Saturday, 11 June 2022

 लॉन टेनिसमध्ये सुवर्णाची 'आकांक्षा'पूर्ती'


खेलो इंडिया युथ गेम्स'

            पंचकुला, दि. ११: खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस आहे. प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण बनला आहे. एकेका सुवर्णपदकासाठी काट्याची लढाई सुरू आहे. लॉन टेनिसमध्ये सकाळीच महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) कांस्य पदक पटकावले. कडाक्याच्या उन्हात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरेने कर्नाटकच्या सुहिथा मयुरीचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. हा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. आकांक्षाने तीन सेटमध्ये (६-७, ७-६ व ६-४) हा सामना जिंकला.


            पंचकुलातील जिमखाना मैदानावर ही चुरशीची लढत झाली. पहिल्या सेटमध्ये कर्नाटकच्या मुयरीने आघाडी घेतली होती. पहिले चार गुण मिळवल्यानंतर तिने सामन्यावर पकड बनवली. परंतु आकांक्षाने ४-४ आणि ५-५, ६-६ अशी बरोबरी साधली. परंतु ऐनवेळी मुयरीने गुण घेत पहिला सेट जिंकला.


दुसऱ्या सेटमध्येही पहिले पाच गुण घेऊन मयुरी पुढे होती. परंतु आकांक्षाने नंतर खेळ प्रकारात बदल करुन फोरहँड, बॅकहॅडचे फटके मारून तिने गुण घेण्यास सुरूवात केली. सहा-सहा गुण बरोबरी झाली. नंतर आकांक्षाने एक गुण घेत दुसरा सेट (७-६) जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली.


            नेहमीप्रमाणे तिसऱ्या सेटमध्ये मयुरी आघाडीवर राहिली. पहिले चार गुण घेत तिने आकांक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आकांक्षा दोन गुणांवर होती. तेव्हापासून खेळाचा नूर पालटला. दोघीही एकेका गुणांसाठी झगडत होत्या. त्यांना प्रत्येकी तीन अॅडव्हान्टेज मिळाले. परंतु तिसरा महत्त्वाच पॉईंट ही आकांक्षानेच घेतला. चौथाही गुण सहज घेतला. चार-चार अशी बरोबरी झाल्याने मयुरी बॅकफूट गेल्याचे दिसून आले. पाचवा गुणही आकांक्षानेच घेतला. दबावात आलेल्या मयुरीवर तिने पुन्हा एक महत्त्वपूर्ण गुण घेत तिसऱ्या सेटमध्ये (६-४) अशा फरकाने सामना जिंकला.


एकेरीत सहज कांस्य


            मुलींच्या एकेरीत महाराष्ट्राला कांस्यपदक सहजपणे पदक मिळाले. पुण्याच्या वैष्णवी आडकर आणि हरियाणाच्या श्रृती अहलावत यांच्यात कांस्य पदकासाठी सामना होता. परंतु या सामन्यात श्रृती गैरहजर राहिली. त्यामुळे वैष्णवी कांस्यपदकाची मानकरी ठरली.


क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आकांक्षाचा उत्साह वाढविला


            एकेरीत सुवर्णपदक पटकावणारी आकांक्षा ही नवी मुंबईतील एएसए अकादमीत सराव करते. प्रशिक्षक अरूण भोसले यांच्यासोबत महाराष्ट्राचे क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे, ओएसडी व्यंकेश्वर, खो-खोचे प्रशिक्षक उदय पवार यांनी सामन्यास उपस्थित राहून आकांक्षाला प्रोत्साहन दिले. ती पिछाडीवर असतानाही मानसिक बळ देण्याचे काम त्यांनी केले. क्रीडा मंत्री सुनील केदार व आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनीही शुभेच्छा देत खेळाडूंचा उत्साह वाढविला.


सायकलिंगमध्ये रौप्य, टेटेमध्ये मुली फायनलमध्ये


            रोड सायकलिंगमध्ये मास स्टार्ट प्रकारात सिद्धेश पाटीलने रौप्यपदक पटकावले. तो पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू आहे. टेबल टेनिसमध्येही मुलींनी महाराष्ट्राचा हरियानात डंका वाजवला आहे. त्यांचा अंतिम सामना सायंकाळी सहा वाजता हरियाणासोबत होणार आहे. दिया चितळे व स्वस्तिका घोष (दोघीही मंबई) या हरियाणाच्या सुहाना सैनी व चक्रवर्ती यांच्यासोबत लढतील.


 


000000


 


 


 


 



 महाराष्ट्र - राज्यसभा द्विवार्षिक निवडणूक- 2022 निकाल जाहीर.

            मुंबई, दि. 11 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी काल दिनांक 10 जून 2022 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून या राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीत 7 उमेदवारांपैकी 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहे.

            विजयी उमेदवारांच्या निवडणूक क्रमवारीनुसार पीयूष वेदप्रकाश गोयल यांना पहिल्या फेरीत 4800 मत मूल्य, डॉ.अनिल सुखदेवराव बोंडे यांना पहिल्या फेरीत 4800 मत मूल्य मिळाले आहे. इम्रान प्रतापगढी यांना पहिल्या फेरीत 4400 मत मूल्य मिळाली आहे. प्रफुल मनोहरभाई पटेल यांना पहिल्या फेरीत 4300 मत मूल्य मिळाली असून संजय राजाराम राऊत यांनाही पहिल्या फेरीत 4100 मत मूल्य मिळाली आहेत. तर धनंजय भीमराव महाडिक यांना तिसऱ्या फेरीत 4156 मत मूल्य मिळाली असून हे सर्व 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहे.

            महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांनी केलेल्या मतदानात 284 वैध मते ठरली होती.


 

 पवित्र प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या नियुक्त्यांबाबतवयक्तिक मान्यतेची आवश्यकता नाही .           प्रा.वर्षा गायकवाड

            मुंबईदि. 10- पवित्र प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या/ येत असलेल्या/ येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या नियुक्त्यांबाबत संबंधित उमेदवाराचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी यापुढे वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाहीअसे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

            या शासन निर्णयानुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिकमाध्यमिकउच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयेअध्यापक विद्यालये तसेच विद्यानिकेतने इ.संस्थांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे नियुक्त झालेल्या उमेदवारांबाबत संबंधित शैक्षणिक संस्थांनी नियुक्ती आदेश निर्गमित केल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या पदास शासन अनुदान अनुज्ञेय असल्यास त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्याचे नाव शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्याबाबत प्रस्ताव संबंधित संस्थांनी नियुक्ती दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत संबंधित उपसंचालक कार्यालयात सादर करावा. उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याबाबतचे प्रस्ताव संबंधित विभागाचे विभागीय अध्यक्षविभागीय परीक्षा मंडळ यांच्या कार्यालयात सादर करावा. वरील प्रमाणे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित उपसंचालक यांनी आवश्यक तपासणी करून एक महिन्याच्या कालावधीत संबंधित उमेदवाराचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

            वैयक्तिक मान्यता देताना शिक्षणाधिकाऱ्यांकडून विलंब होत असल्यामुळे शिक्षकांना वेळेवर वेतन सुरू करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याबाबतची मागणी लोकप्रतिनिधीशिक्षक संघटना यांच्यामार्फत वेळोवेळी करण्यात येत असल्याने यामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. तसेच उच्च न्यायालयाने देखील अशा विविध प्रकरणांमध्ये वैयक्तिक मान्यता व शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ठ करण्याची कार्यपद्धती सुस्पष्टसोपी व सुटसुटीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.

            या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी पदभरती केलेल्या तथापि या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत प्रदान न केलेल्या वैयक्तिक मान्यतांबाबत संबंधित शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व संस्थांना लेखी पत्र नोंदणीकृत डाकेद्वारे पाठवून त्यांच्या संस्थेतील ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता अद्यापि प्राप्त झालेली नाहीअशा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव त्याबाबत सर्व आवश्यक माहितीसह तीन महिन्यात सादर करणे आवश्यक राहीलअसे कळवावे असेही या शासननिर्णयाद्वारे निर्देशित करण्यात आले आहे.

            सदरहू तीन महिन्यांच्या कालावधीनंतर संबंधित शैक्षणिक संस्थांना या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी भरती केलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांबाबत अथवा शिक्षकांबाबत वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव सादर करता येणार नाही. तसेचसंबंधित शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक/ विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देखील अशा पध्दतीने विहीत कालावधीनंतर प्राप्त झालेल्या वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही करणे अनुज्ञेय राहणार नाही.

00000


-                                                  प्रा.वर्षा गायकवाड

            मुंबई, दि. 10- पवित्र प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या/ येत असलेल्या/ येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या नियुक्त्यांबाबत संबंधित उमेदवाराचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी यापुढे वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

            या शासन निर्णयानुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये तसेच विद्यानिकेतने इ.संस्थांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे नियुक्त झालेल्या उमेदवारांबाबत संबंधित शैक्षणिक संस्थांनी नियुक्ती आदेश निर्गमित केल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या पदास शासन अनुदान अनुज्ञेय असल्यास त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्याचे नाव शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्याबाबत प्रस्ताव संबंधित संस्थांनी नियुक्ती दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत संबंधित उपसंचालक कार्यालयात सादर करावा. उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याबाबतचे प्रस्ताव संबंधित विभागाचे विभागीय अध्यक्ष, विभागीय परीक्षा मंडळ यांच्या कार्यालयात सादर करावा. वरील प्रमाणे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित उपसंचालक यांनी आवश्यक तपासणी करून एक महिन्याच्या कालावधीत संबंधित उमेदवाराचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

            वैयक्तिक मान्यता देताना शिक्षणाधिकाऱ्यांकडून विलंब होत असल्यामुळे शिक्षकांना वेळेवर वेतन सुरू करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याबाबतची मागणी लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना यांच्यामार्फत वेळोवेळी करण्यात येत असल्याने यामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. तसेच उच्च न्यायालयाने देखील अशा विविध प्रकरणांमध्ये वैयक्तिक मान्यता व शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ठ करण्याची कार्यपद्धती सुस्पष्ट, सोपी व सुटसुटीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.

            या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी पदभरती केलेल्या तथापि या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत प्रदान न केलेल्या वैयक्तिक मान्यतांबाबत संबंधित शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व संस्थांना लेखी पत्र नोंदणीकृत डाकेद्वारे पाठवून त्यांच्या संस्थेतील ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता अद्यापि प्राप्त झालेली नाही, अशा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव त्याबाबत सर्व आवश्यक माहितीसह तीन महिन्यात सादर करणे आवश्यक राहील, असे कळवावे असेही या शासननिर्णयाद्वारे निर्देशित करण्यात आले आहे.

            सदरहू तीन महिन्यांच्या कालावधीनंतर संबंधित शैक्षणिक संस्थांना या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी भरती केलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांबाबत अथवा शिक्षकांबाबत वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव सादर करता येणार नाही. तसेच, संबंधित शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक/ विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देखील अशा पध्दतीने विहीत कालावधीनंतर प्राप्त झालेल्या वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही करणे अनुज्ञेय राहणार नाही.

00000



 आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी युवक-युवतींना आयटीआयमधूनमिळणार व्यवसाय प्रशिक्षण


कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

· प्रवेशाकरीता गुणांकनाची कोणतीही अट नाही

· भरकटलेल्या युवक-युवतींना मूळ प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन होणार

            मुंबई, दि. 10 : नक्षलग्रस्त जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात 2 नवीन आयटीआय सुरु करण्यात येत असून यामध्ये नक्षलग्रस्त शरणार्थी किंवा त्यांच्या पाल्यांना राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नक्षलवादातून शरण आलेल्या व आत्मसमर्पण केलेल्या युवक-युवतींसाठी या आयटीआयमध्ये प्रवेशाकरीता गुणांकनाची कोणतीही अट असणार नाही, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केली.

            मंत्री श्री. टोपे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात पालांदूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि गडचिरोली जिल्ह्यात जिमलगट्टा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) या दोन नवीन आयटीआय यासाठी सुरु करण्यात येत आहेत. प्रवेश सत्र 2022 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. या विद्यार्थ्यांना आयटीआयच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून सूट देण्यात आली असून त्यांना संस्थास्तरावर प्रवेशाची संधी मिळणार आहे. नक्षली चळवळीतून शरण आलेल्या युवक-युवतींना कौशल्यावर आधारित रोजगाराभिमुख व्यवसाय प्रशिक्षण देणे आणि त्याद्वारे त्यांना मूळ प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. या दृष्टीने विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

            मंत्री श्री. टोपे म्हणाले, या दोन्ही आयटीआयमध्ये मिळून एकूण 360 विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. दोन्ही आयटीआयमध्ये जोडारी, विजतंत्री (इलेक्ट्रिशीयन), तारतंत्री (वायरमन), यांत्रिक मोटारगाडी आणि सुइंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल. पालांदूर येथील आयटीआय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर जिमलगट्टा (जि. गडचिरोली) आयटीआयच्या कार्यशाळा इमारत बांधकामासाठी 13 कोटी 18 लाख रुपयांच्या मान्यतेचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रक्रियेत आहे. सध्या हे आयटीआय अलापल्ली (जि. गडचिरोली) येथे तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात येत असून जिमलगट्टा येथील कार्यशाळा इमारत बांधकामास लवकरच मान्यता देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

            नक्षलग्रस्त भागातील युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास ते अतिरेकी कारवायांकडे जाण्यापासून परावृत्त होतील. त्याचबरोबर यामुळे नक्षलवादी चळवळीला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री श्री. टोपे यांनी व्यक्त केला.


००००



 

बालकामगार

 बालमजुरी प्रथेविरोधात एकत्र या

                                         - कामगार मंत्री हसन मुश्रीफ

· 14 वर्षाखालील शोषित मुलांची माहिती तत्काळ नजीकच्या कामगार आयुक्त कार्यालय तसेच हेल्पलाईन क्र. 1098 वर कळविण्याचे नागरिकांना आवाहन.

            मुंबई दि, 11: बालमजुरीसारखी समाजविघातक अनिष्ठ प्रथा संपविण्यासाठी राज्यातील जागृत जनतेने एकत्र येवून महाराष्ट्रातून बालमजुरी नष्ट करावी. असे आवाहन, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिनानिमित्त राज्यातील जनतेला केले आहे.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यभरातील 14 वर्षाखालील लहान मुले शाळेत न जाता कुठे काम करताना आढळल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ नजीकच्या कामगार आयुक्त कार्यालय अथवा हेल्पलाईन क्र. 1098 वर कळवावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. 

            14 वर्षाखालील सर्व मुलांना घटनेने शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिला आहे. याकरिता राज्यात 14 वर्षाखालील गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. सर्व लहान मुलांनी शाळेत शिकून स्वत:चे व देशाचे भविष्य उज्ज्वल करावे, ही त्यामागील भूमिका आहे. असे असतानाही काही समाजकंटक या कोवळ्या जीवांना बेकायदेशीरपणे स्वत:च्या स्वार्थाकरिता कामावर ठेवून त्यांचे शोषण करतात. या कुप्रथेविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवे. नागरिकांनी सजगता दाखवून अशा समाजकंटकाची माहिती शासन यंत्रणेस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अशा समाजकंटकांविरुद्ध खात्रीशीर कारवाई करण्यात येईल, तसेच पिळवणूकग्रस्त बालकास पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

0000000



ब्लॅक hole

 The Black Hole is a British movie based on human greed. The 3-minute movie stuns the audience with its shocking ending. The film won 4 international awards. The black hole in the human brain or the black hole of greed that is never filled. This clip is worth watching several times.


 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथे 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या (बी.एस्सी.) महाविद्यालय स्थापन करण्याबाबत 16 मार्च 2021 रोजी शासन मान्यता देण्यात आली.

· शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालय स्थापन करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) धोरण ठरविण्यास 23 सप्टेंबर 2021 रोजी शासन मान्यता देण्यात आली. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत औरंगाबाद, लातूर, अकोला आणि यवतमाळ येथे नव्याने स्थापित झालेले अतिविशेषोपचार रुग्णालय कार्यान्वित करण्याकरिता शासनाच्या निर्गमित केलेल्या पीपीपी धोरणानुसार चालविण्याकरिता प्राथमिक स्वरुपात औरंगाबाद व लातूर या संस्थेकरिता REoI प्रसिध्द करण्यात आला आहे.

· महाराष्ट्रातील तृतीयक आरोग्य सेवेसाठी (Tertiary Healthcare Services) पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय शिक्षण सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाचे रणनीतिक सल्लागार म्हणून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेला (आयएफसी) करारबद्ध करण्यासाठी दि.28.09.2021 रोजी करार करण्यात आला आहे.

· शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या (निवासी डॉक्टरांच्या) विद्यावेतनात दरमहा 10 हजार रुपये वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक ०२/०९/२०२० रोजी निर्गमित करण्यात आला असून उक्त वाढ ही दिनांक ०१/०५/२०२० पासून लागू करण्यात आली आहे. तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या (निवासी डॉक्टरांच्या) विद्यावेतनातही दिनांक २५/११/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये रूपये दहा हजार इतकी वाढ करण्यात आली असून उक्त वाढ ही दिनांक ०१/०५/२०२० पासून लागू करण्यात आलेली आहे. याशिवाय राज्यातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालयातील आणि शासन अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील आंतरवासिता प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात दिनांक ०३/०९/२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक ०१/०८/२०१९ पासून रूपये सहा हजार वरून रूपये अकरा हजार इतकी वाढ करण्यात आली आहे.

· आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशांकरीता प्रदेशनिहाय (मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र ) 70 टक्के आणि राज्यस्तरावर 30 टक्के जागांचे वाटप करण्यात येत होते. त्यानुसार संबंधित प्रदेशातील आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या जागांपैकी 70 टक्के जागा त्याच प्रदेशातुन 10 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता राखीव ठेवण्यात येत होत्या. तर उर्वरित 30 टक्के जागा राज्यातील सर्व उमेदवारांकरीता उपलब्ध करण्यात येत होत्या.आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशांकरीता गुणवत्तेनुसार समान संधी प्राप्त होण्यासाठी आणि सदर प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थी यांच्याकडुन सातत्याने मागणी होत होती. त्यानुसार 7 सप्टेंबर 2020 रोजी अधिसूचना काढण्यात आली आहे. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता लागु असलेले प्रादेशिक आरक्षण (70:30 कोटा पध्दत) रद्द करण्यात आले असुन आता राज्यस्तरावर गुणवत्तेनुसार आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांचे प्रवेश करण्यात येत आहेत.

· शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत सहायक प्राध्यापक (गट-ब) या संवर्गातील अध्यापकांना नियमित वेतनश्रेणी ऐवजी रु. 1,10,000/- (गोंदिया, चंद्रपूर, धुळे, यवतमाळ, अंबाजोगाई व नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच आरोग्य पथक, पालघर येथील सहायक प्राध्यापक) व रु. 1,00,000/- (उर्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर संस्थांमधील सहायक प्राध्यापक) या दराने एकत्रित मानधन जानेवारी 2021 पासून देण्यात येत आहे.

· नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा करिता पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

· वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सक्षमीकरणासाठी संचालनालयाच्या स्तरावर एकूण 19 नियमित पदे व बाह्यस्त्रोताद्वारे सेवा देण्यासाठी 14 अशी 33 पदे तसेच प्रादेशिक स्तरावरील सहसंचालक कार्यालयासाठी 22 नियमित व बाह्यस्त्रोताद्वारे सेवा देण्यासाठी 06 अशी एकूण 28 पदे निर्माण करण्याचा निर्णय 6 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या पदांमध्ये आयुक्त (वैद्यकीय शिक्षण) या पदाचा अंतर्भाव असून आयुक्त (वैद्यकीय शिक्षण) हे पद निर्माण करण्यात आले असून त्यावर भा.प्र.से. संवर्गातील अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

· प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथे अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करण्यासाठी प्रथम टप्प्याकरिता एकूण 888 पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात आली.

· डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयनांदेड येथे 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या (बी.एस्सी.) महाविद्यालय स्थापन करण्याबाबत 16 मार्च 2021 रोजी शासन मान्यता देण्यात आली.

·                 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालय स्थापन  करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) धोरण ठरविण्यास 23 सप्टेंबर 2021 रोजी शासन मान्यता देण्यात आली. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत औरंगाबाद, लातूर, अकोला आणि यवतमाळ येथे नव्याने स्थापित झालेले अतिविशेषोपचार रुग्णालय कार्यान्वित करण्याकरिता शासनाच्या निर्गमित केलेल्या पीपीपी धोरणानुसार चालविण्याकरिता प्राथमिक स्वरुपात औरंगाबाद व लातूर या संस्थेकरिता REoI प्रसिध्द करण्यात आला आहे.

·                 महाराष्ट्रातील तृतीयक आरोग्य सेवेसाठी (Tertiary Healthcare Services) पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय शिक्षण सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाचे रणनीतिक सल्लागार म्हणून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेला (आयएफसी) करारबद्ध करण्यासाठी दि.28.09.2021 रोजी करार करण्यात आला आहे.

·                 शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या (निवासी डॉक्टरांच्या) विद्यावेतनात दरमहा 10 हजार रुपये वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक ०२/०९/२०२० रोजी निर्गमित करण्यात आला असून उक्त वाढ ही दिनांक ०१/०५/२०२० पासून लागू करण्यात आली आहे. तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या (निवासी डॉक्टरांच्या) विद्यावेतनातही दिनांक २५/११/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये रूपये दहा हजार इतकी वाढ करण्यात आली असून उक्त वाढ ही दिनांक ०१/०५/२०२० पासून लागू करण्यात आलेली आहे.  याशिवाय राज्यातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालयातील आणि शासन अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील आंतरवासिता प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात दिनांक ०३/०९/२०१९ रोजीच्या  शासन निर्णयान्वये दिनांक ०१/०८/२०१९ पासून रूपये सहा हजार वरून रूपये अकरा हजार इतकी वाढ करण्यात आली आहे.

·                 आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशांकरीता प्रदेशनिहाय (मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र ) 70 टक्के आणि राज्यस्तरावर 30 टक्के  जागांचे वाटप करण्यात येत होते. त्यानुसार संबंधित प्रदेशातील आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या जागांपैकी 70 टक्के जागा त्याच प्रदेशातुन 10 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता राखीव ठेवण्यात येत होत्या. तर उर्वरित 30 टक्के जागा राज्यातील सर्व उमेदवारांकरीता उपलब्ध करण्यात येत होत्या.आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशांकरीता गुणवत्तेनुसार समान संधी प्राप्त होण्यासाठी आणि सदर प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थी यांच्याकडुन सातत्याने मागणी होत होती. त्यानुसार 7 सप्टेंबर 2020 रोजी अधिसूचना काढण्यात आली आहे. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता लागु असलेले प्रादेशिक आरक्षण (70:30 कोटा पध्दत) रद्द करण्यात आले असुन आता राज्यस्तरावर  गुणवत्तेनुसार आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांचे प्रवेश करण्यात येत आहेत.

·                 शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत सहायक प्राध्यापक (गट-या संवर्गातील अध्यापकांना नियमित वेतनश्रेणी ऐवजी रु. 1,10,000/- (गोंदियाचंद्रपूरधुळेयवतमाळअंबाजोगाई व नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच आरोग्य पथक, पालघर येथील सहायक प्राध्यापकव रु. 1,00,000/- (उर्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर संस्थांमधील सहायक प्राध्यापकया दराने एकत्रित मानधन जानेवारी 2021 पासून देण्यात येत आहे.

·                  नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयनंदुरबारशासकीय वैद्यकीय महाविद्यालयअलिबागशासकीय वैद्यकीय महाविद्यालयसिंधुदुर्ग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसातारा करिता पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

·                  वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सक्षमीकरणासाठी संचालनालयाच्या स्तरावर एकूण 19 नियमित पदे व बाह्यस्त्रोताद्वारे सेवा देण्यासाठी 14 अशी 33 पदे तसेच प्रादेशिक स्तरावरील सहसंचालक कार्यालयासाठी 22 नियमित व बाह्यस्त्रोताद्वारे सेवा देण्यासाठी 06 अशी एकूण 28 पदे  निर्माण करण्याचा निर्णय 6 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.  या पदांमध्ये आयुक्त (वैद्यकीय शिक्षण) या पदाचा अंतर्भाव असून आयुक्त (वैद्यकीय शिक्षण) हे पद निर्माण करण्यात आले असून त्यावर भा.प्र.से. संवर्गातील अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

·                 प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयअकोलायवतमाळलातूर व औरंगाबाद येथे अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करण्यासाठी प्रथम टप्प्याकरिता एकूण 888 पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात आली.

·                 

Featured post

Lakshvedhi