Tuesday, 18 April 2023

नव भारत साक्षरता कार्यक्रम’ या अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणही द्यावे

 नव भारत साक्षरता कार्यक्रम’ या अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणही द्यावे

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 18 राज्यात ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमा’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभाग आणि स्वयंसेवकाचे सहकार्य घ्यावे. त्याचप्रमाणे निरक्षरांना साक्षर करण्याबरोबरच त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणही द्यावेअसे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

            केंद्र शासन पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम’ हा 2023 ते 2027 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाच्या सदस्यांसमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओलउच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीशालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरेमाहिती महासंचालक जयश्री भोजशालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझीशालेय शिक्षण संचालक (योजना) महेश पालकरशालेय शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावीसंचालक (माध्यमिक) कृष्णकुमार पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. केसरकर यांनी या योजनेची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित विभागांच्या जबाबदारीचा आढावा घेतला. ते म्हणाले कीशालेय शिक्षण, उच्च शिक्षणआदिवासी विकाससामाजिक न्यायमहिला व बालविकासआरोग्यग्रामविकास आदी विभागांतर्गत विद्यार्थीशिक्षकअंगणवाडी सेविकाआशा कार्यकर्ती यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग घ्यावा. हा कार्यक्रम केवळ शिक्षणापुरता मर्यादित न राहता लाभार्थींना साक्षर झाल्यानंतर व्यावसायिक शिक्षण देण्यात यावे. यासाठी कौशल्य विकास विभागाचे सहकार्य घ्यावे. निरक्षरांना साक्षर करणे हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने यात सक्रीय सहभाग घेण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करावे. शिक्षकांसाठी जिल्हा आणि राज्य स्तरावर स्पर्धा आयोजित करावी. गावपातळीवर मदत होण्यासाठी कंपन्यांच्या सीएसआर निधीचे सहकार्य घ्यावे. यापूर्वी अशा मोहिमेमध्ये सहभाग घेतलेल्यांचे अनुभव विचारात घ्यावेत. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना श्रेणी अथवा प्रमाणपत्र द्यावे, असेही त्यांनी सूचविले.

            विद्यार्थ्यांना समाजाशी जोडले जाणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून साक्षरतेचे काम द्यावे, असे प्रधान सचिव श्री.रस्तोगी यांनी सुचविले. तरमहाविद्यालयांनी गाव दत्तक घेतले, तर ही योजना प्रभावीपणे राबविता येईलअसे माहिती महासंचालक श्रीमती भोज यांनी सांगितले.

            शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी नव भारत साक्षता कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. या योजनेसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येईलतसेच निरक्षरांचे सर्वेक्षण करून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सर्व प्रक्रिया पार पाडल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे स्वरुप

            राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील शिफारशींनुसार व संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार 2030 पर्यंत सर्व तरूण आणि प्रौढपुरूष आणि स्त्रिया अशा सर्वांनी 100 टक्के साक्षरता आणि संख्याज्ञान संपादन करणे हा योजनेचा मूळ हेतू आहे. राज्यात शिक्षण संचालनालय (योजना) तसेच महाराष्ट्र राज्य नव भारत साक्षरता परिषदेमार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

                       

            या कार्यक्रमाअंतर्गत 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील शिकाऊ व्यक्तींमध्ये आर्थिक साक्षरताकायदेविषयक साक्षरताडिजिटल साक्षरताआपत्ती व्यवस्थापन कौशल्यआरोग्याची काळजी व जागरूकताबालसंगोपन आणि शिक्षणकुटुंब कल्याण आदी महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे कलाविज्ञानतंत्रज्ञानसंस्कृतीक्रीडामनोरंजन तसेच स्थानिकांना स्वारस्य असलेल्या विषयांचे निरंतर शिक्षण देण्यात येणार आहे.

            या योजनेमध्ये ‘प्रौढ शिक्षण’ ऐवजी सर्वांसाठी शिक्षण’ ही संज्ञा वापरली जाणार आहे. याच्या अंमलबजावणीसाठी शाळा हे एकक असणार आहे. यासाठी लाभार्थी आणि स्वयंसेवी शिक्षक यांचे सर्वेक्षण शाळांकडून केले जाईल. शासकीय/ अनुदानित/ खाजगी शाळांमधील शिक्षकांव्यतिरिक्त शिक्षक पदाचे शिक्षण घेणारे/ उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थीपंचायत राज संस्थाअंगणवाडी सेविकाआशा कार्यकर्त्या तसेच एनवायकेएसएनएसएसएनसीसी यांचा देखील स्वयंसेवक म्हणून सहभाग असेल. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानमहत्त्वपूर्ण जीवन कौशल्येव्यावसायिक कौशल्य विकासमूलभूत शिक्षण आणि निरंतर शिक्षण हे या योजनेचे पाच घटक आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या निधीसाठी केंद्राचा हिस्सा 60 आणि राज्याचा हिस्सा 40 टक्के असणार आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/


 

सर्वगुण संपन्न मेथी,

 *मेथी*


भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये  मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.डाळ,पराठा किंवा करी सारख्या सर्वच पदार्थांमध्ये मेथी वापरण्यात येेतात.मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.जाणून घेऊयात मेथीच्या सेवनाचे आरोग्यावर काय चांगले परिणाम होतात.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/K5QdAp4Y8J7GrjUFVxAuu3

आहारात मेथीचा समावेश जरुर करा-


मेथी रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते-


काही संशोधनात असे आढळून आले आहे की मेथीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.मेथीमध्ये असलेल्या स्टेरॉईडल सेपोनिन्समुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईड चे शोषण टाळले जाते.


ह्रदयविकाराचा धोका कमी होतो-


मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या घटकामुळे ह्रदयाचे आरोग्य नियंत्रित राहते.त्याचप्रमाणे मेथीमध्ये असलेल्या पोटॅशियमुळे सोडीयमच्या कार्यावर नियंत्रित राहते ज्यामुळे हुदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रित राहतात.


रक्तातील साखर नियंत्रित राहते-


मधूमेहींनी मेथाचे दाणे व मेथीची पाने या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते.तसेच मेथीमधील अमिनो असिड या घटकामुळे इन्शूलीनच्या निर्मितीस देखील चालना मिळते. जाणून घ्या ‘हळदी’ने ठेवा रक्तातील साखर नियंत्रणात !


पचनप्रक्रिया सुलभ होते-


मेथीमध्ये फायबर व अन्टीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात व पचनास मदत होते.कधीकधी अपचन अथवा पोटदुखी असल्यास मेथीचा चहा घेतल्यास आराम मिळतो.सकाळी उठल्यावर मेथीचा उकळलेला अर्क घेतल्यास बद्धकोष्ठतेमध्ये देखील फायदा होतो.


छातीत जळजळ होत असल्यास आराम मिळतो-


छातीत जळजळ होत असल्यास रोजच्या आहारात एक चमचा मेथी दाण्याचा समावेश करा.यासाठी मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत ठेवा व नंतर स्वयंपाकामध्ये वापरा. नक्की वाचा ‘पित्ता’वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी  !


वजन कमी करण्यासाठी मेथीचा चांगला उपयोग होतो-


वजन कमी करण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले मेथीचे दाणे सकाळी उपाशी पोटी चाऊन खा.मेथीमध्ये असलेल्या नैसर्गिक फायबरमुळे ते दाणे पोटात फुगतात भूक कमी लागते.ज्यामुळे सहाजिकच तुम्हाला वजन कमी करण्याचे ध्येय लवकर गाठता येते. जाणून घ्या वजन कमी करायचं ? मग करा योगसाधना


ताप व घसा खवखवणे यावर गुणकारी-


ताप असल्यास मेथी एक चमचा लिंबू व मधासोबत घेतल्यास लगेच आराम मिळतो.तसेच खोकला व घसा खवखवत असल्यास त्यावर देखील मेथी गुणकारी आहे.


स्तनपान करणा-या महिलांमध्ये दुधाचे प्रमाण वाढते-


मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन या घटकामुळे आईच्या दूधाच्या प्रमाणात वाढ होते.त्यामुळे स्तनपान करणा-या महिलांना मेथी खाण्याचा सल्ला देण्यात येतो.


बाळाचा जन्म सुलभ होतो-


मेथीच्या सेवनामुळे बाळाच्या जन्माच्या वेळी गर्भाशयाच्या आकुंचन व प्रसरणाला मदत होते.त्यामुळे प्रसव वेदना कमी होतात.मात्र अधिक प्रमाणात मेथी सेवन केल्यास गर्भपात होण्याचा धोका असल्यामुळे गर्भवती महीलांनी मेथीचे सेवन करताना सावध रहावे.


महिलांच्या मासिक पाळीमधील समस्या कमी होतात-


मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन,आयसॉफ्लॅवेन्स,अॅस्टोजिन या घटकांमुळे मासिक पाळीमध्ये आराम मिळतो.त्याचप्रमाणे मेथीमधील या घटकांमुळे मॅनोपॉजमध्ये होणा-या मूड बदलणे व उष्णतेच्या समस्येमध्ये देखील आराम मिळतो.मासिक पाळीच्या काळामध्ये तसेच गरोदर व स्तनपान करणा-या महिलांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होते.आहारात मेथीच्या भाजीचा वापर केल्याने शरीराला पुरेसे लोह मिळते.मात्र या भाजीतील लोहाचे शरीरात शोषण होण्यासाठी त्यामध्ये टोमॅटो व बटाट्याचा वापर देखील करा.


कोलन कॅन्सर टाळता येतो-


मेथीमधील फायबर या घटकांमुळे अन्नातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.त्यामुळे कोलन कॅन्सर टाळण्यास मदत होते.


त्वचेचा दाह अथवा चट्टे कमी होतात-


मेथीमधील विटामिन-सी या अॅन्टीऑक्सिडंटमुळे त्वचा भाजणे,गळू अथवा इसबामध्ये होणारा त्वचेचा दाह कमी होतो.तसेच जखमा लवकर भरुन निघतात.यासाठी भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांची पेस्ट जखमेवर लाऊन त्यावर स्वच्छ कापडाची पट्टी बांधा.


त्वचा विकार कमी होतात-


चेह-यावरील ब्लॅकहेड्स,पिम्पल्स,सुरकुत्या कमी करण्यासाठी मेथीचा फेसपॅक लावल्यास चांगला फायदा होतो.यासाठी मेथीचे दाणे उकळलेल्या पाण्याने चेहरा धुवा अथवा ताज्या मेथीच्या पानांची पेस्ट वीस मिनिटे चेह-यावर लावा व नंतर चेहरा स्वच्छ धुवा.


केसांच्या समस्या कमी होतात-


मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात.केस गळत असल्यास अथवा पातळ असल्यास दररोज तुमच्या कोकनट ऑईलमध्ये मथी दाणे रात्रभर भिजत ठेवा व नंतर केसांना त्याचा हलक्या हाताने मसाज करा.मेथींमुळे केसांमधील कोंडा देखील कमी होतो.



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



जिल्हा परिषद मधील 457 पदे भरली जाणार

 जिल्हा परिषद मधील 457 पदे भरली जाणार

 

       उस्मानाबाद,दि.18(जिमाका)उस्मानाबाद जिल्हा परिषद अंतर्गत सरळसेवा कोटयातील रिक्त पदामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील पदांचा सुधारीत आकृतीबंध मंजूर असल्याने व आरोग्य विभाकडील रिक्त असलेल्या विविध संवर्गातील 100 टक्के पदे तर उर्वरीत विविध विभागाकडील सुधारीत आकृतीबंध मंजूर नसल्याने अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त असलेल्या पदापैकी 80 टक्के पदे जाहिरातीद्वारे भरणेसाठी जाहिरात अंतिम टप्यात असून शासनाचे मार्गदर्शक निर्देशाप्रमाणे पदभरतीची कार्यवाही प्रगतीत आहे.

             शासन निर्णय दि.16 मार्च .2023 अन्वये दि.31 डिसेंबर,2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिध्द होणाऱ्या जाहिराती करीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादेत दोन वर्ष  शिथिलता देण्यात आली आहे.तसेच माहे मार्च 2019 च्या जाहिरातीप्रमाणे या पूर्वी अर्ज केलेले /भरलेले आहेत अशा सर्व उमेदवारांना दि.31 डिसेंबर,2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातीकरीता अर्ज करण्यास पात्र करण्यात आले आहे.तसेच मार्च 2019 च्या जाहिरातीप्रमाणे सदर पदासाठी असलेली शैक्षणिक अर्हता ही पुढील फक्त एका परिक्षेसाठी कायम ठेवण्यात आलेली आहे.

         जिल्हा परिषद भरतीच्या अनुषंगाने आय.बी.एसकंपनीमार्फत अर्जपोर्टल विकसित करण्याचे काम कंपनी स्तरावर सुरु करण्यात आलेले आहे. अर्ज पोर्टल विकसीत होताच शासनाकडील प्राप्त मार्गदर्शक सुचनंप्रमाणे जिल्हा परिषद उसमानाबाद कडील विविध संवर्गातील सरळसेवा भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्याची कार्यवाही अनुसरण्यात येत आहे.

             जिल्हा परिषद उस्मानाबाद कडील सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने माहिती व शंका निरसन करण्याकरीता जिल्हा परिषद  सामान्य प्रशासन विभागया कार्यालयामध्ये 02472-223388 हा क्रमांक हेल्पलाईन क्रमांक म्हणून उपलब्ध करण्यात आलेला आहे.उमेदवारांनी भरतीसंदर्भात माहिती तसेच त्यांच्या शंका निरसन करण्यासाठी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15) उपरोक्त हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी,राहूल गुप्ता यांनी केले आहे.

*****

 


मुंबई- गोवा महामार्गावरील इंदापूर ते झाराप मार्गावरील दुपदरीरस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करावी

 मुंबई- गोवा महामार्गावरील इंदापूर ते झाराप मार्गावरील दुपदरीरस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करावी


- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

            मुंबई, दि. १८ : मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते झाराप मार्गावरील रस्त्याची कामे युद्धपातळीवर पूर्ण करुन पावसाळ्यापूर्वी किमान दोन पदरी रस्ता पूर्णपणे तयार करावा. यामध्ये रायगडमधील पळस्पे ते इंदापूर, रत्नागिरीमधील अरवली ते वाकेड व कशेडी घाटातील प्रलंबित रस्त्यांचा समावेश असून ही सर्व रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.


            नवी मुंबई येथील कोकण भवन मधील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


             गुहागर चिपळूण कराड रस्त्याच्या चिपळूण तालुक्यातील पिंपळी-बुद्रुक ते कुंभार्ली घाटमाथा (हेळवाक) या एकूण २१ कि.मी. भागाचे दुपदरीकरण करुन उन्नतीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करणे, आणि हे काम चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट करुन रस्त्याची कामे मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी मुख्य अभियंता, रस्ते परिवहन मंत्रालय व मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांना दिल्या.


              चिपळूण पागनाका (७०० मी.) व सावर्डे शहरामध्ये उड्डाण पूल (१२५० मी.) हे प्रस्ताव चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट करुन उड्डाणपूलांची कामेही मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या.


            चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये मंजूर करुन घेऊन चालू आर्थिक वर्षात पुढील कामे सुरु करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील अलिबाग वडखळ रस्ता ००.०० ते २२.२०० चे महामार्ग दर्जाच्या स्तराला उन्नतीकरण करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी चे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६.३७ कि.मी. लांबीचे काम मंजूर असून उर्वरित १४.३० कि.मी. चे उन्नतीकरण करण्याच्या सूचनाही मंत्री चव्हाण यांनी या बैठकीत दिल्या.


****

होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपये

 होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपये


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली मदत.

            मुंबई, दि. १८ : - कात्रज-देहू मार्गावरील किवळे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.


            कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याने या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तीव्र दुःख तसेच मृत, त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदनाही व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.


०००००

Get Ready for the Heat Wave!*

 *Get Ready for the Heat Wave!*


Be prepared for high temperatures between 40 ° -50 ° C. Always drink clean water and drink slowly. Avoid cold water or ice.


Currently, Malaysia, Indonesia, Singapore and other countries are experiencing a "heat wave".


What to do and what not to do?


1. Doctors say not to continue drinking very cold water when the temperature reaches 40 ° C, as our small blood vessels may burst or explode.


It was said that one of the doctor's friends had come in from outside on a hot day. Sweating profusely and wanting to cool down quickly, he immediately washed his feet with cold water... Suddenly, out of sight, he collapsed. An ambulance was immediately called and taken to hospital.


2. When the heat reaches 38 ° C and you come from outside...let's warm up. Don't drink cold water. You can drink hot or warm water, but drink it slowly.


Do not wash your hands or feet immediately, and do not wash or wet areas exposed to the sun. Take at least 30 minutes or half an hour before washing or showering.


3. A man cooled down from the heat and immediately took a shower. After the shower, he was taken to hospital with a stiff jaw. He had a stroke.


*Notes:*

During the summer months or if you are very tired, avoid drinking very cold water immediately, as it can cause the veins or blood vessels to narrow or narrow, which can lead to a stroke.


Teach your kids and roommates as a reminder to each other!


*Spread and Spread the Words*

काजवयचा भाऊ उजवा

 

बॅटरी नाही,गॅस नाही किंवा कोणताही पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ नाही तरीही स्थिर प्रकाश हा ईश्वरी चमत्कार नाही तर काय आहे.....🙏

Featured post

Lakshvedhi