Thursday, 25 August 2022

गणेशो्सवानिमित्त सूचना

 गणेशोत्सव काळात भाविकांची गैरसोय आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठीमुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणाकडे ये - जा करणाऱ्या अवजड वाहनांना प्रतिबंध

·       जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना निर्बंधातून सूट

            मुंबईदि. 24 : गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच त्या मार्गावर ये जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी गृह (परिवहन) विभागाने अशा वाहनांना या मार्गावर प्रतिबंध केला आहे. त्या संदर्भातील आदेश दि. २३ ऑगस्ट२०२२ रोजी जारी करण्यात आले आहेत.

            दि.२७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून (००.०१ वाजेपासून) ते दि.१० सप्टेंबर रोजीच्या रात्री आठ वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर वाळू/रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहणार आहे. परंतुवरील निर्बंधबंदी दूधपेट्रोल/डिझेलस्वयंपाकाचे गॅस सिलेंडरलिक्वीड मेडिकल ऑक्सिजनअन्न धान्यभाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ च्या रस्ता रुंदीकरण /रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्यमाल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

            महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासीयांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येते.  राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरुन जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतूकीमुळे या कालावधीत कोकणाकडे ये-जा करणा-या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय होतेत्यामुळे गृह (परिवहन) विभागाने मोटार वाहन अधिनियम१९८८ च्या कलम ११५ मधील तरतूदीचा वापर करुन  सार्वजनिक हितास्तव पनवेल ते

इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ (रा.म.क्र.जुना क्र.१७) (पनवेल ते सिंधुदूर्ग मार्गे पेणवडखळनागोठाणेकोलाडइंदापूरमहाडखेडचिपळूण, संगमेश्वरराजापूरकणकवलीकुडाळसावंतवाडी) वरुन होणारी वाळू/रेती भरलेल्या ट्रकचीमोठ्या ट्रेलर्सच्या तसेच अवजड वाहनांच्या वाहतूकीस प्रतिबंध केला आहे. त्याबाबतचे आदेश विभागाने जारी केले आहेत.

            या आदेशानुसार,  गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास/ मुर्तीचे आगमन ( दि.२७.०८.२०२२ रोजी ००.०१ वाजेपासून ते दि.३१.०८.२०२२ रोजी २०.०० वाजेपर्यंत) कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे (जड-अवजड वाहनेट्रकमल्टीएक्सलट्रेलर इ. वाहने) अशा वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असेल.

            पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचे विर्सजन/गौरी गणपती विसर्जन/ काही अंशी परतीचा प्रवास ( दि. ०४.०९.२०२२ रोजी ०८.०० वाजेपासून ते दि.०६.०९.२०२२ रोजी २०.०० वाजेपर्यंत) कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहनेट्रकमल्टीएक्सलट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद असेल.

            अनंत चतुर्दशी १० दिवसांचे गणपती विसर्जन/ परतीचा प्रवास ( दि.०९.०९.२०२२ रोजी ०८.०० वाजेपासून ते दि.१०.०९.२०२२ रोजी २०.०० वाजेपर्यंत)  या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किवा १६ टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहनेट्रक,

मल्टीएक्सलट्रेलर इ. वाहने) वाहतुकीस पूर्णत: बंद असेल.

            दि.२७.०८.२०२२ रोजी ००.०१ वाजेपासून ते दि.१०.०९.२०२२ रोजी २०.०० वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर वाळू/रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंद करण्यात यावी. परंतुवरील निर्बंधबंदी दूधपेट्रोल/डिझेलस्वयंपाकाचे गॅस सिलेंडरलिक्वीड मेडिकल ऑक्सिजनअन्न धान्यभाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ च्या रस्ता रुंदीकरण /रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्यमाल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार

नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग/महामार्ग पोलीस यांना सूचना.


शिक्षक deeeeeeeen

 *शिक्षक कुठे काय करतो*


वकील, डॉक्टर, आणि कलेक्टर

सारं तुम्हास करण्या जीव त्याचा झुरतो

तरी,कुणीही उठतं शेमडं बंब आजकल

म्हणे शिक्षक कुठे काय करतो

वेळ जनगणनेची आली

त्यांनी अशी तयारी केली

दिसभर विद्यादान करी

रात्री जनगणना सुरू झाली

वेळ मिळेना देण्या कुटुंबाला

सर्व्हे करण्या दारोदारी फिरतो

तरी कुणीही उठतं.....।।

निवडणुकीची आली वारी

सारे शिक्षक बनले अधिकारी

कुटुंबाची त्यास नाही पर्वा

राष्ट्रीय कार्य जोमाने करी

निष्पक्षपाती,इमानदार तो

साऱ्यांस असा आदर्श तो ठरतो

तरी कुणीही उठतं.......

सर्व्हेक्षण साऱ्या गावाचे करी

पोलिओ डोस पाजले दारोदारी

असा अष्टपैलू आहे का कुणी

कामे एकटाच सगळे करी

डोईवरी बोजा अशैक्षणिक कामाचा

विद्यादान तरीही इमाने करतो

तरी कुणीही उठतं.......

कोरोना संकट आले देशावरी

इथेही जोमाने तो देशकार्य करी

कोवीड-१९ योध्दा बनला असा

राष्ट्रीय कार्य सदैव उरी

सेवा देताना कैक बळीही गेले

तो ही देशासाठी शहीद इथे ठरतो

तरी कुणीही उठतं........

पोतं पोषण आहाराचे डोईवरी

कारकून-शिपायांचंही काम तो करी

कुटुंबकल्याणाच्या केसही केल्या

कधी प्रौढ शिक्षणाचीही ओढली दोरी

प्रामाणिकपणे हे सारे करण्या

धावपळ करून एकटाच मरतो

तरी,कुणीही उठतं शेमडं बंब आजकल

म्हणे शिक्षक कुठे काय करतो 


*श्री. सुभाष बाबू ओव्हाळ*

*माणगांव, रायगड.*

जागतिक पत्निदिन

 *"आज जागतिक पत्नीदिन आहे*

 *......मस्त आहे नक्की वाचा.....*


जी आपल्या *चुका* दाखवते पण

*घोडचूकावर,* पांघरूण घालते.................!

जी आपल्या, *खाण्यावर* बोलते

पण,न खाल्यास, *काळजी* करते...............!

*चहा* पिण्यावरून, जी सतत बोलते,

पण भिजूनआल्यावर, *स्वत:च* चहा करते..!

 जिला सगळ्यातलं, *सगळं* कळते

पण *चेकवर* सही,कुठे करू म्हणते............!

जिच्या *बडबडीनं,* आपण बाहेर जातो

पण तिच्याच *ओढीनं,* लगेच परत येतो....!


   *"त्या"* आपल्या, तारणहार *पत्नीला*

         *आज सप्रेम नमस्कार...


*🌞💖 💖🌞*.

हल्ला बोल मदत

 वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांनाआता २० लक्ष रू. अर्थसहाय्य मिळणार

- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. 24 : वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना देण्‍यात येणा-या १५ लक्ष रू. अर्थसहाय्याच्‍या रक्‍कमेत वाढ करत ही रक्‍कम २० लक्ष रू. इतकी करण्‍याचा निर्णय वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत जाहीर केला.

            राज्‍याच्‍या वनविभागाच्‍या माध्‍यमातून उत्‍तम पद्धतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरू असल्‍याने वन्‍यप्राण्‍यांच्‍या संख्‍येत मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. मानव–वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने वनालगतच्‍या गावांमध्‍ये राहणाऱ्या नागरिकांचे वनविभागामार्फत प्रबोधन करण्‍यात येत असून डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमार्फत स्‍थानिक जनतेचे वनावरील अवलंबीत्‍व कमी करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामध्‍ये सन सन 2019-20 या वर्षी 47, 2020-21 ला 80 आणि 2021-22 ला 86 इतकी मनुष्यहानी झाली आहे. मनुष्‍यहानी झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या अवलंबित कुटूंबियांना वाघ, बिबट्या, रानडुक्‍कर, गवा, अस्‍वल, लांडगा, कोल्‍हा, हत्‍ती व रानडुकरे यांच्‍या हल्‍ल्‍यात होणाऱ्या मनुष्‍यहानीमुळे देण्‍यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्‍या रकमेत वाढ करण्‍यात आली असून यापुढे १५ लक्ष ऐवजी २० लक्ष रू. इतके अर्थसहाय्य देण्‍यात येणार आहे. २० लक्षपैकी १० लक्ष रू. देय असलेल्‍या व्‍यक्‍तीला तत्‍काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्‍कम रूपये १० लक्ष त्‍यांच्‍या राष्‍ट्रीयकृत बॅंकेत असलेल्‍या दरमहा व्‍याज देणाऱ्या संयुक्‍त खात्‍यामध्‍ये ठेव रक्‍कम अर्थात फिक्‍स डिपॉझीट जमा करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. व्‍यक्‍ती कायम अपंग झाल्‍यास रू. ५ लक्ष तर व्‍यक्‍ती गंभीररित्‍या जखमी झाल्‍यास रू. १ लक्ष २५ हजार इतके अर्थसहाय्य देण्‍यात येणार आहे. व्‍यक्‍ती किरकोळ जखमी झाल्‍यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्‍यात येणार असून खाजगी रूग्‍णालयात औषधोपचार करणे अगत्‍याचे असल्‍यास त्‍याची मर्यादा २० हजार रू. प्रती व्‍यक्‍ती इतकी राहणार आहे.

            वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात गाय, म्‍हैस, बैल यांचा मृत्‍यु झाल्‍यास देण्‍यात येणाऱ्या ६० हजार रू. इतक्‍या रकमेत वाढ करून ती ७० हजार रू. इतकी करण्‍यात आली आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्‍यु झाल्‍यास देण्‍यात येणाऱ्या १० हजार रू. इतक्‍या रकमेत वाढ करून १५ हजार रू. इतकी वाढ करण्‍यात आली आहे. गाय, म्‍हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्‍व आल्‍यास देण्‍यात येणारी १२ हजार इतकी रक्‍कम वाढवून १५ हजार रू. करण्‍यात आली आहे. तसेच गाय, म्‍हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्‍यास देण्‍यात येणारी ४ हजार रू. ची रक्‍कम ५००० रू. इतकी करण्‍यात आली आहे.

            वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात होणारी मनुष्‍यहानी व त्‍यामुळे संबंधित कुटूंबियांची होणारी आर्थिक परवड लक्षात घेता त्‍या पार्श्‍वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा निर्णय महत्‍वपूर्ण मानला जात आहे.

000



 

नोंदिनिकृत स्कूल बस

 नोंदणीकृत स्कुल बस व्यतिरिक्त विशिष्ट स्कूलबससाठी सक्ती करणाऱ्याशाळांची शिक्षण विभागामार्फत चौकशी करणार.

- शंभूराज देसाई.

            मुंबई, दि. 24 : नोंदणीकृत स्कुल बस व्यतिरिक्त विशिष्ट स्कूलबससाठी शाळा सक्ती करीत असल्यास अशा शाळांची शिक्षण विभागामार्फत चौकशी करण्यात येईल. पालकांनी अशा शाळा किंवा बसविषयी तक्रार करावी, या पालकांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.

            राज्यात शालेय बस आणि व्हॅनमधून होणारी विद्यार्थ्यांची वाहतूक असुरक्षित असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य नागोराव गाणार यांनी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

            सन २०२२ - २०२३ या शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक सुरक्षितपणे करण्याच्या दृष्टीकोनातून परिवहन विभागातर्फे राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यामार्फत स्कूल बसची नियमितपणे तपासणी करण्यात येते. यामध्ये अग्निशामक सुविधा नसलेली वाहने, वैध योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने ,वाहनाची रचना नियमाप्रमाणे नसणे, स्पीड गव्हर्नर नसलेली वाहने, विद्यार्थ्यांची धोकादायकरित्या वाहतुक, परिचारक नसलेली वाहने व वैध विमा नसलेली वाहने यांच्या तपासणीच्या सूचना वेळोवेळी निर्गमित केल्या जातात. तसेच शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी सुटीच्या दिवशी तसेच एप्रिल २०२२ व मे २०२२ या महिन्यात प्राधान्याने करण्यात यावेत अशा सूचना सर्व क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आल्या होत्या.

            शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षित वाहतूकीसाठी शासनाने अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम, २०११ लागू केले आहेत व त्याची अंमलबजाणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती गठीत करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक शाळेत प्राचार्याच्या अध्यक्षतेखाली एक परिवहन समिती गठीत करण्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या समितीने शाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने आण करणे, परिवहन शुल्क, बसथांबे निश्चित करणे, याबाबींकडे लक्ष देण्यासाठी तसेच वाहनाचे कागदपत्रे जसे नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, वायुप्रदुषण प्रमाणपत्र, वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती, अग्निशमन सुविधा, प्रथमोपचार पेटी इत्यादी सुविधाची पडताळणी करणे यासारखी कामे समितीद्वारे पार पाडली जातात. राज्यामध्ये महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बस करीता विनियम) नियम, २०११ मधील तरतुदींनुसार एकूण ४७७४३ इतके स्कूल बस वाहने नोंदणीकृत आहेत.

            कामगारांना किमान वेतन देण्यासाठी कामगार विभागाला निर्देश दिले जातील. किमान वेतन कायद्याप्रमाणे चौकशी करण्यात येईल. नियमापेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल. अपर मुख्य सचिव, परिवहन व शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांच्या समवेत यासंदर्भात बैठक घेऊन विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही नवीन सूचना आहेत त्या लागू केल्या जातील असेही मंत्री श्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

            या लक्षवेधी सूचनेमध्ये सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रवीण दरेकर, ॲड.अनिल परब यांनी सहभाग घेतला.

000000



अनुसूचित जमाती

 अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य कर्मचाऱ्यांचे सेवाविषयकप्रश्न मंत्रीमंडळासमोर मांडणार

- शंभूराज देसाई

            मुंबई, दि. 24 : अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत नियुक्त झालेल्या परंतु जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने अधिसंख्य झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक/ सेवा निवृत्तीबाबत अभ्यासगटाचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.

            अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा व सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्याच्या अनुषंगाने सदस्य अभिजित वंजारी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी उत्तर देतांना मंत्री श्री देसाई यांनी ही माहिती दिली.

            सेवानिवृत्ती विषयक लाभांबाबत सविस्तर अभ्यास करुन शासनास शिफारशी करण्यासाठी तत्कालिन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली होती. या अभ्यासगटाचा अहवाल प्राप्त झाला आहे. अहवालाच्या अनुषंगाने विधी व न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग व वित्त विभागाचे अभिप्राय प्राप्त करुन घेण्यात आले आहेत. हा अहवाल मंत्रिमंडळाच्या निर्णयार्थ सादर करण्यात येणार असल्याचेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.



लक्षवेधी


विधानपरिषद लक्षवेधी :

आश्रमशाळा अनुदानप्रश्नी शासन सकारात्मक

- अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

            मुंबई, दि. 24 : राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी,अनिवासी आश्रमशाळा योजनेतील आश्रमशाळांना अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

            राज्यातील 288 डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय निवासी आश्रमशाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत सदस्य सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी उत्तर देतांना मंत्री श्री. राठोड यांनी ही माहिती दिली.

            केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत स्वयंसेवी संस्थाकडून चालविल्या जाणाऱ्या अनुसूचित जातीच्या आश्रमशाळांना अनुदान देण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकर निवासी,अनिवासी आश्रमशाळा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत सन 2019-20 पासुन 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 63 कोटी निधीची तरतूद करण्यात आली असल्याचेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi