"निर्माल्य" आपणास काय शिकवते ???? जरुर वाचण्या सारखे.
ताज्या फुलांचे आपल्याला गोड कौतुक असते आणि ती देवाच्या पायांवर वाहिली की आणखी आनंद होतो, फुलांचाही फुलण्याचा जन्म सफल होतो.
फुले घेताना ती 'माझी' असतात, पण देवाला वाहिली की 'त्याची ' होतात...... किती शांतपणे आपण हे स्वीकारतो. अगदी अलिप्त
'ज्याचे होते त्याला दिले' फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते.
काल वाहिलेली फुले आज शिळी होतात. निर्माल्य होऊन जातात. मग निरिच्छ मनाने, ती उचलून आपण गंगार्पण करतो.
त्यांच्याप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो. अपेक्षा नसते. हे कसे सोडू? हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही.
अगदी तसेच, आपली दुःखे 'त्याच्या' चरणावर वहायची आणि शांत होऊन जायचे, त्यांच्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही.
गण गण गणात बोते...
No comments:
Post a Comment