Sunday, 27 August 2023

महाराष्ट्राच्या शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

 महाराष्ट्राच्या शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’


          नवी दिल्ली, 27: केंद्र सरकारकडून यावर्षीची 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ यादी जाहिर झाली असून, राज्यातून एकमेव जिल्हा परिषद शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना पाच सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’पुरस्कार मिळणार आहे.


 


दरवर्षी प्रमाणे यावर्षीही देशातील शिक्षकांना शिक्षक पुरस्काराने 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवन दिल्ली येथे प्रदान केले जाणार आहेत. श्रीमती मृणाल गांजाळे या जिल्हा परिषद समीक्षा शाळा गाव महाळुंगे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी राज्य शिक्षक पुरस्कार आणि आय.सी.टी. पुरस्कार मिळालेला आहे.


 


शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रीय शिक्षक दिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाते. यंदा मंत्रालयाकडून 50 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रत्येकी 50 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

अंदमान बोलावतंय !*

 *अंदमान बोलावतंय !*


*महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेली अंदमान यात्रा, नव्या हंगामाची नोंदणी सुरू करत आहोत.*


*आपल्या सर्वांचे आराध्य दैवत स्वा. सावरकर यांची अंदमनातून मुक्तता होऊन १०१ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने सावरकरांना अभिवादन करण्यासाठी शब्दामृत प्रकाशनातर्फे ही विशेष सहल आयोजित करण्यात येत आहे संपूर्ण प्रवासात सावरकर विचारांचा जागर करण्यासाठी प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, इतिहास अभ्यासक पार्थ बावस्कर हे सोबत असतील. या सहलींचे आणखी एक आकर्षण म्हणजे झी मराठी सारेगमप मधील आपल्या सर्वांची लाडकी गायिका मुग्धा वैशंपायन. या सहलीदारम्यान दररोज स्वा. सावरकर रचित गीते आपल्या सर्वांसमोर मुग्धा वैशंपायन आपल्या गोड स्वरातून सादर करणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य तपशील व काही वैशिष्ट्ये सोबत देत आहोत.*


*१. स्वा. सावरकरांना अभिवादन करण्यासाठी वंदे मातरम्, जयोस्तुते, आणि ने मजसी ने या गाण्यांचे गायन व सावरकरांची मुक्तता होऊन १०१ वर्ष झाली या निमित्ताने १०१ ज्योती प्रज्वलित करण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल.* 


*२. या कार्यक्रमादरम्यान व्याख्याते पार्थ बावस्कर हे सेल्युलर कारागृहात व्याख्यान देतील. प्रसिद्ध गायिक मुग्धा वैशंपायन यावेळी सावरकरांची गीते गातील. या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी.*


*३. अंदमान प्रवासात संपूर्णपणे ३ स्टार उत्तम दर्जाच्या हॉटेलमध्ये निवास व्यवस्था असेल. ट्विन शेअरिंग तत्वावर रूम्स असतील.*


*४. दररोज एकवेळ नाश्ता, एकवेळ चहा, आणि दोनदा उत्तम दर्जाचे शुद्ध शाकाहारी जेवण ( दोन्ही वेळीं गोड पदार्थ ) अशी परिपूर्ण व्यवस्था या प्रवासात असेल.*


*५.अंदमानात स्थळदर्शन करतांना प्रत्येक वेळी एसी बस / टेम्पो ट्रॅव्हलर गाडीचा प्रवास असेल.*


*६. या विशेष सहलीत मुख्य आकर्षण म्हणजे अंदमानातील प्राणी आणि पक्षी यांच्याशी संवाद साधणार्या, त्यांच्याशी बोलणाऱ्या श्रीमती अनुराधा राव यांच्या तोंडून सावरकरांचे आजवर कधीही न ऐकलेले अनुभव ऐकता येतील.*


*७. सहभागी प्रत्येकाला सावरकरांनी त्यांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेसोबत गळ्यात अडकवलेला बिल्ला अभिमानाने धारण करायचा आहे,आमच्यातर्फे सहभागी प्रत्येकाला हा ऐतिहासिक आणि दुर्मिळ बिल्ला भेट देण्यात येईल. या बिल्याचे महत्व अनन्यसाधारण आहे.* 


*८. सहलीत दररोज व्याख्याते,लेखक पार्थ बावस्कर हे सावरकरांच्या जीवनावरील विविध पैलू उलगडणारे व्याख्यान सादर करतील. दररोज एक तास हे व्याख्यान होईल. मुग्धा वैशंपायन विविध राष्ट्रभक्तीपर गीते गातील.*


*९. सहलीदरम्यान पार्थ बावस्कर यांच्या संकल्पनेतून साकारलेला "हे मातृभूमी तुजला" हा कार्यक्रम मुग्धा वैशंपायन आणि पार्थ बावस्कर सादर करतील.*


*१०. पोर्टब्लेअर शहर, नेताजी सुभाष -पूर्वीचे रॉस बेट, शहीद बेत - नील बेट,स्वराज्य बेट - हॅवलॉक बेट या विविध स्थळांना भेटी देण्यात येतील. शहीद व स्वराज्य बेटांवर प्रत्येकी एक रात्र मुक्काम असेल, येथील समुद्रकिनारे जगभर प्रसिद्ध आहेत, आशिया खंडातील क्रमांक २ वर असणाऱ्या राधानगरी बीचवर भरपूर वेळ घालवता येईल.*


*११. लाईमस्टोन लेणी या खाऱ्या पाण्यापासून बनलेल्या गुफा आणि सोबतच जारव्हा नावाचे दुर्मिळ आदिवासी प्रजाती हे दोन्ही बघण्याची सुवर्णसंधी या सहलीत आम्ही उपलब्ध करून देत आहोत. सोबत मॅनगृव्ह फॉरेस्टला भेट देण्यात येईल.*


*१२. संपूर्ण दिवसभरात सावरकरांनी जो त्याग केला, जे कष्ट भोगले त्याची माहीत नसलेली कहाणी ऐकत ऐकत अंदमानातील सर्वोत्तम आणि जगप्रसिद्ध स्थळांना भेटी देण्यासाठी विशेष आयोजन म्हणजे "अंदमान बोलावंतय" ही विशेष सहल.*


*१३. या प्रवासादरम्यान ६ तासांचा अविस्मरणीय जहाज प्रवास करायचा आहे तोही काळ्या पाण्याच्या समुद्रातून. हा प्रवास तीन टप्यात असेल.*

*पोर्ट ब्लेअर ते स्वराज्य द्वीप*

*स्वराज्य ते शहीद द्वीप* 

*शहीद ते पोर्ट ब्लेअर*


*१४. दिनांक 20 ते 26 नोव्हेंबर 2023* 

*दिनांक 22 ते 28 जानेवारी 2024* 

*या यंदाच्या तारखा आहेत. पोर्ट ब्लेअर येथे दुपारी १ पर्यंत पोहोचेल असे विमान आपण बुक करायचे आहे.*

 

*१५. सावरकरांच्या मुक्ततेनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी ही सहल आहे, त्यामुळे निवडक सावरकरप्रेमीना सहभागी करून घेण्यात येईल. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची विशेष काळजी घेतली जाईल.*


*१६. एकूण मूल्य आहे ३९,५००/- ( incl GST ) ज्यात अंदमान ते अंदमान असा संपूर्ण प्रवास, निवास, जेवण, स्मारकाची तिकिटे, जहाज प्रवास यांचा समावेश आहे. मुंबई किंवा पुणे येथून अंदमान पर्यंत विमानाची तिकिटे आपण काढायची आहेत.*

*प्रत्येकी रुपये १०,०००/- विनापरतावा भरून आपण आपली जागा नक्की करू शकता.*


*१७. अंदमानातील बहुतांश स्थळे दाखवणारी तसेच व्याख्याते,लेखक पार्थ बावस्कर यांची व्याख्याने आणि मुग्धा वैशंपायन यांची गीतमैफल आयोजित करणारी ही एकमेव यात्रा आहे.*


*१८. या यात्रेतील सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे सेल्युलर कारागृहात जाऊन सावरकरांना अभिवादन करणे. यासाठी आपण बराच वेळ राखून ठेवला आहे. यावेळी आपल्याला तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.* 


*१९. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानात सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवला. त्या स्थानावर आज एक अतिभव्य भारताचा तिरंगा उभारण्यात आला आहे. या यात्रेत आपण सायंकाळी तिरंगा स्थानाला भेट देऊन अभिमानाने त्याची कहाणी पार्थ बावस्कर यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. या ठिकाणी मुग्धा वैशंपायन यांच्या सुमधुर स्वरात आपण राष्ट्रगीत आणि वंदे मातरम मोठ्या अभिमानाने गणार आहोत.*


*२०. अंदमानातील ख्यातनाम आणि जगविख्यात असलेला लेझर शो पाहून कार्यक्रमाची सांगता होईल.*

*मित्रहो,* 

*ज्या सावरकरांनी अंदमानात ५० वर्ष शिक्षा भोगण्याच्या इराद्याने पाऊल ठेवले, हाल सोसले त्यांना वंदन करण्यासाठी एकदा तरी अंदमानला जायलाच हवे. आतापर्यंत सुमारे दीड हजार लोकांना आम्ही यशस्वी अंदमान सहल घडवली आहे. आपणही हा अनुभव घ्या. आपल्या प्रत्येकाचे ते कर्तव्य आहे.आपण आपल्या परिचितांना या सहलीत सामील करा, तरुणांपर्यंत हा सावरकर विचार नेण्यासाठी ही माहिती आपल्या परिचितांना नक्की शेअर करा, चला, अंदमान बोलावंतय !*


आपले

*शब्दामृत प्रकाशन*

*बुकिंगसाठी सम्पर्क - ९९७००७७२५५*

रेडीओची एक सुरम्य आठवण...आवडलेली पोस्ट

 रेडीओची एक सुरम्य आठवण...आवडलेली पोस्ट 


 हे सगळं आपण अनुभवलंय.... 

ते परत एकदा जागवा...


*आकाशवाणीचे हे मुंबई केंद्र आहे...*


*नमस्कार श्रोतेहो…!*


मध्यम लहरी *"तीनशेअठ्ठ्यात्तर अंश सात आठ मीटर्स अर्थात सातशेब्याण्णव किलोहर्ट्झ"* 

वर आकाशवाणीचे हे केंद्र आहे…किंवा “२३९.८१ मीटर म्हणजेच १२९१ किलोहर्ट्ज“ वर आकशवाणीच्या केंद्रा वरून आम्ही बोलत आहोत…


*सकाळचे पाच वाजून पन्नास मिनिटे व दहा सेकंद झाली आहेत आहेत…* असा निवेदिकेचा मंजूळ स्वर कानी पडायचा आणि सनईचे सूर वाजायचे. 


कधी सांगली, कधी पुणे, तर कधी मुंबई केंद्र एवढाच काय तो फरक. 


बाकी कार्यक्रम सगळीकडे तितकेच सुरेल आणि सुंदर …

हे सगळं काय?..... *तर एकेकाळचा “रेडिओ” आणि “आमचं जीवन”....* 


*आज पुन्हा आठवलं नव्यानं.*


किती रम्य दिवस होते ते आणि अविस्मरणीय आठवणी..!! आठवण एवढ्याच साठी म्हटलं कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं एक वेगळ स्थान होतं 


कारण त्या *“रेडिओच्या” जमान्यात* आपण लहानाचे मोठे झालो आणि हा रेडिओ म्हणजे आपल्या घराचा कुटुंबाचा एक सदस्य होता..

   

माझं बालपण हे दोन वेगवेगळ्या घरामधून गेलेलं. मातीच्या भिंती आणि काळ्या कौलाचं छप्पर असलेलं घर. बाहेरच्या खोलीतील एका भिंतीवरच्या कपाटात असायचा आमचा भला मोठा रेडिओ. 


त्यानंतर दुसऱ्या घरात तो लाकडी फळीवर आला. त्याला जोडलेला एक स्पिकर बॉक्स स्वैपाकघरातपण असायचा. कालांतराने आमच्याकडे मर्फी चा ट्रान्सिस्टर पण आला, त्याला चामड्याच एक भक्कम कव्हर पण होतं आणि गळ्यात अडकावायला त्याला चामड्याचा एक पातळ पट्टा होता. *त्या काळी रेडिओला वर्षाला सहा रुपये लायसन्स असायचे* …. 


आमचा हा रेडिओ इलेक्ट्रिक वर चालणारा असायचा आणि ट्रान्सिस्टर इलेक्ट्रिक आणि बॅटरी शेल दोन्हीवर चालायचा…. एकाचवेळी तीन शेल टाकावे लागायचे… तेव्हा फक्त एव्हरेडी कंपनीचे शेल मिळायचे…..असो..


असा हा आमचा रेडिओ सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी एका विशिष्ट धुन ने चालू व्हायचा…..


एक मिनिटाची ती धून बंद होताच… 


आपोआप ‘’वंदे मातरम्” सुरु व्हायचा अन मग दिल्ली केंद्रावरुन प्रक्षेपित होणार्‍या व पुणे केंद्राहुन सहक्षेपित हिंदी बातम्या प्रसारित व्हायच्या… — “ये (थोडा श्वास घ्यायचा,मग ) आकाशवाणी है *”अब देवकी नंदन पांडे से समाचार सुनिये”*…हा आवाज म्हणजे तेव्हा देशाचा आवाज झाला होता…!!


एकदा बातम्या संपल्या कि मग प्रभात वंदन व लगेच भक्तीगीतांचा कार्यक्रम सुरु व्हायचा....


दिवसाची खऱ्या अर्थानं मंगलमय सुरुवात असायची ती...


घनश्याम सुंदरा,

श्रीधरा अरुणोदय झाला….उठी लौकरी वनमाळी उदयाचळीं मित्र आला….


आनंदकंदा प्रभात झाली..उठी सरली राती…काढी धार क्षीरपात्र घेऊनी..धेनू हंबरती… लक्षीताती वांसुरेंहरी धेनुस्तनपानाला…..


या भूपाळी बरोबर लता मंगेशकर यांची “’रंगा येई वो रे…विठाई विठाई माझी कृष्णाई—कान्हाई $$”’ किंवा “पैल तोहे कावू कोकताहे, शकून गे माहे सांगताहे…”, ‘’भेटी लागी जीवा लागलेसी आस,…पाहे रात्रंदिवस वाट तुझी..” असं भक्तिमय संगीत चालू असायचं. 


याला जोड म्हणून पंडित भीमसेन जोशी यांची "इंद्रायणी काठी देवाची आळंदी...लागली समाधी ज्ञानेशाची.." किंवा मोठी ताण आवळत “जे का रंजले गांजले’ त्यासी म्हणे जो आपुले…” अशी भक्ती गीते धीरगंभीर आवाजात ऐकू यायची. 


बाबूजींचं 'समाधी साधन संजीवन नाम' हे ६ वाजून २० मिनिटांनी हटकून असायचच. 


शाळेच्या दिवसात क्लास ला जाण्यासाठी हे गाणं झालं कि सायकलचं पायंडल मारायचं. घड्याळ कधीच बघावं लागत नव्हतं. बऱ्याच वेळा घड्याळ असायचं पण नाही. *सगळं काही चालायचं ते रेडिओ वरच.*


सकाळी चहाचा घोट घेत असताना ६:५५ ला संस्कृत बातम्या चालू व्हायच्या ते आम्हाला काही कळत नव्हतं पण दररोज ते सुरुवातीच पठण ऐकून *“इयं आकाशवाणी | संप्रति वार्ता: श्रूयन्ताम् | प्रवाचकः बलदेवानन्द सागरः |…”* हे आमचं पाठ झाल होतं…..पुढे आम्ही कॉलेजला जाईपर्यंत किती तरी वर्षे तोच आवाज होता..!!. संस्कृत कुणाला काही समजत नव्हते 


पण, 


आतून आई चा आवाज मात्र यायचा...संस्कृत बातम्या झाल्या रे...आंघोळीला जा...

    

सकाळी सात वाजता पाच मिनिटाच्या हिंदी बातम्यांच्या सुरुवातीला बातमीदार एक आवंढा गिळून— *“”ये (थोडा श्वास घ्यायचा, मग) आकाशवाणी है” अब सुब्रम्हण्यम स्वामी से समाचार सुनिये”"*

    

बरोब्बर सात वाजून पाच मिनिटांनी घोषणा ऐकू यायची…

   *“आकाशवाणी पुणे! सुधा नरवणे (किंवा भालचंद्र कुलकर्णी) आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत!!”*— *ठळक बातम्या… सुधा नरवणे आणि त्यांचा आवाज* आजही आठवतो. अत्यंत स्पष्ट आवाजात आणि १० मिनिटात त्यावेळचे जग समजायचे.

     

सकाळी ८ वाजता हिंदीतून मग ८ वाजून १० मिनिटांनी इंग्रजी मधून दिल्ली केंद्रावरच्या बातम्या प्रसारित व्हायच्या. नंतर साडे आठ वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे *मराठी बातमीपत्र हे दत्ता कुलकर्णी, नंदकुमार कारखानिस, माधुरी लिमये, मृदुला घोडके* त्यावेळी द्यायचे. आजही त्यांचे आवाज कानांत बसलेले आहेत.


८ वाजून ४० मिनिटांनी कधी नाट्यसंगीत तर कधी चित्रपट संगीत तर कधी भावगीते प्रसारित होत असत.

    

अकरा वाजता आकाशवाणी मुंबई ब केंद्रावरुन *कामगार सभा* हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम लागायचा…. त्याकाळी *शाहीर दादा कोंडके* याचं लोकप्रिय झालेलं *“मळ्याच्या मळ्यामधे कोण ग उभी"* अन् *"अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान"* हि गाणी हटकून असायची…. 

ऐकून ऐकून आम्हा पोरांची ती गाणी तोंडपाठ झाली…!!

   

दुपारी बारा वाजता बाई माणसाची घरातील सर्व आवरा सावर झाली की, *”माजघरातल्या गप्पा”* हा कार्यक्रम चालू झाला की त्या प्रत्येकाला त्या गप्पा आपल्या घरातल्या गप्पा वाटायच्या… 


*सरु बाईंचा सल्ला* हा घरातील वडिलधाऱ्या मंडळीने दिलेला सल्ला वाटायचा….

    

संध्याकाळी पुन्हा रेडिओचा ताबा मिळायचा….


साडेसहा वाजता *“कामगारांसाठी”* असा पुन्हा एक विरुगंळ्याचा कार्यक्रम लागायचा…

त्यात लोकसंगीत, लोकगीतं, कोळीगीत,भारुडे, अशा गाण्यांचा भरणा असायचा...

शाहीर विठ्ठल उमप, अनंत फंदी यांची कितीतरी गाणी त्यावेळी ऐकलीय — *“बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको—संसारामधी असा आपला, उगाच भटकत फिरु नको”* हे गाणं आजही कानात गुणगुणतय..!!

    

संध्याकाळी साडेसहाला शेतकऱ्यांच्या साठी दररोज एक *आपली शेती* नावाचा अर्ध्या तासाचा प्रायोजित कार्यक्रम लागायचा…..


लहान असल्यानं शेतीतील कार्यक्रमाचा काहीच कळायचं नाही पण… *“झुळझुळ वाणी.. खेळवा पाणी.. आणायचं कुणी.. सांगतो राणी... फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावाणी…. फिनोलेक्स”*…हि मध्येच वाजणारी जाहिरात बरोबर म्हणायचो…

    

संध्याकाळी सात वाजता मुंबई केंद्रावरुन मराठी बातम्या लागायच्या… *वृत्तनिवेदका श्रीमती इंदुमती काळे* आठवतात. बातम्यांची वेळ झाली कि शेजारी पाजारी गल्लीतले ज्यांच्याकडे रेडिओ आहे, त्यांच्या अंगणात गोळा व्हायचे अन कधी कधी वडीलधारी मंडळी कट्ट्यावर त्या बातम्या ऐकत बसायचे…..


मग गल्ली पासून ते अमेरिकेच्या अध्यक्षापर्यंत चर्चा व्हायची. अमेरिका आणि रशियाने काय करायला हवे याचा हि सल्ला दिला जायचा वडीलधाऱ्या मंडळींकडून.

    

रात्री ८ वाजता दिल्ली केंद्रावरच्या इंग्रजी मधून क्रीडा बातम्या असायच्या आणि बरोबर ८ वाजून ५ मिनिटांनी दिल्ली केंद्रावरच्या मराठी बातम्या...आणि *आकाशवाणी दत्ता कुलकर्णी (किंवा नंदकुमार कारखानिस)* आपल्याला बातम्या देत आहेत ....." असा दमदार आवाज घरात घुमायचा..

    

घरातील लोकांची जेवणं व्हायची तोपर्यंत नऊ वाजलेले असायचे मग *नभोवाणी आणि मित्रमंडळ सादर करत आहे एक नाटिका...* असा एक श्रवणीय अर्ध्या एक तासाचा नाट्यप्रयोग लागायचा…. 


ते ऐकत असताना आपण प्रत्यक्ष ते नाटक अनुभवतोय असं भास व्हायचा…..

   

तोर्यंत घरात अंगणात/घरात गाद्या, गिरद्या, गोधड्या, वाकळ असं काही बाही टाकून झोपण्याची तयारी केलेली असायची अन नेमकं त्याच वेळी जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम चालू व्हायचा…. मग मोकळ्या हवेत अंथरुणावर लोळत पडत ही सुमधुर श्रवणीय गाणी ऐकत कधी झोपी जायचो ते कळत पण नसायचं….!!

    

असाच रात्री ९ वाजता प्रसारीत होणारा आणखी एक साप्ताहिक लोकप्रिय कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम *“आपली आवड”* की ज्यात पत्राने लोक मराठी गाणी आकाशवाणी केंद्राला कळवायचे आणि मग ज्या गाण्यासाठी जास्त पत्रं आलीत ती गाणी मग आपल नावं घेवून त्या कार्यक्रमात लावली जायची….!! 


सूर्य मावळतीला गेल्यावर संध्याकाळी *सांजधारा* म्हणून एक भावगीतांचा कार्यक्रम चालू व्हायचा *“अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवुनी जाती”* किंवा *‘’संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखाची जाणीव तिजला नाही….. संथ वाहते कृष्णामाई’’* ही आणि अशी अनेक अरुण दाते आणि सुधीर फडके यांनी गायलेली भावगीते आजही मनात घर करून उभी आहेत..!

    

असाच एक साडेनऊ वाजता रेडिओवर *‘गम्मत-जम्मत’* हा लहान मुलांचा कार्यक्रम लागायचा…. *’गम्मत जम्मत. या या या गम्मत जम्मत. ऐका हो गम्मत जम्मत. या या या ढिण्चॅक ढिण्ण, ढिण्चॅक ढिण्चॅक ढिण्ण’* अशी त्या शिर्षक गीतानं कार्यक्रमाची सुरुवात व्हायची…. त्यातलं शेवटचे *‘गम्मSSSSत जम्मSSSSत’* हे शब्द कानावर आले कि आम्ही मुलं हात वर करून ते शब्द त्या रेडिओ सोबत म्हणायचो…!!

    

शनिवारी रात्री साडेनऊला नाटकांचे, कादंबरीचे नभोवाणी रुपांतर चांगले असायचे.

     

तेंव्हा रेडिओवर जास्त करून मराठी कार्यक्रमच ऐकले जायचे. 


मराठी सिने संगीत, शास्त्रीय संगीत, श्रुतिका, चर्चा, किर्तनं, बाजारभाव इत्यादी इत्यादी. पैकी रात्रीची *'टेकाडे भाऊजींची'* श्रुतिका, रात्रीची *आपली आवड* हे अगदी न चुकवायचे कार्यक्रम. हिन्दी कार्यक्रम ऐकायचेच नाही असेही नाही. 


दुपारी अडीच वाजता विविध भारती, त्यातील *'फौजी भाईयों कि खिदमत में'* सादर होणार्‍या कार्यक्रमात येणार्‍या मोठेमोठ्या निर्माते, दिग्दर्शक, हिरो - हिरॉइन्स वगैरे ग्लॅमरस व्यक्तींना प्रत्यक्ष 'ऐकायला' मिळायचं. गाणी तर सुंदर असायचीच. 

      

दर बुधवारी रात्री ८ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी *"बिनाका गीत माला"* हा कोणतं गाणं या आठवड्यात किती नंबरला आहे... याबाबतचा एक तासाचा कार्यक्रम लागायचा…. त्यात ते अमिन सायानीचे निवेदन... *“भाईयो और बहेंनो, तो चलो देखते है, इस हप्ते में पायदान नंबर चार पे कौनसा गाना है..”*

हे असं त्यांनी म्हंटल कि, आमच्या घरामध्ये त्या गाण्यावरुन पैजा लागायच्या…..कोण जिंकतंय कोण हरतयं यापेक्षा आपला अंदाज बरोब्बर आल्याचा आनंद अधिक असायचा…..तो अमीन सयानी म्हणजे प्रत्येकाला आपल्या घरातील माणूस वाटायचा... इतकं जिवंत ते सादरीकरण कानाला अन मनाला भावायचं..!! 


*बिनाका गीतमालाचा वार्षिक कार्यक्रम* म्हणजे गाण्यांची मेजवानीच. आमच्या काळातल्या गाण्यांशी आमचं भावविभोर विश्व निगडीत होतंच की! आम्ही कागद-पेन घेऊन ती यादी लिहून काढायचो. वषभरातल्या आपल्या आवडत्या गाण्यांशी ती ताडून पाहायचो. अमीनभाईंचा आश्वासक, आपलासा वाटणारा आवाज, ती गाणी! ते गायक! व्वा! असे दिग्गज कलाकार ज्या शतकात जन्मले, त्याच शतकात आपलाही जन्म झाला आहे, या सुखद जाणिवेनं आजही किती कृतकृत्य वाटतं.


रात्री सव्वानऊला *'ईगल फ्लास्क'* प्रस्तुत इन्स्पेक्टर ईगल ह्यांची विनोदी मालिका लागायची 


तर *'हवामहल'* कार्यक्रमात वेगवेगळ्या पुरातन ऐतिहासिक वास्तू स्वतः इतिहास कथन करायच्या.

    

फौजी भाईयों की पसंद के फिल्मी गाने!’ जिवाचा कान करून ऐकायचो. या कार्यक्रमासोबत मदमस्त गाण्यांचा जो सिलसिला सुरू व्हायचा तो थेट रात्रीपर्यंत 

(काय हो? *ते झुमरीतल्लैया नेमकं कुठल्या राज्यात आहे बरं!*). 


सर्वचजण *‘बेला के फूल’* हा कार्यक्रम संपताच निद्रादेवीची आराधन करायचे आणि सरतेशेवटी रेडिओ बंद व्हायचा. 


तुमच्याहि रेडिओच्या काही आठवणी नक्की असतील….. या आणि अशा कितीतरी रेडिओच्या आठवणी मनात आजही घर करून उभ्या आहेत……


निर्जीव असला तरी, घराघरातील तो एक हक्काचा आपलेपणाचा सदस्य होता…..


एकवेळ आपण चुकू पण तो कधीच चुकत नव्हता……टीव्ही च्या काळात जरी डोळे सुखावले असले तरी पण कान आणि मन मात्र त्या जुन्या आठवणीत गुरफटुन राहिले…. 


हा रेडिओच आमचा सुख-दु:खाचा साथी होता.


ह्या सर्व गोष्टींची चमचमती झालर लाभलेलं आमचं बालपण आठवलं की अजूनही मन हळवं होतं.

                        🙏🌹🙏

*आज हर किसी की उम्र 2023 है*

 *आज हर किसी की उम्र 2023 है*

क्या आप जानते हैं कि *आज पूरी दुनिया एक ही उम्र की है!* 

आज का दिन बहुत खास है और *यह हर हजार (1,000) साल में केवल एक बार होता है*

आपकी *आयु + आपके जन्म का वर्ष, प्रत्येक व्यक्ति = 2023*

यह इतना अजीब है कि विशेषज्ञ भी इसकी व्याख्या नहीं कर सकते! 

*आप इसे जांचें और देखें कि क्या यह 2023 है* इसका हजारों वर्षों से इंतजार किया जा रहा है!

उदाहरण:

मैं 62 साल का हूं.

मेरा जन्म 1961में हुआ था.

*तो 62+1961=2023*

इस वर्ष के दौरान अपनी आयु का उपयोग करें।

उदाहरण:

मेरा जन्म 1993 में हुआ था और मेरी उम्र 30 साल है।

*1993 +30=2023*

बहुत ही रोचक। 

*कृपया इसे आज़माएँ*

😊😊😊😊😊😊😊

*मस्तरहे, स्वस्थरहे,व्यस्तरहे*

गणितात अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्यांनी नि:शेष भाग जातो.*

 *गणितात अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्यांनी नि:शेष भाग जातो.*


*अशी कोणतीही संख्या नाही असेच बहुतांश जणांचे म्हणणे होते.*


 *पण हा एक आकडा खूपच विचित्र आहे आणि जगातील सर्व गणितज्ञांना धक्का बसला आहे.*


*ही संख्या भारतीय गणितज्ञांनी त्यांच्या अविचल बुद्धिमत्तेने शोधून काढली.*


 *ही संख्या २५२० पहा.*


 *ही अनेक संख्यांपैकी एक असल्याचे दिसते,*


 *…. तथापि, प्रत्यक्षात तसे नाही,*


*२५२० ही अशी संख्या आहे, ज्याने जगभरातील अनेक गणितज्ञांना आश्चर्यचकित केले आहे.*


 *२५२० या संख्येला १ ते १० पर्यंतच्या कोणत्याही संख्येने नि:शेष भाग जातो.*


 *सम किंवा विषम:*


 *हे खरोखर आश्चर्यकारक आणि अशक्य असल्यासारखे वाटते.*


 *आता, खालील तक्ता पहा;*


 *२५२० ÷ १ = २५२०*


 *२५२० ÷ २ = १२६०*


 *२५२० ÷ ३ = ८४०*


 *२५२० ÷ ४ = ६३०*


 *२५२० ÷ ५ = ५०४*


 *२५२० ÷ ६ = ४२०*


 *२५२० ÷ ७ = ३६०*


 *२५२० ÷ ८ = ३१५*


 *२५२० ÷ ९ = २८०*


 *२५२० ÷ १० = २५२*


 *२५२० या संख्येचे रहस्य [ ७ × ३० × १२ ] च्या गुणाकारात लपलेले आहे.*


*भारतीय हिंदू वर्षाच्या संदर्भात, या २५२० क्रमांकाचे कोडे सोडवले आहे.*


 *हे या संख्येचे गुणांक आहेत.*


 *आठवड्याचे दिवस (७),*


 *महिन्याचे दिवस (३०)*


 *आणि वर्षातील महिने (१२)*


 *[ ७ × ३० × १२ = २५२० ] हे काळाचे वैशिष्ट्य आणि प्रभुत्व आहे.*


 *महान गणिती ज्याने ते शोधले होते;*

*श्री श्रीनिवास रामानुजम.* 

🙏🙏🌹🌹

बालेवाडी येथे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’प्रदान सोहळा २८ ऑगस्ट रोजी

 बालेवाडी येथे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’प्रदान सोहळा २८ ऑगस्ट रोजी


क्रीडा मंत्री संजय बनसोडे


            मुंबई, दि २७: क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०१९-२०,२०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचे पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते २८ ऑगस्ट रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, येथे सायंकाळी पाच वाजता प्रदान करण्यात येणार आहेत.


 


            हा पुरस्कार प्रदान सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतीत संपन्न होणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.


 


             मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, तसेच क्रिडापट्टूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या सोहळयात तीन वर्षांचे एकूण ११९ पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार (सन २०१९-२० ) श्री. श्रीकांत शरदचंद्र वाड (ठाणे) यांना, (सन २०२०-२१) श्री दिलीप बळवंत वेंगसरकर आणि (सन २०२१-२२) श्री.आदिल जहांगिर सुमारीवाला, (मुंबई) यांना प्रदान करण्यात येणार असून विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.


 


            उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील , विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


                                                   

         ००००


 


 


निर्माल्य" आपणास काय शिकवते ???? जरुर वाचण्या सारखे.

 "निर्माल्य" आपणास काय शिकवते ???? जरुर वाचण्या सारखे.


ताज्या फुलांचे आपल्याला गोड कौतुक असते आणि ती देवाच्या पायांवर वाहिली की आणखी आनंद होतो, फुलांचाही फुलण्याचा जन्म सफल होतो.


फुले घेताना ती 'माझी' असतात, पण देवाला वाहिली की 'त्याची ' होतात...... किती शांतपणे आपण हे स्वीकारतो. अगदी अलिप्त


'ज्याचे होते त्याला दिले' फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते.


काल वाहिलेली फुले आज शिळी होतात. निर्माल्य होऊन जातात. मग निरिच्छ मनाने, ती उचलून आपण गंगार्पण करतो.


त्यांच्याप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो. अपेक्षा नसते. हे कसे सोडू? हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही.


अगदी तसेच, आपली दुःखे 'त्याच्या' चरणावर वहायची आणि शांत होऊन जायचे, त्यांच्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही.


गण गण गणात बोते...

Featured post

Lakshvedhi