Wednesday, 18 January 2023

सुप्रभात

: कुणाच्या नजरेत आपण चांगले आहोत तर कुणाच्या नजरेत आपण वाईट आहोत. खरं तर हे आहे की, ज्याला जशी गरज आहे, त्याच्यासाठी आपण तसे आहोत!


सुप्रभात

 *निर्जीव मोबाईल मिस कॉल देऊन शोधता येतो....*

*किती बरे झाले असते "शब्दांना" मिस कॉल देता आले असते तर.*

*बंद पडत चाललेले "संवाद" पुन्हा सुरू करता आले असते आणि "अबोल" झालेली "नाती" पुन्हा "बोलकी" झाली असती...!*

  * *स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...*

*संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते*

 *आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही*.

*✍❣फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...*


    ❤️🙏🏾🙏🏾❤️

Tuesday, 17 January 2023

पार्वती बाईस नमस्कार

पार्वती बाईस नमस्कार

 महिलांना दररोज 11 ते 4 कार्यालयीन काम दिले पाहीजे. कोणाला?ज्या महिलांना घरात सकाळ व संध्याकाळ स्तयंपाक येतै अशा महिलांना

जिला स्वयंपाक करता ये नाही त्यांना 8 तास कार्यालयीन काम योग्य

: काही महिला दरमहा दुसरी महिला कडून जेवण तयार करून घेतात.व पुरुष मंडळी चहा करून देतात😂😂😂

*लाइटिंग से जगतपिता के स्वरूपो के मनमोहक दर्शनों का अद्भुत दृश्य*

 

*लाइटिंग से जगतपिता के स्वरूपो के मनमोहक दर्शनों का अद्भुत दृश्य*

सर्व नाम

 


 दिल्लीतील विविध मराठी संस्थांच्या योग्य सूचनांची

अंमलबजावणी करणार


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


            नवी दिल्ली, 17 : नवी दिल्लीतील विविध मराठी संस्थांकडून येणाऱ्या कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे सांगितले.


            कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात दिल्लीतील विविध मराठी संस्थांशी सोमवारी संवाद साधताना मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. या बैठकीस केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, यांच्यासह विविध मराठी संस्थेचे पदाधिकारी, केंद्र सरकारच्या विविध विभागात प्रतिनियुक्तीवर असलेले मराठी अधिकारी, यासह सदनाचे आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्याच्या ऐतिहासिक खाणाखुणा आजही महाराष्ट्राबाहेर दिसतात. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, खाद्यसंस्कृती, लोककलेची समृद्ध अशी परंपरा आहे. दिल्लीतील मराठी अधिकारी, येथे वास्तव्यास असलेले मराठी नागरिक हे समृद्ध परंपरा वाढवित आहेत. त्यांचा अभिमान असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. राजधानी दिल्लीत असणाऱ्या संस्थांनी दिलेल्या सूचनांवर विचार करून कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल.


            राजधानीत केंद्र सरकारच्या विविध आयोगात, विभागात महाराष्ट्र केडरचे तसेच इतर केडरचे मूळ महाराष्ट्रातील अनेक अधिकारी आहेत. यासह मूळ महाराष्ट्रातील मात्र, व्यवसाय- खासगी नोकरी निमित्त आलेले मराठी लोक दिल्लीतील विविध भागात अनेक वर्षांपासून राहतात. त्यांनी येथे विविध संस्था उभारून महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जोपासली आहे. यासोबतच विविध स्पर्धा परीक्षांसाठी येणाऱ्या तरूण मुला-मुलींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या संस्था मदत करतात.


            या संस्थांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. यातील काही महत्वाच्या सूचना ज्या आपल्या विभागाशी संबंधित असतील त्यांची त्वरेने अंमलबजावणी केली जाईल, तर उर्वरित सूचनांवर संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

Miss you... ना...!☺

 Miss you... ना...!☺

वयानुसार आपण काय काय ..

गोष्टी सोडल्या..


*आपण गाभुळलेली चिंच ..*

*अनेक वर्षात खाल्लेली नाही*


*जत्रेत मिळणारी ..*

*पत्र्याची शिट्टी ..*

*वाजवलेली नाही.*


*चटक्यांच्या बिया घासून ..*

*चटके द्यावेत ..*

*असं आता वाटत नाही*


*सर्कसमधला जोकर आपलं ...*

*मन आता रिझवू शकत नाही.*


*तसंच कापसाची म्हातारी ..*

*पकडण्याचा चार्मही ..*

*राहिलेला नाही..*

*कारण ..*

:

*कापसाच्या म्हातारीने ..*

*उडता उडता आपला ..*

*बालपणीचा काळ सुखाचा..* *स्वत:बरोबर कधी नेला ..*

*ते आपल्याला कळलंच नाही.*


*आता त्या सहली नाहीत...*


*दोन दोन मुलांच्या ..*

*जोड्या करून ..*

*चालणं नाही..*


*विटी दांडू नाही...*

*गोट्या*लगोरी*


*साबणाचे फुगे नाहीत..*


*प्रवासात बोगदा आला तर ..*

*एक अनामिक हुरहूर नाही..*


*त्या उडणाऱ्या म्हातारीने ..*

*हे सगळे आनंद नेले...*

*त्याच्या बदली ..*

*तिचं वार्धक्य तिने ..*

*आपल्याला दिलं...*


*म्हणूनच ती अजून उडू शकते...*

*आणि आपण जमिनीवरच आहोत.*


*लाटेने की काळाने ...*

*नेला तो मातीचा किल्ला?*


*भोवऱ्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला…*


*हरवली कुठेतरी ती शाळेतली मूल्यशिक्षणाची वही,*


*इवलुश्या मार्कांच्या प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही….*


*गेले कुठे ते चालताना ..*

*“पॅकपॅक” आवाज करणारे ..*

*पायातले बूट?*


*"मी नाही देणार जा माझं चॉकलेट”*

*म्हणत आवळलेली ती ..*

*घट्ट मूठ….*


*किती जिव्हाळा होता ..*

*डोकं टेकवलेल्या ..*

*आईच्या हाताच्या उशीत?*

:

*ब्लँकेटहून जास्त ..*

*ऊब होती त्या ..*

*मायेच्या कुशीत…*


*हरवला तो प्रेमाचा घास….*

*“चिऊताई” दाखवत आईने भरवलेला…*


*घरात न सांगता ..*

*लपवून लपवून ..*

*खाऊ खायचा तो ..*

*प्लॅन ठरवलेला?*


*गेले कुठे जत्रेतले ते ..*

*गोड गोड म्हातारीचे केस?*


*छोट्याशा बुटांची ..*

*आईने बांधलेली ती ..*

*सुटलेली लेस….*


*गेली कुठे ती ..*

*मामाच्या गावी जाणारी ..*

*झुकझुक गाडी?*


*शाळेत बडबडगीते गाताना ..*

*एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?*


*झोपताना पाहिलेला तो ..*

*चांदोमामा कुठे हरवला?*


*अ आ इ ई ..*

*पाटीवर लिहिणारा तो ..*

*खडू कुणी पळवला?*


*कशाला आलं हे ...*

*आपल्याला शहाणपण????*


*हरवलं त्यात ते सुंदर बालपण..*

*खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना?*


*आयुष्यातील काही ...*

*अनमोल क्षणांची आठवण ...*

*ते क्षण निसटून गेल्यावरच प्रकर्षाने होते...*


*पण बालपणीच्या काही ..*

*आठवणी,*

*मनाच्या कोपऱ्यात ..*

*अजूनही दाटलेल्या असतात,*


*त्यांना हलकेच गोंजारलं असता ..*

*त्यांची सय अधिकच गडद होते...*


*आपलं मनही किती विचित्र असतं ना...*


*जेव्हा लहान असतो तेव्हा पटकन मोठं व्हावंसं वाटतं...*


*शाळा सोडून बाबांसारखं ...कामावर जावंसं वाटतं...*


*मात्र आता मोठं झाल्यावर ...*

*पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात ..*

*आणि नकळत डोळ्यात पाणी येतं..*


*आय मिस माय चाइल्डहूड यार*

*कोई लौटा दे मुझे...*

*बीते हुए दिन..*


*चला मन थोडे हलके झाले ..*

चंद्रपूर येथे मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे

 चंद्रपूर येथे मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे


- मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            नवी दिल्ली, 17 : महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. त्यातही विदर्भात हे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे, अशी मागणी महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.


            केंद्रीय मंत्री श्री रूपाला यांच्या अध्यक्षतेखाली सागर परिक्रमा योजनेची आढावा बैठक सोमवारी घेण्यात आली. त्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देवून वरील मागणी केली.


              विदर्भात तळी, मालगुजरी तळी, शेत तळी आदी असे एकूण 30,650 तळी आहेत. यात 1, लाख 87 हजार 249 हेक्टर पाण्याचे क्षेत्र आहे. यातील 50 टक्के तळ्यात मासेमारी केली जाते.


            चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्व आणि दक्षिण सीमेला वैनगंगा आहे, तर पश्चिम सीमेला वर्धा नदी आहे. याठिकाणी 5,547 जल समिती (वॉटर बॉडीज) असून 25,429 हेक्टर पाणी क्षेत्र आहे. यामधील 29 टक्के तळी मत्स्यव्यवसायासाठी वापरले जातात तर 20 टक्के तळी हे शेत तळे आहेत.


            देशातील इतर भागात ज्याप्रमाणे गोड्या पाण्यातील मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्रे उभारली आहेत, त्याच धर्तीवर चंद्रपूरमध्येही संशोधन केंद्र उभारण्यात यावे. यामुळे गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाचा जलदगतीने विकास होऊ शकेल. मत्‍स्य बीजपुरवठा, अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती ही प्रशिक्षणाद्वारे देऊन कौशल्य विकास करता येईल.


            शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मत्स्यव्यवसाय पूरकव्यवसाय म्हणून अधिक उपयोगी ठरत आहे. विदर्भात मत्स्यबीज समूह केंद्राला (फिश सीड क्लस्टर) संधी आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या समन्वयाने चंद्रपूर येथे प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे, अशी मागणी निवेदनात नमूद आहे.


००००

Featured post

Lakshvedhi