळयामध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेवून विविध पदावर काम केलेले आहे.

2004 मध्ये अ.भा.शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहरजी धांडे सर यांच्या नेतृत्वाखाली, शिवा संघटनेचे जिल्हा उपप्रमुख म्हणूनही कार्य केले. युवा संघटन कलेले आहे.

इ.स.2005 मध्ये परळी येथील वीरशैव समाजाचे जेष्ठ नेते दत्ताप्पा इटके गुरूजी, विजयकुमार मेनकुदळे, सोमनाथअप्पा हालगे यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र विरशैव सभेचे जिल्हा युवा संघटक व जिल्हा सचिव म्हणून 15 वर्ष कार्य केलेले आहे.

सध्या 2023 पासून महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक मा.काकासाहेब कोयटे, अध्यक्ष सुनिलशेठ रुकारी, उपाध्यक्ष राजेंद्रआबा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आत्मलिंग शेटे यांची दि. 21 जुन 2023 रोजी लिंगायत संघर्ष समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करुन त्यांना समाजाचे एकत्रिकरण करणे, समाजाचे विविध प्रश्न, अडीअडचणीसाठी प्रयत्न करावेत म्हणून आत्मलिंग शेटे यांची निवड करुन त्यांचा समाज कार्याचे कौतुकच केलेले आहे.

आत्मलिंग शेटे यांनी सोनपेठ येथे श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या 9/11/2005 रोजी झालेल्या 5 वा पट्टभिषेक वर्धापन दिनानिमित्त पंचजगद्गुरू अड्डपालखी सोहळा या कार्यक्रमात सचिव म्हणून त्यांनी चांगले कार्य केले.

विरशैव समाजाचे विरशैव जोडो अभियानात सक्रीय सहभाग घेतला तसेच काकासाहेब कोयटे, सुनिलशेठ रुकारी, राजेंद्रआबा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथअप्पा हालगे, दत्ताप्पा ईटके, विजयकुमार मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सोबत दिनांक 11/7/2014 रोजी कराड येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर मोर्चात व उपोषणात सक्रीय सहभाग घेतला होता.

तसेच परळी येथे 15/7/2014 रोजी विरशैव समाजाला अल्पसंख्यांक दर्जा व आरक्षण मिळावे तसेच स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा म्हणून जो परळी शहरातील मुले, महिला पुरूष यांचा जो भव्य असा मोर्चा काढला होता. त्यात आत्मलिंग शेटे यांचा संयोजनात सिंहाचा वाटा होता व नंतर दत्ताप्पा इटके गुरूजी, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढुन उपजिल्हाधिकारी मा.सविताताई चौधर यांना विरशैव समाजाच्या वतीने निवेदन दिले होते. त्यात सक्रीय सहभाग घेतला होता.

5/6/2019 रोजी परळी येथे मा.अरविंदजी जत्ती यांच्या संकल्पनेतून जगतज्योती समतानायक, महात्मा बसवेश्वर संदेश यात्रा निमित्त परळी शहरात 14 फुटाचा भव्य अशा पुतळा असलेल्या संदेश यात्रेचे व बसव बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष मा.अविनाशजी भोशीकर यांच्या नेतृत्वाखाली या संदेश यात्रेचे आयोजन करण्यामध्ये आत्मलिंग शेटे यांचा संपुर्ण सहभाग होता.

-0 विरशैव गौरव पुरस्कार 0-

आत्मलिंग शेटे यांना लातूर येथे दि.4/6/2016 रोजी राष्ट्रसंत डॉ.ष.ब्र.प.शिवलिंग शिवाचार्य महाराज, खा.सुनिल गायकवाड, आ.महादेव जानकर, उद्योगपती शंकरराव बोरकर यांच्या हस्ते मा.प्रा.सुदर्शन बिराजदार यांनी बसव मेळाव्यामध्ये “समाजभुषण” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आली.

तर नांदेड येथे महात्मा बसवेश्वर समता परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय “बहुजनरत्न” हा पुरस्कार प्रदेशाध्यक्ष संतोषजी देशमुख व डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, बसव ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अविनाश भोशीकर, आ.रामराव अडकुते यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे.

19/4/2018 रोजी मुरुम येथे बसव परिषदेच्या वतीने अध्यक्ष श्रीशरण बसवराज पाटील व बसव परिषदेचे अध्यक्ष रामलिंग पुराणिक यांनी आत्मलिंग शेटे यांना भव्य अशा कार्यक्रमात बसवरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

11/3/2018 रोजी भोर येथे उन्नती महिला प्रतिष्ठाणच्या वतीने “पत्रकार भुषण” पुरस्कार देण्यात आला. असे अनेक पुरस्कार हे आत्मलिंग शेटे यांना देण्यात आलेले आहेत.

-0 रेल्वे बोर्ड सदस्य 0-

तसेच आत्मलिंग शेटे यांना दि.23/2/2013 मध्ये स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांनी रेल्वे बोर्ड कमेटी सदस्य म्हणून शिफारस केली. तसेच खा.प्रितमताई मुंडे यांनी देखील रेल्वे बोर्डाला शिफारस केल्यानंतर 3 टर्म रेल्वे बोर्ड कमेटी सदस्यपदी (डी.आर.यु.सी.सी.मेंबर) काम केलेले आहे. यामध्ये परळी रेल्वे स्टेशन मध्ये अनेक सुविधांचा सिकंदराबाद येथील डी.आर.यु.सी.सी.मिटींग मध्ये पाठपुरावा करुन विषय मांडले आहेत. अनेक मागण्या मान्य करुन घेतल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळातच फुट ओव्हरब्रिजवर शेड, अपंगांसाठी लिफ्ट नांदेड-पनवेल गाडीला डब्बे प्रवासी वाढवणे, तिरुपती बालाजी गाडीसाठी प्रयत्न केलेले आहेत. दिव्यांगासाठी पास सवलत योजनेसाठी भरपूर दिव्यांगांना पासेस मिळवुन दिलेले आहेत. तसेच रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवर भव्य अशी श्री महादेवाची पिंडीची स्थापना केली.

-0 विविध कार्य 0-

सध्या आत्मलिंग शेटे यांनी मानवता कल्याण मंडळ, ज्योतिर्लिंग सामाजिक प्रतिष्ठाण, पत्रकार संघटना, प्रवाशी संघटना, पोस्ट सल्लागार समिती, रामेश्वर देवस्थान, विरशैव दिनदर्शिका प्रकाशन इत्यादी अनेक संस्था, संघटनेत विविध पदावर कार्यरत आहेत.

20 ऑगस्ट 2023 रोजी त्यांची मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या परळी तालुका समन्वयक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष एस.एम.देशमुख व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक दत्तात्रय आंबेकर यांनी आत्मलिंग शेटे यांचे कार्य पाहुन नियुक्ती केलेली आहे.

आत्मलिंग शेटे यांनी समाजकार्यात विविध क्षेत्रात काम केलेले आहे. त्यांचा परळीतील विविध संस्था, संघटनेच्या वतीने ही त्यांचा सत्कार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सर्वश्री डॉ.हरिश्चंद्रजी वंगे दादा, वि.दा.सावरकर पतसंस्थेचे चेअरमन बाजीरावभैय्या धर्माधिकारी, बन्सलचे महाराष्ट्राचे प्रमुख चंदुलालजी बियाणी, विरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष दत्ताप्पा इटके गुरूजी, वारकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे, वैद्यनाथ देवस्थानचे सचिव राजेश देशमुख, जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ, जगद्गुरू भीमाशंकरलिंग महास्वामीजी केदारपीठ, एस.टी.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश गित्ते, बालाजी दहिवाळ, सुरेशजी टाक, पत्रकार संघ इत्यादींच्या वतीने अनेक वेळेस आत्मलिंग शेटे यांचा सत्कार झालेला आहे असे हे आमचे परममित्र आत्मलिंग शेटे यांचा आज दि.30/9/2023 रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना माझ्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा, त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रभु वैद्यनाथ चरणी प्रार्थना..!

............................

- बबनअप्पा डांगे (गुरुजी)

पद्मावती विभाग, परळी वैजनाथ, जि.बीड

मो.8308476199

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

                                                                                सुमंत भ

            मुंबई, दि.२९ : राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम,उपक्रम राबविण्यात यावेत तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका व नगरपालिका, नगर परिषद यांनी व्यापक प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करावे,असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिले आहेत.


            राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर २०२३ हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याबाबतचे परिपत्रक सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहे. या दिवशी सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र, परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सचिव श्री. भांगे यांनी सांगितले आहे. 


 

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील विद्यार्थी व लोकसहभागातून गड -किल्ले आणि परिसर स्वच्छता मोहीम

 राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील विद्यार्थी व लोकसहभागातून गड -किल्ले आणि परिसर स्वच्छता मोहीम .                                                    मंत्री मंगल प्रभात लोढा


 


१ ऑक्टोबर रोजी परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर रोजी गड-किल्ले परिसर स्वच्छता अभियान


 


            मुंबई,दि. 29 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याद्वारे १ ऑक्टोबर रोजी नजिकचा परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर रोजी राज्यातील गड -किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.


            मंत्री श्री लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात १ ऑक्टोबर रोजी 'स्वच्छतेसाठी एक तारीख -एक तास उपक्रम' राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने राज्यात कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय.) यांच्या माध्यमातून आणि स्थानिक लोकप्रतिनिधी,सामाजिक संस्था,दुर्गप्रेमी यांच्या सहभागातून १ ऑक्टोबर रोजी परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर रोजी गड-किल्ले परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियानात सहभागी होण्यासाठी जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाशी (आयटीआय) संपर्क साधावा.


            आपला परिसर आणि आपल्या इतिहासाचे साक्षीदार असलेले गड किल्ले स्वच्छ आणि सुंदर ठेवले गेले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 व्या वर्षानिमित्त कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील विद्यार्थ्यांद्वारे शिवरायांना एक अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम आखण्यात आली आहे. स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्रासाठी राज्यात १ ऑक्टोबर ते 15 डिसेंबर पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कौशल्य विकास विभागाच्या या स्वच्छता विषयक उपक्रमांसाठी सर्वांनी सहभागी होऊन व हे अभियान यशस्वी करूया असे आवाहन ही मंत्री श्री.लोढा यांनी केले आहे.


 


            व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी म्हणाले, राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. स्थानिक आय.टी.आय.आपल्या नजीकच्या गड किल्ल्यावर व परिसर स्वच्छता मोहीम स्थानिक नियोजनानुसार स्वच्छता मोहिमेचा उपक्रम राबविणार आहे.


 

गौरी पुजन, आगरी पद्धतीने शिरकी गाव पेन रायगड


 Nilakshi Patil Patil❤️🥰❤️: सर्व गाण्यांचे संकल्पना - स्मिता गावंड. लेखिका - स्मिता गावंड. मुख्य गायिका - सुनंदा गावंड. सह गायिका - स्मिता गावंड, मनीषा गावंड, निता पाटील, रुपाली पाटील, निलाक्षी पाटील. वाद्य वाजंत्री (ढोल) - पार्थ गावNilakshi Patil Patil❤️🥰❤️: Hech

Featured post

Lakshvedhi