Sunday, 21 May 2023

फूल है बहरोका

 युनायटेड अरब अमिरातने दुबईत उभारलेलं हे "पुष्प उद्यान" म्हणजे चित्ताकर्षक आणि विलोभनीय आविष्कार.... एक डोळा बंद करून 3D चा अनुभव घ्या... तुम्हाला नक्कीच मज्जा वाटेल अशी रचना... मग चला सफर करू या 👍👍🌹🌹🙏🙏


🥀.. सब्जा.. तुळशिचे बि..*

 *🌾🥀.. सब्जा.. तुळशिचे बि..*



 *माहिती आपल्याला आवडली तर नक्की शेअर करा*


 

   उन्हाळ्याचि सुरवात झालि , तशि उन्हाळ्याचा कडाका वाढत चालला आहे. आपण काहि कामानिमित्त बाहेर पडतो, आणि उन्हाचि सामना करावा लागतो, सूर्याचि किरणे सरळ प्रूथ्विवर येउन मद्यावर येत असल्याने , उष्णतेचे प्रमाण वाढते.

   🥀 नाकातून रक्त येतं, भोवळ येते, उष्माघाताचा झटका येतो, उन बाधण्याचे प्रमाण वाढते, अश्या अनेक समस्या निर्माण होतात, या सर्वावर।.,, सब्जा,, म्हणजे तुळशिचे बी, उपयुक्त उपाय आहे,

      , सब्जा, चविला गोड आहे, आणि शरिरातिल उष्णता कमि करून थंडावा देते. भरपुर प्रथिने असतात, यांत फायबर, ओमेगा, फाँलिक अँसिड, कँलशिअम, मँग्नेशिअम, लोह, व्हिटमिन सि, ए, भरपुर प्रणाणांत आहे..

 🥀.. फायदे🥀...(१).. सब्जामुळे प्रतिकारशक्ति वाढते, सब्जामद्धे कँलरीजचे प्रमाण अधिक असते,(२). सब्जामद्ये अल्फा लिनिलेनिक अँसिड असते, ते वजन कमी करण्यासाठी उपयोगि ठरते रोज रात्री पाण्यात भिजवून त्यात लिंबु लस व मध मिसळून ठेवा, सकाळि घ्यावे

    🥀..(३).. त्वचा विकारांसाठी सब्जा लाभि आहे

 त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, तजेलदार राहते,(४) मधूमेहावर गुणकारी आहे.. साखर नियंत्रित राहते

(५)..🥀.. पोट साफ करण्याचे उत्तम औषध आहे.

   बी पाण्यात भिजवून सकाळि घ्यावे..

(६) मायग्रेन, डिप्रेशन, मानसिक दौर्ब्यल्य, दूर होते , अंगावर येणारि सूज कमी होते,(७) खोबरेल तेलात जर सब्जा बी चे चूर्ण मिसळून लावले तर, सोरायसिस, एक्जिमा, बरा होतो

 🥀🥀🥀.. सब्जा हा पाण्यात , मिल्क शेक, सरबत, फालुदा, ताक, लस्सि, यांत टाकून पितात...



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



स्त्री शक्ती समाधान शिबिरात 112 तक्रारींचे निराकरण

 स्त्री शक्ती समाधान शिबिरात112 तक्रारींचे निराकरण

स्त्री शक्ती समाधान शिबिरात

112 तक्रारींचे निराकरण

 

 

           मुंबई,दि.20: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आज मुलुंड पश्चिम टी वॉर्ड येथे 140 तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यामधील112 तक्रारी जागीच  निकाली काढण्यात आल्या.  प्राप्त तक्रारी तातडीने सोडविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

          यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी कार्यक्रमाला  उपस्थित होते. कार्यक्रमात महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांच्या  स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.      

          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. हा उपक्रम  ३१ मे २०२३ पर्यंत   दुपारी ३ ते 5.30 वाजता  सूरू राहणार आहे.अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले 

           मुंबई,दि.20: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आज मुलुंड पश्चिम टी वॉर्ड येथे 140 तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यामधील112 तक्रारी जागीच निकाली काढण्यात आल्या. प्राप्त तक्रारी तातडीने सोडविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.


          यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमात महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांच्या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.      


          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते 5.30 वाजता सूरू राहणार आहे.अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले 

पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाचीतिसरी बैठक 21 ते 23 मे 2023 दरम्यान मुंबई

 पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाचीतिसरी बैठक 21 ते 23 मे 2023 दरम्यान मुंबई


            मुंबई, दि. २०: भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेअंतर्गत पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाची तिसरी बैठक 21 ते 23 मे 2023 दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट संवादाच्या आराखड्याच्या अनुषंगाने होणाऱ्या फलनिष्पत्तीवर आधारित दृष्टीकोन ठेऊन चर्चा करण्यावर असेल.  


            या तीन दिवसीय बैठकीची सुरुवात जुहू चौपाटीवर किनारपट्टी स्वच्छता मोहिमेने होईल. यानंतर ‘ओशन-20’ संवादाचे आयोजन करण्यात येईल. आपले समुद्र किनारे आणि महासागरांचे रक्षण करण्याविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि सामुदायिक सहभागाची जाणीव करून देणे किनारपट्टी स्वच्छता मोहिमेचे उद्दिष्ट आहे.


            ओशन-20 मंचाची सुरुवात इंडोनेशियाच्या जी-20 अध्यक्षते दरम्यान महासागर विषयक प्रश्नांवरील विचार आणि कृती पुढे नेण्यासाठी झाली होती. या उपक्रमाचे सातत्य कायम राखून त्यात अधिक भर घालण्याच्या हेतूने भारताच्या अध्यक्षतेखाली सक्रीय नेतृत्वाचे दर्शन घडवून पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीत नील अर्थव्यवस्थेच्या तीन स्तंभांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून शाश्वत आणि हवामानाच्या दृष्टीने संवेदनक्षम नील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.


            बैठकीच्या पहिल्या दिवशी होणारे सत्र ‘नील अर्थव्यवस्थे’च्या विविध पैलूंवर आधारित असेल. या दिवशीचे पहिले सत्र हे नील अर्थव्यवस्थेसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या विषयावर असेल. त्यानंतर धोरणे, शासन आणि सहभाग या विषयांवर परिसंवाद होतील तर नील अर्थव्यवस्थेसाठी वित्त पुरवठा यंत्रणा स्थापन करणे या संदर्भात समारोपाचे सत्र होईल.


            या सत्राची रचना, पॅनल चर्चा आणि त्यानंतर श्रोत्यांशी संलग्न चर्चा अशाप्रकारे केली गेली आहे. महासागरांची जपणूक आणि त्यांची हानी थांबवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि आपल्या सागरी स्त्रोतांचे रक्षण करण्यासाठीच्या चर्चेवर या परिसंवादात भर दिला जाणार आहे.


            पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीत पुढील दोन दिवस जी 20 देशांमधील एकमत साध्य करण्याच्या दिशेने विचारमंथन करून मसुद्याच्या मंत्रिस्तरीय बैठकीच्या आराखड्यावर चर्चा केली जाईल. यानंतर अंतर्गत सत्रानंतर चौथ्या ECSWG बैठकीच्या नियोजना विषयी चर्चा होऊन समारोप होईल.


            जी 20 सदस्य राष्ट्रांमध्ये महासागरांचे शाश्वत व्यवस्थापन आणि समुद्री जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी अत्याधुनिक उपाय विकसित करण्यावर भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेखालील पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गट भर देत आहे. एकत्रित जागतिक प्रयत्नांची आवश्यकता आणि सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी त्वरित कृतीची गरज यावर प्रत्येक बैठकीत सातत्याने भर देण्यात आला आहे.


            शाश्वत आणि संवेदनशील भविष्या करता G20 देश, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी तिसरी ECSWG बैठक एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, प्रत्येक प्राधान्य क्षेत्रांतर्गत परिणाम साध्य करण्यासाठी आणि सर्वांसाठी शाश्वत आणि संवेदनशील भविष्य घडवण्यासाठी सर्व भागधारकांसोबत कार्य करण्यासाठी वचनबद्ध आहे.


पीआयबी/ मुंबई

सामुदायिक सोहळ्यातील विवाहासाठीच्याअनुदानात 25 हजार रुपये वाढ करणार

 सामुदायिक सोहळ्यातील विवाहासाठीच्याअनुदानात 25 हजार रुपये वाढ करणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती


 


            पालघर, दि.20 : आदिवासी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वर सामुदायिक विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सामुदायिक विवाहसोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजारांपर्यंत वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली.


            पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार रवींद्र फाटक, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके , जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.


            सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अशा कार्यक्रमाला प्रत्येकाने आवर्जून वेळ काढून जायला हवे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील वधू-वरांचा विवाह होतो ही अभिमानाची बाब आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रत्येकाने सामुदायिक विवाह सोहळ्याला सहकार्य केले पाहिजे. कर्ज काढून लग्नसोहळे केल्याने अनावश्यक खर्च होतो. असा खर्च टाळता यावा यासाठी असे सामुदायिक विवाहसोहळे गरजेचे असून ही समाज व काळाची गरज आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.


            शेतकरी सन्मान योजनेतून केंद्राचे सहा हजार रुपये व राज्य सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये शेतकरी बांधवांना देण्यात येतात. या भागाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बांद्रा वर्सोवा ब्रिज विरारपर्यंत आणला जाईल. कामगारांसाठी 150 खाटांचे रुग्णालय अंतिम टप्प्यात आहे. विरारपासून कोस्टल हायवे ॲक्सेस कंट्रोल थेट पालघरपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. एमएमआरडीएद्वारे आवश्यक प्रकल्प दिले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलचा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

 सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलचा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न 


जगासाठी उत्कृष्ट शिक्षक घडवून भारताने 'विश्वगुरु' व्हावे : राज्यपाल रमेश बैस 


आज जगातील अनेक देशांना चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे. भारताने संपूर्ण जगाकरिता उत्कृष्ट शिक्षक घडवून खऱ्या अर्थाने 'विश्वगुरु' व्हावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.     


          मुंबई, दि. 20: मुंबईतील सिंगापूर इंटरनॅशनल स्कुल मुंबई या संस्थेच्या २०२३ वर्गाचा पदवीदान समारंभ राज्यपाल बैस यांच्या मुख्य उपस्थितीत संस्थेच्या दहिसर मुंबई येथील शैक्षणिक संकुलात शनिवारी (दि. २०) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.


          सध्याच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये देशाला मोठ्या प्रमाणात अभियंते, व्यवस्थापक, सीए, कंपनी सचिव, अधिकारी, कुशल कामगार व तंत्रज्ञांची आवश्यकता आहे. परंतु त्याहीपेक्षा देशाला चांगले नागरिक घडवणाऱ्या उत्तम शिक्षकांची गरज आहे, असे सांगून मेधावी स्नातक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर शिक्षक बनण्याचा देखील पर्याय निवडावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. 


          महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी राष्ट्रीय नेत्यांनी विदेशात शिक्षण घेतले परंतु देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुन्हा भारतात परत आले, याचे स्मरण देऊन विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षण घेतले तरी देखील देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी परत आले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. 


          शाळेच्या २०२३ वर्षाच्या ९७ विद्यार्थ्यांना यावेळी शालान्त आयबी डिप्लोमा प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या स्नातकांचा सत्कार करण्यात आला.      


          कार्यक्रमाला आमदार मनिषा चौधरी, आमदार पंकज भोयर, सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शारोनी मल्लिक, प्राचार्य ग्रॅम कॅसलेक, आयबी प्रमुख अब्सोलोम मुसेवे, स्नातक विद्यार्थी तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते

ओम् उच्चारणे फक्त धार्मिक नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.*

 *"ओम् उच्चारणे फक्त धार्मिक नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

रोज फक्त पाच मिनिटे ओम् उच्चारण केल्याने मेंटल आणि फिजिकल फायदे होतात.


 *कसे करावे ओम् उच्चारण?*


ओम् उच्चारण करण्यासाठी कोणत्याही पोजिशनमध्ये बसा. डोळे बंद करुन दिर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम् उच्चारण करत हळुहळू श्वास सोडा. या काळात पुर्ण शरीरात व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा. 

जर ओम् उच्चारण करताना कान बंद करता आले तर यापेक्षा जास्त फायदा होईल.

*ओम् कार जपाचे महत्व आणि परिणाम :


१)मानवी मनाची शुद्धता करणे.


२)मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे.


३)मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे.


४)शारीरिक दृष्ट्या, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव भावनांवर नियंत्रण आणणे.


५)ओम् कर जपामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचे तरंग निर्माण होवून, ते वातावरण भारावून टाकले जाते व त्यामुळे मानवी मन त्या वातावरणामध्ये हरवून जाते व समाधी स्थिती गाठणे सोपे जाते.


*ओम् कर जप :


ओ SSSSSS म् ………………..ओ SSSSSS म्………………ओ SSSSSSS म्……………..

------------------------------------------------

*ओंकाराच्या उच्चाराने मिळवा अनेक आजारांवर नियंत्रण*

   

हिंदू धर्मात ओंकाराचे महत्व अनन्यसाधारण आहे. जीवसृष्टीतील पहिला ध्वनी ओम असल्याचे मानतात. मंत्रोच्चारात ओंकार नसल्यास मंत्र अपू्र्ण वाटतात. 

परंतु धार्मिक महत्वाशिवाय ओंकाराचे शारीरिक महत्वही आहे. होय, ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात. 

*तुम्ही अनभिज्ञ असलेल्या ओंकाराच्या फायद्यांविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.*


*१. थायरॉईड -*

 ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो. 


*२. अस्वस्थता -*

 तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा. 


*३. तणाव -*

 यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्झिन्स) दूर होतात.


*४. रक्तप्रवाह -*

 यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो. 


*५. पचन -*

 ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते. 


*६. स्फूर्ती -*

 ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो. 


*७. थकवा -*

 थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही. 


*८. झोप -*

 ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसांतच झोप न येण्याची समस्या दूर होते. म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करणे आवश्यक आहे. 


*९. फुफ्फुस -*

 ओंकाराच्या उच्चाराने फुफ्फुसाचे कार्य सुधारते. 


*१०. पाठीचा कणा -*

 ओंकारामुळे निर्माण होणारे कंपन पाठीच्या कण्याला बळकट बनवतात.



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Featured post

Lakshvedhi