सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 10 May 2023
मेट्रो- ३ मार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार
मेट्रो- ३ मार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार
मेट्रो रेल्वे खऱ्या अर्थाने मुंबईची जीवनरेषा
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
चर्चगेट ते विधानभवन मेट्रो-३ भुयारी मार्गाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
मुंबई, दि. १० : मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-३ हा मार्ग जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून येत्या डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत मेट्रो रेल्वेचा हा टप्पा पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई मेट्रो-३ टप्प्याच्या चर्चगेट ते विधानभवन या भुयारी मार्गाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प ) सुबोध गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भुयारी मार्गातून चालत प्रकल्पाची पाहणी केली आणि कामाची संपूर्ण माहिती घेतली. मुंबई मेट्रो मार्ग-३ (कुलाबा-वांद्रे- सिप्झ ) हा मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच वाहतुकीच्या पर्यायी सुविधेसाठी हा मार्ग असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मेट्रोमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हवा, ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मेट्रो ३ मार्ग हा मेट्रो -१, २,६ आणि ९ यांना तसेच मोनोरेलला जोडला जाणार आहे. याशिवाय, उपनगरी रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याशिवाय मुंबईतील विमानतळांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे. या मेट्रो -3 रेल्वेमार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे तसेच रस्त्यावरील सहा लाख वाहने कमी होतील असा विश्वास व्यक्त करून या मार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत तर दुसरा टप्पा जून २०२४ पूर्वी पूर्ण केला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
राज्याच्या विकासाचे जे प्रकल्प आहेत, त्यांना विलंब होणार नाही. आरेचा कारशेडचा विषय मार्गी लागला आहे. मेट्रो रेल्वेचे अधिकारी- कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ प्रकल्प : एक दृष्टिक्षेप
● कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा ३३.५ कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग आहे
● या मार्गावर २७ स्थानके असून त्यापैकी २६ भुयारी तर एक जमिनीवर आहे.
● या मार्गामुळे प्रमुख व्यवसाय आणि रोजगार केंद्रे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, मनोरंजनाच्या सुविधा तसेच उपनगरीय रेल्वेशी न जोडलेल्या काळबादेवी, गिरगाव, वरळी, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांसारख्या भागांना जोडणी मिळेल.
● २०२४ पर्यंत मेट्रो-३ च्या प्रत्येकी ८ डब्यांच्या ३१ गाड्या कार्यरत असतील.
● इतर मेट्रो मार्ग, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि एसटी बस सेवांशी एकत्रित जोडणी करत असून उपनगरीय रेल्वेतील १५% प्रवासी मेट्रो-३ कडे वळतील.
● सन २०४१ पर्यंत मेट्रो-३ मुळे वाहनांच्या फेऱ्यांमध्ये प्रतिदिन ६.६५ लाखाने घट होईल.
● या मार्गामुळे दरवर्षी २.६१ लाख टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल.
पहिला टप्पा : आरे ते बीकेसी
● एकूण स्थानके या मार्गावर १० स्थानके असून त्यापैकी ९ भुयारी तर एक जमिनीवर आहे.
● अंतर १२.४४ किमी
● दोन गाड्यांमधील कालावधी ६.५ मिनिटे
● पहिल्या टप्प्यातील गाड्यांची संख्या ९ गाड्या
● मेट्रो ३ मार्गाचे पहिल्या टप्प्यातील एकूण ८७.२% काम पूर्ण
● एकूण ९७.८% प्रकल्प बांधकाम पूर्ण
● एकूण ९३% स्थानक बांधकाम पूर्ण
● एकूण ६५.१% प्रणालीची कामे पूर्ण
● रेल्वे रुळाचे एकूण ८६.३% बांधकाम पूर्ण
● सेवेची चाचणी ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे.
दुसरा टप्पा : बीकेसी ते कफ परेड
● एकूण स्थानके १७ .
● अंतर २१.३५ कि.मी.
● दोन गाड्यांमधील कालावधी ३.२ मिनिटे
● दुसऱ्या टप्प्यातील गाड्यांची संख्या २२ गाड्या
● मेट्रो ३ मार्गाचे (दुसऱ्या टप्प्यातील) एकूण ७६.९% काम पूर्ण
● एकूण ९५.३% प्रकल्प बांधकाम पूर्ण
● एकूण ८८.३% स्थानक बांधकाम पूर्ण
● एकूण ४२.४% प्रणालीची कामे पूर्ण
● रेल्वे रुळाचे एकूण ४६.६% बांधकाम पूर्ण
● हा मार्ग अंदाजे जून २०२४ मध्ये सुरू होणार
● मेट्रो ३ मार्गाचे एकूण ८१.५% काम पूर्ण
● एकूण ९२.८% प्रकल्प बांधकाम पूर्ण
● ८९.८% स्थानकांचे बांधकाम पूर्ण
● ५०.९% प्रणालीची कामे पूर्ण
● रेल्वे रुळाचे ६१.१% बांधकाम पूर्ण
● भुयारी मार्गाचे १००% काम पूर्ण
● ४२ ब्रेकथ्रू संपन्न
● डेपोचे ६३% बांधकाम पूर्ण
● सद्यस्थितीत डेपो ३१ गाड्यांच्या देखभालीसाठी सज्ज
● आरे डेपोमध्ये वेगवेगळ्या कंत्राटदारांच्या समन्वयाने मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहेत. डेपोमध्ये देखभाल आणि कार्यशाळा इमारत कामे, ऑपरेशन कंट्रोल सेंटर,ओव्हरहेड इक्विपमेंट सिस्टम, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लंबिंगची.कामे, स्टॅबलिंग लाइन, ऑक्झिलरी सबस्टेशन, वॉश प्लांट, रेल्वे रुळ घालणे इत्यादी कामांचा समावेश आहे.
मेट्रो-३ च्या गाड्या
● आतापर्यंत मेट्रो-३ च्या तीन गाड्या मुंबईत दाखल; अजून दोन गाड्या श्रीसीटी आंध्र प्रदेश येथील ऑस्तोम कारखान्यातून मुंबईकरिता रवाना झाल्या असून दि. १७ किंवा १८ मेपर्यंत या गाड्या मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे. यानंतर उर्वरित ४ गाड्या प्रत्येक महिन्यात २ अशा मुंबईत दाखल होतील.
मेट्रो मार्ग-३ चा दक्षिण मुंबईतील विस्तार, कफ परेड ते नेव्ही नगर
● एकूण लांबी - २.५ किमी
● स्थानकाची संख्या १ (नेव्ही नगर स्थानक)
● स्थानकाचे ठिकाण- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च (टीआयएफआर) जवळील डॉ. होमी भाभा रोड
● अंदाजे खर्च साधारण २४०० कोटी
● या भागातील पुनर्विकासाचा विचार करता नेव्ही नगरमधील अंदाजे ५० हजार लोकांना या मेट्रो मार्गाचा फायदा होईल.
००००
बहुगुणी नोनी
*नोनी फळ.......*
..एक लहानश्या बटाट्याइतके पण अननसाप्रमाणे फोडि दिसणारे, पिवळे व हिरव्या रंगाचे एक फळ असते. हिचे झाड जास्त मोठे नसते. पाने मोठी हिरविगार असतात. व पाने समांतर पण अर्ध्या फुटांवर असतात. ही झाडे विशेषतः केरळ व उत्तर भागात पर्वतिय क्षेत्रात आढळतात... तसे हे क्वचित महाराष्ट्र भागातही दिसून येते. या फळाची विशेषतः हे आहे की हे फळ एकच रोग नाही तर अनेक गंभीर रोगांवर निश्चित औषध आहे. याचे औषधी गुणधर्म पोटासंबधित सर्व प्रकारच्या समस्या, मधुमेह, दमा, संधिवात, ह्रुदयरोग, कर्करोग, पुरुषांचे रोग, यावर परिणाम कारक आहे..
***** यात सापडणारे जेरोनाईन सर्वात खास द्रव्य आहे. हे फळ रोगप्रतिकारक शक्ति साठी अम्रुतासम आहे. नोनि हे एकमेव फळ आहे. आणि यात जीवनसत्त्व व अॅंटिआॅक्सिडंट, अॅंटिबॅक्टेरिअल, अॅंटिव्हायरल, व अॅंटि ट्युमर, अॅंटिइंफ्लेमेटरी देखिल गुण सम्रूद्ध आहे....
पोटदुखी, गॅसेस, अॅसिडिटि, अल्सर, इत्यादी साठी रोज नोनि चा रस काढून घ्यावा. आराम मिळतो..
रक्तातील साखर नियंत्रणात राहते शिवाय इन्सुलिनची हि वाढ होते. उच्च रक्तदाब व मायग्रेन असलेल्या लोकांनी दिवसातून दोन वेळा घ्यावा याचा रस. तसेच बद्धकोष्ठता, अपचन, जुलाब डिसेंट्री, सारख्या रोगांवर रामबाण औषध आहे.. जर तुमचे केस गळत असेल, किंवा टक्कल पडले असेल तर नोनि फळांचा रस काढून घ्यावा, याने वरील त्रास दूर होतात..हे अनियमित मासिक पाळी व अति रक्तस्राव होणे, कंबरदुखी या सर्व त्रासांवर रामबाण औषध आहे.. चेहर्यावर सतत पिंपल्स मुरूमे येणं, तसेच.. सोरायसिस एक्जिमा, हर्पिस, यासारख्या चर्म रोगांवर नोनिचा रस काढून घ्यावा फरक पडतो व रोग बरे होतात..नोनि फळांमध्ये सांधेदुखी, कडकपणा, स्नायू दुखि, दूर करण्याचि क्षमता आहे..
अस्थमा दमा श्वसनमार्गाचे विकार, असल्यास नोनि फळांचा रस काढून घ्यावा.. याने त्रास दूर होतात..
..नोनि रसाचे प्रमाण..**/...सेवन... नोनिचा ज्यूस मोठ्यांसाठी ३० मि.ली.. व मुलांना २-२ चमचे एका ग्लास पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी व रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी प्यावे.. मिक्सर मधे नोनि फळांचे तुकडे व थोडे पाणी घालून फिरवून घ्यावे. व गाळून घ्यावे मग हा ताजा रस घेउ शकता. यात दुसरी फळे टाकता येईल.. रिकाम्या पोटी हा रस प्यावा. कारण आपण जे जेवण घ्याल ते लवकर व सहज पचेल.. मात्र रात्री झोपताना घेउ नये. कारण याने एनर्जी मिळते, आणि मग झोप येत नाही...या फळाचा फार मोठा फायदा हा आहे की, हा तुम्हाला निरोगी ठेउन १०० वर्षे आयुष्य देऊ शकतो.आणि व्रुद्धावस्था लवकर येउ देत नाही... किमान सिझन प्रमाणे हे फळ आहारात असू द्यावे
.. आणि उत्तम आरोग्य राखावे.....
सुनिता सहस्रबुद्धे.....
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
##.. हिंग... असा फोईटिडाया
...##.. हिंग... असा फोईटिडाया...
.... पेरूला फोईटिडाया वनस्पतिच्या मुळाचा रस काढून, सुकवून, त्यापासुन बनवलेला पदार्थ म्हणजे..#. हिंग#.. होय. आपण दैंनदिन जीवनात याचा भरपुर वापर करतो.
... अतिशय उपयुक्त मसाला आहे.. तर बघू या याचे औषधिय फायदे....
...... ##निरामय ##आयुर्वेद..
१) केळ्यात हिंग घालून किंवा गुळासोबत अथवा बाजरिसोबत हिंग खाल्यास उलटि, ढेकर, उचकि लागणे बंद होते.
२) दातात किड झाल्यास रात्रि झोपताना दातात हिंग भरून झोपावे. किड पडते.
३) कान दुखत असल्यास तिळाच्या तेलात हिंग शिजवून त्याचे दोन थेंब दुखर्या कानात टाकल्यास कानदुखि थांबते.
४) उलटि होत असल्यास हिंगाच पाणि, पोटावर लावल्यास आराम पडतो.
##निरामय ##आयुर्वेद..
५) पायात काटा गेल्यास चिमुटभर हिंग पाण्यात मिसळून त्या जागेवर लावाव. वेदना कमि होतिलच पण काटाहि वर येतो.
६) बद्धकोष्ठ झाल्यास हिंगात थोड मिठ व चिमुटभर सोडा टाकुन रात्रि झोपण्यापूर्वि सेवन करावे. म्हणजे
पोट साफ होते.
७) पोटात क्रुमि, जंत झाल्यास हिंगाच्या पाण्याचा एनिमा दिल्यास जंत बाहेर पडतात.
८) उघड्या जखमेवर किडे झाल्यास त्यावर हिंगाच चूर्ण लावल्याने किडे मरतात.
९) ज्यांना भूक लागत नाही त्यांनि जेवणापूर्वि तुपात घोळवलेलं.हिंग, आल्याचा तुकडा, लोण्याबरोबर खाल्यास भूक वाढते.
१०) मूळव्याधिवर हिंगाचा लेप लावल्यास लवकर आराम पडतो.
११) खाज- खुजलि यां सारख्या त्वचाविकारांवरहि हिंग अतिशय उपयुक्त असुन ते पाण्यात भिजवून दाह होणार्या
भागावर लावल्यास आराम पडतो.
##निरामय ##आयुर्वेद..
१२) पायाला, टाचेला भेगा पडल्या असतील तर कडुलिंबाच्या तेलात हिंग घालून ते तेल तिथे लावल्यास भरुन येतात.
१३) सर्दि झाल्यास हिंगाच्या गोळिचा वास घेतल्यास नाकातलि सर्दि बाहेर पडते.
१४) क् हिंग हे एक उत्तम पेनकीवर आहे. दातदुखी, डोकेदुखि, पोटदूखी, मासिक पाळीच्या वेळी होणार्या वेदना, या सर्वावर हिंगाचे पाणि व तिथे लेप लावल्यास बरे वाटते.
१५) छातित जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठि हिंग व मध व आले एकत्रित करून घ्यावे. याने खोकला हि बरा होतो.
१६) मधुमेहात हिंग घेतल्यास रक्तशर्करा कमि होते.
स्वादुपिंड कार्यशिल होतात.
१७) हिंगात * क्युमेरिन* नावाचे तत्व असते जे
रक्ताला पातळ करते. त्यामुळे गुठळ्या होत नाही
व बँड कोलेस्ट्रोल वाढत नाही. ह्रूदयविकार होत नाही.
१८) विषमज्वर, टायफाईड, मुदतिचा तापात हिंगाचे पाणि दिल्यास हे लवकर बरे होतात.
कारण हिंग अँटिबँक्टेरिअल आहे.
.. अश्या प्रकारे हिंग हा अतिशय फायदेशिर मसाला आहे..
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
Tuesday, 9 May 2023
रेल्वे तिकीट जाणून घ्या आता फायदे
👆🏻 मित्रांनो मुंबई मधे फिरण्यासाठी किंवा कामानिमित्त वगवेगल्या ठिकाणी जात असताना आपल्याला प्रतेक स्टेशनवर टिकिट काढावी लागते...
या पर्यटक टिकिट चा वापर केल्यास Rs.80 मधे मुंबई मधून चालु असनाऱ्या कुठलाही लोकल ट्रेन मधे दिवसभर कितीही वेळा कुठेही प्रवास करू शकता ( हे टिकीट असता ना रिटन टिकीट काढायची गरज नाही)
हे टिकिट रोहा, वसई ट्रेन मध्ये आणि सर्व मुंबई लोकल ट्रेन मधे दिवसभर वापरू शकतो...
या टिकीट बद्दल माहिती नसल्याने या टिकीट चा फायदा घेता येत नाही म्हणून मित्रांनो माहिती पुढे शेअर कारा जेणेकरून या पर्यटन टिकीट चा फायदा घेता येईल...
.🙏
लोकराज्य’चा कृषी विशेषांक प्रकाशित
लोकराज्य’चा कृषी विशेषांक प्रकाशित
मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' मासिकाच्या एप्रिल-मे 2023 च्या कृषी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
या विशेषांकामध्ये कृषी, फलोत्पादन, पशुसंर्वधन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, सहकार व पणन, मृद व जलसंधारण आदी विभागाच्यावतीने राज्यात राबविण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या यशकथांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. याच बरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे विशेष लेख तसेच महत्त्वाच्या घडामोडी, ‘मंत्रिमंडळात ठरले’ या सदरांचाही समावेश या अंकात आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर हा अंक वाचकांसाठी उपलब्ध आहे.
युवा संगम उपक्रमांतर्गत पंजाब मधील युवकांची राज्यपालांशी भेट.
युवा संगम उपक्रमांतर्गत पंजाब मधील युवकांची राज्यपालांशी भेट.
"महाराष्ट्र, पंजाब यांचे देशासाठी योगदान फार मोठे"
- राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 9 : पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांमधील अंतर दीड हजार किलोमीटर पेक्षा अधिक असले तरी दोन्ही राज्ये अध्यात्मिक व सांस्कृतिक देवाण घेवाणीमुळे भगिनी राज्ये असून स्वातंत्र्य लढ्यात व त्यानंतर राष्ट्रनिर्माण कार्यामध्ये दोन्ही राज्यांचे योगदान फार मोठे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित 'युवा संगम' उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र भेटीवर आलेल्या पंजाबमधील ४५ युवक -युवतींनी मंगळवारी (दि. ९) राज्यपाल बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
संत नामदेव महाराष्ट्रातून पंजाबला गेले व भक्तिमार्गाचा पुरस्कार केला तर शिखांचे दहावे गुरु गोबिंद सिंग यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथे वास्तव्य केले. हुतात्मा भगतसिंह यांना महाराष्ट्रातील क्रांतिकारक हुतात्मा राजगुरु यांनी साथ दिली.
आज महाराष्ट्र व पंजाब या दोन्ही राज्यांमधील सर्वाधिक युवक सैन्यदलामध्ये भरती होतात. महाराष्ट्राच्या विकासात देखील राज्यातील पंजाबी बांधव मोठे योगदान देत आहेत असे राज्यपालांनी सांगितले. युवकांनी खूप शिकावे, नवनवी कौशल्ये आत्मसात करावी, व्यसनांपासून दूर रहावे व आपण निवडलेल्या क्षेत्रातून देशसेवा करावी असे आवाहन राज्यपालांनी युवकांना केले.
आयआयटी मुंबईने एनआयटी जालंधर या संस्थेला शैक्षणिक सहकार्य करावे तसेच दोन्ही संस्थांनी शिक्षक व विद्यार्थी आदान प्रदान करावे अशीही सूचना राज्यपालांनी केली.
मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा मुलांनी देश पाहावा
पूर्वी लोक सुटीच्या दिवशी मित्रांकडे, नातलगांकडे जात. त्यामुळे संवाद होत असे. आज मोबाईल - लॅपटॉपच्या युगात माणसे कुटुंबापासून दुरावत आहेत. युवकांनी देशातील विविध प्रदेशांना भेटी दिल्यास त्यातून संवाद वाढेल व खूप काही शिकायला मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.
पुरण पोळी, श्रीखंड पहिल्यांदा खाल्ले
महाराष्ट्रात पहिल्यांदा येऊन खूप आनंद झाला व येथून परत जाऊच नये असे वाटते. मात्र येथे उकाडा फार जास्त आहे, असे पंजाब मधून आलेल्या एका युवतीने सांगितले. महाराष्ट्रातील पुरणपोळी, श्रीखंड व शिरा खूप आवडल्याचे एका युवकाने सांगितले तर येथील जनजीवन खूप धावते असल्याचे मत एका युवतीने नोंदवले.
राज्यपालांशी झालेल्या चर्चेनंतर युवकांनी राजभवनाला भेट दिली. यावेळी भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रो. टी.जी सीताराम, आयआयटी मुंबईचे संचालक प्रो. सुभासिस चौधरी, 'युवा संगम'चे निमंत्रक प्रो. मंजेश हनावल, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार सुरेंद्र नाईक, आयआयटी मुंबईचे रजिस्ट्रार गणेश भोरकड़े, पंजाब येथून आलेले शिक्षक समन्वयक, आयआयटीच्या जनसंपर्क अधिकारी फाल्गुनी बॅनर्जी नाहा आदी उपस्थित होते.
'युवा संगम' उपक्रमांतर्गत पंजाबमधील युवकांना महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटन, विकास व औद्योगिक प्रगती यांची झलक दाखवली जाणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील ३५ व दादरा नगर हवेली दमण - दिऊ येथील १० युवक देखील पंजाबला भेट देत आहेत. महाराष्ट्राला भेट देत असलेल्या पंजाब मधील युवकांचे पालकत्व आयआयटी मुंबई करीत आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...





