Monday, 9 January 2023

औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे

 औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            पुणे दि. ८: देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            भारती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या भारती सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल आणि विद्यार्थी वसतीगृह संकुलाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पुनावाला, खासदार संजयकाका पाटील, आमदार विश्वजीत कदम, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ.विवेक सावजी, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आज चीनमधून उद्योग बाहेर पडत असताना हे उद्योग भारतात येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. मात्र, अशा उद्योगांना आकर्षित करण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करावे लागेल, त्यासाठी त्याप्रकारचे शिक्षण द्यावे लागले. त्यादृष्टीने भारती विद्यापीठासारख्या संस्थांना महत्व आहे.


 देशाच्या विकासात स्टार्टअपची भूमिका महत्वाची


            भारतीय युवकांनी तंत्रज्ञान युगात आपली क्षमता दाखवून दिली आहे. भारत आणि महाराष्ट्रातही अनेक स्टार्टअप तयार होत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाने ही परिस्थिती निर्माण केली आहे. या वेळेचा उपयोग आपण केला तर आपल्या देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळख प्रस्थापित करता येईल. या अमृतकाळात पुढील २५ वर्ष आपल्यासाठी महत्वाचे आहेत. यात चांगली शैक्षणिक व्यवस्था निर्माण केली तरच आपण आपल्या देशाला प्रगतीकडे नेऊ शकतो.


 औद्योगिक विकासासाठी उत्तम शिक्षण आवश्यक


            आज तंत्रज्ञान क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. संरक्षण उत्पादनात आपण आयात करणारे होतो. मात्र आज अनुकूल व्यवस्था निर्माण केल्याने आपण संरक्षण उत्पादने निर्यात करू शकतो. पुण्यातील औद्योगिक प्रगती येथील शैक्षणिक विकासामुळे झाली. कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने पुणे, राज्याचे उत्पादनाचे केंद्र आणि उद्योगांसाठी आकर्षण होऊ शकले. भारती विद्यापीठासारख्या विद्यापीठाने मनुष्यबळ विकासाचे मोठे कार्य केले.


            भारती विद्यापीठाने विदेशासारखे शैक्षणिक परिसर निर्माण केले. एक मिशन म्हणून त्यांनी हे काम हातात घेवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य केले. भारती विद्यापीठाने विदर्भातही असा शैक्षणिक परिसर निर्माण करावा. मराठवाडा आणि विदर्भात अशी शिक्षण व्यवस्था निर्माण झाल्यास महाराष्ट्र देशाच्या विकासात मोठे योगदान देणारे राज्य ठरेल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.


 स्व.पतंगराव कदम यांच्यात प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची ताकद


            स्व.पतंगराव कदम यांच्याकडे पाहिल्यावर आश्वासकता वाटायची. त्यांच्यात प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची ताकद होती. शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे. म्हणून १९० पेक्षा अधिक संस्था भारती विद्यापीठांतर्गत दिसून येतात. केवळ उच्च शिक्षण नाही तर गुणवत्तापूर्व शिक्षण देण्याचे कार्य त्या माध्यमातून होते आहे, असेही श्री.फडणवीस म्हणाले.


            अदार पुनावाला यांना या पुरस्काराच्या माध्यमातून देशातर्फे धन्यवाद देण्याचे काम झाले आहे. जगाला भारताची ताकद दाखविण्याचे कार्य सीरम इन्स्टिट्यूटने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातच लस निर्मितीचा निर्धार केला आणि देशाच्या कानाकोपऱ्यात ही लस पोहोचली. म्हणून सीरमसारख्या संस्थेचा अभिमान वाटतो. स्व.पतंगराव कदम यांच्या नावाचा अर्थात शून्यातून विश्व उभारणाऱ्याच्या नावाचा पुरस्कार शून्यातून विश्वाला वाचविण्याचे कार्य करणाऱ्याला दिला ही महत्वाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.



वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता

 वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता.

-शरद पवार

            खासदार श्री.पवार म्हणाले, आरोग्य विषयक नव्या सुविधा निर्माण करताना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भारती विद्यापीठासारख्या संस्था हे करू शकतील. जगात नवनवे संशोधन होत आहे, बदल होत आहेत, नवे तंत्रज्ञान निर्माण होत आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन समृद्ध पिढी घडविण्याचा प्रयत्न होत आहे. संशोधनात लक्ष केंद्रीत करून देशासमोरचे प्रश्न सोडविण्याला हातभार लावावा. या नव्या क्षेत्रातील परिवर्तनाची दिशा भारती विद्यापीठ देशाला देईल असा विश्वास शदर पवार यांनी व्यक्त केला.

            ते म्हणाले, स्व.पतंगराव कदम यांनी शून्यातून हे विश्व निर्माण केले. शैक्षणिक क्षेत्रात द्रष्टे म्हणून त्यांची ओळख होती. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा प्रश्न असलेल्या पाणी प्रश्नाचे जाणकार म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल. रयत शिक्षण संस्थेशी असलेली बांधिलकी त्यांनी कधी सोडली नाही. त्यांच्या नावाचा पुरस्कार अदार पुनावाला यांना देण्यात आल्याचा आनंद आहे.

            जगात १६० देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक १०० मुलांपैकी ५० मुले सीरमची लस वापरतात. महाराष्ट्र आणि देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. सामाजिक भान ठेवून अदार पुनावाला यांनी वडिलांचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला १५० पेक्षा अधिक वाहने दिली आहेत. मानवाचे प्रश्न सोडविण्याचे काम करताना समाजाला मदत करण्याचे कार्य ते करत असतात. असेही श्री. पवार म्हणाले.

            मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू म्हणाले, स्व.पतंगराव कदम यांनी विशेष उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन भारती विद्यापीठाची स्थापना केली. त्यामुळे आज ही संस्था विविध विद्याशाखांमध्ये प्रगती करीत आहे. हिमाचल प्रदेश आज शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. हिमाचल प्रदेशच्या डॉक्टरांनी देशाच्या वैद्यकीय क्षेत्रात लौकीक मिळविला आहे.

            तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुढे गेल्यास सुधारणा निश्चितपणे करता येते. वैद्यकीय क्षेत्रातदेखील तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल.  हिमाचल प्रदेशने वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणांसोबत उच्च शिक्षण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्याचे श्री. सुक्खू यांनी सांगितले.

            श्री.पुनावाला म्हणाले, सिरम इन्स्टीट्यूटच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भारत आणि जगाची लशीची मागणी पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केल्याने ७० ते ८० देशांना मदत करता आली. राज्य आणि केंद्र सरकारचेही यात सहकार्य मिळाले. विद्यार्थ्यांचे स्वप्न आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण भारतात आहे, असे त्यांनी सांगितले.

            प्रास्ताविकात आमदार  कदम म्हणाले, भारती विद्यापीठाच्या स्थापनेच्या ५८ वर्षाच्या काळात ९० हून अधिक शाखा ग्रामीण भागात आहेत. सामाजिक बांधिलकीचा वसा स्व.पतंगराव कदम यांनी घालून दिला आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातही विद्यापीठाने अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कोविड काळात विद्यापीठाच्या रुग्णालयाने रुग्णसेवेचे काम केले. गोरगरिबांच्या सेवेसाठी नूतन सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. संस्थेने मानवता जपण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह  सुक्खू यांच्या हस्ते पहिला डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबाबत अदार पुनावाला यांना प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि श्राड पवार यांनी भारती विद्यापीठ गोल्डन ज्युबिली म्युझियमला भेट दिली.

000


राज्यपालांच्या हस्ते समाजसेवा, संस्कृती व शिक्षण क्षेत्रातील योगदानाकरिता 'साहित्य गंगा' पुरस्कार प्रदान

 राज्यपालांच्या हस्ते समाजसेवा, संस्कृती व शिक्षण क्षेत्रातील योगदानाकरिता 'साहित्य गंगा' पुरस्कार प्रदान


            मुंबई, दि. ८ : समाजसेवा, संस्कृती व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या उत्तर भारतीय महासंघ या संस्थेचा २८ वा वर्धापन दिन तसेच संस्थेतर्फे देण्यात येणारे 'साहित्य गंगा' पुरस्कार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन येथे प्रदान करण्यात आले.


            कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे, माजी आमदार राज पुरोहित व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


            राज्यपालांच्या हस्ते ओ पी व्यास, पंडित कालीनाथ मिश्र, गिरीश मिश्रा, प्रशांत मलिक, के पी पांडे, कमलेश दुबे, आर पी व्यास, शैलेंद्र भरती यांसह ३५ व्यक्तींना 'साहित्य गंगा' पुरस्कार प्रदान करण्यात आले.


0000


 


Governor presents 'Sahitya Ganga' Awards of Uttar Bhartiya Mahasangh


 


Governor Bhagat Singh Koshyari attended the Gaurav Samaroh and 'Sahitya Ganga' Awards presentation ceremony on the occasion of completion of 28 years of service by Uttar Bhartiya Mahasangh at Raj Bhavan Mumbai.


National President of the Mahasangh Dr Yogesh Dube and former MLA Raj Purohit were present.


The Governor presented the 'Sahitya Ganga' Puraskars to 35 personalities including O P Vyas, Pt Kalinath Mishra, Girish Mishra, Prashant Malik, K P Pandey, Kamlesh Dubey, Shailendra Bharatti and others.


0000



राज्यपालांच्या हस्ते 'एक और दुष्यंत' या गजल संग्रहाचे प्रकाशन.

 राज्यपालांच्या हस्ते 'एक और दुष्यंत' या गजल संग्रहाचे प्रकाशन.

            मुंबई, दि. ८ : बांधकाम व्यावसायिक व कवी अतुल अग्रवाल यांनी लिहिलेल्या 'एक और दुष्यंत' या गजल संग्रहाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी राजभवन येथे झाले.


            मुंबई हिन्दी अकादमी या संस्थेतर्फे आयोजित या प्रकाशन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष पवन तिवारी, सचिव रामकुमार, साहित्यिक डॉ. करुणाशंकर उपाध्याय आदी उपस्थित होते.


            यावेळी प्रसिद्ध लेखक राजेंद्र श्रीवास्तव, मनोज कुमार गोयल, 'पासबान ए अदब'चे संस्थापक कैसर खालिद, शायना एन.सी, डॉ स्मिता दातार, संजीव निगम, अनघा गांगल, राखी तांडेल व प्रवीण कुमार सागर यांना साहित्य, समाज व शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.


0000


 


Governor releases the book of Ghazals 'Ek Aur Dushyant'


            Mumbai, Date. 8 :Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the book 'Ek Aur Dushyant', a collection of Gazals by real estate developer and poet Atul Agrawal at Raj Bhavan Mumbai.


            The book release programme was organised under the aegis of Mumbai Hindi Akadami.


        President of the Akadami Pawan Tiwari, Secretary Ramkumar, writer Prof. Karunashankar Upadhyay and others were present.


        The Governor felicitated eminent personalities from the field of Literature, social work and education on the occasion.


            Founder of Pasbaan E Adab Qaiser Khalid, Shaina N C, Rajendra Shrivastava, Dr Smita Datar, Manoj Kumar Goyal, Rakhi Tandel, Pravin Kumar Sagar and Sanjeev Nigam were prominent among those who were felicitated.


0000



साखरे ऐवजी गुळ का खावा?*

 *साखरे ऐवजी गुळ का खावा?*


▪️ *फुफ्फुसातील संसर्ग रोखतो* गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो.


▪️ *पोटाच्या तक्रारींवर गुणकारी* पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॕसिडीटीची तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो.


▪️ *आंबट ढेकरींपासून सुटका* – गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबते.


▪️ *सांधेदुखीतून सुटका* –

 सांधे दुखत असतील तर गूळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो. दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो.


▪️ *थकवा दूर होतो* – 

गूळ खाण्यानं शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. थकवा, कमजोरी जाणवत असेल तर जरूर गूळ खावा.


▪️ *रक्ताची कमतरता भरून निघते* -

गूळ हा लोहाचा मोठा स्रोत आहे. तुमचं हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर रोज गूळ खाण्यानं तात्काळ फायदा होतो. गूळ खाण्यानं शरीरातील लाल पेशींची संख्या वाढते. त्यामुळे गर्भवती महिलांना डॉक्टर गूळ खाण्याचा सल्ला देतात.


▪️ *रक्तदाब नियंत्रणात राहतो* - गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.


▪️ *हाडं मजबूत होतात* - गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण अधिक असतं. हाडांना बळकट करण्यात हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे गूळ खाण्यानं हाडांसाठीही लाभदायी ठरते.


▪️ *शरीर कार्यक्षम राहतं* गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते. शरीर ताकदवान बनवण्यासाठी दुधात गूळ घालून घेणे उपयुक्त ठरते. दुध आवडत नसल्यास एक कप पाण्यात पाच ग्रॅम गूळ, थोडासा लिंबू रस आणि काळे मीठ घालून प्यायल्यास थकवा दूर होईल.


▪️ *सर्दीवरही गुणकारी* सर्दी-पडसं दूर करण्यासाठीही गूळ लाभदायी ठरतो. काळीमिरी आलं आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी-पडसं कमी होतं. खोकला येत असेल तर साखरेऐवजी गूळ खाणं लाभकारक ठरतं. आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते.


▪️ *डोळ्यांसाठीही लाभदायी* – गूळ खाल्ल्यानं डोळ्यांची क्षीणता कमी होते. दृष्टी सुधारण्यासही मदत होते.



धन्यवाद, 🙏

आमच्याकडे सात्विक कृषीधन अंतर्गत नैसर्गिक गुळ, खांडसरी साखर, गूळ पावडर, तुप वगैरे तसेच इतर नैसर्गिक व सेंद्रीय ऊत्पादने उपलब्ध आहे. 


*"नजिकच्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात उपलब्ध, कृपया लवकरात लवकर संपर्क करावा.....*

मुग्ध तूच मुग्ध मी

 


कुदरत का करिश्मा


 

Featured post

Lakshvedhi